Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Friday, June 10, 2016

आमवातातील अपथ्य

आयुर्वेद कोश ~ आमवातातील 'पथ्य ' !!

आमवात हा जितका वेदनादायक असतो तितकेच त्याचे सादरीकरण (प्रेसेंटेशन ) भयंकर असते . आतील बाजूस वळलेली बोटे पाहताना कसेनुसे होते . बर एकदा हा बदल झाला की झाला . . . पुन्हा बोटे आधीसारखी होत नाहीत . आमवाताचे शरीरावर होणारे दुष्परिणाम हा सुद्धा चिंतेचा विषय . याचा हृदयावर वाईट परिणाम होतो हे आधुनिक शास्त्र सांगते . आयुर्वेद मात्र काही शतके आधीच आमवाताने हृदय गौरव होतो असे  वर्णन आहे . असो ! तर या आमवातात काय खावे किंवा काय खावू नये याबाबत थोडेसे -

आमवात होण्याचे प्रमुख कारण म्हणजे विरुद्ध आहाराचे (दुध +मासे इत्यादी ) केलेले सेवन , अग्नी मंद झालेला असतानाही आचरट पणे खाल्लेला आहार , गोड , पचायला जड असे अन्न खावून जो मुळीच व्यायाम करत नाही अशा लोकांना आमवात होतो . इथे प्रथम अग्नी दुष्टी . . तिच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अग्निमांद्य . . अग्निमांद्य असतानाही पचन  शक्तीच्या पेक्षा अधिक घेतलेला आहार . . आहाराचे अपनचन . . थोडासा आहार पचणे बराचसा अपाचित आहार शरीरात पडून राहणे . . यालाच आम म्हणतात ! असा आम वातासह सर्व शरीरात फिरून आमवात निर्माण करतो अशी या आजाराची सामान्य संप्राप्ती ! त्यामुळे मला आमवात होऊच नये असे वाटत असेल त्यांनी काय करावे ??

१. आपली पचन शक्ती उत्तम राहील याची काळजी घ्यावी .
२. पचेल आणि पचवता येईल तितकाच आहार घ्यावा .
३. चार घास कमी खायला हरकत नाही .
४. सध्या जी काही 'tempting combinations  ' हॉटेल मध्ये मिळतात ती बहुतेक विरुद्ध आहाराची असतात . त्यामुळे ऑर्डर देताना आपण नक्की काय ऑर्डर करत आहोत याचा विचार जरूर करावा .
५. आठवड्यातून एकदा वैद्याचा सल्ला घेऊन लंघन जरूर करावे . (येथे लंघन म्हणजे उपवास किंवा जेवणात बदल असे अपेक्षित नाही . त्यामुळे आपला उपवास असतो त्या दिवशीचा खिचडी इत्यादी जिन्नस शिजवून पचन शक्तीवर ताण देवू नये . संपूर्ण दिवस नाही जमला तर किमान सायंकाळी कोष्ण जल त्यात सुंठ इत्यादी घालून घ्यावे . अर्थात यासाठी वैद्याचा सल्ला आवश्यक . कारण प्रत्येकाच्या प्रकृतीचा अभ्यास करून मगच लंघन कालावधी व इतर गोष्टी ठरवता येतात .
६. सांध्यांचे दुखणे किंवा पचनाच्या तक्रारी 'अंगावर ' काढू नयेत . वेळेत वैद्यकीय सल्ला घ्यावा . इत्यादी !!

मग आमवात झाल्यावर काय घ्यावे ??

१. आमवतात जेव्हा तहान लागेल तेव्हा पिंपळी , पिंपळी मूळ , चवक , सुंठ आणि चित्रक घातलेले पाणी प्यावे . यास पंचकोल असे  म्हणतात . हे पाण्यात घालणे म्हणजे याचा अर्क पाण्यात उतरणे महत्वाचे . सध्या खूप सुंदर 'इन्फ़्युजन बॉटल ' मिळतात . त्यात हे घालून दोन तीन तास ठेवले की पाणी प्यायला हरकत नाही . यात उपमुद्दा असा की हे औषधी पाणी आहे म्हणून तहान नसताना हे पाणी पिणे अपेक्षित नाही तर तहान लागल्यावरच हे पाणी पिणे अपेक्षित आहे .

