Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Sunday, July 10, 2016

आयुर्वेद की महती . . जहांगीर की जबानी !!

आयुर्वेद कोश ~ आयुर्वेद की महती . . जहांगीर की जबानी !!

हिंदुस्थानावर मोघलांनी बरीच वर्ष राज्य केले . त्या 'बादशाह ' लोकांपैकी 'जहांगीर ' होय . तर हा जहांगीर आपली रोजनिशी लिहीत असे . . त्याला 'तुजूक ए जहांगीर ' किंवा ' जहांगीर नामा ' असे नाव आहे . मूळ पर्शिअन भाषेतली ही  संपूर्ण रोजनिशी उपलब्ध आहे .तिचा हिंदी अनुवाद सुद्धा उपलब्ध आहे . त्यात आलेला आयुर्वेद संदर्भ शेअर करत आहे . . .

जहांगीरच्या दरबारात एक भारतीय बल्लवाचार्य दाखल झाला . 'मासळी ' शिजवण्याच्या त्याची खासियत होती . बादशहाच्या दरबारी नोकरी करायची इच्छा त्याने व्यक्त केली . त्यावर बादशाह म्हणाला की 'तू तुझी कला दाखव . ती पसंत पडली तर तुला नोकरीला ठेवू '

त्या दिवशी बल्लवाने शाही बावर्ची खान्यात मासळी तयार केली . बादशाह  यास ती मासळी प्रचंड आवडल्याने त्याने बल्लवास नोकरीवर ठेवून घेतले . अनेक दिवस बल्लव बादशहास उत्तम असे जेवण खायला घालत असे . बादशाह आवडीने ते खात असे . एक दिवस मात्र तो बल्लव सापाचे तुकडे करून , सापाचे मांस बादशहास मासळी म्हणून खायला घालत असे ,हे उघडकीस आले . बादशाह समोर बल्लवाने याची कबुली दिली . . . बल्लव इतके सर्प आणत कोठून असे याबाबत बादशहास उत्सुकता निर्माण झाली . . . त्याने बल्लवास हुकूम केला की तू सर्प कोठून आणतोस हे आम्हास बघ्यायचे आहे . .

एके दिवशी बादशाह आपला लवाजमा आणि बल्लव घेऊन अरण्यात गेला . तेथे थोडी जागा मोकळी करून दुधाची कढई भरून ठेवली होती . त्या जागेपासून दूर अशी बादशाह व त्याच्या लावाजम्याची बसायची सोय केली . बल्लव मंत्र म्हणू लागल्यावर त्या अरण्यातून विविध सर्प बाहेर आले . . . त्या सर्पांचा प्रमुख आला . . ते सर्व सर्प त्या कढई मधील दूध पिऊ लागले . . . मुख्य सर्प मात्र बादशहा यास हवा होता . . तशी त्याने बल्लवास आज्ञा केली . . बल्लव यावर म्हणाला '' या सर्पास पकडणे म्हणजे साक्षात मृत्यू आहे . . तरीही आपणास हा सर्प हवा असेल तर माझी विनंती मान्य करा . . या सर्पाने मला दंश केला तर मला पुरून किंवा जाळून न टाकता काळ्या रंगाच्या बैलाचे पोट चिरून मला त्यात ठेवा आणि बंगाल मधील बारिसाल  येथे असणाऱ्या माझ्या बहिणीला 40 दिवसांच्या आत बोलवा . आणि तिला ही हकीकत सांगा ''

मुख्य सापाला पकडताना त्याने बल्लवास दंश केला आणि तो मरणासन्न झाला . बादशाह ने त्यास काळ्या बैलाच्या पोटात बल्लवास घालून बैलाचे पोट शिवले . त्याच्या बहिणीस सांगावा पाठवला .

त्या बल्लवाची बहीण दिपाबाई दिल्लीत दाखल झाल्यावर तिला ही सर्व हकीकत सांगण्यात आली . तिने राजाकडून 3 दुधाने भरलेल्या कढया मागवून घेतल्या . त्या कढइत तिने तिच्याजवळ असलेले औषध टाकले . बल्लवाचे शरीर बैलाच्या पोटातून काढून त्या प्रथम कढई मध्ये टाकले . संपूर्ण कढई मधील दूध हिरवे झाले . त्या नंतर तिने दुसऱ्या कढई मध्ये आपल्या जवळील औषध टाकले . त्या दुसऱ्या कढई मध्ये बल्लवाचे शरीर टाकले आणि त्या कढई मधील दूध सुद्धा हिरवे झाले . तिसऱ्या कढईत औषध टाकून त्यात बल्लवाचे शरीर टाकले असता दूध हिरवे झाले नाही . पण बल्लवाच्या शरीराची मात्र हालचाल होऊन तो शुद्धीत / जिवंत जाहला !!

गोष्ट संपली . . आता शंका घेण्याचे आणि विवादाचे मुद्दे . .

1. मेलेला किंवा मरणासन्न माणूस काळ्या बैलाच्या पोटात 40 दिवस कसा राहील ?
2. बैलाच्याच पोटात का ?
3. तिने कोणते औषध दुधात घातले ?
4. मंत्र म्हंटल्यावर साप जंगलातून आले असे कसे ?
5. साप दूध पीत नाहीत असं म्हणतात मग इथे असे उल्लेख कसे ?
6. ही गोष्ट 'प्रयोगशाळेत ' सिद्ध होऊ शकते का ?? इत्यादी गुणिले अनंत !!

काळाच्या ओघात अनेक दुवे अनेक विद्या या नष्ट झाल्या आहेत . विष चिकित्सा आणि त्यावरील उपक्रम याचे संदर्भ संहितेत सापडतात . परंतु त्यावर आणि त्याच्या आधारावर 'यशस्वी ' चिकित्सा करणारी गुरु शिष्य परंपरा सध्या 'ज्ञात ' नाही . आदिवासी भागात किंवा ग्रामीण भागात भोंदू लोक विष उतरवायचा नावाखाली जे अघोरी प्रकार करतात त्याचे समर्थन ना आयुर्वेद करतो ना भारतीय शास्त्रे . .

ही गोष्ट शेअर करण्याचा हेतू असा की जहांगीर याच्या काळापर्यंत आयुर्वेद आणि वनस्पती शास्त्र किती प्रगत , प्रगल्भ आणि अग्रेसर होते याचा अंदाज आपल्याला बांधता यावा . 1627 मध्ये जहांगीर वारला . . त्यामुळे किमान 16 व्या शतका पर्यंत भारतीय शास्त्रे यशाच्या शिखरावर होती असे म्हणायला हरकत नाही . त्या नंतर मात्र आपली इतकी झपाट्याने घसरगुंडी झाली की आता आपल्याला 'असे काही होऊ शकते का ? ' किंवा ' असे काही झाले असेल का ?' असा प्रश्न पडतो आणि वाद घालायला आपण बाह्या सरसावून तयार होतो . . .

सदर घटना ही ' तुजूके जहांगीर ' मधील आहे . . . यावर विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा विषय . . आम्हाला मात्र असे संदर्भ मिळाल्यावर आनंद वाटतो भारतीय शास्त्रांच्या प्रगतीचा आणि दुःख सुद्धा वाटते सदर समृद्ध वारसा आणि ज्ञान कालौघात लुप्त झाल्याचे !!

वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे
आयुर्वेद कोश (https://www.facebook.com/aarogyakosh/ )

9175338585

(लेख कृपया लेखकाच्या नावासह व नाव न बदलता शेअर करावा . या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते)

No comments:

Post a Comment

Visit Our Page