Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Tuesday, September 25, 2012

स्वयंपाकाचे शास्त्र

भारतीय जीवनशैलीत आहारशास्त्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येक स्त्री किंबहुना पुरुषसुद्धा येनकेन प्रकारे आहारशास्त्राशी निगडित आहे. रॉबर्ट मॅककॅरिसन नावाच्या आहारतज्ज्ञांच्या मते योग्य प्रकारचा आहार आरोग्य शाबूत ठेवण्याचा, तर अयोग्य आहार हा रोगवाढीसाठीचा एकमेव महत्त्वपूर्ण घटक आहे.

आंघोळ करणे, रात्रीची झोप घेणे या गोष्टी जशा आपण बेमालूमपणे करतो. तसाच रोजचा स्वयंपाकही बेमालूमपणे किंवा सवयीने पार पाडला जातो. पण कसातरी स्वयंपाक उरकून पोट भरणे हा आपला हेतू नसतोच. तो सुद्धा शास्त्रशुद्ध पद्धतीने होणे गरजेचे आहे.

रोजच्या जेवणातला वरणभात तयार करणे हेसुद्धा शास्त्रच आहे. तांदूळ धुताना ब-याच जणींना तो खूप रगडून भरपूर पाण्यात धुण्याची सवय असते. तांदळात अळ्या होऊ नयेत म्हणून बोरिक पावडर लावण्याची गरज असते. ही पावडर निघून जाण्यासाठी खूप चोळून आणि अतिरिक्त पाण्याचा वापर करून तांदूळ धुतल्यास त्यातील 40 टक्क्यांपर्यंत थायामिन आणि ‘निकोटिनिक अ‍ॅसिड’ वाढत जाते.

हॉटेलमधला स्टीम राइस ब-याचदा आपण घरी करतो. जास्त पाण्यात तांदूळ शिजवून जास्तीचे पाणी फेकून दिल्यावर मोकळा भात तयार होतो. पण या पाण्यासोबत मिनरल्सदेखील जातात. त्यासाठी माफक पाण्याचा वापर करावा. यामुळे अन्नातील मोडियम, पोटॅशियम आणि कॅल्शियमचा आपल्याला पुरेपूर वापर करता येईल.

ब-याच कुकरी शोजमध्ये असे सांगितले जाते की, पालेभाज्या शिजवताना त्यावर झाकण ठेवले नाही तर त्या हिरव्यागार दिसतात. पण भाज्या न झाकता शिजवल्यास त्यातील व्हिटॅमिन सी नष्ट होते. म्हणूनच शक्यतोवर अन्न पे्रशर कुकरमध्ये शिजवावे. अन्नाला जितकी जास्त काळ उष्णता दिली जाते, तितकी त्यातील पोषणमूल्ये कमी-कमी होत जातात. स्निग्ध पदार्थ म्हणजे तेल, तूप, जितके जास्त गरम करू तितके त्यातील हानिकारक पदार्थांचे प्रमाण वाढते. ब-याचदा तळण केलेले तेल-तूप आपण पुन्हा फोडणीसाठी वापरतो, पण हे तेल-तूप वापरणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे.

अन्नाच्या पोषक तत्त्वांची जपणूक करण्यासाठी काही गोष्टींचे पालन करा-
* भाज्या शिजवताना झाकून ठेवा.
* डाळ, तांदूळ धुताना रगडून धुणे टाळा.
* भाज्या वाहत्या पाण्यात आधी धुवा, मग चिरा.
* वारंवार अन्न गरम करणे टाळावे.
* वरण, भाज्या शिजवताना शक्यतो आम्लरसाचा वापर करा.
* अन्न जपून वापरा, वाया घालवू नका. आपण वाचवलेल्या अन्नात इतर शेकडो व्यक्तींना भोजन मिळू शकते.
 
 
 
 

Sunday, September 23, 2012

तुळस ही गणेश पूजनात निषिद्ध का?

भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा अपवाद वगळता तुळस ही गणेश पूजनात निषिद्ध का? त्याची कथा...