२. पडवळ , कारले यांच्या भाज्या उत्तम . कडू निंबाची पाने उत्तम . फक्त यांचा अतिरेकी वापर नको .

३. जव , साठे किंवा तांबडे तांदूळ याचा भात हितकारक .

४. हुलगे , वाटाणे , हरभरे यांचे कढण घ्यावे .

५. बडीशेप , सुंठ , वेखंड इत्यादी ''''वैद्याच्या सल्ल्याने '''' गरम पाण्यासह घ्यावे . इत्यादी !!

आमवातातील 'अपथ्य '

१. दही
२.मासे
३. उडीद
४. गूळ
५. जे पचायला जड , बुळबुळीत आहे त्याचा त्याग करावा .

असे हे आमवातातील सामान्य पथ्यापथ्य . . . याचा वापर हा आमवतात हितकारक असतो !!

वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे
आयुर्वेद कोश (https://www.facebook.com/aarogyakosh/ )

9175338585

(लेख कृपया लेखकाच्या नावासह व नाव न बदलता शेअर करावा . या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते)आयुर्वेद कोश ~ आमवातातील 'पथ्य ' !!

आमवात हा जितका वेदनादायक असतो तितकेच त्याचे सादरीकरण (प्रेसेंटेशन ) भयंकर असते . आतील बाजूस वळलेली बोटे पाहताना कसेनुसे होते . बर एकदा हा बदल झाला की झाला . . . पुन्हा बोटे आधीसारखी होत नाहीत . आमवाताचे शरीरावर होणारे दुष्परिणाम हा सुद्धा चिंतेचा विषय . याचा हृदयावर वाईट परिणाम होतो हे आधुनिक शास्त्र सांगते . आयुर्वेद मात्र काही शतके आधीच आमवाताने हृदय गौरव होतो असे  वर्णन आहे . असो ! तर या आमवातात काय खावे किंवा काय खावू नये याबाबत थोडेसे -

आमवात होण्याचे प्रमुख कारण म्हणजे विरुद्ध आहाराचे (दुध +मासे इत्यादी ) केलेले सेवन , अग्नी मंद झालेला असतानाही आचरट पणे खाल्लेला आहार , गोड , पचायला जड असे अन्न खावून जो मुळीच व्यायाम करत नाही अशा लोकांना आमवात होतो . इथे प्रथम अग्नी दुष्टी . . तिच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अग्निमांद्य . . अग्निमांद्य असतानाही पचन  शक्तीच्या पेक्षा अधिक घेतलेला आहार . . आहाराचे अपनचन . . थोडासा आहार पचणे बराचसा अपाचित आहार शरीरात पडून राहणे . . यालाच आम म्हणतात ! असा आम वातासह सर्व शरीरात फिरून आमवात निर्माण करतो अशी या आजाराची सामान्य संप्राप्ती ! त्यामुळे मला आमवात होऊच नये असे वाटत असेल त्यांनी काय करावे ??

१. आपली पचन शक्ती उत्तम राहील याची काळजी घ्यावी .
२. पचेल आणि पचवता येईल तितकाच आहार घ्यावा .
३. चार घास कमी खायला हरकत नाही .
४. सध्या जी काही 'tempting combinations  ' हॉटेल मध्ये मिळतात ती बहुतेक विरुद्ध आहाराची असतात . त्यामुळे ऑर्डर देताना आपण नक्की काय ऑर्डर करत आहोत याचा विचार जरूर करावा .
५. आठवड्यातून एकदा वैद्याचा सल्ला घेऊन लंघन जरूर करावे . (येथे लंघन म्हणजे उपवास किंवा जेवणात बदल असे अपेक्षित नाही . त्यामुळे आपला उपवास असतो त्या दिवशीचा खिचडी इत्यादी जिन्नस शिजवून पचन शक्तीवर ताण देवू नये . संपूर्ण दिवस नाही जमला तर किमान सायंकाळी कोष्ण जल त्यात सुंठ इत्यादी घालून घ्यावे . अर्थात यासाठी वैद्याचा सल्ला आवश्यक . कारण प्रत्येकाच्या प्रकृतीचा अभ्यास करून मगच लंघन कालावधी व इतर गोष्टी ठरवता येतात .
६. सांध्यांचे दुखणे किंवा पचनाच्या तक्रारी 'अंगावर ' काढू नयेत . वेळेत वैद्यकीय सल्ला घ्यावा . इत्यादी !!

