Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Sunday, October 30, 2011

उतारवयात अनुभवा कामजीवन!

कामजीवन ही केवळ तरुणाईची मक्तेदारी आहे, हा एक सर्रास गैरसमज आहे. आपल्याकडील संवेदनशील सांस्कृतिक जडणघडणीमुळे हा चुकीचा प्रवाद पसरला आहे. वार्धक्यातही जोडप्यांना कामसुखाची गरज असते. कामक्रीडांमुळे शरीराचे विविध व्यायाम घडून येतात. संशोधकांना आढळलंय की कामजीवनाचं सौख्य लुटणाऱ्या वयोवृद्ध जोडप्यांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण ५०० टक्क्यांनी कमी असतं.

... 

साठीकडे झुकल्यावर माणसाची कामातुरता कमी होते, हा एक सर्रास गैरसमज आहे. अमेरिकेत एकदा ५० ते ९२ वयोगटातील ४३४६ स्त्री-पुरुषांचं सवेर्क्षण घेण्यात आलं होतं. तेव्हा, साठी-सत्तरीतल्या वृद्धांनी स्पष्ट कबुली दिली होती की, त्यांचं कामजीवन सुरळीत चालू असून, त्यात त्यांना खूप रस वाटतो. ही सगळी शिकली सवरलेली मध्यमवगीर्य मंडळी होती. खरंतर वृद्धापकाळातही कामजीवन आपणास साथ देतं, हे वास्तव तरुण मंडळींनाही उत्साहवर्धक वाटणारं आहे. या सवेर्क्षणात, अडतीस वर्षं संसार केलेली बाई म्हणाली होती, 'माझा नवरा बाहेरून परत येणार असतो, तेव्हा मी त्याची आतुरतेनं वाट पाहत बसते. फोनवर त्याचा आवाज ऐकला किंवा त्याने घातलेली शीळ ऐकली की माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात.'

सदुसष्ट वर्षांचे एक गृहस्थ म्हणाले होते, 'शाळेत असताना आम्ही प्रेमात पडलो अन् सरत्या काळात आमचं प्रेम वाढत गेलं. अजूनही आमच्या प्रेमाचा आलेख वर वर चढतोय.' आणि त्या सर्व प्रौढ दाम्पत्यांनी आपल्या संसारसुखाचं श्ाेय त्यांच्या निरामय कामजीवनास दिलं होतं.

वाढत्या वयानुसार माणसाच्या जिभेची चव, श्रवणशक्ती, दृष्टी, शारीरिक ताकद कमी होते, त्या प्रमाणे कामातुरतेवरही परिणाम होत असतो. शिवाय हृदयविकार, मधुमेहासारखे आजार त्यांच्या कामजीवनात अडथळे बनतात. पण या आजारांमुळे कामशक्ती ऱ्हास पावते असं मात्र मुळीच नाही.

कामजीवन ही केवळ तरुणाईची मक्तेदारी आहे, हा एक सर्रास गैरसमज आहे. आपल्याकडील संवेदनशील सांस्कृतिक जडणघडणीमुळे हा चुकीचा प्रवाद पसरला आहे. वार्धक्यातही जोडप्यांना कामसुखाची गरज असते. कामक्रीडांमुळे शरीराचे विविध व्यायाम घडून येतात. संशोधकांना आढळलंय की कामजीवनाचं सौख्य लुटणाऱ्या वयोवृद्ध जोडप्यांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण ५०० टक्क्यांनी कमी असतं. नियमित वीर्यपात होणाऱ्या पुरुषांचा मूत्रनलिकेतील प्रोस्टेट ग्रंथीच्या कर्करोगापासून बचाव होतो. कामसुखामुळे वयोवृद्धांच्या शरीरातील रक्तदाबावर अनुकूल परिणाम होतो. शरीराचे मांसल स्नायू कार्यरत राहतात. संप्रेरकाचं सवण नियंत्रित राहतं आणि शरीरातील विविध ग्रंथींची पुनर्रचना होण्यास मदत होते.

