Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Tuesday, October 20, 2015

सुप्रजनन : वैज्ञानिक दृष्टीकोन

सुप्रजनन : वैज्ञानिक दृष्टीकोन
लेखक – प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार
(आयुर्वेद वाचस्पति)
सहयोगी प्राध्यापक,
पोदार वैद्यक महाविद्यालय व रुग्णालय, वरळी, मुंबई.
+917738086299
+919819686299
आपले अपत्य शारीरिक, मानसिक व बौद्धिकदृष्ट्या उत्तम असावे हे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते, त्याशिवाय ती स्वत:ला अपूर्णच समजते. केवळ आई होणे ही एकच जबाबदारी तिच्यावर नसते तर आजच्या धावपळीच्या जीवनात ‘एक अपत्य–सुखी दांपत्य’ ह्या सूत्राचा अवलंब करताना एकुलते एक अपत्य सुसंस्कृत, सुजाण, सुदृढ व सर्वार्थाने परिपूर्ण असणे गरजेचे आहे. त्यासाठी सुप्रजननाचे महत्व आहे.
मासिक ऋतुचक्रामध्ये रजःप्रवृत्तीपासून पुढे १२ ते १६ दिवस गर्भधारणेसाठी योग्य असतात. गर्भशयामध्ये ह्याच काळात बीजाचे रोपण होणे शक्य असते. त्यावेळी रसधातुचे पोषण होणे आवश्यक आहे. बीज, बीजभागदुष्टि गर्भाच्या आरोग्यासाठी कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे पुरुषाचे शुक्र सुद्धा उत्तम प्रकारचे असणे आवश्यक आहे. जन्मास येणाऱ्या बालकाचे आरोग्य पूर्णत: माता–पित्याच्या मानसिक व शारीरिक अवस्थेवर अवलंबून असते. त्यासाठी त्यांची आवश्यक शरीरशुद्धी, आहार–विहार व औषधी यांचा गर्भावर होणारा परिणाम यासंबंधी विचार करणे आवश्यक आहे.
सुदृढ गर्भधारणेसाठी स्त्रीबीज व पुरुषबीज सक्षम असणे आवश्यक ठरते. त्यासाठी सर्वात पहिला उपचार म्हणजे शरीरशुद्धी. ह्यासाठी अत्यंत उपयुक्त उपचार म्हणजे ‘आयुर्वेदीय पंचकर्म’. गर्भधारणेची इच्छा असणाऱ्या स्त्री–पुरुषाने शास्त्रोक्त पद्धतीने पंचकर्म अर्थात वमन, विरेचन, नस्य, बस्ति इ. उपचार अवश्य करावेत. विरेचन म्हणजे कोठा साफ करण्यासाठी नुसते जुलाब नव्हेत किंवा बस्ति म्हणजे केवळ साबण पाण्याचा एनिमा नव्हे. ह्यात आयुर्वेदीय निर्माण पद्धतीने तयार केलेले व वनस्पतींनी सिद्ध केलेले तूप प्रकृती, वय व शरीरशक्तीचा विचार करून किमान सात दिवस घ्यावे. शरीरशुद्धीसाठी बाह्यस्नेहन म्हणजेच अभ्यंग, मसाज इ. चा उपयोग करावा. पंचकर्म म्हणून केवळ शिरोधारा, अंगाला तेल रगडणे असे वरवरचे दिखाऊ उपचार करू नयेत. स्त्रियांनी गर्भाधानापूर्वी शोधन व बृहण उत्तरबस्ति, योगबस्ती क्रम, योनिघावन–धूपन, इ. उपचार तज्ञ आयुर्वेद स्त्रीरोग चिकित्सकाच्या मार्गदर्शनाखाली करावेत. शास्त्रशुद्ध पद्धतीने ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधि लागतो. त्यापेक्षा कमी वेळात केलेल्या शॉर्टकट उपचारांचा योग्य फायदा होणे शक्य नाही हे सुप्रजेसाठी इच्छुक दांपत्याने समजून घ्यावे. “वैद्यराज व्हिजन” ही संस्था ह्यासाठी मोफत समुपदेशन करते.
पंचकर्म उपचारांनी शरीरशुद्धी तर होतेच त्याचरोबर पुरुष व स्त्रीबीजशुद्धी पण होते. सर्व इंद्रियांची शक्ती वाढते, मन प्रसन्न होते. स्त्री–पुरुषामधील आकर्षण वाढते व पुढे गर्भधारणा होऊन आरोग्यसंपन्न अपत्यप्राप्ती होते.