मग आमवात झाल्यावर काय घ्यावे ??

१. आमवतात जेव्हा तहान लागेल तेव्हा पिंपळी , पिंपळी मूळ , चवक , सुंठ आणि चित्रक घातलेले पाणी प्यावे . यास पंचकोल असे  म्हणतात . हे पाण्यात घालणे म्हणजे याचा अर्क पाण्यात उतरणे महत्वाचे . सध्या खूप सुंदर 'इन्फ़्युजन बॉटल ' मिळतात . त्यात हे घालून दोन तीन तास ठेवले की पाणी प्यायला हरकत नाही . यात उपमुद्दा असा की हे औषधी पाणी आहे म्हणून तहान नसताना हे पाणी पिणे अपेक्षित नाही तर तहान लागल्यावरच हे पाणी पिणे अपेक्षित आहे .

२. पडवळ , कारले यांच्या भाज्या उत्तम . कडू निंबाची पाने उत्तम . फक्त यांचा अतिरेकी वापर नको .

३. जव , साठे किंवा तांबडे तांदूळ याचा भात हितकारक .

४. हुलगे , वाटाणे , हरभरे यांचे कढण घ्यावे .

५. बडीशेप , सुंठ , वेखंड इत्यादी ''''वैद्याच्या सल्ल्याने '''' गरम पाण्यासह घ्यावे . इत्यादी !!

आमवातातील 'अपथ्य '

१. दही
२.मासे
३. उडीद
४. गूळ
५. जे पचायला जड , बुळबुळीत आहे त्याचा त्याग करावा .

असे हे आमवातातील सामान्य पथ्यापथ्य . . . याचा वापर हा आमवतात हितकारक असतो !!

वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे
आयुर्वेद कोश (https://www.facebook.com/aarogyakosh/ )

9175338585

(लेख कृपया लेखकाच्या नावासह व नाव न बदलता शेअर करावा . या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते)आयुर्वेद कोश ~ आमवातातील 'पथ्य ' !!

आमवात हा जितका वेदनादायक असतो तितकेच त्याचे सादरीकरण (प्रेसेंटेशन ) भयंकर असते . आतील बाजूस वळलेली बोटे पाहताना कसेनुसे होते . बर एकदा हा बदल झाला की झाला . . . पुन्हा बोटे आधीसारखी होत नाहीत . आमवाताचे शरीरावर होणारे दुष्परिणाम हा सुद्धा चिंतेचा विषय . याचा हृदयावर वाईट परिणाम होतो हे आधुनिक शास्त्र सांगते . आयुर्वेद मात्र काही शतके आधीच आमवाताने हृदय गौरव होतो असे  वर्णन आहे . असो ! तर या आमवातात काय खावे किंवा काय खावू नये याबाबत थोडेसे -

आमवात होण्याचे प्रमुख कारण म्हणजे विरुद्ध आहाराचे (दुध +मासे इत्यादी ) केलेले सेवन , अग्नी मंद झालेला असतानाही आचरट पणे खाल्लेला आहार , गोड , पचायला जड असे अन्न खावून जो मुळीच व्यायाम करत नाही अशा लोकांना आमवात होतो . इथे प्रथम अग्नी दुष्टी . . तिच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अग्निमांद्य . . अग्निमांद्य असतानाही पचन  शक्तीच्या पेक्षा अधिक घेतलेला आहार . . आहाराचे अपनचन . . थोडासा आहार पचणे बराचसा अपाचित आहार शरीरात पडून राहणे . . यालाच आम म्हणतात ! असा आम वातासह सर्व शरीरात फिरून आमवात निर्माण करतो अशी या आजाराची सामान्य संप्राप्ती ! त्यामुळे मला आमवात होऊच नये असे वाटत असेल त्यांनी काय करावे ??