धर्मध्वज राजाची लावण्यवती कन्या 'वृंदा' ही उपवर झाली होती. तीने आपल्या पित्यास माझे लग्न विष्णूशी लावून द्या असा हट्ट धरला. त्यावर धर्मध्वजाने तिला दैवी वरा
चा ध्यास सोडून मानवी वर सुचविण्यास सांगितले. परंतु वृंदाने त्यांचे ऐकले नाही. ती विष्णूवनात जाऊन चतुर्भुज विष्णूचे ध्यान व जप करुन लागली. वृंदेने एकचित्ताने एक लक्ष वर्ष उग्र तप केले व त्याच्या प्रभावाने तिला अंतर्ज्ञान प्राप्त झाले.

एकदा वृंदेने भागीरथी नदीच्या तिरावर विघ्नेश्वर गणेशास ध्यानमग्न पाहिले. अंतर्ज्ञानाने तिला गणेश हा विष्णूरुप असल्याचे ज्ञान झाले व ती गणेशावर मोहित झाली. वृंदेने श्रीगणेशाचे ध्यान भंग केले. डोळे उघडताच तो म्हणाला, "हे माते, तू कोण आहेस? माझ्या ध्यानाचा भंग का करत आहेस? गणेशउपासनेत एकचित्त असणा-याची एकाग्रता भंग करणा-यास नरकात जावे लागते, त्यामुळे पुन्हा माझ्या ध्यानात भंग आणू नकोस" त्यावर वृंदा म्हणाली "मी धर्मध्वजाची कन्या असून नाना तपांनी प्रभावयुक्त आहे, मला तुझ्याशी विवाह करायचा आहे तरी माझा त्वरित स्वीकार कर ". त्यावर गणेशाने तिला समजावले, "मी तुझ्याशी विवाह करु शकत नाही. विवाह करुन मी मोहपाषात अडकणार नाही. तू तुझ्या तपासम तुल्यबळ असा वर पहा".

गणपतीच्या नकाराने संतापलेल्या वृंदेने, "तू विवाह करशीलच" असा शाप दिला. शापास प्रतिउत्तर म्हणून गणेशाने वृंदेस, "तू वृक्ष होऊन मूढ योगीत पडशील" असा शाप दिला. हा दारुण शाप ऐकताच वृंदा घाबरुन थरथर कापू लागली व तिने गणाधीशाची क्षमा मागितली.

दयावान गणेशाने तिची तपश्चर्या लक्षात घेऊन तिला सांगितले, "देवी तू येथून जा, वनात तुला असूर भेटेल त्यावर तू आसक्त होशील, असूर मरताच पतिव्रते तू आपल्या देहास चितेच्या अग्नीत त्यागशील व वृक्षरुप तुळस होशील. महाविष्णूस शाप देऊन शिळारुपी शाळीग्राम करशील. त्यानंतर भावी काळात विष्णूची पत्नी म्हणून निरंतर रममाण होशील. माझ्या कृपेने तू धन्य होशील. देवांना तुझी पुत्रपुष्पे सदैव मान्य होतील. अन्य काष्ठासम तुला त्रैल्योक्यात कोणीही मानणार नाही तर तुझ्या काष्ठांच्या माळा सकळ जन गळयात भक्क्तीभावाने घालतील. विष्णूची पत्नी म्हणून मानव तुजला पुजतील. तथापि, मला तू वर्ज्य असशील यात मात्र संशय नाही."

गणेशास वंदन करुन चिंताक्रांत वृंदा वनात तप करण्यासाठी निघून गेली. वृंदा एकचित्त 'गणेश नाममंत्र जपत ' तप करत होती. दीड लक्ष वर्षे उलटून गेल्यावर गणेश प्रसन्न झाले व तिच्यासमोर प्रकट झाले. हर्षभरीत वृंदा त्यांना प्रणाम करुन स्तुतिस्तोस्त्र गाऊन पूर्वी केलेल्या चुकीची क्षमा मागू लागली. त्यावर गणेशाने तिला वरदान दिले "तू गाणपत्य होशील. वर्षातून एकदा तुला माझ्या पूजेत स्थान मिळेल. भाद्रपद शुक्ल चतुर्थीस तुझे पत्र मला भक्तीभावाने वाहिल्यास ते मला पावन होतील. भाद्रपद शुक्ल चतुर्थीस मला वाहिल्या जाणा-या एकवीस प्रकारच्या पत्रीत तुझ्या पत्रांचाही समावेश असेल व केवळ त्या दिवशीच तुझे पत्र मला वाहिलेले चालेल अन्य दिवशी तुझे पत्र माझ्या पूजनात चालणार नाही."