इंग्लंडमधील रॉयल एडिनबर्ग इस्पितळातील डॉ. डेव्हिड क्लिस यांनी १९ ते १०२ वयोगटातील ३५०० जणांचं शास्त्रोक्त सवेर्क्षण केलं होतं. तेव्हा त्यांना आढळलं होतं की आठवड्यातून तीनदा समागम करणारी मंडळी कामसुखापासून वंचित होणाऱ्या मंडळींपेक्षा तुलनेने १० वर्षांनी तरुण दिसतात. तारुण्याच्या टिकाऊपणासाठी आनुवंशिकता केवळ २५ टक्के कारणीभूत असते, बाकी सर्व त्यांची स्वभाववैशिष्ट्यं आणि वागणुकीवर अवलंबून असतं. कामसौख्यामुळे प्रौढांच्या मनावरचा ताण सैल होण्यास मदत होते. तसंच इण्डोफिर्नसारखी वेदनाशमक जीवरसायनं शरीरात निर्माण होतात. याशिवाय, कामसुख लुटताना शरीरात उत्पादित होणाऱ्या ऑक्सिटोसिन या रसायनामुळे पती-पत्नीतील एकोप्याची भावना वाढते आणि जोडप्यात सुसंवाद होऊन त्यांच्यातील जीवनबंध घट्ट होत असतात.

अलीकडेच, स्वित्झर्लण्डमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वृद्ध जोडप्यांच्या सवेर्क्षणात, पुन्हा एकदा, म्हाताऱ्या मंडळींमध्ये वाढणाऱ्या कामातुरतेवर शिक्कामोर्तब झालं आहे. अन् साठीनंतरचा काम ही काही पाश्चिमात्य लोकांची मक्तेदारी नाही, हे आपल्याकडील डॉक्टरमंडळींच्याही ध्यानी आता आलं आहे. हृदयावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर आपली कामशक्ती लय पावणार नाही ना, या शंकेने त्रस्त झालेले हृद्रोगी आहेत. म्हातारपणी होणाऱ्या पाकिर्न्सन आजारात खाल्लेल्या औषधांमुळे कामवासना वाढलेल्या आजीबाईही आहेत. इतकंच काय, हृदयाचा झटका आला तरी बेलाशक पण व्हाएग्रा वापरून लिंग ताठरता प्राप्त करून घेणाऱ्या आजोबांची उदाहरणंही आहेत.

आयुष्यातील मध्यमवयात खाणंपिणं भरपूर वाढलेलं असतं आणि थकवा येणं ही परिस्थिती बहुसंख्य लोकांच्या बाबतीत असते. स्पर्धामय जीवनात सामाजिक, आथिर्क स्तर उंचावण्याच्या धडपडीत आपण नकळत आरोग्याला गहाण टाकत जातो आणि लैंगिक जीवनाच्या सुदृढतेवरही मोठा आघात करत असतो. सर्वसाधारण: आपल्याकडील समाजात लग्न झालं, मुलंबाळं झाली की सर्व संपलं असा समज करून स्त्रिया आपलं जीवन आचरण सुरू करतात. त्यांचा वस्त्रप्रावरणांबद्दलचा नीटनेटकेपणा हरवतो. शरीराच्या आकारमानावरील ताबा सुटतो. या आणि अशा दुर्लक्षित बाबींमुळे पती-पत्नीतील आकर्षण कमी होऊ शकतं. हे आकर्षण जपून ठेवणं म्हणजे 'निज शैशवा'स जपून ठेवण्यासारखं आहे. शिवाय, शक्य तेवढं वाचन करून ज्ञानवृद्धी करणं, आपल्यातील कलागुणांचा विकास करणं यांसारख्या गोष्टींद्वारे पतीपत्नीने वैचारिकदृष्ट्या जवळीक साधली तर त्यांच्यातील आकर्षण सतत वाढीस लागतं. त्यामुळे उतरत्या वयातील कामजीवन समृद्ध होण्यास हातभार लागतो, हे सांगणे न लगेच. 





