Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Tuesday, November 30, 2010

शेती-उद्योग

बदलत्या काळानुसार शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढीस लागला आहे. नत्र,स्फ़ुरद, पालाश या मुख्य खतांसोबतच सुक्ष्मखतांचा (Micro nutrient fertilizers) वापर वाढला आहे. पैकी नत्र,स्फ़ुरद,पालाश या मुख्य खतांची निर्मीतीसाठी प्रचंड गुंतवणुकीचे कारखाने लागतात.

परंतू सुक्ष्मखतांची (Micro nutrient fertilizers) निर्मीती किंवा प्रक्रिया-पॆकिंग करून विपनन करणे हा उद्योग/व्यवसाय म्हणुन अत्यंत चांगला पर्याय ठरू शकतो.
या अनुषंगाने इच्छूकांना मदत व्हावी या उद्देशाने येथे काही कृषीसंबधित करता येण्याजोग्या उद्योगांची एक यादी बनविण्याचा प्रयत्न करित आहे.


१) सुक्ष्मखते (Micro nutrient fertilizers)
पिकांच्या जोमदार वाढीसाठी १६ मुलद्रव्यांची (elements) आवश्यकता असते. त्यापैकी Fe, Zn, Mn, Cu, B, Mo, Cl हे प्रमुख मुलघटक असुन यांच्या एकापेक्षा अधिक मुलघटकांच्या योग्य त्या प्रमाणात मिश्रणाला सुक्ष्मखते म्हणतात. सध्या या सुक्ष्मखंतांना प्रचंड मागणी आहे.
मुलद्रव्यांची (elements) नांवे खालील प्रमाणे.
1) Copper sulphate (CuSO4.5H2O)
2) Zinc sulphate (ZnSO4.7H2O)
3) Borax or Sod.Borate (Na2B4O7.10 H2O)
4) Manganese Sulphate (MnSO4.4H2O)
5) Ammonium Molybdate ( (NH4)6Mo7O24.4H2O)
6) Ferrous sulphate (FeSO4.7H2O)
7) Magnesium sulfate (or magnesium sulphate)
………………………………………………………………………
२) जैविक खते (Bio-fertilizers)
A. Nitrogen fixers
Symbiotic: – Rhizobium, inoculants for legumes.
Non-symbiotic: – For cereals, millets, and vegetables.
a) Bacteria:-
i). Aerobic:-Azatobacter, Azomonas, Azospirillum.
ii) Anaerobic:- Closteridium, chlorobium
iii) Facultative anaerobes- Bacillus, Eisherichia
b) Blue green algae- Anabaena, Anabaenopsis, Nostoe
A. Phosphate solubilizing micro-organisms.
B. Cellulolytic and lignolytic micro-organisms.
C. Sulphur dissolving bacteria.
D. Azolla.
………………………………………………………………………….
३) संप्रेरके - फ़वारणीच्या माध्यमातुन वापर केला जातो.
पिकांची कायीक वाढ, फ़ळांची गुणवत्तासुधारणा, पिकांचा कालावधी
कमि-जास्त करणे वा तत्सम कारणासाठी संप्रेरके वापरली जातात.
सध्या वापरात असलेली काही मुख्य संप्रेरके.
१) आमिनो अ‍ॅसिड – Amino Acid.
२) जिबरेलिक अ‍ॅसिड – Gibberellic acid (also called Gibberellin A3, GA, and (GA3)
३) नॆपथ्यालिक अ‍ॅसेटिक अ‍ॅसिड – NAA
४) ह्युमिक ऎसिड – Humic acid – Fulvic acid organic plant food and root growth promoters
……………………………………………………………………………
१) या उद्योगांसाठी जिल्हा उद्योग केंद्र,खादी-ग्रामोद्योग वा इतर शासकिय विभागांकडून बिजभांडवल स्वरूपात अर्थसाहाय्य होऊ शकते.
२) वर उल्लेखिलेले बहुतांश उद्योग २५ लाखाचे आंत असल्याने पंतप्रधान रोजगार योजनेंतर्गत सबसिडी मिळण्यास पात्र आहेत.
वरिल सर्व उत्पादनांना चांगली मागणी असून मालाची गुणवत्ता व मार्केटिंग
कौशल्य या दोन बाबींच्या आधारावर सहज यशप्राप्ती होऊ शकते.

सेंद्रिय शेती

सेंद्रिय शेती ही संपूर्ण जीवनाला स्पर्श करणारी शेतीची एक पद्धत आहे. या पद्धतीमध्ये माती, पाणी, वनस्पती, मातीतील असंख्य जिवाणू व त्यांचे त्याज्य पदार्थ, पर्यावरण, प्राणी, माणूस, जंगले या सर्वांच्या जीवनचक्राचा शास्त्रीय दृष्टिकोनातून एकमेकांशी कसा संबंध आहे, याचा अभ्यास करून शेती केली जाते.

सेंद्रिय शेतीची उद्दिष्ट्ये -
1. सेंद्रिय शेती पद्धतीने उत्पादनखर्चात कपात.
2. प्रति हेक्‍टरी निव्वळ नफा वाढविणे, विषमुक्त अन्नधान्य, भाजीपाला, फळे तयार करणे.
3. विविध प्रकारच्या प्रदूषणास आळा घालणे.
4. जनावरे व यंत्राच्या शक्तीत बचत व शेती नापिकतेच्या जबाबदारीतून मुक्तता.

