Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Sunday, June 12, 2016

ऋतुचर्या व जीवनशैली

ऋतुचर्या व जीवनशैली
- वैद्य स्नेहा मार्लेवार एम. डी. (आयु)
आयुर्वेद हे व्याधींचे शास्त्र नसून आरोग्याचे शास्त्र होय. व्याधी होण्याआधीच तो होऊ नये यासाठी काय काळजी (प्रिकॉशन्स) घेता येतील याचे ज्ञान फक्त आयुर्वेद शास्त्रात दिलेले आहे. आपले जीवन आरोग्यमय होण्यासाठी आयुर्वेदात विविध परिचर्या सांगितल्या आहेत. त्यात जन्मापासून वृध्दावस्थेपर्यंत जातमात्र परिचर्या, बालकांसाठी लेहन, चाटन, अन्नप्राशन, संस्कार, तसेच दिनचर्या, ऋतुचर्या, ऋतुमती स्त्रियांसाठी रजस्वला परिचर्या, गर्भिणींसाठी गर्भिणी परिचर्या, सूतिका परिचर्या या सर्व परिचर्यांचे त्या -त्या वेळी व्यवस्थित पालन केल्यास त्या स्थितीशी निगडित आजार होण्याची शक्यता अत्यंत कमी होते. त्यामुळे आयुर्वेद शास्त्राने या परिचर्यांवर विशेषत्वाने भर दिलेला आहे. जे की इतर कुठल्याही शास्त्रात हे आढळणार नाही.
दैनंदिन जीवनामध्ये आरोग्य साधनेला महत्त्व दिलेले दिसते. आहार, निद्रा, ब्रह्मचर्य, सद्वृत्तपालन, आचार रसायन, प्रकृतीविशिष्ट आहार- विहार, आरोग्याचे निर्देशक मापदंड दिसून येतात. त्यावर प्रकृतीचा विचारही केलेला दिसतो. आरोग्य ही एक स्थिती आहे आणि तिचे स्वतंत्र अस्तित्व आहे. दिवा लावला म्हणजे 'सकाळ झाली' असा त्याचा अर्थ होत नाही प्रकाश होतो एवढेच! आरोग्य रुजवावे लागते.  आरोग्याची आजीवन उपासना कशी करावी याचे सखोल विवेचन आयुर्वेदामध्ये दिसून येते. ज्या शरीरात दोष, धातूमल, अग्ी यांच्या क्रियांमध्ये समतोल आहे. मन, आत्मा व इंद्रिय प्रसन्न आहेत; ते शरीर स्वस्थ समजावे. त्यासाठी ''सर्व अन्यं परित्यञ्य शरिरं अनुपालयेत् । बाकी सर्व सोडून अगोदर शरीराचे नीट अपालन करावे. हा संदेश स्पष्टपणे जगाला दिलेला आहे. पण आपले सुख फक्त ऐहिक स्वरूपाचे असते. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे आयुर्वेदाचे चिंतन आहे.
दीपावलीच्या निमित्ताने आपण फक्त ऋतुचर्या आणि जीवनशैली एवढाच विचार या लेखात करणार आहोत. 'ऋतू म्हणजे बदलणारा काळ. प्रत्येक प्रदेशानुसार किंवा देशानुसार ऋतू लांबतो किंवा कमी होतो. नजीकच्या काळामध्ये ऋतुलक्षणांचा आधार घेऊन ऋतुपालन सर्वांना करावे लागणार आहे. प्रत्येक ऋतू हा दोन महिन्यांचा असतो. असे एकूण सहा ऋतू आहेत .
प्रत्येक ऋतूत सभोवतालच्या परिसरात बदल दिसून येतात. वातावरणात विशिष्ट बदल झाल्यावर पर्यावरणातसुध्दा बदल होतो. ऋतूबदलानुसार दोषस्थितीचा विचार आयुर्वेदात आढळतो. दोष 'चय/प्रकोप' झाल्यास ऋतूनुसार आपल्या आहार - विहारात बदल करून दोषांचे शमन करून आरोग्याचे समतोल साधण्याचे व्यवस्थापन म्हणजे ऋतुचर्या.
ऋतुचर्याबाबत पालनाबाबत विचार करताना ऋतूचे साधारण दोन भागांत विभाजन करता येईल.
