Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Tuesday, December 15, 2015

🍀 शरीरातील निसर्ग

🍀 शरीरातील निसर्ग 

🍀
        शरीर स्वतः विविध लक्षणांच्या स्वरूपात आपणास काही सुचना करते त्यांचे पालन केले तर कुठलाही आजार त्रास गंभीरतेकडे जात नाही. लवकर दुरूस्त होतो..
    उदा. १.ताप असताना तोंडस चव नसते सर्वांग दुखते या लक्षणाद्वारे शरीरास आपणास काहीतरी सांगावयाचे असते. तोंडास चव नाही आता पोटाला आराम पाहीजे. अगोदर शरीरातील तापिचे कारण घाण (अपाचित अन्न अाम) भुकेद्वारे पचु दे. मगच रोजचे जेवन कर तोपर्यंत हलके अन्न मुगाची पातळ खिचडी ईत्यादी खा. तसेच शारीरीक हालचालीमुळे अपाचित आम सर्व शरीरात पसरण्याचा धोका असतो त्यामुळे आम कोठ्यातच (digestive tract मध्ये) पचावा शरीरात पसरू नये म्हणुन अंग गळुन जाणे दुखणे आदी लक्षणे दिसतात. कारण फक्त शारीरीक कष्ट हालचाली होउ नये हे असते. आपणास लक्षणे समजीे तर ठीक नाहीतर अपाचित आम पोटात असताना घेतलेला आहार पुर्विपासुन असलेल्या अपाचित आमसह मिसळुन आणखी जास्त प्रमाणात आपाचित आम तयार करतो. शारीरीक हालचालीमुळे अपाचित आम सर्व शरीरभर पसरून उपद्रव स्वरूप गंभीर व्याधी उत्पत्तीची निर्मिती करतो. वा व्याधी उत्त्पत्तीसाठी सुपिक जमीन बनवुन ठेवतो. काहीं लोकांत कुठलाही इतिहास नसताना sudden sugar वाढते किंवा रक्तदाब वाढतो. कुठलाही इतिहास नसताना अचानक त्रास होतो. हा त्रास अपाचित आम शरीरात पसरल्याने होतो. साध्या तापातुन उपद्रव स्वरूप विविध गंभीर आजार उत्पन्न होतात...
         २. अतिसार म्हणजे संडासला पातळ वारंवार जावे लागणे. हा त्रास दुषीत आहार वा पाण्याने होतो. अन्नपचन नीट होत नाही दुषीत न पचलेला अन्नाचा भाग जलाच्या साहाय्याने शरीर स्वतः बाहेर काढते. यावेळी सुध्दा मुखातुन जडान्न सेवन केले असता त्रास कमी न होता वाढतो. भुक लागल्यास पातळ मुगाची खिचडी खाता येते. पण गुलाबजामुन केळी सारख्या जड पदार्थांनी घाण अडवणे loose motions कमी करणे म्हणजे महात्रासदायक शास्रविरोधी...
          शरीरातील घाण औषधींनी वा वरील पदार्थांनी अडवली तरी पुढे त्रासदायक colitis सारखे त्रासदायक आजार उत्पन्न होतात.. त्यामुळेच शरीराचा निसर्ग लक्षात घेणे गरजेचे. निसर्ग विरोधी वा शास्रविरोधी उपायांनी केल्यास ताप वा अतिसाराची लक्षणे नाहीसी होतात. पण पुढे उपद्रव स्वरूपातील किचकट चेंगट आजारांचा सामना करावा लागतो. शरीराचे एेकायचे की शास्रविरोधी उपाय करून उपद्रव ओढुन घ्यायचे हे स्वतः वरच अवलंबुन असते. म्हणुनच शास्रकारांनी सांगितले आहे कुठल्याही आजाराची उपद्रव रहित चिकित्सा म्हणजे खरी चिकित्सा.....

वैद्य गजानन मॅनमवार

श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र
पावडेवाडी नाका
नांदेड 9028562102 , 9130497856

No comments:

Post a Comment

Visit Our Page