शरीरशुद्धीच्या महत्त्वाच्या टप्प्यानंतर आर्तव व शुक्र वाढण्यासाठी ओजवर्धक औषधी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ह्यात अश्वगंधा, आत्मगुप्ता, श्वदंष्ट्रा, नारायणी, कोकिलाक्ष,अक्कलकारा, नागवल्ली पत्र अशा वनस्पती असाव्यात.‘अश्वमाह’ नावाने ह्या संपन्न वनस्पतींनी निर्मित औषध उपलब्ध आहे. ह्याच्या सेवनाने शुक्र धातूचे सामर्थ्य वाढते. ‘तंत्र शुक्र बाहुल्यात् पुमान’ असे वर्णन संहिताकारांनी केले आहे. त्यामुळे निःसंशय सुप्रजानिर्मिती होते.
ह्या औषधामुळे रसधातुचे उत्तम पोषण होते. सुप्रजननासाठी सार्वदेहिक शुक्र तसेच बीजभूत शुक्र ह्या दोन घटकांची गरज असते. ह्या औषधांमध्ये मायक्रोन्युट्रियंट्स असल्याचे सिद्ध झाले आहे. अनादि काळापासून वनस्पतींच्या रूपाने आयुर्वेदामध्ये ह्यांचा वापर करण्यात येतो.
1.कवचबीजामुळे शरीरातील टेस्टोस्टेरॅान वाढते. त्यामुळे लिबिडो म्हणजे कामशक्ती वाढते.
2.वासा व गुडुची - ह्या द्रव्यांमुळे शुक्रदुष्टी दुर होते व त्याप्रमाणे शुक्रामध्ये कुठल्याही प्रकारची विकृती रहात होत नाही.
3.शतावरी, अश्वगंधा, कृष्ण्तीळ ह्या द्रव्यांमुळे शुक्राणूंची संख्या वाढते व शुक्रबीज निर्मिती होते. ही सर्व औषध योजना करण्यामागे संहिताकारांचे कौशल्य वाखाणण्यासारखे आहे. माझ्या खाजगी प्रॅक्टिसमध्ये मी ह्याचा वापर अनेक दांपत्यांवर केला असून त्याचे उत्तम परिणाम झालेले अनुभवास येतात. ह्यासाठी “शुक्रजीवक व अश्वमाह” ही औषधे मी वापरतो. दूध व तुपाबरोबर घेतल्याने ह्या औषधांमुळे उत्तम शुक्रवर्धन होते असा माझा अनुभव आहे.
4.विदारीकंद या द्रव्यात मॅग्नेशियम व ‘अ’ जीवनसत्व असून शुक्रपोषणासाठी ह्याची मदत होते. आमलकीमध्ये जीवनसत्व ‘सी’, जीवनसत्व ‘के’, कॅल्शियम, मॅग्नेशियम असते. त्यामुळे पेशींमध्ये कुठल्याही प्रकारची विकृती निर्माण होत नाही. आमलकीमध्ये आठ ते दहा मिलिग्रॅम जीवनसत्व ‘सी’ असून हे पेशींचा विनाश होऊ देत नाही.
5.अंनतमूळ आणि गोक्षुर हे स्त्री-पुरुषांमध्ये एकमेकांविषयी प्रेमभावना उत्पन्न करतात. ह्यामध्ये शुक्रबीज निर्मितीची शक्ती आहे.
6.पिप्पली व पुनर्नवा हे अॅन्टिफंगल व शोथनाशक आहे.
‘शुक्रजीवक व अश्वमाह’ बरोबर रुग्णाची प्रकृती बघून वरील औषधांचे सेवन करणे हितावह ठरते.
आता स्त्रियांना सुप्रजननासाठी देण्यात येणाऱ्या औषध योजनेबाबत थोडक्यात विचार करूया. सुप्रजनन तर दूरच पण काही मातांना वारंवार गर्भस्त्राव व गर्भपात होतात. काही स्त्रियांमध्ये तर सातत्याने पाच पेक्षा जास्त वेळा अकाली प्रसूती होऊन गर्भ मृत झाल्याचे दिसते. अशा स्त्रिया मातृत्व सुखापासून वंचित राहतात. आयुर्वेदात अशा स्त्रियांसाठी ‘क्षेत्रचिकित्सा’ वर्णन केली आहे. अनेक स्त्रियांचे प्रसव अकाली होऊन बालक मृत्यू पावते. क्षेत्रचिकित्सेसाठी खालील वनस्पतींनी निर्माण केलेल्या ‘गर्भजीवक’ नामक गोळ्या उपयुक्त आहेत.