1) आदान काळ  2) विसर्गकाळ
आदान काळ ः-
हा आग्ेय गुणात्मक असून या काळात सूर्य हा उत्तरायनात असल्यामुळे सूर्याचे किरण प्रखर असतात. त्यामुळे सृष्टीमध्ये रुक्षता, तीक्ष्णता, उष्णता वाढून सृष्टीच्या बलाचा ऱ्हास होतो. कडू, तूरट आणि तिखट या रसांची वृध्दी होते म्हणून मनुष्यांच्या ठिकाणी दुर्बलता येते. सृष्टी आपले बल हिरावून घेते म्हणून या काळात आदान काळ म्हणतात. शिशिर, वसंत, ग्रीष्म या ऋतूंचा समावेश या काळात होतो.
विसर्ग काळ ः- हा काळ सौम्य गुणात्मक असतो, सूर्य दक्षिणायनात असल्यामुळे ढग, वर्षा यामुळे सूर्याचा प्रभाव नष्ट होऊन चन्द्राचा प्रभाव वाढतो. चंद्राच्या शीतल किरणांच्या प्रभावामुळे सृष्टीचे पोषण होते. पृथ्वीवरील संताप नष्ट होतो. रुक्षता कमी होते. आम्ल, मधुर आणि लवण रसाची वृध्दी होते. त्यामुळे मनुष्यांना बलप्राप्ती होते. वर्षा, शरद आणि हेमंत या ऋतूंचा समावेश या काळात होतो.
शिशिर ऋतुचर्या -
माघ आणि फाल्गुन या महिन्यांचा समावेश या ऋतूत होतो. ढग, वारा आणि पावसामुळे या ऋतूत शीतलता जाणवते पण आदान काळामुळे रूक्षता उत्पन्न होते. निसर्गात झाडांची पानगळती होते. वातावरण शीत असल्यामुळे अग्नी बऱ्यापैकी प्रदिप्त असतो. त्यामुळे पौष्टिक पदार्थ खाणे हितकर ठरेल, त्याचप्रमाणे व्यायाम, उद्वर्तन, अभ्यंग, स्वेदन करण्यास हरकत नाही.
वसंत ऋतुचर्या ः-
वसंत ऋतूला 'ऋतूंचा राजा' म्हणतात. या काळात वारा दक्षिणेकडून वाहतो आणि दिशा निर्मळ होतात. सूर्यकिरणे लाल रंगाची होतात. वृक्षांना नवी पालवी फुटते. आंब्याला मोहर येतो. चैत्र आणि वैशाख महिन्यांचा यात समावेश असतो. शिशिर ऋतूमध्ये संचित झालेला फक्त या अन्यांमुळे पातळ होतो. त्यामुळे अग्नी मंद होतो. बल कमी होते आणि विविध व्याधी उत्पन्न होतात.
अग्नीमांद्याचा विचार करून आहार योजना करावी लागते. गहू, ज्वारी, बाजरी, जव इ. जुन्या धान्यांचा वापर या काळात करायला पाहिजे. कणिकाचे फुलके, खाकरा, जोंधळयाची भाकरी, असे हलके पदार्थ खावेत. त्याचप्रमाणे तांदूळगा, शेवग्याच्या शेंगा, पातीचा कांदा, पडवळ, मुळा, वांगी यांचा आहारात समावेश करावा. मसाल्यांचे पदार्थ, तेल याचाही वापर करावा.
दुपारच्या जेवणानंतर लगेच झोपू नये. दुपारी भूक लागल्यास मुरमुरे आणि लाह्यांचा चिवडा खावा. दही, श्रीखंड, लस्सी यांसारख्या पदार्थाच्या सेवनानंतर लगेच झोपू नये. या ऋतूमध्ये तज्ज्ञांच्या सल्यानुसार वमन करून घेण्यास हरकत नाही.
