Pages

Wednesday, November 2, 2016

भोजन केव्हा करावे?

  जेवण केव्हा करावे? 
     हा प्रश्न आपल्याला केव्हा पडतो तर, जेव्हा वजन वाढलेले असते, डायटिंग करायची असते, डायबेटीस झालेला असतो किवा थोडक्यात आरोग्यविषयक ताक्रारी वाढतात तेव्हा हा प्रश्न पडतो. जिज्ञासेपोटी, आरोग्याची काळजी म्हणून, त्यामागील विज्ञान जाणून घ्यायच म्हणून असा प्रश्न आम्हाला कोणी विचारेल ऐसा नर दुर्लभच.
               सकाळी उशिरा उठणे, रात्री फार वेळ जगणे, उशिरा घरी येणे ह्या आजच्या चाली रिती आहेत. त्यामुळे अवेळी जेवण हि प्रथा रूढ होते आहे. अवेळी, भूक नसताना, अप्रसन्नचित्त असताना जेवण करणे अपेक्षित नाही हे अन्न आपल्याला पोषक ठरणार नाही.
   मग जेवायचं केव्हा?
  • त्या दिवशी आंघोळ स्वतःची आंघोळ झालेली हवी( भूक चांगली लागते)
  • आंघोळी आधी काहीही खाऊ नये.(अन्न नित पचत नाही)
  • आधी खाल्लेला आहार पचला आहे का? ह्याची खात्री करून घ्यावी.(भूक लागलेली असणे हि खात्री)
  • सूर्योदयानंतर , सुर्योदयापूर्वी ( अन्नपचन चांगले होते.)
  • आपली खरी भूक ओळखून जेवणाच्या वेळा फिक्स करणे.(वेळ झाली म्हणून न जेवता भूक लागली तेव्हा जेवणे म्हणजे खरी भूक)
जेवणाच्या वेळा पाळणे खूप महत्वाचे आहे ह्याने आपल्याला बऱ्याच रोगांपासून दूर राहता येईल. “किती जेवावे” हा विषय लवकरच लिहील.
 © वैद्य भूषण मनोहर देव.
 ज्योती अयुर्वेद
जळगाव 
8379820693




   

No comments:

Post a Comment