Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Tuesday, October 18, 2016

स्त्रियांत आजाराची कारणे

🍀 स्रियांत आजारांची कारणे 🍀

विरूध्दमद्याध्यशनादर्जीर्णादगर्भप्रपातादतिमैथुनाच्च | यानाध्वशोकाद्तिकर्षणाच्च भाराभिघाताच्छयनाद्दिवा च||                    वंगसेनस्रिरोगाधिकार

स्रियांत विरूध्द अन्न उदा. दुध+मीठ, मुगाची खिचडी+ दुध, शिळे वा दोन वेळा गरम केलेले अन्न आदी विरूध्द अन्न व विरूध्द क्रिया फ्रीजचा वापर केल्याने स्रियांत आजार उत्पन्न होतात.
            पुर्वीचे अन्न पचले नसताना देखील पुन्हा जेवन केल्याने स्रियांत आजार उत्पन्न होतात. जेवन केल्यानंतर पुन्हा पहिल्या ३ तासात काही खाऊ नये व ६ तास काही खाल्ल्याशिवाय राहु नये.
         नेहमी अजीर्ण होत असेल तर स्रियांचे विकार उत्पन्न होतात. अजीर्ण होउ नये याकरिता योग्य वेळी म्हणजे भुक लागली असता हितकारक आहार घ्यावा.
           गर्भपात झाला तरीदेखील स्रियांत आजार उत्पन्न होतात. अतिमैथुनाने देखील स्रियांत आजार उत्पन्न होतात. अत्याधिक प्रवास दुचाकीचा अधिक वापर केल्याने देखील स्रियांत आजार उत्पन्न होतात.
    नेहमी शोक दुखामुळे देखील स्रियांत आजार उत्पन्न होतात. कर्षन करणारी कारणे नेहमी उपवास करणे, उपाशीपोटी राहणे, अवजड कामे करणे जड वजन उचलणे, मार लागणे आदी कारणांमुळे स्रियांत आजार उत्पन्न होतात.
          दिवसा जेवणानंतरची झोप आजार निर्मितीचे प्रमुख कारण स्रियांत दिसते. दिवसा झोपल्याने कफपित्तवाढुन कफपित्ताने उत्पन्न आजार डोकेदुखी, अर्धडोकेदुखी वजन वाढने आदी आजार उत्पन्न होतात.
     वरील कारणे टाळली तर स्रियांत आरोग्य राखता येइल. सोबत काही कारणे घडली असतील आणि काही त्रास असल्यास चिकित्सा आहार विहाराचा  योग्य सल्ला जरूर घ्यावा..

      🍀रजस्वला परिचर्या🍀
    (पाळीच्या काळातील नियम)

मासिक रजस्राव सुरू झाल्यानंतर स्रिंयानी पुढील नियमांचे पालन केले असता विविध आजारांपासुन  (pcod, cyst, fibriods) दुर राहता येते......
१.झोपण्यासाठी चटईचा वापर करणे गादी वैगेरे न वापरणे...
२. शारीरीक व मानसिक हिंसा न करणे, ब्रह्मचर्य पालन करणे..
३.सात्विक आहाराचे सेवन करावे...
४.या काळात रडणे, नखे काढणे,अंगाला तैल उटणे लावणे, डोळ्यात काजळ वा अंजन लावणे, स्नान करणे, दिवसा झोपणे, धावणे, मोठे शब्द एेकणे, फार हसणे, फार बोलणे,फार श्रम करणे,भुमिखनन करणे, वारा लागेल ठिकाणी बसणे, अशा वायुला बिघडवणारया प्रकुपित करणारया गोष्टी करू नयेत...
  वरील नियम पाळावेत कारण शरीरातील वायु महिणाभरात जमा झालेले दुषीत रक्त शरीराबाहेर काढतो आणि स्रियांची शारीर शुध्दी करून आरोग्य टिकवतो.जर वरील नियम पाळले नाहीत तर वायुचा प्रकोप होतो आणि प्रकुपीत वायु दुषीत रक्ताला शरीरात पसरवुन वांग, त्वचाविकार, लठ्ठपणा, केस गळणे, pcod,fibriods, cyst.आदी विविध आजार निर्माण करतो....
    स्रियांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी रजस्रावाच्या काळात वरील नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. पाळीच्या तक्रारी ह्याच स्रिंयामध्ये सर्व आजारांसाठी कारणीभुत ठरतात.मासिक पाळीच्या छोट्या मोठ्या तक्रारींसाठी योग्य उपचार केले नाही तर भविष्यात गंभीर दुष्पपरिणामांचा सामना करावा लागतो.

श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद नांदेड
Mob no - 9028562102, 9130497856

No comments:

Post a Comment

Visit Our Page