ह्यात पुत्रजीवी, शतावरी, सारिवा, कसेरु, गंभारी, कमळ बीज, मंजिष्ठा ह्या वनस्पती आहेत. ह्या चिकित्सेमुळे सुयोग्य गर्भधारणा होते, गर्भपात टाळता येतो.
सध्या मोबाईल सदृश अनेक विद्युत उपकरणाचा वापर दैनंदिन जीवनात बेसुमार वाढलेला दिसतो. त्यांपासून निर्माण होणारी रेडिएशन्स स्त्री शरीरावर सतत आघात करत असतात. ह्यांच्या दुष्परिणामांपासून गर्भ व गर्भिणी संरक्षण करण्यासाठी ‘फलमाह’ नामक गोळ्या नक्कीच उपयोगी ठरतील असा विश्वास वाटतो. ह्या विषयाला खंबीर ग्रंथाधार आहे. हा पाठ फलसर्पि नावाने प्रसिद्ध आहे. सर्पि म्हणजे घृत किंवा तूप.
आयुर्वेदात ज्या ठिकाणी तुपाचा उल्लेख आहे त्याठिकाणी गायीचेच तूप अभिप्रेत आहे. सध्या भारतात मिळणारे बहुतांश गायींचे दूध हे जर्सी जातीच्या प्राण्याचे आहे. भारतीय वंशाच्या गायीच्या व जर्सी प्राण्याच्या दुधाच्या गुणधर्मांत लक्षणीय फरक आहेत. शिवाय त्यापासून तूप निर्माण करण्याची प्रचलित प्रक्रिया देखील निराळी आहे. दुधाच्या सायीला विरजण लावून दही निर्माण करणे, त्यापासून लोणी प्राप्त करणे व नंतर अग्नी संस्काराने त्यापासून तूप तयार करणे ही पद्धत शास्त्रीय आहे. सध्या प्रचलित असलेल्या ‘क्रीम सेपरेशन’ पद्धतीने प्राप्त केलेले लोणी म्हणजे प्राणिज चरबी. ह्या चरबीला उष्णता देऊन प्राप्त केलेला स्निग्धांश म्हणजे सध्या बाजारात मिळणारे तूप. गुणधर्मांच्या दृष्टीने 'लोणकढे’ तुपाच्या तोडीस उतरणे हे कदापि शक्य नाही. आणखीन एक कारण म्हणजे गर्भावस्थेत तुपाच्या स्वरुपात औषध गिळणे बऱ्याच स्त्रियांना शक्य होत नाही शिवाय काही काळानंतर अशा तुपाला एक प्रकारचा उग्र वास येतो. म्हणून हा कल्प ‘सिद्ध तुपाच्या’ पद्धतीने निर्माण करण्यापेक्षा त्यातील वनस्पतींचा वापर अन्य स्वरुपात करणे अधिक योग्य आहे. म्हणून ह्या वनस्पतींच्या मिश्रणातून निर्मित गोळ्या “फलमाह” नावाने उपलब्ध झाल्या आहेत.
गर्भिणीच्या सुयोग्य पोषणासाठी ह्या गोळ्या फारच उपयुक्त आहेत. वारंवार होणारे गर्भपात, अकाली प्रसव ह्याचबरोबर स्त्रियांमध्ये होणाऱ्या टॉर्च इन्फेक्शनवरही फलमाह गोळ्यांनी यशस्वी चिकित्सा करता येते. अकाल प्रसव, गर्भस्त्राव, गर्भपात ह्यावर निश्चित अशी चिकित्सा नसल्याचे मत आधुनिक वैद्यक शास्त्रातील स्त्रीरोगतज्ञ वेगवगळ्या परिसंवादातून व्यक्त करीत असल्याचे माझ्या माहितीत आहे.