असे बोलून श्रीगणेश अंतर्धान पावले व वृंदेचे मन प्रसन्न व हर्षोत्फुल झाले.

सर्व पूजांमध्ये महत्त्वाचे स्थान असणा-या तुळशीस गणपती पूजनात निषिद्ध मानले जाते. परंतु, वर्षातून एकदा गणेश चतुर्थीस (भाद्रपद शुक्ल चतुर्थीस) तिचा समावेश गणेश पूजनात केला जातो. त्या दिवशी गणपतीला वाहिल्या जाणा-या एकवीस पत्रींमध्ये तुळसही असते.

गणेशास भाद्रपद शुक्ल चतुर्थीस वाहिल्या जाणा-या एकवीस पत्री पुढीलप्रमाणे आहेत: (१) पिंपळ, (२) देवदार, (३) बेल, (४) शमी, (५) दूर्वा, (६) धोतरा, (७) तुळस, (८) भृंगराज / माका, (९) बोर, (१०) आघाडा, (११) रुई/मांदार, (१२) अर्जुन/अर्जुनसादडा, (१३) मरवा, (१४) केवडा/केतकी, (१५) अगस्ती/ हादगा, (१६) कन्हेर/ करवीर, (१७) मालती/मधुमालती, (१८) डोरली/बृहती, (१९) डाळिंब, (२०) शंखपुष्पी/विष्णुकांत, (२१) जाई/चमेली.
http://www.facebook.com/umesh.kulkarni.35

'लक' (Luck) म्हणजे काय?

