Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Friday, December 4, 2015

वार्धक्य ,आज़ार व आरोग्य

वार्धक्य ,आज़ार व आरोग्य



लहानपन देगा देवा
मुंगीसाखरेचा रवा
वार्धक्य आले देवा
सोबती आयुर्वेद हवा...!!
लहानपणात मुलांचे लाड,आजारपने आई वडील प्रेमाने काढतात ,पन वार्धक्य आले की येनार्या आजाराला काढतांना मुले सोबत असो वा नसों पन आयुर्वेद नक्की च जवळ असावा... तो मित्र आहे ,सखा आहे...!!
४० - ५० शी नंतर वार्धक्यात आपन कधी पोहचलो हे लक्षातही येत नाही,आयुष्यभर जे कधीच आपलें नसते त्यासाटी दिन रात मेहनत करुन शरीर झिजवुन सुख सोयी जमवल्या पन ते करतांना वाढलेले वजन,रक्तदाब ,शुगर,तानतणाव हे ही जमवतो .. व आज़ार सुरु होतात.....
असे का होते बरे? मग मोठ्या डाँक्टरकडे आपन जातो तो औषधे लिहुन देतों व म्हनतो ही औषधे आता कायमस्वरुपी घ्या.....!! विचार करनारी गोष्ट आहे ... त्यावेळी वाटते... पन त्या विचाराला उत्तर हे आयुर्वेद हे मिळते...
स्वस्थस्य स्वास्थ रक्षणम्..!! मानसाला स्वस्थ कसे राहता येईल व त्याचे स्वास्थ्य कसे निरोगी ठेवता येईल तेच आयुष्याचा वेद आयुर्वेद सांगते . दिनचर्या ,रुतुचर्या,ह्याचे सुंदर वर्णन आयुर्वेदात केले आहे,सकाळीं लवकर उठुन मुखमार्जन , मलमुत्रविसर्जन केल्यानंतर १ ग्लास कोमट पाणी प्यावे.. तसेच तेल अभ्यंग ,स्नान केल्यानंतर प्राणाचा आयाम- प्राणायाम करावे.. त्यात अनुलोम विलोम ई करावे
न्याहारी मग ते सकाळी काहीही पन ते अन्न ताजे असने गरजेचे आहे,मग ते उकमा,पोहे, ई तसेच आहारात तेलकट,शिळे पदार्थ कटाक्षाने टाळावे कारन शिळे अन्न च मलबध्दतेसाठी कारणीभुत ठरते व परिनामी आजार उद्भवतात तसेच मीठ कमी असने नेहमी चांगलेच....!!
दुपारचे जेवन हे सुर्यमध्यावर गेल्यास होने गरजेचे आहे कारन सुर्याचा आपल्या जाठराग्नीवर फार परीनाम पडत असतो,सुर्योदयावेळेनुसार उठने तसेच सकाळच्या कफ वर्धक वातावरनात व्यायाम तसेच गरम पदार्थाचे सेवन महत्वाचे...हि सर्व प्रकिया हि कफनाशक असली पाहीजे तसेच दुपारी सुर्य मध्य असता पित्तकाळ सुरु होतो त्यामुळे जेवनही होने गरजेचे काळ १२-२
आहार - चपाती( गहु/ ज्वारी/ नाचनी/ बाजरी)
सर्व पालेभाज्या व कप भर ताक जेवल्यानंतर घ्यावे..तसेच जेवल्यानंतर ३० मि नंतर पाणी प्यावे ..
जेवल्यानंतर लगेच झोपु नये तर थोडे चालावे जेने करुन अण्न पचन चांगले होते.. व पाणी नेहमीच पिताना कोमट घ्यावे...!!
संध्याकाळी सुर्यास्तानंतर जेवन अल्प करुन म्हनजेच ७ -८ दरम्यान चपाती भाजी घ्यावे,उगाच फार उशीरा जेवने हे अपचनास कारन ठरते.. रात्री झाेपतांना १ कप भर दुध नियमाने घ्यावे...
असा आहार व विहार हा रुतुनुसार बदलतोही त्यामुळे योग्य आयुर्वेद तज्ञ कडुन मार्गदशन घ्यावे....
वार्धक्यात गुडघेदुखी ,कंबरदुखी व मनक्याचे आजार ,दमा,पोटाचे विकार हे सतत त्रास देत असतात त्यामुळे औषधि चिकित्सा व पंचकर्म चिकित्सा ही फार लाभदायक ठरते,पंचकर्म शरीर शुध्दी चिकिक्सेने शरीरातील वाढलेले आज़ार कमी होतात ,त्यात स्नेहन,स्वेदन म्हनजेच शरीराची औषधी तेलाने मालीश व औषधी द्रव्याची वाफ दिली जाते जेनेकरुन शरीरावरील सुज,वेदना कमी होतात तसेच वाढलेल्या दोशांना एकमार्ग मिळुन ते कोष्टात जमा होतात व वमन,विरेचन ,बस्ती ,शिरोधारा,नस्य ह्या पंचकर्म चिकित्सेने वाढलेल्या दोषांना शरीराबाहेर काढता येते ...
