Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
Showing posts with label शेती. Show all posts
Showing posts with label शेती. Show all posts

Thursday, June 9, 2016

कीटक संकट

# आयुर्वेदातुन आरोग्याकडे

   🐝🐞 कीटकसंकट 🐜🕷

पावसाळ्याचा काळ हा किटकसंकटांचा काळ असतो. आदान काळात मनुष्याचे शरीर दुर्बल असते, सोबतच जाठराग्नि ही दुर्बल बनते. या काळात जमिनीतुन निघणारया बाष्पामुळे, पावसामुळे, काळाच्या परिणामाने पाणी अम्लविपाकी बनत असल्यामुळे जाठराग्नि क्षीण होतो त्यामुळे शरीर व जाठराग्नि (भुक) आणखीणच दुर्बल बनते या काळात.
   म्हणुनच पावसाळ्याच्या काळात साधारणपणे सर्व विधींचे पालन करावे.
    पुर्वी चिकनगुणिया झालेल्या लोकांत सांधेदुखी सुज अत्याधिक असते, मच्छर कीडे मुंग्या सारखे प्राणी चावले की लहान बालकांपासुन मोठ्या लोकांत पिटिका चकते येतात.
मलेरिया डेंगुचा तापही असतो या काळात..
याला कारण बदललेले वातावरण म्हणजे अम्लविपाकी जल, जाठराग्नि व शरीर दुर्बलता हे असते.
पावसाळ्यातील आहार विहाराचे पालन केले तर या त्रासापासुन दुर राहता येईल.. त्रास असल्यास प्रकृती नुसार आहार विहार औषधींचा सल्ला नजिकच्या वैद्याकडुन घेता येईल.

🌥 पावसाळ्यातील आहार विहार 🌧

काही दिवसांनी पावसाला सुरूवात होईलच पावसाळ्यात बाह्य वातावरणात जसे बदल घडतात तसे शरीरातही बदल घडतात. या बदलानुसार आहार विहारीय बदल करणे आवश्यक आहे.
            पावसाळ्यात जेवनासोबत मधाचा अनुपान रूपाने वापर करावा. ज्या दिवशी अधिक थंड वातावरण असते त्या दिवशी शरीरातील वात अधिक प्रमाणात प्रकुपित असतो. त्यादिवशी वाताला कमी करण्यासाठी आंबट मीठ स्नेहयुक्त लोणच्या सारख्या पदार्थांचा उपयोग करावा.
             भुख चांगली राखण्यासाठी जुने यव, गहु, शाली तांदुळ यांचा नित्य उपयोग करावा. सोबतच उकळुन गार केलेले पाणी पिण्याकरिता उत्तम असते.
              पुर्वीच्या उन्हाळ्यातील आहार विहाराचे पालन केलेले नसल्याने उत्पन्न वाताच्या दमा, सांधेदुखी, पडसे, खोकला आदी आजारांसाठी बस्ती आदी वातनाशक शरीरशुध्दीचे उपक्रम वैद्याच्या सल्ल्याने करावेत.

🌧⛈  पावसाळ्यात वर्ज्य गोष्टी ✖

उदमन्थं दिवास्वप्नंमवश्यायं नदीजलम् ||
व्यायाममातपं चैव व्यवायं चात्र वर्जयेत् || च.सु.

पावसाळ्यात पाणी मिसळुन सातु खाणे, दिवसा झोपणे, ओस पडत असताना बाहेर फिरणे, नदीचे पाणी पिणे, व्यायाम करणे, उन्हात फिरणे, व्यवाय मैथुन कर्माचा त्याग केला पाहीजे.

वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेदीय चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड

Tuesday, November 30, 2010

शेती-उद्योग

बदलत्या काळानुसार शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढीस लागला आहे. नत्र,स्फ़ुरद, पालाश या मुख्य खतांसोबतच सुक्ष्मखतांचा (Micro nutrient fertilizers) वापर वाढला आहे. पैकी नत्र,स्फ़ुरद,पालाश या मुख्य खतांची निर्मीतीसाठी प्रचंड गुंतवणुकीचे कारखाने लागतात.

