Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Monday, December 14, 2015

कृत्रीमरित्या पिकवलेली फळे

कृत्रीमरित्या पिकवलेली फळे

आजकाल बाजारात मिळणारी बरीचसी फळे रसायनिक पदार्थांच्या साहाय्याने पिकविली जातात आणि नैसर्गिकरित्या पिकवण्यासाठी लागणारया कालावधीपेक्षा लवकर रसायनांद्वारे पिकवुन (संस्कार करून) विक्रीसाठी आणली जातात.....
आयुर्वेद शास्रानुसार १ सुत्र आहे. संस्कारोही गुणांन्तरधारम् उच्यते | संस्काराने गुणधर्म बदलतात. काय बदल होते ते पहाने महत्वाचे... काल परिणाम संस्कार हा एक महत्वाचा परिणाम होतो. बहुतेक सर्व फळे बीजापासुन निर्माण होत असल्याने फळामध्ये लवकर पक्वावस्था येते तशीच early maturity मानवी शरीरात दिसते. सामान्य विशेष या आयुर्वेद सिध्दांतानुसार वरील प्रमाणे लवकर पिकणारी फळे खाणारया मुलांमुलीमध्ये early maturity दिसु शकते. यावर कदाचित भविष्यात संशोधन होईलही..
दुसरा परिणाम फळांचे प्राकृत चवीत रसात गोड आंबट तुरट आदीमध्ये बदलाचा दिसुन येतो..
उदा... काही वेळा रासायनिक पध्दतीने पिकविलेली केळी गोड न लागता कच्च्या केळी प्रमाणे तुरट लागते हे प्रत्यक्ष खाल्ले असता समजते.. अशा प्रकारे चवीतील बदल इतर फळांच्या बाबतीत ही प्रत्यक्ष दिसतात आणि फळे खाण्याच्या मुळ हेतुला हरताळ फासला जातो. कारण चवीत गोड आंबट तुरट आदीतील बदल हे गुणधर्म बदलाला कारणीभुत ठरतात फळे खाण्याचा उद्देश सफल होत नाही उपयोग होत नाही शरीरासाठी.. केमीकल्स चे परिणाम दुष्पपरिणाम हा स्वतंत्र विषय!!!
नैसर्गिकरित्या पिकवलेली फळे खायचीत की रसायनांद्वारे early mature झालेली फळे खायचीत ते स्वतः च्याच हातात आहे.....

श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र
 पावडेवाडी नाका
 नांदेड

9028562102, 9130497856

No comments:

Post a Comment

Visit Our Page