🍀 दिवसाची झोप ☘
दिवसा जेवनानंतर झोपणे हा बरयाचस्या लोकांचा नित्यक्रम असतो. दिवसा जेवनानंतर येणारा आळस हा आहारविधी नुसार आहार न घेतल्याचे निदर्शक आहे. अन्नपचन योग्य दिशेने होत नसल्याने आळस झोप येते आणि २-३ तास झोप घेतली असता शरीरातील कफपित्ताचा रोज प्रकोप होतो. त्याने शरीर विविध आजारांसाठी सुपीक जमीनीप्रमाणे बनते. वजन वाढते अंगावर सुज येते विविध प्रकारच्या तपासण्या normal च्या पुढे जातात. कुठलाही त्रास कमी होत नाही.दिवसा जेवनानंतर येणारा आळस झोप टाळण्यासाठी आहारविधींचे पालन अत्यावश्यक आहे. त्याने अन्नपचन योग्य दिशेने होऊन शरीराचे बल आयुष्य आरोग्य वाढेल. दिवसा जेवनानंतर झोपल्याने उत्पन्न आजारांसाठी आयुर्वेदीय  औषधींचा सल्ला घ्यावा. सोबतच आहारातील बदल प्रकृतीनुसार समजावुन घ्यावेत व ते शक्य होईल तितके पाळावेत.
   दिवसा जेवनानंतर झोप येत असेल तर शरीर आजारांच्या दिशेने जात आहे हे समजावे. आजाररूपी stations टाळायची असतिल तर मार्गात बदल म्हणजे आहारविधीचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा बहुतेक आजार होतातच टळत नाहीत.
✔ दिवसाची झोप ✔
रात्री जागरण झाल्यास सकाळी जेवणापुर्वी जेवढे जागरण झाले असेल त्याच्या निम्मा वेळ झोपुन घ्यावे जेवनानंतर झोपु नये.
वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद नांदेड
Mob no -- 9028562102, 9130497856
.jpg) 
 
 
 

No comments:
Post a Comment