हि पंचकर्म चिकित्सा हि शरीरातील बारीक पेशी मधील Toxic (दुष्य ) बाहेर काढन्यास मदत करते जेनेकरुन गुडघे मनके ई मघील झिज असो वा पोटाचे विकार असो वा हाता पायाची सुजीत असो हि कमी होन्यास मदत होते...
ज्याप्रमाने रुतुनुसार आहार बदलतो त्याप्रमाने रुतुनुसार पंचकर्म करनेही चांगलेच..
पावसाळ्यात वाताचे आज़ार जास्त होतात त्यात गुडघे,मनक्याचे आज़ाराचे वेदना प्रबळ होतात त्यामुळे त्यात बस्ती चिकित्सा म्हनजेच औषधी तेल वा काढ्याचा (Enema)बस्ती घ्यावा हे प्रकर्षाने Nervous system चेतनासंस्थेवर काम करते ह्या सर्व नसा Neutrition आहार शोषनासाठी पक्वाशयात प्रविष्ट असतात ,झाडाची मुळें जसे पानी व इतर मुलद्व्य मुळातुन शोषतात त्याप्रमानेच ह्या नसाही पक्वाशयातुनच आहार शोषुन घेतात त्यामुळे ह्या नसांमध्ये वा पर्यायी हाडांमध्ये काही बिघाड झाल्यास तर त्याचे मुळ कारन हे पक्वाशयच असते म्हनजेच मल मुत्र विघटन वा अन्नपचन ह्यात बिघाड हा होतोच,त्सामुळे ह्या चेतना संस्थेचे आज़ार बरे करतांना पक्वाशयाचा विचार करने गरजेचे ठरते व गुदमार्गे दिलेल्या बस्ती मध्ये आजारानुसार औषधी तेल वा काढ़े वापरुन ते आज़ार काही दिवसातच बरे होतात.
तसेच हिवाळ्यात पित्ताचे आज़ार वाढतात त्यात अम्लपित्त,अंगावर खाज ई आज़ार हे स्नेहन,स्वेदन करुन औषधी तुप पिन्यास देवुन दोषांना एकत्रित करुन जुलाब एकाच दिवशी देवुन बाहेरसकाढले जातात.. ह्यात कुठलाही त्रास होत नाही
ह्यात एक गोष्टी लक्षात घेतली पाहीजे ती हि की,औशधी तुप जे पिन्यास दिले जाते ते शरीरातील सुक्ष्मातीसुक्ष्म पेशीपर्यत पोहचुन तेथील वाढीव दोशांना कोष्ठात म्हनजेच पोटात घेवुन येते व मग शरीरातुन ते जुलाबावाटे काढावे,ह्यात पुरवीं स्नेहन स्वेदन केल्याने शरीराला काही त्रास होत नाही परंतु वैद्याच्याच मार्गद्शनाने पंचकर्म करावे..
तसेच उन्हाळा पुरवी कफासाठी वमन म्हनजेच उल्टी देवुन कफ बाहेर काढला जातो हि प्रकिया विरेचनासारखी स्नेहन व स्वेदन
दिले जाते व नंतर वमन .. देतात...
तसेच रुतुवितरित आजारांनुसार कधीही पंचकर्म केले तर ते वैद्याच्या सल्यानुसार करावे....
जसी गाडीची सर्विसींग केल्यानंतर चांगले आँईल व पेट्रोल गरजेचे असते तसेच रसायन औषधे हि गरजेची असतात.. जेने करुन शरीराला बल,प्रतिकार शक्ती व अपुनर्भव चिकित्सा म्हनजेच तो आज़ार परत होवु नये हि चिकित्सा... पंचकर्मनंतर केली जाते....!!
वर्षातुन एकदा पंचकर्म केल्याने शरीर रोगमुक्त व त्याची प्रतिकार शक्ती नक्कीच वाढते व आज़ार होन्यापासुन आपन तो रोखु शकतो...!!
त्यामुळे वार्धक्य हो शाप नसुन आयुर्वेद संगे वरदान आहे..
आयुर्वेद सर्वासाठी....!!!
साईनाथ आयुर्वेद
ठाणे/ पुणे.
9821832578

No comments:

Post a Comment

Visit Our Page