जोसेफ तुस्कानो 


http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3319369.cms

आहारातून अतिसेवन

चुकून जमिनीवर सांडलेले तेल /तूप साफ करायला वेळ व श्रम बरेच लागतात आणि एवढे करूनही ते व्यवस्थित साफ होत नाही. तुमच्या आहारातील तेल/ तूपाबाबत सुद्धा हे खरे आहे.
स्निग्धघटकातून भरपूर उष्मांक ( कॅलरीज) निर्माण होतात. आहारात जर स्निग्धघटकांचे अतिसेवन असेल तर शरीराला लागणा-या उष्मांकापेक्षा कितीतरी जास्त उष्मांक शरीरात निर्माण होतात. हे जास्तीचे उष्मांक मग शरीरात वेगवेगळ्या भागात साठवले जातात. तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात यावर शरीरात स्निग्धघटक साठण्याचे प्रमाण व जागा अवलंबून असतात.

स्त्रीच्या शरीरात पुरुषांपेक्षा जास्त स्निग्धघटके साठतात आणि हे एकदम नैसर्गिक आहे. युवा पुरुषांच्या शरीरातील स्निग्धांशाचे प्रमाण त्याच्या वजनाच्या साधारण १०-१५ टक्के असते तर युवा स्त्रीमध्ये त्याच्या दुप्पट म्हणजे तिच्या वजनाच्या २० -३० टक्के असणे हे एकदम नैसर्गिक आहे. संततीचे प्रजनन व संगोपन करणे हे स्त्रीचे नैसर्गिक काम आहे. या काळात जर तिला अन्नाची कमतरता झाली तर शरीरात साठलेल्या अतिरीक्त स्निग्धांशाच्या मदतीने शरीराची गरज भागवता यावी यासाठी निसर्गाने केलेली ती सोय आहे. त्यामुळे स्त्रीच्या प्रजनन काळात “ झीरो फिगर” चा अट्टाहास हा घातक होऊ शकतो. 
शरीरात साठलेल्या या अतिरीक्त स्निग्धांशामुळे नुसते तुमचे शरीर बेडौल दिसत नाही तर तुमच्या हृदयावरही कामाचा ताण वाढतो. ५०० ग्रॅम अतिरीक्त स्निग्धांशे तुमच्या हृदयाला ३०० किलोमीटर लांबीइतक्या जास्तीच्या रक्तवाहिण्यांमधून रक्त पाठविण्याचे अतिरीक्त काम व ताण देतात.
दुसरा तोटा म्हणजे हे सगळे स्निग्धांश रक्तातून वहात असताना ते तुमच्या रक्तवाहिण्यांच्या भिंतीवरही साठत जाऊन रक्ताभिसरणाला अडथळा निर्माण करतात. यामुळे हृदयाला होणा-या रक्तपुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण होऊन गंभीर स्वरुपाचा हृदयविकारा होऊ शकतो.
शरीरात स्निग्धघटक साठले आहेत किंवा नाही हे पाहण्य़ाची एक सोपी पद्धत म्हणजे तुमच्या कमरेचा घेर व दंडाची जाडी.
या दोन ठिकाणी तुम्ही हाताचा अंगठा व तर्जनी यांच्या चिमटीत जास्तीत जास्त स्नायु पकडण्याचा प्रयत्न करा. दोन सेंटीमिटरपेक्षा जास्त जाडी जर तुम्ही तुमच्या चिमटीत पकडू शकला तर याचा अर्थ तुम्ही चिमटीत पकडलेला हा भाग शिथिल स्नायु नसून कातडीखाली साठलेली चरबी आहे . म्हणजेच तुमच्या शरीरात आधीच जास्त स्निग्धघटक साठलेले आहेत व इथून पुढे स्निग्धघटकांच्या सेवनावर तुम्हाला बारकाईने लक्ष ठेवायला हवे.
ही कसोटी सर्वांना लागू होते मग तुमचे लिंग, वय काहीही असो. तुम्ही ही सोपी कसोटी करून पहा व तुम्हीच ठरवा तुम्ही लठ्ठ आहात किंवा नाही.
एकदा हे झाले की मग आहारातून किती स्निग्धघटक घ्यायचे हे ठरवा व त्यावर काळजीपुर्वक लक्ष ठेवा. 
तुमच्या आहारातील सर्वसाधारण अन्नप्रकारातील स्निग्धघटकांचे प्रमाण खालील तक्त्यात दिले आहे. त्यावरून तुमच्या आहारात सध्या किती स्निग्धघटक आहेत व किती घ्यायला हवेत याचा तुम्हाला अंदाज घेता येईल. हे प्रमाण एका वेळच्या खाण्यातील आहे.

