Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Sunday, May 22, 2016

गव्हांकुर रस

आयुर्वेदातुन आरोग्याकडे
       🌾 गव्हांकुर रस 🌾
हल्ली विविध आजारांसाठी गव्हांकुर रस पिण्याचा प्रघात वाढत आहे. पाश्चात्यांचे अनुकरण श्रेणीतील आणखी एक प्रकार म्हणता येईल याला. गव्हांकुराला आयुर्वेदीय दृष्टीने पाहणे आवश्यकच कारण हा निसर्गनिर्मित पदार्थ व गव्हांकुर रस घेणारे लोकही आयुर्वेदाच्या नावाने पित असतात.
            गव्हांकुराचा गवतात म्हणजे तृणधान्यात समावेश होतो. क्षुद्रधान्याला तृणधान्य देखील म्हणतात. मनुष्य गहु, ज्वारी, तांदुळ, डाळ, फळे या बीज भागरूपी पदार्थांचा उपयोग खाण्यासाठी करतो. प्राण्याप्रमाणे कडबा, चिपाडे, गवताचा चोथा खाण्यासाठी वापरत नाहीत त्याचे कारण म्हणजे मनुष्याचे आतडे असे पदार्थ पचवण्यास असमर्थ अाहेत व मनुष्य रवंथ करणारा प्राणीही नाही.
              गवताचा रस हा आयुर्वेदीय शास्रानुसार स्वरस कल्पनेतील असल्याने  पचावयास अतिजड असतो आणि असा अतिजड रस मनुष्याला पचवावा लागतो. गवताच्या रसापेक्षा ज्याबीजभाग गव्हापासुन गवत बनते त्या गव्हापासुन बनलेल्या पीठावर अग्निसंस्कार करून पोळी स्वरूपात खाणे चांगले नाही का ?? हा प्रश्न मनाला पडायला हवा. कारण आजकाल supplyments चीच चलती आहे शरीरासाठी अत्यावश्यक असलेला गहु ज्वारी तांदुळ दुध तुप असा मुख्य आहार मुख्य प्रवाहातुन दिवसेंदिवस कमी होत आहे. याउलट  supplymentory lab made product मोठ्या संख्येने वाढत आहेत आणि खाल्लेही जातात. त्यामुळेच आजारी लोकांची संख्या वरचेवर बुलेट ट्रेन प्रमाणे वाढत आहे असे म्हटल्यास चुकिचे ठरू नये..
       गवत वा गवताचा रस खायचा प्यायचा की गहु ज्वारी तांदुळ दुध तुप दाळी भाज्या यासारखे बीज भागरूपी अन्नधान्यावर संस्कार केलेले पदार्थ खायचेत ते स्वतः च्या डोळस बुध्दीनेच ठरवावे.
     मुख्य आहार खाऊनही पोषण कमी पडत असेल तरच  supplymentory आहाराचा विचार करावा तोही निसर्गनिर्मित. Lab मध्ये बनविलेल्या कृत्रीम पदार्थाचा नव्हे..
            कारण निसर्ग निर्मित पदार्थ शरीरासाठी सहजसात्म्य होतात याउलट कृत्रीम पदार्थांवर जाठराग्नि, पांचभौतिक अग्नि, धात्वाग्नि यांचे संस्कार होत नसल्याने कृत्रीम supplymentory पदार्थ आपोआपच पचन न होता शरीराबाहेर पडतात. कृत्रीम पदार्थ खाण्याचे व शरीराबाहेर काढण्याचे विनाकारण कष्ट मानवी शरीराला घ्यावे लागते त्याद्वारे फायद्यापेक्षा नुकसानच अधिक होते..
वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेदीय चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड
Mob no-- 9028562102, 9130497856
For what's up post send your request messege on above mob no

No comments:

Post a Comment

Visit Our Page