सुप्रजननासाठी आयुर्वेदात उपलब्ध औषधे :-
अश्मंतक, इक्षु, कपित्थ, कमल पुष्प , कमलगट्टा, कसेरु,कुलिंजन, कृष्ण सारिवा, तिल,कृष्ण सारिवा, गंभारी, गोक्षुर, डोरली, देवदार, द्राक्ष, पटोल, पृश्निपर्णि, प्रियंगु, बला, बिल्व, मंजिष्ठा, यष्टिमधु, रिंगणी, वटांकुर, वड साल, शतावरी,शाकबीज, शिग्रु, शृंगाटक, श्वेत सारिवा, सुंठ इ. वनस्पती सुप्रजननासाठी उपयुक्त असून ह्यांत सूक्ष्मपोषक तत्वे आहेत. शिवाय प्रत्येक महिन्यात गर्भाला आवश्यक असलेली हॉर्मोन्स देखील ह्यातून प्रेरित होतात. आधुनिक शास्त्रानुसार मॅक्रो व मायक्रोन्युट्रियंट्स ह्यामध्ये समाविष्ट असून ते गर्भशयातील बाळाची वाढ उत्तम प्रकारे करतात. या औषधांमध्ये ग्लूटॅमिक अॅसिड, मेथीअॅनिन आणि आर्जिनीन यांसारखी दहापेक्षा जास्त अमाईनो अॅसिड असल्याचे डॉ. के. एस. अय्यर, परेल, मुंबई यांनी सिद्ध केले आहे. ह्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, ह्यांसारखी घटकद्रव्ये उपलब्ध आहेत. शिवाय गर्भाच्या वाढीनुसार हॉर्मोन्सच्या गरजेचे बदलते प्रमाण ह्यांच्या सेवनाने गर्भिणीला व गर्भाला नैसर्गिक रित्या प्राप्त होतात. वरील औषधांचा उपयोग गर्भिणीपांडू, रक्तक्षय, प्रीएक्लेम्पशिया, जेस्टेशनल डायबिटीस, इंट्राहिपॅटिक कोलेस्टॅसिस ह्या विकारांमध्येसुद्धा होतो. मुंबई येथील पोदार रुग्णालयात ह्यावनस्पती पाठांचा उपयोग गेल्या पन्नास वर्षापासून होत आहे.
औषधाइतकीच आहार योजना देखील महत्वाची आहे.
स्त्रियांसाठी आहार :-
सुप्रजननासाठी स्त्रियांनी रोजच्या आहाराशिवाय कॅल्शियम व मॅग्नेशियमयुक्त बनणारे पदार्थ, मेथी, शेवग्याच्या शेंगा, बीट, अंजिर, द्राक्ष, कलिंगड, बाजरी, तीळ, उडीद, हिरव्या पालेभाज्या, सुकामेवा, ज्वारी, इ. सेवन करावेत.
पुरुषांसाठी आहार:-
ताजी फळे, दूध, लसूण, मुळा, बटाटे, तुप, उडीदडाळ, साखर, फरसबी, बीट, गाजर, इ. आहार पुरुषांनी सेवन करावा.
स्त्री-पुरुषांनी असा वेगवेगळा आहार का घ्यावा?
वरील आहारामध्ये शुक्र व आर्तव यांना कार्यक्षम करण्याची क्षमता असते. अपत्यपथामध्ये शुक्रनिवडीची क्षमता असते. अपत्यपथ, गर्भाशयमुख, गर्भाशय यांच्यामध्ये शुक्रनिवड व भृणरूजूकरण अवलंबून असते. वरील प्रकारचा आहार सुप्रजननासाठी आवश्यक ठरतो. शरीरशुद्धी, औषधीद्रव्ये आणि आहार यांचा विचार केल्यानंतर आता आपण वातावरणाचा गर्भावर काही परिणाम होतो काय ह्या विषयावर उहापोह करू या.
आपला आहार-विहार जीवनपद्धती या बाबी कशा असाव्यात हे आपण ठरूवू शकतो. ह्यात काही चुकीचे सेवन केले गेले तर त्याचा विपरीत परिणाम गर्भावर होऊ शकतो. ओझोन व कार्बन मोनॉक्साईड या वायूचे हवेमधील प्रमाण ज्या भागांमध्ये जास्त आहे, त्या भागातील गरोदर बायकांची मुले सदोष हृदय घेऊन जन्माला येण्याची शक्यता असते. हृदयाबरोबरच फुप्फुसावरही प्रदूषणाचा वाईट परिणाम होतो. गरोदरपणाच्या दुसऱ्या महिन्यात हृदयामध्ये व फुफ्फुसामध्ये असे दोष निर्माण होतात. अशा प्रकारचा अभ्यास कॅलिफोर्नियातील शास्त्रज्ञांनी केला आहे. ह्यासाठी योग्य पद्धतीने व तज्ञ मार्गदर्शनाखाली प्राणायाम करणे हितकर ठरू शकते.
ह्या सर्व गोष्टींचा विचार करून केलेली शास्त्रशुद्ध आयुर्वेदीय चिकित्सा दाम्पत्याला सुप्रजननासाठी एक वरदानच ठरेल ह्यात शंका नाही.

No comments:

Post a Comment

Visit Our Page