Pages

Wednesday, November 2, 2016

थंडीच्या काळातील आहार

🌿 थंडीच्या काळातील आहार 🌿

गोधुमपिष्टमाषेक्षुक्षीरोत्थविकृतीः शुभाः |
नवमन्नं वसां तैलं... || वा.सु.३/१२-१३

गव्हाच्या पीठापासुन बनविलेले पदार्थ, उडीद दाळ, ऊसाचा रस, गुळाचे पदार्थ, दुधापासुन निर्मित पदार्थ ( दही, पनीर, ताक, लोणी,तुप आदी ) नविन तांदुळाचा भात, वसा, तेल यांचे सेवन थंडीच्या काळात करावे.

🍚 हिवाळ्यातील दही 🍚

गुरू स्निग्धं सुमधुरं कफकृद्वलवर्धनम् |
वृष्यं मेध्यश्च हैमन्तं पुष्टिदं तुष्टिवृध्दिदम्||
वृष्यं बलकरं पैत्तं श्रमस्यापहरं परम्|
शैशिर सघनं चाम्लं मधुरं पिच्छलं गुरू||  हारितसंहिता

हेमंत रूतुमधील दही पचावयास जड, स्नेहयुक्त, गोड कफबलवर्धक, बुध्दीवर्धक, तुष्टी पुष्टी, संतोषकारक असते.
शिशिर रूतुमधील दही बलवर्धक, शुक्रवर्धक, पित्तवर्धक, श्रेष्ठ श्रमहरण करणारे, घन (घट्ट) गुणाचे, आंबट गोड चविचे, गुळगुळीत, पचावयास जड असे असते.

दही खाताना खालील नियम पाळावेत.

1⃣ कधीही रात्री दही खाऊ नये.

2⃣तुप वा साखरेशिवाय दही कधीही खाऊ नयेत.

3⃣ मुगाच्या युषाशिवाय वा मधाशिवाय दही खाऊ नयेत.

4⃣ गरम करून कधीही दही खाऊ नयेत.

5⃣  किंवा आवळ्याशिवाय दही खाऊ नयेत.

वरील नियमाशिवाय दहीसेवन केले तर शरीरातील दोष बिघडुन ताप, रक्तपित्त, विसर्प, त्वचाविकार, पाण्डुरोग, भ्रम, उग्र कावीळ आदी आजार उत्पन्न होऊ शकतात...

वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद नांदेड
Mob no -- 9028562102, 9130497856

No comments:

Post a Comment