Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Wednesday, November 2, 2016

आहार विधी

१. उष्णमश्नीयात् -- गरम अन्न खावे त्याने अन्न चविष्ट तर लागतेच सोबतच भुक वाढते, अन्नाचे पचन लवकर होते, वाताचे अनुलोमन होते, अतिरिक्त कफ कमी होतो. यामुळेच नेहमी गरम अन्न खावे.
     एकदा गरम केलेले अन्न परत गरम करू नये ते परत गरम केल्यास विषवत बनते.
   याउलट नेहमी थंड अन्न खाणे चविष्ट तर नसतेच सोबतच भुक कमी करते, उशीरा पचते, वाताचे अनुलोमन करत नाही, कफाला वाढवते.

२. स्निग्धमश्नीयात् -- तेल वा तुपादि स्नेहाचे संस्कार केलेले पदार्थ खावेत.
त्याने अन्नाची चव वाढते, जाठराग्नि प्रदीप्त होते, अन्नाला लवकर पचविते, वाताचे अनुलोमन करते, शरीराची वृध्दी करते, इंद्रीयांना द्रढ बनविते, बलवर्धन करते, वर्ण चांगला बनविणारे असते. यामुळेच स्निग्ध तुप तैल संस्कार युक्त आहार घ्यावा याऊलट स्नेहरहित आहार वरील गुणधर्माच्या विरोधी असतो.

३. मात्रावदश्नीयात् -- उदराचे तीन भाग मानुन १ भाग अन्नाने भरावा, १ भाग द्रवाने भरावा व १ भाग वातादी दोषांसाठी रिकामा ठेवावा. जी आहाराची मात्रा सुखाने जिरेल तीच योग्य मात्रा होय.

४. जीर्णे$श्नीयात्ः -- पुर्वीचे जेवन पचल्यानंतरच पुन्हा आहार घ्यावा. पुर्वीचे अन्न पचल्यावर जेंव्हा भुक लागते, शरीरातील स्रोतसांची मुख शुध्द झाल्यावर, शुध्द ढेकर आल्यानंतर, वात मुत्र मलंचा त्याग केल्यावर घेतलेला आहार हा शरीराला दुषीत न करता शरीराची पुष्टी करून आयुष्य वाढवतो. अजीर्णात घेतलेला आहार शरीराला दुषीत करितो व आयुष्य कमी करतो.

५. वीर्याविरूध्दमश्नीयात् -- विरूध्द अन्नाचे सेवन करून नये.
   विरूध्द पदार्थ सेवनाने शास्रानुसार पुढील आजार होतात.
नपुंसकता, आंधळेपणा, विसर्प( herpes zoster), जलोदर( पोटात पाणी साचणे),विस्फोट(शरीरावर फोड निर्माण होणे), उन्माद, भंगदर, मुर्च्छा, मद, पोट गच्च होणे, गळ्याचे आजार,पांडुरोग (रक्त कमी होणे) आमविष (पचन न झाल्याने उत्पन्न विष) पांढरा कोड,  विविध त्वचाविकार सोरियासिस, ग्रहणीरोग (ibs), सर्वांगास सुज, अम्लपित्त, ताप,सर्दी पडसे, संतानदोष, गर्भात दोष किंवा बाळाचा मृत्यु हे सर्व विकार विरूध्द पदार्थ सेवनाने होतात. फक्त विविध आजार टाळण्यासाठीच नाहीतर उत्तम संतती प्रजानिर्मितीसाठी देखील विरूध्द पदार्थ टाळावेत. नाहीतर कालांतराने गंभीर परिणाम दिसावयास लागतात. विरूध्द सेवन करणारया लोकांनी तो बंद करावा काही त्रास असल्यास आयुर्वेदीय चिकित्सा विषयक सल्ला जरूर घ्यावा.

६. इष्ट देशे इष्टसर्वाेपकरणं चाश्नीयांत -- मनानुकुल स्थानी, भोजनाच्या संपुर्ण सामुग्रीसह आहार घ्यावा..
अप्रिय जागी आहार घेणे मानसिक विकारांचे कारण ठरते.

७.नातिद्रुतमश्नीयात् -- फार गतीने लवकर लवकर आहार घेऊ नये. अशा प्रकारे आहाराचे सेवनाने अवसाद निर्माण होतो, तो योग्य प्रकारे आमाशयात पोहचत नाही.

८.नातिविलम्बितमश्नीयात् -- फारच हळुवारपणे भोजन करू नये. त्याने तृप्ती होत नाही सोबतच अाहार अधिक मात्रेने पोटात जातो. वाढलेला आहार थंड बनतो व अन्नाचा विषमपाक होतो.

९.अजल्पन्नहसन् तन्मना भुञ्जीत--  बडबड न करता व न हसता मन लावुन आजार सेवन करावा नाहीतर घेतलेल्या आहाराने अवसाद निर्माण होतो, अन्न योग्य प्रकारे आमाशयात पोहचत नाही आणि अशा आहाराच्या गुण दोषांची उपलब्धी निश्चित सांगता येत नाही.
          आहारविधी नुसार आहार घेणे निरोगी राहण्यासाठी अत्यावश्यक आहे नाहीतर सर्व प्रकारचे आजार मनुष्याचा पिच्छा सोडत नाहीत.

वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद नांदेड
Mob no -- 9028562102, 9130497856

No comments:

Post a Comment

Visit Our Page