अन्नप्रकार ( १०० ग्रॅम)स्निग्धांशाचे प्रमाण ( ग्रॅम)
उकडलेले किंवा भाजलेले बटाटे०.१
स्निग्धांशविरहीत दुधापासून बनविलेले दही०.३
वरीलप्रमाणेच बनविलेले ब्रेडस्प्रेड४.०
लोणी८.०
चपाती१०.०
मिल्कशेक१०.०
मलई१३.०
चॉकलेटची छोटी वडी१५.०
चीझ बर्गर१५.०
कठीण पनीर१९.०
भाजलेल्या मांसाचा तुकडा२०.०
कबाब किंवा सॉसेज२१.०
सामोसा२६.०

वरील तक्त्यावरून तुमच्या रोजच्या सर्वसाधारण आहारात असलेल्या एकावेळच्या खाण्यातील स्निग्धांशाचे प्रमाण समजते.
तुमची स्निग्धतेची रोजची गरज आहे ६५ ते ८५ ग्रॅम या दरम्यान. समजा तुम्ही एकदोन सामोसे व छोटा चॉकलेटचा बार खाल्लात तरी तुमची स्निग्धघटकाची रोजची गरज पूर्ण होते. म्हणजेच तुमचे रोजचे दोनवेळचे जेवण व इतर खाणे यातून मिळालेले स्निग्धघटक हे अतिरीक्त होतील व शरीरात साठून राहतील.

आहारातील स्निग्धघटकांचे प्रमाण तुम्ही कसे कमी कराल?
वरील कसोटीप्रमाणे तुमच्या शरीरात स्निग्धघटक साठून राहिले असतील तर प्रथम रोजच्या आहारातून तुमच्या शरीरात किती स्निग्धघटक जातात याचा वरील तक्त्यावरून तुम्ही अंदाज घ्या.
आता तुम्हाला स्निग्धघटकांचे आहारातील प्रमाण कमी करावे लागेल. हे कसे कराल?
प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा की आहारातून तेल/ तेल वा तत्सम स्निग्धघटक पूर्णत: बंद करणे आरोग्याला हानीकारक अहे आणि मुख्य म्हणजे तसे करण्याची गरजही नाही. आणि रोजचे दोनवेळचे जेवण कमी करण्याचीही गरज नाही. फक्त काही पथ्ये पाळा.
रोज शक्यतो घरचेच जेवण घ्या. कमी स्निग्धता असलेल्या पदार्थांचे प्रमाण वाढवा. म्हणजेच चपाती किंवा पराठा याऐवजी पुलकी खा. त्याला वरून तूप लावू नका. भाजलेले वा उकडलेले पदार्थ जास्त खा. नाश्त्याच्या वेळी तुम्ही पावावर लोणी लावीत असाल तर पुढच्यावेळेपासून त्यावर लोण्याचा पातळ थर द्या. उपहारगृहात खावेच लागले तर तळलेल्या सामोसे / वडे सारख्या पदार्थापेक्षा उकडलेल्या इडलीला प्राधान्य द्या. चीझ सॅन्डवीचपेक्षा व्हेज सॅन्डवीच खा. भाजलेले वा उकडलेले पदार्थ खा.
रोज एक ग्लास दूध पित असाल तर दुधातील स्निग्धांशाबद्दल तुम्हास माहीत असणे आवश्यक आहे.
मलईयुक्त पूर्ण दूध : २२.० ग्रॅम,
अर्धे स्निग्धांशयुक्त दूध : ११.० ग्रॅम
स्निग्धांश काढलेले दूध : १ ग्रॅम
तुमच्या शरीरातील स्निग्धांशाच्या प्रमाणाप्रमाणे यापैकी कोणते दूध घ्यायचे ते तुम्ही ठरवू शकता. तुम्ही जाडे नसाल व तुमचा आहार संतुलीत आहे आणि आहारात तेलही प्रमाणातच आहे तर तुम्ही अर्धे स्निग्धांश युक्त दूध ( ५०%) वापरू शकता.
तुमच्या आहारात तळलेले पदार्थ असतील, भातावर व पोळीवर तूप घेत असाल तर मात्र तुम्हाला स्निग्धांशविरहीत ( स्कीम्ड) दूधच घ्यावे लागेल.