परंतू सुक्ष्मखतांची (Micro nutrient fertilizers) निर्मीती किंवा प्रक्रिया-पॆकिंग करून विपनन करणे हा उद्योग/व्यवसाय म्हणुन अत्यंत चांगला पर्याय ठरू शकतो.
या अनुषंगाने इच्छूकांना मदत व्हावी या उद्देशाने येथे काही कृषीसंबधित करता येण्याजोग्या उद्योगांची एक यादी बनविण्याचा प्रयत्न करित आहे.


१) सुक्ष्मखते (Micro nutrient fertilizers)
पिकांच्या जोमदार वाढीसाठी १६ मुलद्रव्यांची (elements) आवश्यकता असते. त्यापैकी Fe, Zn, Mn, Cu, B, Mo, Cl हे प्रमुख मुलघटक असुन यांच्या एकापेक्षा अधिक मुलघटकांच्या योग्य त्या प्रमाणात मिश्रणाला सुक्ष्मखते म्हणतात. सध्या या सुक्ष्मखंतांना प्रचंड मागणी आहे.
मुलद्रव्यांची (elements) नांवे खालील प्रमाणे.
1) Copper sulphate (CuSO4.5H2O)
2) Zinc sulphate (ZnSO4.7H2O)
3) Borax or Sod.Borate (Na2B4O7.10 H2O)
4) Manganese Sulphate (MnSO4.4H2O)
5) Ammonium Molybdate ( (NH4)6Mo7O24.4H2O)
6) Ferrous sulphate (FeSO4.7H2O)
7) Magnesium sulfate (or magnesium sulphate)
………………………………………………………………………
२) जैविक खते (Bio-fertilizers)
A. Nitrogen fixers
Symbiotic: – Rhizobium, inoculants for legumes.
Non-symbiotic: – For cereals, millets, and vegetables.
a) Bacteria:-
i). Aerobic:-Azatobacter, Azomonas, Azospirillum.
ii) Anaerobic:- Closteridium, chlorobium
iii) Facultative anaerobes- Bacillus, Eisherichia
b) Blue green algae- Anabaena, Anabaenopsis, Nostoe
A. Phosphate solubilizing micro-organisms.
B. Cellulolytic and lignolytic micro-organisms.
C. Sulphur dissolving bacteria.
D. Azolla.
………………………………………………………………………….
३) संप्रेरके - फ़वारणीच्या माध्यमातुन वापर केला जातो.
पिकांची कायीक वाढ, फ़ळांची गुणवत्तासुधारणा, पिकांचा कालावधी
कमि-जास्त करणे वा तत्सम कारणासाठी संप्रेरके वापरली जातात.
सध्या वापरात असलेली काही मुख्य संप्रेरके.
१) आमिनो अ‍ॅसिड – Amino Acid.
२) जिबरेलिक अ‍ॅसिड – Gibberellic acid (also called Gibberellin A3, GA, and (GA3)
३) नॆपथ्यालिक अ‍ॅसेटिक अ‍ॅसिड – NAA
४) ह्युमिक ऎसिड – Humic acid – Fulvic acid organic plant food and root growth promoters
……………………………………………………………………………
१) या उद्योगांसाठी जिल्हा उद्योग केंद्र,खादी-ग्रामोद्योग वा इतर शासकिय विभागांकडून बिजभांडवल स्वरूपात अर्थसाहाय्य होऊ शकते.
२) वर उल्लेखिलेले बहुतांश उद्योग २५ लाखाचे आंत असल्याने पंतप्रधान रोजगार योजनेंतर्गत सबसिडी मिळण्यास पात्र आहेत.
वरिल सर्व उत्पादनांना चांगली मागणी असून मालाची गुणवत्ता व मार्केटिंग
कौशल्य या दोन बाबींच्या आधारावर सहज यशप्राप्ती होऊ शकते.

सेंद्रिय शेती

सेंद्रिय शेती ही संपूर्ण जीवनाला स्पर्श करणारी शेतीची एक पद्धत आहे. या पद्धतीमध्ये माती, पाणी, वनस्पती, मातीतील असंख्य जिवाणू व त्यांचे त्याज्य पदार्थ, पर्यावरण, प्राणी, माणूस, जंगले या सर्वांच्या जीवनचक्राचा शास्त्रीय दृष्टिकोनातून एकमेकांशी कसा संबंध आहे, याचा अभ्यास करून शेती केली जाते.