१. आपली पचन शक्ती उत्तम राहील याची काळजी घ्यावी .
२. पचेल आणि पचवता येईल तितकाच आहार घ्यावा .
३. चार घास कमी खायला हरकत नाही .
४. सध्या जी काही 'tempting combinations  ' हॉटेल मध्ये मिळतात ती बहुतेक विरुद्ध आहाराची असतात . त्यामुळे ऑर्डर देताना आपण नक्की काय ऑर्डर करत आहोत याचा विचार जरूर करावा .
५. आठवड्यातून एकदा वैद्याचा सल्ला घेऊन लंघन जरूर करावे . (येथे लंघन म्हणजे उपवास किंवा जेवणात बदल असे अपेक्षित नाही . त्यामुळे आपला उपवास असतो त्या दिवशीचा खिचडी इत्यादी जिन्नस शिजवून पचन शक्तीवर ताण देवू नये . संपूर्ण दिवस नाही जमला तर किमान सायंकाळी कोष्ण जल त्यात सुंठ इत्यादी घालून घ्यावे . अर्थात यासाठी वैद्याचा सल्ला आवश्यक . कारण प्रत्येकाच्या प्रकृतीचा अभ्यास करून मगच लंघन कालावधी व इतर गोष्टी ठरवता येतात .
६. सांध्यांचे दुखणे किंवा पचनाच्या तक्रारी 'अंगावर ' काढू नयेत . वेळेत वैद्यकीय सल्ला घ्यावा . इत्यादी !!

मग आमवात झाल्यावर काय घ्यावे ??

१. आमवतात जेव्हा तहान लागेल तेव्हा पिंपळी , पिंपळी मूळ , चवक , सुंठ आणि चित्रक घातलेले पाणी प्यावे . यास पंचकोल असे  म्हणतात . हे पाण्यात घालणे म्हणजे याचा अर्क पाण्यात उतरणे महत्वाचे . सध्या खूप सुंदर 'इन्फ़्युजन बॉटल ' मिळतात . त्यात हे घालून दोन तीन तास ठेवले की पाणी प्यायला हरकत नाही . यात उपमुद्दा असा की हे औषधी पाणी आहे म्हणून तहान नसताना हे पाणी पिणे अपेक्षित नाही तर तहान लागल्यावरच हे पाणी पिणे अपेक्षित आहे .

२. पडवळ , कारले यांच्या भाज्या उत्तम . कडू निंबाची पाने उत्तम . फक्त यांचा अतिरेकी वापर नको .

३. जव , साठे किंवा तांबडे तांदूळ याचा भात हितकारक .

४. हुलगे , वाटाणे , हरभरे यांचे कढण घ्यावे .

५. बडीशेप , सुंठ , वेखंड इत्यादी ''''वैद्याच्या सल्ल्याने '''' गरम पाण्यासह घ्यावे . इत्यादी !!

आमवातातील 'अपथ्य '

१. दही
२.मासे
३. उडीद
४. गूळ
५. जे पचायला जड , बुळबुळीत आहे त्याचा त्याग करावा .

असे हे आमवातातील सामान्य पथ्यापथ्य . . . याचा वापर हा आमवतात हितकारक असतो !!

वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे
आयुर्वेद कोश (https://www.facebook.com/aarogyakosh/ )

9175338585

(लेख कृपया लेखकाच्या नावासह व नाव न बदलता शेअर करावा . या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते)

No comments:

Post a Comment

Visit Our Page