Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Tuesday, June 12, 2012

परीक्षेच्या उंबरठ्यावर....!

चौथी स्कॉलरशिप ते दहावी, बारावी, स्पर्धात्मक परीक्षा घराच्या उंबरठय़ापर्यंत येऊन पोहोचल्या आहेत. सध्याच्या स्पर्धेच्या युगात मार्काच्या आंधळय़ा शर्यतीत भाग घेतल्यावाचून पर्याय नाही. मग मुलांच्या मागे अभ्यासाचा धाकदपटशा लावायचा की नाही? या संभ्रमात सध्या तमाम पालकवर्ग आपले शरीर, मन, भावनिक आरोग्य हरवून बसला आहे. ३० ते ४५ वर्षे या वयोगटातील स्त्री-पुरुषांना उच्च रक्तदाब, निद्रानाश, पोटाच्या वाढत्या तक्रारी (मनो-कायिक आजारांना) तोंड द्यावे लागत आहे. यासाठी पालकांनी स्वत: संयम बाळगणे, आवश्यक आहे तरच ते आपल्या पाल्याची परीक्षेची पूर्वतयारी करून घेऊ शकतील.
आयुर्वेदाच्या माध्यमातून या काही टिप्स :
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी परीक्षा जवळ आल्या की स्वाभाविकच अभ्यासाचा ताण वाढतो आणि रात्रीची जागरणे आणि अभ्यासाचे वाढते तास मुलांच्या शरीर-मनावर तणाव निर्माण करतात. त्यातून क्लासेसचे दडपण असेल तर विचारायलाच नको. हा ताण कमी करायचा असेल तर त्यासाठी पुढील गोष्टींची पालकांनी काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना सकाळी लवकर उठून अभ्यास करण्याचे महत्त्व पटवून द्यावे. सूर्योदयाच्या सुमारास बाह्य वातावरणातून मेंदूला आपोआपच तरतरी, एकाग्रता, कार्यक्षमता वाढवण्याचे रसायन मिळत असते, त्याचा फायदा घ्यावा.
संपूर्ण शरीराला तिळाच्या तेलाचा हलकासा मसाज शरीर-मनाला उभारी देतो, थकवा कमी करतो, आजारांविरोधी प्रतिकारक्षमता वाढवतो.
नाकात गाईच्या तुपाचे २-२ थेंब लावल्याने सर्दीपासून संरक्षण होते, नाकाच्या आतील त्वचेचे प्रदूषणविरोधी काम सुरू राहते.
तळपायाला व केसांना रोज मसाज केल्याने डोळय़ांचे आरोग्य सुधारते.परीक्षा जवळ आल्या असल्या तरी विद्यार्थ्यांनी नियमित व्यायाम करणे, निदान सूर्यनमस्कार घालणे अपरिहार्य आहे, कारण व्यायामामुळे आळस दूर होतो.
तुळस, ज्येष्ठमध अशा वनौषधींचा वापर प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी करता येतो.
परीक्षांच्या काळात मुलांची झोप हमखास वाढते. अशावेळी खोटी झोप म्हणजेच आळस ओळखून पिण्यासाठी गरम पाण्याचा वापर, आठवडय़ातून एकदा एरंड तेल किंवा सुंठीचे तज्ज्ञांच्या सल्ल्याने चाटण द्यावे.
जेवणात मिठाई अरबट-चरबट पदार्थ, ब्रेड, मैद्याचे पदार्थ, बाहेरचे खाद्यपदार्थ देणे टाळावे. पिण्याच्या पाण्यासंदर्भात योग्य काळजी घ्यावी.
मुलं आजारी पडल्यास लगेचच तज्ज्ञांची मदत घेऊन योग्य औषधोपचार करावे. घरातील वातावरण :घरातील वातावरणाचा मुलांच्या अभ्यासावर परिणाम होत असतो. त्यामुळे पालकांनी या काळात परस्परांतील मतभेद, वादविवाद दूर ठेवावे.
टीव्ही, कॉम्प्युटर बंद असे ओरडत पालकांनी रुद्रावतार धारण केला तर भीतीमुळे मुलांच्या मेंदूतील स्रवांवर परिणाम होतो. परिणामी स्मरणशक्तीही कमी होते. म्हणून टीव्ही, कॉम्प्युटरसाठी किती वेळ द्यावा याचं महत्त्व मुलांना संवादातून पटवून द्या.
वेखंड, गुग्गुळ, अगुरू, धूप इ. वनौषधी धुपनाने घरातील वातावरण पवित्र आणि सकारात्मक बनवण्याचा प्रयत्न करावा. लक्षात ठेवा खेळीमेळीच्या आणि आनंदी वातावरणाचा अभ्यासावर चांगला परिणाम होतो.
औषधे व रसायनांचा उपयोग :प्रत्येक मुलाची स्मरणशक्ती, ग्रहणक्षमता, धारणक्षमता त्याच्या प्रकृतीवर आणि क्षमतेवर अवलंबून असते. योग्य वाढीसाठी उत्तम आहार, विहार, योगसाधना यांची मदत घ्यावी.
गाईचे दूध, तूप, ब्राह्मी, ज्येष्ठमध, अश्वगंधा, मण्डूकपर्णी, वेखंड इ. औषधी आणि रसायन द्रव्ये मन तसेच भावभावनांवरचे तणाव कमी करून अभ्यासात स्थिरता वाढवतात. तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्याचा वापर करून घ्यावा.

- डॉ. जितेश प्र. पाठक
आयुर्वेदाचार्य:
http://www.facebook.com/drjiteshpathak

1 comment:

  1. Hi ayush,

    Really you wrote awesome post in marathi as well as good information about स्पर्धात्मक परीक्षा

    ReplyDelete

Visit Our Page