ग्रीष्म ऋतु ः- या ऋतुत वात दोषाचा संचय होतो. त्यामुळे शक्ती कमी झाल्याचा अनुभव येतो. उत्साह वाटत नाही. अग्ी मंद होतो. या काळात पहाटे सूर्योदयापूर्वी उठावे. थोडया प्रमाणात व्यायाम करावा. चंदनबला तेलाने अभ्यंग करावे. ज्यांना दररोज वेळ मिळत नाही त्यांनी शनिवार/रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी अभ्यंग करावे. आहारात मधुर, शीत, पातळ, तरल आणि स्निग्ध पदार्थांचा समावेश करावा. द्रव आहारामध्ये दूध+साखर, सरबत, पन्हे, नारळपाणी व फळांचे रस घ्यावेत. रात्री चांदण्यात उघडयाने झोपावे. शक्यतो सुती तलम कपडयांचा वापर करावा. या काळात शक्यतो मैथुन टाळावे. रात्री उशिरा जेवण करू नये. दुपारी थोडीशी वामकुक्षी घेण्यास हरकत नाही.
आहारामध्ये भेंडी, पडवळ, गाजर, फ्लॉवर, बीट, सुरण कोहळा यांसारख्या भाज्या, मूगडाळ अख्खे मसूर यांचा वापर करावा. कणकेची खीर, दूध-पोळी खावे तसेच सकाळच्या व्याहारीला तूप-मीठ-भात खावे. आमटीमध्ये धने, जिरे, हिंग, हळद यांचा वापर करावा. तसेच कैरी, कोकमदेखील वापरावे. ताकाची कढी विशेषत्वाने सेवन करावी. पण दही मात्र वर्ज्य करावे.

वर्षा ऋतुचर्या ः- श्रावण आणि भाद्रपद या दोन ऋतूंचा समावेश वर्षा ऋतुत होतो. आदान काळाच्या प्रभावाने शरीर आणि जाठराग्नी दुर्बल झालेले असतात आणि वरून पावसामुळे जमिनीतून वाफ असल्यामुळे प्राषण केलेल्या पाण्याचा आम्ल विपाक होऊन दोष दुषित होतात आणि जाठराग्नी मंद होतो. या ऋतूमध्ये वमन/विरेचन आणि बस्ती चिकित्सेने शरीराची शुध्दी (तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली) केल्यास बरे राहील.
अग्निमाप असल्यामुळे शक्यतो जुने धान्य, गहू, तांदूळ, यव यांचा समावेश आहारात असावा. जुने धान्य पचण्यास सोपे असतात.
या काळात जाठराग्नी मंद असल्यामुळे त्याला बलवान्द करणे महत्त्वाचे असते. त्यामुळे आठवडयातून एकदा लंघन करणे आवश्यक असते. त्यामुळे हिन्दू धर्मात या काळात उपवास, व्रत, वैकल्ये सांगितले आहेत. परंतु लोक त्याचा विपर्यास करतात आणि उपवासाचे वेगवेगळे पदार्थ अति गरम करून खातात त्यामुळे उलट जाठराग्नी मंद होतो. या काळात तेलापेक्षा साजूक तुपाचा वापर अधिक प्रमाणात करावा. जेवणामध्ये ताजे आणि गरम गरम जेवण जेवावे. भोपळा, पडवळ, बीट, रताळी यांचा वापर करावा. लसूण, जिरे, सुंठ, मिरी, आले अशा अग्नीवर्धक पदार्थांचा वापर करावा. तांदूळ, गहू, शिंगडे, मुग यांची खीर खावी. स्नानासाठी कोमट पाणी वापरावे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली 'बस्ती चिकित्सा' करून घ्यावी. बस्ती म्हणजे आयुवर्ेदीय औषधांचा एनिमा विशिष्ट कालवधीत करावयाचा असतो.
उद्वर्तन, स्नान, धूम्रपान इ. क्रिया कराव्यात या ऋतूत पाणी स्वच्छ गाळून आणि उकळून प्यावे या काळात व्यायाम करू नये उन्हात जाऊ नये. उन्हात जाऊ नये.
शरद ऋतुचर्या ः- आश्विन आणि कार्तिक महिन्यांचा समावेश असलेल्या या ऋतूत, वर्षा ऋतूतील संचित पीत्ताचा सूर्याच्या उष्णतेने प्रकोप होतो. कइरस युक्त द्रव्यांनी सिध्द केलेल्या तुपाचे सेवन करून विरेचन करावे आणि रक्तमोक्षणासाठी हा ऋतू अगदी योग्य होय. त्यामुळे रक्तप्रसानास मदत होते. व रक्त शुध्दी होते.