http://knowaboutyourfood.blogspot.com/

पानगळ आणि चैत्रपालवी


सातत्याने परिवर्तन हा  निसर्ग नियम आहे. शिशिर ऋतूत निसर्गात जे बदल होतात त्याचे परिणामस्वरूप खूप मोठ्या प्रमाणावर झाडांची होत असलेली पानगळ  आपण दरवर्षी बघतो. त्यापाठोपाठ वसंत ऋतू सुरु झाला कि निसर्ग पुन्हा एकदा बदलतो आणि त्याचे परिणामस्वरूप झाडांना आलेली नवीन चैत्रपालवी सुद्धा आपण दरवर्षी बघतो. निसर्ग ऋतुचक्र दरवर्षी याप्रकारे कार्यरत असते. शिशिर ऋतू आल्यावर झाडांची जुनी पाने कोणतीही खळखळ न करता त्या त्या झाडापासून वेगळी होतात आणि नवीन येणाऱ्या चैत्र पालवीला जागा करून देतात.
आम्हाला असलेला अनुभव नवीन येणाऱ्या पानाना नाही असे जुनी पाने म्हणत नाही. आम्ही नसलो तर झाडाचे कार्य व्यवस्थित चालणार नाही अशा गमजा ती जुनी पाने करत नाहीत. चैत्र महिन्यात येणारी नवीन पालवी कोणताही अनुभव गाठीशी नसताना जुन्या पानांची कमतरता भासू न देता नवीन जोमाने त्या झाडाची कार्ये पूर्वी सारखीच पूर्ण करतात.
प्रत्यक्ष जीवनात मात्र हे चित्र सहसा दिसत नाही. घराघरातील वयोवृध्द स्वखुशीने तरुणांच्या हातात संसाराची सूत्रे सोपवताना फार कवचित दिसतात. आम्ही गेली कैक वर्षे जसे करत आलो आहोत तसेच पुढे चालू ठेवण्याचा त्यांचा हेका कमी होताना दिसत नाही. एकंदर आयुष्मान वाढत चालले आहे त्यामुळे ज्या घरात ७५-८० चे वयोवृध्द आहेत त्या घरात ५० च्या जवळपास असणाऱ्या त्यांच्या पुढील पीढीला स्वतंत्र पाने संसार करता येत नाही आणि त्यांच्या मनातील स्वतंत्र संसारच्या कल्पना पूर्ण झालेल्या नसतानाच त्यापुढील पीढी सुद्धा त्यांच्या मनासारखे करता येत नाही म्हणून चीचीद करताना दिसते.
जी गोष्ट घरात तीच गोष्ट बाहेरील कार्य क्षेत्रात दिसून येते. व्यवसाय क्षेत्र असो किवा राजकारण असो वायोवृधानी  आपले अधिकार स्वताहून पुढील पिढीच्या हाती सोपवले आहेत हे दृश्य काहुपाच तुरळकपणे पाहण्यास मिळते.
कोणत्याही गोष्टीचा मोह ठेऊ नये अशी अध्यात्माच्या नावाने सकाळ संध्यकाळ पोपटपंची करणारी मंडळी सुद्धा याला अपवाद दिसत नाहीत.
स्वताचे अधिकार स्वताहून सोडणे हे आपण पानगळ ते चैत्र पालवी या अविरत चालणाऱ्या निसर्ग दृश्यातून कधी शिकणार आहोत का ?               

