Pages

Sunday, August 28, 2016

माती खाण्यापासुन उत्पन्न होणारे त्रास

माती खाण्यापासुन उत्पन्न होणारे त्रास

विशेषतः स्रियांमध्ये माती खडु  खाण्याची सवय पाहावयास मिळते.
शरीरातील रक्त धातु कमी झाल्यावर माती खडु गेरू खाण्याची इच्छा होते आणि बरयाच स्रिंया व लहान मुले माती खडु खात असतात.
  अशा प्रकारे माती खडु खाण्याची सवय असणारयांच्या शरीरावर काय परिणाम होतो ते पाहणे महत्वाचे आहे.
        कुठल्याही प्रकारचे मातीसेवन शरीरातील रसादी सात धातुंना रूक्ष शुष्क बनवुन खाल्लेल्या पदार्थांसही रूक्ष बनविते. मातीचे पचन न झाल्याने ती शरीरातील स्रोतसांत शिरून त्यास बंद करून पांडुरोग उत्पन्न करते.

पांडु रोगाची सामान्य लक्षणे

शरीरातील रक्त व चरबी कमी होते, शक्ती कमी होते, इंद्रीये शिथिल होतात, अंग ठेचल्यासारखे होते, मन फार कोमल होते, डोळ्याचे कोनाडे सुजतात, राग अत्याधिक येतो, वारंवार थुंकणे, थोडे बोलणे, अन्न व थंड पदार्थ न अावडणे, केस गळणे, भुक मंदावणे, माड्यां गळुन जाणे, ताप, दम लागणे, चक्कर येणे, कानात गुजगुज होणे, श्रमाशिवाय थकवा येणे अश्या प्रकारचे त्रास होतात..
    योग्य शास्रोक्त आयुर्वेदीय उपचार घेतले तर अशा त्रासापासुन मुक्तता मिळु शकते.. नाहीतर कावीळ पासुन ते गाठी पर्यंतचे सर्व आजार उपद्रव स्वरूपी होऊ शकतात.
माती खडु आदी खाण्याची सवय असणारयांनी नजिकच्या चांगल्या वैद्याकडुन तपासणी करून औषधी पथ्यापथ्य पंचकर्मांचा सल्ला अवश्य घ्यावा.

वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद नांदेड

No comments:

Post a Comment