Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Monday, September 12, 2016

सुख प्रसव आणि संगोपन – काळाची गरज!

सुख प्रसव आणि संगोपन – काळाची गरज!

पुनरुत्पादन हा सृष्टीचा नियम आहे. निसर्गातल्या तीनही ऋतुंमध्ये उत्पत्ती,स्थिती आणि प्रलय या द्वारे पुनरुत्पादनाचे नियमन केले जाते. पृथ्वीवर आढळणाऱ्या सर्वच जीवांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे पुनरुत्पादन चालूच असते!

सृजनाचे अथवा पुनर्निर्मितिचे हे कार्य अत्यंत नैसर्गिक आहे. ‘ब्रह्मांडी ते पिंडी’ या न्यायाने निसर्गाचे नियम आपल्या शरीरालाही लागू पडतात. सुपीक भूमीवर पडलेले उत्तम बीज जसे अनुकूल हवामान,पोषण आणि ऋतु मिळाल्यावर भूमीतून तरारून वर येते त्याचप्रमाणे उदरात जीव तयार होत असतो.दोन जीव परस्परांच्या ‘स्नेहातून’ एका नवीन जीवाला जन्म देत असतात.

हि साधी सोपी नैसर्गिक गोष्ट सध्या दुरापास्त झालीये.

लग्नाचे वाढेलेले वय,धकाधकीचे जगणे,सतत चिंता-ताण,ऋतुचर्या –दिनचर्या पाळण्याचा अभाव, योग्य अन्न सेवन आणि व्यायाम करण्याबद्दलची अनास्था, कामशास्त्रा बद्दलची अपुरी,अयोग्य माहिती,शरीराला खूप ठिकाणी गृहीत धरणे, या आणि अशा कितीतरी गोष्टींमुळे आपण नैसर्गिक तत्वांपासून दुरावत चाललोय.

मुल होत नाही म्हंटल्यावर आधी येतात त्या होर्मोन टेस्ट आणि त्यांच्या आकड्यात झालेले बदल.मग सुरु होते hormonal चिकित्सा! पण इथे हा विचार केला जात नाही की hormones का बदलेलेत? कुणीही हि दखल घेत नाही की पाळी कशी येते? फक्त महिन्याच्या महिन्याला येणे गरजेचे नाही तर पाळीचे स्वरूपही निरोगी हवे. आपल्या शरीरातील संप्रेरके अथवा hormones स्वतःहून कमी जास्त होत नसतात.त्यामागे कारण असते आपले बिघडलेले चयापचय!

यावर काम करणे खरच कठीण असते?
याला वेळ लागेल म्हणून चटकन गुण येण्यासाठी वापरलेला हा shortcut त्वरित फलदायी असतो? तर मुळीच नाही. लागणारा वेळ लागतोच तिथेही.आणि वैद्यकीय भाषेत सांगायचे तर मुळ संप्राप्ती तशीच ठेवून बीज तयार होत नाहीये मग ते artificially stimulate करून वाढवले तरीही फलित होत नाही अथवा फलित झाले तरी त्या गर्भधारणेत अनेक complications होऊ शकतात.( सरसकट होतात असे नाही कृपया हा मुद्दा ध्यानात घ्या). अशा pregnancy चा बहुतेक काळ हा विविध medicines मध्ये जातो याचे पडसाद प्रत्यक्ष प्रसव/ delivery च्या वेळी जाणवतात. गर्भधारणा झाल्यानंतर नॉर्मल delivery साठी केलेले प्रयत्न तोकडे पडतात कारण मुळातच “ सुख प्रसवाचा” प्रवास हा तुमच्या पाळी सुरु होण्याच्या कालावधीपासून सुरु होतो तो कधी लक्षातच घेतला जात नाही.

गर्भधारणा हि नैसर्गिकपणे आणि सुखकर व्हावी, ९ महिन्यांचा कालावधी हा कुठल्याही complication शिवाय,कमीत कमी medicines युक्त असावा, प्रत्यक्ष प्रसव हा नॉर्मल असो व सीझर तो “सुख प्रसव” असावा. बाळंतपणा नंतरही सुतिका परिचर्या पाळली जावी  हेच खरे माता बालक स्वास्थ्य !!!

माता बालक स्वास्थ्य सगळ्यांनाच हवेय,त्यासाठी फक्त supplements चा प्रोग्राम हाती घेऊन चालणार नाही तर त्याच्या मुळाशी जाऊन काम करायला हवेय.
यासाठीच हि संकल्पना आहे “सुख प्रसव आणि संगोपन”...............
क्रमश:

वैद्य ज्योत्स्ना पेठकर ९७६४९९५५१७
डॉ. सुहास हेर्लेकर ९४२२५००३४६
परिवर्तन आयुर्वेद
सुख प्रसव आणि संगोपन

No comments:

Post a Comment

Visit Our Page