Vasant Chintaman Joshi



  • A6/12, BEST NAGAR, GOREGAON(W0
  • Mumbai, India 400104

  • 9323406386


Monday, October 24, 2011

स्वतःला उटणे लावणे

स्वतःला उटणे लावणे
१. कपाळ : कपाळावर लावतांना मधल्या तीन बोटांचा उपयोग करून स्वतः लावतांना डावीकडून उजवीकडे या पद्धतीने लावावे. परत उलट्या दिशेने त्यावरून हात फिरवू नये. उलट्या दिशेने हात फिरवल्याने त्रासदायक स्पंदनांची निर्मिती होते. लावतांना थांबून परत डावीकडून उजवीकडे यावे. कपाळाच्या पोकळीत साठलेल्या त्रासदायक स्पंदनांची गती ही डावीकडून उजवीकडे असल्याने त्याच पद्धतीने या स्पंदनांना कार्यरत करून उटण्यातील तेजोमय स्पर्शाने त्यांचे विघटन केले जाते.

२. कपाळाच्या दोन्ही टोकांना बाजूला भुवईजवळ : येथे लावतांना ते बोटांच्या अग्रभागांनी डावीकडून उजवीकडे (खालून वरच्या दिशेने), तसेच उजवीकडून डावीकडे (वरून खालच्या दिशेने) चोळून लावावे. या भागात सुप्त असणार्‍या त्रासदायक लहरींचे वहन दोन्ही बाजूंनी होत असल्याने दोन्ही बाजूंनी घर्षण करून त्यांच्यातील त्रासदायक स्पंदनांना नष्ट करावे.

३. डोळ्यांच्या पापण्या : यांवर लावतांना नाकाकडून कानाकडे हात फिरवावा.

४. नाक : उजव्या हाताचा अंगठा आणि तर्जनी यांनी नाकाच्या दोन्ही बाजूंनी खालच्या दिशेने उतरत यावे आणि खाली आल्यावर उटण्याचा वास घ्यावा. उटण्याच्या वासातून प्रक्षेपित होणारा तेजाशी संबंधित गंध फुफ्फुसांतील वायूकोषात गेल्याने तेथील काळे आवरण नष्ट होण्यास साहाय्य होते.

५. मुखाचा वरचा भाग : या भागातून, म्हणजेच नाकाच्या खालून मधली तीन बोटे ठेवून प्रारंभ करून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने मुखाभोवती गोल, म्हणजेच हनुवटीच्या खड्ड्यातून वर स्वतःच्या डावीकडे जाऊन मुखाभोवतीचा गोल पूर्ण करावा.
६. गालांच्या पोकळी : यांत केंद्रबिंदूशी अनेक टाकाऊ वायू घनीभूत झालेले असल्याने उटणे गालाला लावतांना गालाच्या मध्यभागातून प्रारंभ करून घड्याळाच्या काट्याप्रमाणे बोटांची अग्रे गोल गोल फिरवून लावावे. यामुळे गालातील मध्यपोकळीत घनीभूत झालेली त्रासदायक स्पंदने कार्यरत होऊन त्यांचे विघटन त्याच जागी होण्यास साहाय्य होते.

७. कानाची पाळी : ही तर्जनी आणि अंगठा यांमध्ये धरून तिथल्या तिथे हालवून उटणे लावावे.

८. दोन्ही कान : दोन्ही कान हातांनी पकडून कानाच्या मागच्या बाजूला फक्त अंगठा ठेवून खालून वरच्या दिशेने फिरवावा.

९. मान : मानेच्या मागून मध्यातून दोन्ही हातांची बोटे पुढे विशुद्ध चक्राकडे आणणे

१०. छाती आणि पोट यांचा मध्यभाग : उजव्या हाताच्या तळव्याने छातीच्या मध्यरेषेवर वरून खालच्या दिशेने नाभीकडे हात फिरवत आणणे. यामुळे चक्रे जागृत होतात. त्यानंतर दोन्ही हातांची बोटे छातीच्या मध्यरेषेशी येतील अशा पद्धतीने दोन्ही हात वरून खाली एकाच वेळी फिरवावेत.

११. काखेपासून कमरेपर्यंत : काखेपासून पितृतीर्थासारखा हात, म्हणजेच अंगठा एका बाजूला आणि चार बोटे दुसर्‍या बाजूला ठेवून अंगाच्या दोन्ही बाजूच्या रेषेवरून वरून खाली या पद्धतीने फिरवावेत.