सेंद्रिय शेतीची उद्दिष्ट्ये -
1. सेंद्रिय शेती पद्धतीने उत्पादनखर्चात कपात.
2. प्रति हेक्‍टरी निव्वळ नफा वाढविणे, विषमुक्त अन्नधान्य, भाजीपाला, फळे तयार करणे.
3. विविध प्रकारच्या प्रदूषणास आळा घालणे.
4. जनावरे व यंत्राच्या शक्तीत बचत व शेती नापिकतेच्या जबाबदारीतून मुक्तता.

100 टक्के सेंद्रिययुक्त जमीन निर्माण झाल्यानंतर त्या भागातील भूगर्भातील पाण्याच्या पातळीत निश्‍चित वाढ होते.
जागतिक स्तरावर, तसेच स्थानिक स्तरावर सेंद्रिय उत्पादनाला होणारी वाढती मागणी, त्यांना मिळणारे जादाचे दर, उत्पादित होणारे विषमुक्त अन्न या बाबींचा विचार करता राज्यातील सेंद्रिय शेती कार्यपद्धतीस प्रोत्साहन देणे व एक राष्ट्रीय चळवळ निर्माण करण्याची गरज आहे.

निर्यातीस सध्या वाव असणारी सेंद्रिय उत्पादनेः कापूस, गहू, तांदूळ, वनौषधी, पापड, लोणची, तीळ, कारळे, मिरची इत्यादी.

सेंद्रिय शेतीमधील अडचणी-
1. आवश्‍यक त्या संशोधनाचा अभाव.
2. पुरेशा प्रमाणात स्थानिक विक्रीयोग्य दुकाने उभी करणे.
3. स्थानिकरीत्या प्रमाणके तयार करून सेंद्रिय शेतीचे स्थानिक स्तरावर प्रमाणके करण्याची मुभा देणे.
4. प्रमाणीकरणाची फी शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी भरावी लागते, ही एक मोठी समस्या आहे; त्यावर उपाय शोधण्याची गरज आहे.
5. प्रक्रिया उद्योगाची कमतरता काढणीपूर्व व काढणीपश्‍चात सुविधा, अद्ययावत प्रशिक्षणाची गरज.

महाराष्ट्र राज्यातील सेंद्रिय शेतीची प्रमाणीकरण करणाऱ्या संस्था -
नौका - पुणे, इकोसर्ट - औरंगाबाद,
एसकेएएएल - मुंबई, आयएमओ - बंगळूर, वन्सरर्ट - जयपूर.
प्रमाणीकरणासाठी नोंद झालेले क्षेत्र - 0.58 लाख हेक्‍टर.

सेंद्रीय शेती पध्दतीत रासाय़नीक खते, किटक-बुरशी नाशके, संजीवके, पशुखाद्यातील घटक यांचा पुर्णतः किंवा मोठ्या प्रमाणावर वापर टाळला जातो.

- या पध्दतीत शक्यतो योग्य पिक पालट, पिकांचे अवशेष, जनावरांचे मलमुत्र, द्विदल धान्ये, हिरवळीचे खते, शेती शिवाय इतर होणारा काडीकचरा, जैविक किडरोग तणनाशके यांच्या वापर करून जमिनीची उत्पादकता व पोद टिकवून पिक घ्यायचे या पध्दतीत हे गृहीत धरले आहे की जमिन हे एक जिवंत माध्यम असून त्यामध्ये शेतीस उपकारकक्षम अशा अनंत जीव-जंतूचे वास्तव्य असते. योग्य वातावरण असल्यास त्यात सतत वाढ होत राहते.

- सेंद्रीय शेतीमध्ये जमिनीतील जीव-जंतूना पुरेसे खाद्य मिळाल्यामुळे त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढून काही संप्रेरके सारखी समिश्रे निर्माण होतात जी वनस्पती वाढीस पोषक असतात. व त्यांची रोग-कीड प्रतीकारक शक्ती वाढण्यास मदत करतात. यामुळे रासायनिक कीड-रोग नाशकांच्या वापर कमी होऊ शकतो.

- सेंद्रीय शेतीतील उत्पादने पौष्टीकता, चव, याबाबतीत सरस असून ती साठवणीत जास्त दिवस चांगली राहतात. तसेच अशा त-हेन उत्पदीत केलेल्या भाजीपाला व फळात नायट्रेट, नायट्रोजनचे व कँडमियम धातूचे प्रमाण कमी असते. रासायनिक खतांच्या अती वापराने सुक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी झाल्याने अन्नधान्य भाजीपाला इत्यादींची पौष्टीकता कमी होते व त्याचा मानवी शरीरावर परीणाम होतो.

