Pages

Wednesday, March 15, 2017

बल (शक्ती) कमी करणारी कारण

👇🏻बल (शक्ती) कमी करणारी कारणे💪🏻

अभिघाताभ्दयात्क्रोधाच्चिन्तया च परिश्रमात् |
धातूनां संक्षयाच्छोकाद्बलं संक्षीयते नृणाम् ||

अभिघाताने --- शस्र वा इतर कुठल्याही कारणाने मार लागला असेल तर शक्ती कमी होते.
    
मानसिक वेगांमुळे
मनात नेहमी भिती राग चिंता दुःख यापैकी कुठल्याही १ कारणाने शक्ती कमी होते. कारण भिती चिंता व राग आदी कारणांनी अन्नपचन योग्य रितीने न झाल्याने शरीराचे पोषण होत नाही.

परिश्रमाने -- अत्याधिक प्रमाणात परिश्रमाने देखील शरीरातील शक्तीचा क्षय होतो.

धातुंचा क्षय -- कुठल्याही कारणाने शरीरातील रस रक्तादी ७ धातूचा क्षय होत असेल तर बल कमी होते.
       उदाहरण पाहावयाचे झाल्यास मुळव्याध असताना जीव रूपी रक्त शरीरातुन बाहेर पडते. अधिक प्रमाणात रक्त शरीरातुन बाहेर पडले तरी देखील बल कमी होते.
   बल कमी कारणारया कारणानुसार काही वेळा मानसिक वेगांचे धारण व मनावरील उपाय जे शास्रात सांगितलेले आहे ते करावे लागतात.
           सप्तधातुंपैकी कुठल्याही धातुचा क्षय असेल तर त्या धातुंना वाढविणारया आहार विहार औषधींचा बलवर्धनार्थ उपयोग करावा लागतो.
           परिश्रमासाठी सद्यतर्पण श्रमनाशक आहार औषधींचा उपयोग करावा लागतो..
  शक्ती  वर्धनार्थ फक्त पौष्टीक पदार्थ खुप वेळा कामी येत नाहीत.

वैद्य गजानन मॅनमवार
Mob -- 9028562102, 9130497856

No comments:

Post a Comment