शीतल आणि हलके जेवण करावे. आहारात तुरट, मधूर आणि कडू रसांच्या पदार्थांचा समावेश करावा. भूक लागल्यावर साठी साळी, गहू, यव, मूग, मद्य, साखर, पडवळ, द्राक्ष तसेच मांस सेवन करावे. पित्त प्रकृतीच्या लोकांनी साजूक तूप किंवा स्निग्ध घृन दुधात घालून सेवन करावे. त्वचाविकार असणाऱ्या व्यक्तींनी रक्तमोक्षण करून घ्यावे. आहारामध्ये मुगाची डाळ, जुन्या, तांदुळाचा भात, जोंधळयाची भाकरी, फुल्का, मटकी, चणाडाळ, फळ भाज्यामध्ये दुधी, पडवळ, घोसाळी, दोडके, रताळी, काकडी, माठ, तांदूळगा, पालक, कारले, मेथी अशा कडू व भरपूर रस असलेल्या भाज्या सेवन कराव्यात. या ऋतूमध्ये तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली विरेचन कर्म करावे.
या ऋतूत हिरवी मिरची, दही, लोणची पापड कमी प्रमाणात घ्यावीत. ओल्या खोबऱ्याची चटणी चवीपुरते मीठ घालून पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी खावी. चंद्राच्या प्रकाशाचे सेवन करावे कोजागिरी पौर्णिमेला दूध आटवून आपण चंद्रप्रकाशात पिण्याचे ते एक कारण होय.
या काळात अगदी पोटभर जेवू नये. दही, उन्हात जाणे क्षारीय पदार्थांचे सेवन, तेल, तीक्ष्ण मद्य टाळावे तसेच दिवसा झोपू नये.
हेमंत ऋतुचर्या ः- मार्गशीर्ष - पौष महिन्यांचा समावेश असलेल्या हा ऋतु आरोग्याच्या दृष्टीने शारीरिक बलप्रदान करणारा ऋतु होय. अतिशय शीत अशा ह्या ऋतूमध्ये शरीरातील उष्मा शीतल वायूच्या माऱ्याने शरीरात प्रवेश करतो आणि जाठराग्नी प्रदीप्त करतो. म्हणून या काळात पचण्यास गुरू आणि शक्तिदायक पदार्थांचे सेवन करावे. अन्यथा अग्नीस योग्य इंधन न मिळाल्यास अग्नी तो मंद होतो किंवाउदीर्ण होऊन शरीरातील धातूंचे पाचन करून शरीरातील धातू क्षीण करतो. त्यामुळे या ऋतूमध्ये स्निग्ध - मधुर - आम्ल - लवण रसांचे सेवन करावे.
मांसाहार, शिरा, उडीद, डाळींपासून बनणारे पदार्थ, उडीदाचे लाडू, डिंकाचे लाडू, भाज्यांचे पराठे, पुरी लोणी, दुधापासून बनवलेले पदार्थ इ. भरपूर प्रमाणात खावेत आणि ऊर्जा जमा करावी जेणेकरून ही जमा झालेली ऊर्जा आदान काळात किंवा आजारपणामध्ये आपल्याला वापरता येते.
या काळात व्यायाम, उद्वर्तन, अभ्यंग, स्वेदन, धूम्रपान, अंजन आणि उन्हाचे सेवन करावे. आंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करावा. या ऋतूत वात, पित्त व कफ हे तीनही धातू साम्यवस्थेत असतात. त्यामुळे शरीराची प्रतिकारक्षमता वाढलेली असते. त्यामुळे वैद्यांच्या सल्ल्याने 'रसायन चिकित्सा' करावी.
थोडक्यात काय तर प्रत्येक व्यक्तीला आरोग्याचा लाभ होण्यासाठी व बदलत्या जीवनशैलीमुळे उत्पन्न होणारे आजार टाळण्यासाठी शास्त्रकारांनी ऋतुचर्येचे वर्णन केले आहे. त्याचे अगदी तंतोतंत नाही तरी जेवढे जमले तेवढे अनुकरण करणे शहाणपणाचे ठरेल. वरील सर्व बाबींचे तारतम्य राखून ऋतुचर्या आचरल्यास बदलत्या जीवनशैलीमुळे होणारे आजार निश्चितपणे टाळता येतील.
भ्रमणध्वनी : 9819449316

No comments:

Post a Comment

Visit Our Page