सेंद्रिय शेतीमध्ये बीजसंस्कार -
संवर्धकाचा वापर - ऍझोटोबॅक्‍टर आणि अझोस्पायरिलम ही जिवाणू खते हवेतील नत्र स्थिरीकरण करण्यास आणि नत्र पिकास उपलब्ध करून देण्यास मदत करतात.
दहा किलो बियाण्यांस 250 ग्रॅम जिवाणूसंवर्धकांची बीजप्रक्रिया करावी.

सेंद्रिय शेतीमध्ये पीकसंरक्षण-
मित्रकिडीच्या संगोपनासाठी वापर -
पीक मित्रकीड
मका - क्रायसोपा
कोथिंबीर - ट्रायकोग्रामा, मधुमक्षिका
चवळी - लेडी बर्ड बिटल

मुख्य पिकाचे शत्रूकिडीपासून संरक्षण होण्यासाठी सापळा पिके
चवळी - मावा
तीळ - तुडतुडे
अंबाडी - बोंडअळी
तुळशी - रसशोषण करणाऱ्या किडी
झेंडू - पांढरीमाशी, सुत्रकृमी.

Sunday, November 28, 2010

चिंच

हिन्दी इमली (तेलुगू भाषा చింత చెట चिंता चेट्टू चिंतापंडू) Tamarindus indica

लागवड

1) चिच लागवडी विषयी(जमिन स्‍वरूपाची आहे)
  • रोपे कोणत्‍याजातीची असावित
  • रोपे कोठे व किती दराने मिळतील
  • खड्यांचे स्‍वरूप व खड्डे भरण्‍याची पध्‍दत
  • लागवड कोणत्‍या महिण्‍यात करावी
  • उन्‍हाळ्‍यात पाण्‍याची गरज भासते का?
  • बाजार पेठे विषयी माहिती द्‍यावी
  • चिंचलागवड फायदेशिर ठरूशकेल का?
  • सध्‍या शासनाची कोणती योजना आहे का?
चिच हे फळझाड अनेक प्रकारच्या जमिनीत तसेच विविध पाऊसमानाच्या प्रदेशात चांगले वाढते. चिंचेच्या फळाच्या गरातील रंगावरून चिंचेचे पिवळी चिंच आणि लाल चिंच असे दोन प्रकार पडतात. चिंचेच्या झाडाची अभिवृध्दी बियांपासून रोपे तयार करून तसेच कलमे तयार करून केली जाते. इतर फळझाडांचा चिंचेच्या बागेत आंतरपिके म्हणून वापर करता येतो. चिंचेच्या २० वर्षे वयाच्या एका झाडापासून बिया आणि टरफले वेगळी केलेली सुमारे ५०० किलो चिंच मिळते. चिंच रोपांची अथवा कलमांची लागवड करण्यासाठी १ बाय १ बाय १ मीटर आकाराचे खड्डे खणून घ्यावेत. खड्डे भरताना तळाशी १०-१५ सेंटीमीटर उंचीपर्यंत पालापाचोळा टाकावा नंतर खड्डे चांगले कुजलेले शेणखत आणि माती यांच्या मिश्रणाने भरावेत. मातीत १०० ग्रँम बी.एच.सी. (१०टक्के) फॉलीडॉल पावडर मिसळावी. पावसाळ्याच्या सुरुवातीला प्रत्येक खड्ड्यात चिंचेचे एक रोप लावावे आणि लगेच पाणी द्यावे.
चिंच जात- प्रतिष्ठान, आवळा जात- एन.ए.-7, चकैया, कृष्णा, कांचन, एन.ए.-10, सदर जातीची कलमे कृषी विकास प्रतीष्ठानच्या फार्मवर 40 रु. प्रती कलम दराने उपलब्ध आहेत. फोन संपर्क – 02112-254313 किंवा- महात्मा फुले कृषी विद्यापिठ, राहुरी, नर्सरी विभागाशी संपर्क साधावा.
महत्वाचा किडी आणि त्यांचे नियंत्रण - चिंचेच्या फळझाडांवर नुकसानकारक रोग आणि किडींचा उपद्रव शक्यतो होत नाही. काही वेळा खोडअळी आणि गॉलमाशीचा प्रादुर्भाव झाडावर दिसून येतो. खोडअळीच्या नियंत्रणासाठी, खोडावरील छीद्रामध्ये रॉकेल अथवा पेट्रोलने भिजवलेल्या कापसाच्या बोळा टाकून छिद्रे ओल्या मातीने बंद करावीत. गॉलमाशीच्या नियंत्रणासाठी माशीने उपद्रव केलेल्या फांद्या छाटून टाकाव्यात.
फळांचे उत्पादन - चिचेच्या १० वर्षे वयाच्या एका झाडापासून बिया आणि टरफले वेगळी केलेली. १०० ते १५० किलो चिंच मिळते. झाडांच्या विस्तार वाढल्यानंतर चिंचेच्या उत्पादनात वाढ होते. चिंचेच्या पूर्ण वाढ झालेल्या वीस वर्षे वयाच्या झाडापासून ५०० किलोपर्यंत चिंच मिळते. टरफले, शिरा आणि बिया वेगळी केलेली चिंच बाजारात विक्रीसाठी पाठवितात. वाळविलेल्या चिंचेच्या गराची विक्री पूर्ण वर्षभर केली जाते.[१]