'लक' (Luck), नशीब, तकदीर नांवाचा काहीतरी प्रकार आस्तित्वात आहे. त्याच्या आपल्या आयुष्याशी फार जवळचा संबंध आहे. त्याचे आपल्या आयुष्यावर अनेक बरे वाईट परिणाम होत असतात ही गोष्ट मला वाटते सगणेजणच मान्य करतील.
आपल्या मनासारखी एखादी गोष्ट झाली नाही तर ' I am unlucky', ' माझे नशीबच खराब आहे किंवा ही गोष्ट माझ्या नशीबातच नाही, ' मेरी तकदीरही खराब है!' असे म्हणत आपण आपल्या नशीबाला दोष देत बसतो. जर दुसर्यार कोणाला एखादी गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे मिळाली तर मग आपण लगेचच ' Oh! He is a lucky guy!', 'त्याचे नशीब जोरदार आहे किंवा त्याला नशिबाची साथ आहे.', 'उसकी तकदीर बहोत अच्छी है! उसको तकदीरकी साथ है!' असे म्हणुन त्याच्या नशीबाला आपण त्याचे 'क्रेडीट' देतो. 
थोडक्यात आपण आपल्या यायुष्यातल्या पराभवाला, कमी प्रगतीला, स्वप्नभंगाना 'लक' किंवा 'नशीब' जबाबदार धरतो. तर ई
तरांच्या विजयाला, प्रगतीला त्यांच्या 'अचीव्हमेन्टसना' पण त्यांच्या 'लक' किंवा नशीबाला जबाबदार धरतो.
तर असा हा न दिसणारा, कोणत्याही सायंटिफीक पद्धतीने ज्याचे आस्तित्व सिद्ध होऊ शकत नाही, पण ज्याची आपल्याला पावलोपावली जाणीव होत असते असा हा 'लक फॅक्टर'!
पण 'लक'(Luck) म्हणजे नक्की काय? त्याची नक्की अशी कांही डेफीनेशन आहे कां? कीस चीज का नाम 'लक' है? असे अनेक प्रश्न माझ्या मनांत गेली अनेक वर्षे निर्माण होत होते. हा बहुतकरुन मनाचा खेळ आहे असे मी समजत होतो. शेवटी सगळे कांही नशीबावर अवलंबुन असते असा एक घातक वाकप्रचार आपल्याकडे शिकवला जातो. आपण बरेच जण याचे शिकार होऊन अनेक गोष्टी नशिबावर सोडुन देण्याची घातक सवय लाऊन घेतो. 'असेल हरी तर देईल खाटल्यावरी' या प्रकारची मनोवृत्ती तयार करुन प्रयत्नवाद सोडून देतो किंवा मर्यादीत प्रयत्नांवर भिस्त ठेवतो. मी सुद्धा थोडाफार याच कॅटेगरीतला आहे.
पण अचानक मला 'Luck' या शब्दाची व्याख्या मिळाली. ती खालील प्रमाणे.
L – Labor
U- Under
C-Correct
K- Knowledge
Labor under correct knowledge means LUCK!
अचूक ज्ञानाच्या जोरावर केलेले कष्ट किंवा मेहेनत म्हणजे नशीब.
या ठिकाणी अचूक ज्ञानाबरोबरच कष्ट किंवा मेहेनत पण महत्वाची! नुसतेच कष्ट किंवा मेहेनतिचा उपयोग नसतो तर नुसतेच अचून ज्ञान उपयोगाचे नसते. तर नशीब घडवण्यासाठी या दोन्हिंचेही उत्तम कॉम्बीनेशन करावे लागते. ज्यांना हे जमते ते भराभर पुढे जातात व नशीबवान ठरतात. ज्यांना हे जमत नाही ते मागे रहातात व कमनशिबी ठरतात.
ही नवीन दृष्टी घेऊन मी अनेक यशस्वी व्यक्तींचा अभ्यास केला. दिवसाला बारा बार तास, चौदा-चौदा तास कष्ट करणे त्यांच्या अंगवळणी पडले होते. पण त्याच बरोबर आपण ज्या क्षेत्रांत काम करीत आहोत त्या क्षेत्राचे ज्ञान अद्ययावत किंवा अप टु डेट ठेवण्यासाठीपण ते प्रचंड मेहेनत घेत असतात. त्यासाठी ते खुबिने ईतरांचा उपयोग करुन घेत असतात. वेळ प्रसंगी तज्ञांचा सल्ला घेण्यामधे त्यांना कमीपणा वाटत नाही. शाळा कॉलेजमधील शिक्षणापेक्षा किंवा डिग्रयांच्या सर्टिफिकेटपेक्षा अनुभवातुन मिळणार्याज ज्ञानावर त्यांचा भर असतो. म्हणुनच इंजिनीयरींगचे कोणत्याही प्रकारचे क्वालिफिकेशन नसताना ईयता चौथीपर्यंत शिकलेला थॉमस अल्वा एडीसन किंवा अमेरीकेतील बारावी पर्यंत शिकलेला स्टीव्ह जॉब्ज जागातील सर्वात हुषार इंजिनीयर्स समजले जातात, ते केवळ 'Lucky' किंवा नशीबवान होते म्हणुन नव्हे!
तुम्हाला 'Lucky' व्हायचे आहे कां 'Unlucky' रहायचे आहे हे तुमचे तुम्हीच ठरवायचे आहे.....














Tuesday, September 11, 2012

डेंग्यू आजारापासून बचाव कसा करावा?


 
मराठवाड्यात गेल्या काही वर्षांपासून डासांनी व पिसवांनी होणा-या आजारांनी साथीचे स्वरूप घेतले आहे. पाऊस पडला की, उघडी गटारे, साचलेले पाणी, उकीरडे यामुळे डासांची वाढ मोठ्या प्रमाणात होते. मग डासांमुळे होणारा संसर्ग म्हणजे ‘डेंग्यू’, मलेरिया, चिकुनगुन्या समाजात साथीचे रूप धारण करतात. डेंग्यू आजार पांढ-या व दिवसा चावणा-या तसेच साठवलेल्या पाण्यातून वाढलेल्या डासांमुळे होतो.

डेंग्यू आजार ठरावीक वेळापत्रकाप्रमाणे वागतो. त्यामुळे या आजाराची लक्षणे जरी विविध असली तरी, त्याच्या वेळापत्रकाप्रमाणे आपण त्यातील गंभीरता जाणून घेऊ शकतो. प्रथम लक्षणापासून ते बरे वाटेपर्यंतचा कालावधी साधारण 10 दिवसांपेक्षा जास्त नसतो.

