Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Friday, December 25, 2015

पनीर विरूध्द अन्न

पनीर विरूध्द अन्न 

        हॉटेलात जेवणासाठी गेल्यानंतर veg लोकांचा सर्वात आवडीचा पदार्थ म्हणजे पनीर होय.calories च्या चष्म्याने पाहिले असता पनीर हा फारच energy असले...ला पदार्थ आहे.
आयुर्वेददृष्टया पनीराचे गुणधर्म पाहिले तर बनविण्याच्या विरूध्द पध्दतीमुळे पनीर विरूध्द अन्नात गणला जाऊ शकतो.
       पनीर हा दुधाला फाटुन म्हणजे दुधात लिंबुरस आदी अम्ल पदार्थ (acids) टाकुन विशिष्ट पध्दतीने बनविला जाणारा पदार्थ आहे. फाटलेल्या दुधापासुन बनविला जात असल्याने हा विरूध्द पदार्थ (पचावयास कठीण) आहे...
तरीपण उत्तर भारतात (पंजाब हरियाणा) आदी राज्यात मोठ्या प्रमाणात पनीर खाण्यासाठी वापरला जातो कारण तेथे निसर्गःतच थंडी जास्त असते. थंड वातावरणामुळे भुक उत्तम असल्याने पनीर सारखा पचावयास जड पदार्थही तेथे पचविला जातो. पण नेहमी वापरात असणारया लोकांत लठ्ठपणा उत्पन्न होतो आणि तो लठ्ठपणा पिढानपिढ्या पुढे सरकतो.
        महाराष्ट्र उष्ण कटिबंधजन्य प्रदेश थंडी फक्त हिवाळ्यात ति पन उत्तरेकडील प्रदेशाच्या तुलनेत एकदम कमी मग पनीर सारखा पचावयास जड विरूध्द पदार्थ पचनार कसा, एकदा जरी पनीर खाल्ला तरी constipation सारखा तात्काळ परिणाम होतो. नेहमी नेहमी पनीर खाल्ले तर पचनसंस्था बिघडुन विविध विरूध्द अन्न सेवनजन्य आजार होण्याचा धोका असतो. नेहमी/विकली हॉटेलातील पनीरयुक्त जेवन हे विरूध्द अन्न असल्याने सर्व प्रकारचे आजार उत्पन्न करू शकते. आजच्या काळात वाढलेले bp ani diabetic चे pt हे नेहमी पनीर खाण्याचा effect आहे.असे म्हटल्यास चुकीचे ठरत नाही. एकीकडे bp sugar च्या tab घेतल्या जातात दुसरया बाजुला हॉटेलात यथेच्छ पनीरासारखे पदार्थ खाल्ले जातात. रक्तदाब sugar control होत नाहीत. तसेच विरूध्द अन्न सेवन जन्य अन्य त्रास दिसतात.
पनीर चा वापर करावा का??? वा किती करावा ??? याचा विचार सर्वांनी जरूर करावा


 विरूध्द अन्न पचविणारे व्यक्ती
व्यायामस्निग्धदीप्ताग्निवयःस्थबलशालिनाम् | विरोध्यपि न पीडायै सात्म्यमल्पं च भोजनम्|| वा.सु. ७/४६
       व्यायाम करणारे, स्निग्ध तेल तुपाने युक्त आहार घेणारे, अग्नि भुक चांगली असणारे, तरूणवयात व बलवान अशा लोकांत जरी विरूध्द अन्न सेवन केले तरी फारसे विकार होत नाहीत. तसेच सवयीमुळे व कमी प्रमाणात विरूध्द अन्न शरीरास सात्म्य झाले असतील तर फारसे बाधक ठरत नाहीत..पण नेहमीच विरूध्द अन्न सेवनाने पुढील गंभीर आजार निर्माण होउ शकतात...
नेहमी विरूध्द पदार्थ सेवनाने होणारे त्रास
नेहमी विरूध्द पदार्थ सेवनाने शास्रानुसार पुढील आजार होतात.....
      नपुंसकता, आंधळेपणा, विसर्प (herpes zoster), जलोदर (पोटात पाणी साचणे), विस्फोट (शरीरावर फोड निर्माण होणे), उन्माद, भंगदर, मुर्च्छा, मद, पोट गच्च होणे, गळ्याचे आजार, पांडुरोग(रक्त कमी होणे) आमविष (पचन न झाल्याने उत्पन्न विष), पांढरा कोड, विविध त्वचाविकार सोरियासिस,ग्रहणीरोग (ibs),सर्वांगास सुज, अम्लपित्त, ताप,सर्दी पडसे, संतानदोष, गर्भात दोष किंवा बाळाचा मृत्यु हे सर्व विकार विरूध्द पदार्थ सेवनाने होतात. फक्त विविध आजार टाळण्यासाठीच नाहीतर उत्तम संतती प्रजानिर्मितीसाठी देखील विरूध्द पदार्थ अन्न टाळावेत नाहीतर कालांतराने गंभीर परिणाम दिसावयास लागतात कारण विरूध्द अन्न सेवनाने शरीरातील मज्जा शुक्र व ओज या सारभुत धांतुवर परिणाम होतो. सारभुत धांतुवर परिणाम होत असल्याने उत्पन्न आजार दुरूस्त होण्यासाठी कठीण असतात..
        विरूध्द अन्न पचविण्याची ताकद असेल तरच अल्प प्रमाणात शरीराला त्रासदायक ठरणार नाही एवढ्या प्रमाणातच खावे. विरूध्द अन्न सेवनाचा इतिहास असल्यास गंभीर आजार उत्पन्न होईपर्यंत वाट पाहु नये. चिकित्साविषयक आयुर्वेदीय सल्ला नजिकच्या वैद्याकडुन जरूर घ्यावा....
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र
पावडेवाडी नाका
 नांदेड
वैद्य गजानन मॅनमवार
9028562102, 9130497856

No comments:

Post a Comment

Visit Our Page