पहिला चिंच महोत्सव

औरंगाबादमध्ये कृषी विभाग आणि मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय चिंच महोत्सवाला पाच आणि सहा मार्च २००८ सुरुवात झाली.

आहारातील स्थान

गुणधर्म

  • चिंच सौम्य रेचक म्हणून काम करते.

शेवगा

शेवगा

शेवग्याच्या शेंगा
शेवगा (शास्त्रीय नाव: मॉरिंगा ओलेफेरा) ही भारतातील वनस्पती आहे. शेवगा ही भारतातील खाद्य भाजी आहे. शेवगा या वनस्पतीचे जगभर गेले दशकात महत्त्व वाढले.[ संदर्भ हवा ]

वनस्पतीची रचना

शेवग्याच्या झाडाच्या खोडाचे चित्र
शेवग्याच्या झाडाला आलेला फुलोरा व पाने

उपयोग

  • शेवगा बियापासून जे तेल निघते, त्याला बेन ऑइल म्हणतात. हे तेल सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूत वंगण म्हणून वापरतात.
  • वाळलेल्या शेवगा बियांचे चूर्ण पाणी र्निजंतूक करण्यासाठी जगभर वापरल्या जाते. जागतिक आरोग्य संघटनेने दर १०००लि.पाणी र्निजंतुक करण्यास ८०० ग्रॅम चूर्ण वापरावे असे सुचित केले आहे. त्यामुळे शेवगा बियांचे चूर्ण भारतातून जगभर निर्यात होते.

प्रजाती  

  • जाफना प्रजाती - ही स्थानिक प्रजाती आहे. याच्या शेंगा चवदार असतात. वाणाचे वैशिष्टय़ - एका देठावर एकच शेंग येते. ती २० ते ३० सें.मी. लांब असते.
  • कोकण रुचिरा - हा वाण कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केला आहे. कोकणासाठी शिफारस केली आहे. या झाडाची उंची ५ ते १६ मीटर इतकी असते.
  • पी. के. एम. १ - हा वाण तामीळनाडू कृषी विद्यापीठाचे पेरीया कुलम फळबाग संशोधन केंद्राने विकसित केला आहे. हा वाण चवदार आहे.
  • पी. के. एम. २ - हा वाणही तामिळनाडू कृषी विद्यापीठाने विकसीत केला आहे. - बेन ऑइलसाठी व पाणी शुद्ध करण्यासाठी याच वाणाला प्राधान्य दिले जाते.

इतर प्रकार

  • दत्त शेवगा कोल्हापूर
  • शबनम शेवगा
  • जी.के.व्ही.के. १ आणि जी.के.व्ही ३
  • चेन मुरिंगा
  • चावा काचेरी

अधिक वाचन

खालील पुस्तके उपलब्ध आहेत.
  • शेवगा - लेखक  वि. ग. राऊळ
  • शेवगा लागवड -लेखक डॉ. ठोंबरे
  • शेवगा -  लेखकडॉ. राहूडकर.

Visit Our Page