लक्षणे : सुरुवातीला ताप येणे, अंग भरून येणे, हा ताप उतरण्यासाठी दर चार तासांनी औषधी घ्यावी लागतात. तरीही तो पूर्णपणे नॉर्मल होत नाही. याचे वैशिष्ट्य म्हणजे तो चार-पाच दिवस सारखा वारंवार येतो. रुग्ण या आजाराने खूप गळालेला असतो. हा ताप 5 किंवा 6 दिवसांनी कमी होतो. ताप कमी झालेला असला तरी रुग्ण खूप गळालेला किंवा थकलेला वाटतो.

याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जोपर्यंत रुग्णांच्या अंगात ताप असतो तोपर्यंत तो गंभीरच नसतो. रक्तातील प्लेटलेट्स या एक लाखांपेक्षा जास्त असतात. ब-याच जणांना ताप उतरल्यानंतर वैद्यकीय सल्ल्याची गरज वाटत नाही, पण डेंग्यू ताप उतरल्यानंतर रु ग्ण गंभीर होण्याची शक्यता जास्त असते. डेंग्यूत होणारे दुष्परिणाम 6 ते 9 दिवसांपर्यंत असतात.

- डोकेदुखी, अंग दुखणे डोळ्यापाठीमागे प्रचंड वेदना होणे.
- भूक मंदावणे, चक्कर येणे, थंड घाम सुटणे, उलटी होणे.
- अंगावर गोवरासारखे पुरळ येतात.
- डोळे लाल होणे, डोळे आल्यासारखा भास होणे, पण डोळ्यातील घाण येत नाही.

प्लेटलेट्सचे प्रमाण कमी झाल्याचे आपण ऐकतो. अगदी खेड्यातून रुग्ण पेशी कमी झाल्या म्हणून दवाखान्यात येतो, पण महत्त्वाचे म्हणजे प्लेटलेट्स देण्याची गरज नसते. जर रुग्णास रक्तस्राव होत असेल तरच प्लेटलेट्स द्यावयास पाहिजे. रक्तस्राव नसताना जर रक्ताचे घटक रुग्णास दिले तर त्याची प्रकृती सुधारण्याऐवजी बिघडण्याची शक्यता जास्त असते.

ताप उतरल्यानंतर अजून एक लक्षण जे थोडे अवघड असते. ते म्हणजे फ्ल्यूड शिफ्ट आपल्या शरीरातील पाणी व क्षार हे पोटात, छातीत जमा व्हायला लागते. हा काळ तापानंतर एक किंवा दोन दिवस असतो. रुग्णाला पोट दुखणे, उलटी होणे, दम लागणे अशी लक्षणे दिसतात. अशावेळी तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहणे योग्य.

6 ते 7 दिवसानंतर तळहात-तळपाय यांना खाज सुटते. ती एक दिवस टिकते. नंतर आपोआप कमी होते.

निदान : वरील लक्षणावरून डेंग्यूचे निदान करणे फारसे अवघड नाही. सुरुवातीच्या 3 दिवसांत जर निदान करायचे असेल तर एनएसआय नावाची एक रक्त तपासणी करावी लागते, पण ती अजून सगळीकडे उपलब्ध नाही. म्हणून त्याला 5 ते 6 दिवस डेंग्यूसदृश आजार म्हणावे. सातव्या दिवशी डेंग्यू कॅट, IgM, IgG Elisa Test करणे आवश्यक असते.

उपचार
- डासांचे निर्मूलन करणे हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवला गेला पाहिजे. वैयक्तिक प्रतिबंध, परिसर स्वच्छ ठेवणे, साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडणे, रुग्णाबाबत नगरपालिका व आरोग्य विभागास कळवणे.
- ताप असेपर्यंत आराम करणे, भरपूर पाणी पिणे, पॅरासिटेमॉल गोळी घेणे.
- संभाव्य धोक्याबाबत माहिती असणे, तशी लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेणे.
- ताप उतरल्यानंतरच आजार गंभीर वळण घेऊ शकतो. याची जाणीव असणे गरजेचे आहे.
- रक्तातील घटक फक्त रक्तस्राव असणा-या पेशंटसाठी राखून ठेवणे.
- या आजारासोबत अजून काही कारणामुळे रक्त घटक कमी झाले आहेत काय? हे वैद्यकीय अधिका-यांकडून जाणून घेणे.
 
http://www.facebook.com/drvilas.ujawane 
 

डॉ. विलास उजवणे (DrVilas Ujawane)

Visit Our Page