१२. पाय आणि हात : हाताची बोटे फिरवत पायांवर आणि हातांवर वरून खालच्या दिशेने उटणे लावावे.

१३. पावलाच्या आणि पायाच्या जोडरेषा : पावलाच्या आणि पायाच्या जोडरेषेवर अंगठा आणि तर्जनी यांनी विळखा घालून तो भाग कड्यासारखा घासावा.

१४. डोक्याच्या मध्यभागी : डोक्याच्या मध्यभागी तेल लावून ते हाताने घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरवावे.

१. पाठ : दुसर्‍या व्यक्तीच्या पाठीला उटणे लावतांना पाठीच्या मणक्याच्या रेषेशी दोन्ही हातांच्या बोटांची अग्रे येतील अशा पद्धतीने वरून खालच्या दिशेने दोन्ही हात एकाच वेळी फिरवावेत.

२. कंबर : दुसर्‍या व्यक्तीला लावतांना कमरेच्या आडव्या रेषेवर पाठीकडून तिच्या डाव्या बाजूकडून उजवीकडे येऊन परत उजवीकडून डावीकडे जावे. असे परत परत लावावे.



http://www.facebook.com/pappukaka5

Tuesday, October 4, 2011

नक्षत्र, देवता आणि आराध्य वृक्ष

नक्षत्र, देवता आणि आराध्य वृक्ष
आपल्या पत्रिकेत चंद्र ज्या नक्षत्रात असतो ते आपले जन्म नक्षत्र असते.
उपासना मार्गावर, भक्ती मार्गावर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी कोणत्याही देवतेची उपासना केली तरी प्रथम आपल्या जन्म नक्षत्राची जी देवता आहे त्या देवतेचे स्मरण प्रथम करणे आवश्यक आहे. इतर देवतेपर्यंत पोचण्यासाठी आपल्या जन्म नक्षत्र असलेल्या देवतेला बायपास करू नये. आपल्या आर्ध्य वृक्षाचे चित्र जरी आपल्या नित्य वावर असलेल्या जागी ठेवले तरी ते लाभदायक ठरते..
शरदिनी डहाणूकर यांच्या नक्षत्रवृक्ष या पुस्तकात प्रत्येक वृक्षाचे रंगीत चित्र आहे व अधिक माहितीसुद्धा आहे.
खाली दिलेले टेबल दाते पंचांगकर्ते यांच्या नक्षत्र: देवता आणि वृक्ष मधून संकलित केले आहे.      
नक्षत्र                            देवता               आराध्यवृक्ष
आश्विनी                    अश्विनीकुमार             कुंचला
भरणी                         यम                          आवळ
कृत्तिका                       अग्नी                        उंबर
रोहिणी                         ब्रम्हा                      जांभळी
 मृग                            चंद्र                          खैर
आर्द्रा                           शंकर                         कृष्णागरु
पुनर्वसू                         अदिती                      वळू
पुष्य                             बृहस्पती                  पिंपळ
आश्लेषा                         सर्प                         नागचाफा
मघा                             पितर                          वट
पूर्वा                              भग                         पळस
उत्तरा                             अर्यमा                    पायरी
हस्त                             सूर्य/सविता                जाई
चित्रा                            त्वष्टा                        बेल
स्वाती                          वायू                        अर्जुन
विशाखा                         इंद्राग्नी                    नागकेशर
अनुराधा                       मित्र                         नागचाफा
ज्येष्ठा                           इंद्र                           सांबर
मूळ                               निरुती                     राळ
पूर्वाषाढा                        उदक/आप              वेत
उत्तराषाढा                      विश्वेदेव                    फणस
श्रवण                           विष्णू                       रुई
धनिष्ठा                           वसू/गंधर्व                शमी
शततारका                     वरुण                      कळंब
पूर्वाभाद्रपदा                   अजैकपाद               आम्र
उत्तराभाद्रपदा                  अहिर्बुध्य                कडूलिंब
रेवती                              पूषा                       मोह
  



http://www.facebook.com/vasantcjoshi
Vasant Chintaman Joshi

  • A6/12, BEST NAGAR, GOREGAON(W0
  • Mumbai, India 400104
  • 9323406386


Visit Our Page