100 टक्के सेंद्रिययुक्त जमीन निर्माण झाल्यानंतर त्या भागातील भूगर्भातील पाण्याच्या पातळीत निश्‍चित वाढ होते.
जागतिक स्तरावर, तसेच स्थानिक स्तरावर सेंद्रिय उत्पादनाला होणारी वाढती मागणी, त्यांना मिळणारे जादाचे दर, उत्पादित होणारे विषमुक्त अन्न या बाबींचा विचार करता राज्यातील सेंद्रिय शेती कार्यपद्धतीस प्रोत्साहन देणे व एक राष्ट्रीय चळवळ निर्माण करण्याची गरज आहे.

निर्यातीस सध्या वाव असणारी सेंद्रिय उत्पादनेः कापूस, गहू, तांदूळ, वनौषधी, पापड, लोणची, तीळ, कारळे, मिरची इत्यादी.

सेंद्रिय शेतीमधील अडचणी-
1. आवश्‍यक त्या संशोधनाचा अभाव.
2. पुरेशा प्रमाणात स्थानिक विक्रीयोग्य दुकाने उभी करणे.
3. स्थानिकरीत्या प्रमाणके तयार करून सेंद्रिय शेतीचे स्थानिक स्तरावर प्रमाणके करण्याची मुभा देणे.
4. प्रमाणीकरणाची फी शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी भरावी लागते, ही एक मोठी समस्या आहे; त्यावर उपाय शोधण्याची गरज आहे.
5. प्रक्रिया उद्योगाची कमतरता काढणीपूर्व व काढणीपश्‍चात सुविधा, अद्ययावत प्रशिक्षणाची गरज.

महाराष्ट्र राज्यातील सेंद्रिय शेतीची प्रमाणीकरण करणाऱ्या संस्था -
नौका - पुणे, इकोसर्ट - औरंगाबाद,
एसकेएएएल - मुंबई, आयएमओ - बंगळूर, वन्सरर्ट - जयपूर.
प्रमाणीकरणासाठी नोंद झालेले क्षेत्र - 0.58 लाख हेक्‍टर.

सेंद्रीय शेती पध्दतीत रासाय़नीक खते, किटक-बुरशी नाशके, संजीवके, पशुखाद्यातील घटक यांचा पुर्णतः किंवा मोठ्या प्रमाणावर वापर टाळला जातो.

- या पध्दतीत शक्यतो योग्य पिक पालट, पिकांचे अवशेष, जनावरांचे मलमुत्र, द्विदल धान्ये, हिरवळीचे खते, शेती शिवाय इतर होणारा काडीकचरा, जैविक किडरोग तणनाशके यांच्या वापर करून जमिनीची उत्पादकता व पोद टिकवून पिक घ्यायचे या पध्दतीत हे गृहीत धरले आहे की जमिन हे एक जिवंत माध्यम असून त्यामध्ये शेतीस उपकारकक्षम अशा अनंत जीव-जंतूचे वास्तव्य असते. योग्य वातावरण असल्यास त्यात सतत वाढ होत राहते.

- सेंद्रीय शेतीमध्ये जमिनीतील जीव-जंतूना पुरेसे खाद्य मिळाल्यामुळे त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढून काही संप्रेरके सारखी समिश्रे निर्माण होतात जी वनस्पती वाढीस पोषक असतात. व त्यांची रोग-कीड प्रतीकारक शक्ती वाढण्यास मदत करतात. यामुळे रासायनिक कीड-रोग नाशकांच्या वापर कमी होऊ शकतो.

- सेंद्रीय शेतीतील उत्पादने पौष्टीकता, चव, याबाबतीत सरस असून ती साठवणीत जास्त दिवस चांगली राहतात. तसेच अशा त-हेन उत्पदीत केलेल्या भाजीपाला व फळात नायट्रेट, नायट्रोजनचे व कँडमियम धातूचे प्रमाण कमी असते. रासायनिक खतांच्या अती वापराने सुक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी झाल्याने अन्नधान्य भाजीपाला इत्यादींची पौष्टीकता कमी होते व त्याचा मानवी शरीरावर परीणाम होतो.

सेंद्रिय शेतीमध्ये बीजसंस्कार -
संवर्धकाचा वापर - ऍझोटोबॅक्‍टर आणि अझोस्पायरिलम ही जिवाणू खते हवेतील नत्र स्थिरीकरण करण्यास आणि नत्र पिकास उपलब्ध करून देण्यास मदत करतात.
दहा किलो बियाण्यांस 250 ग्रॅम जिवाणूसंवर्धकांची बीजप्रक्रिया करावी.

सेंद्रिय शेतीमध्ये पीकसंरक्षण-
मित्रकिडीच्या संगोपनासाठी वापर -
पीक मित्रकीड
मका - क्रायसोपा
कोथिंबीर - ट्रायकोग्रामा, मधुमक्षिका
चवळी - लेडी बर्ड बिटल

मुख्य पिकाचे शत्रूकिडीपासून संरक्षण होण्यासाठी सापळा पिके
चवळी - मावा
तीळ - तुडतुडे
अंबाडी - बोंडअळी
तुळशी - रसशोषण करणाऱ्या किडी
झेंडू - पांढरीमाशी, सुत्रकृमी.

चरक संहिता चिकित्सामे उपयोग

चरक संहिता चिकित्सामे उपयोग : 
वरील पुस्तक जेंव्हा मला वाचायला मिळाले , तेन्ह्वा  वरील कव्हर आकर्षक वाटले . जुन्या ग्रंथाकाह्य स्वरूपात आडवी रचना असलेले हे पुस्तक चरक संहिते वरील अतिशय सुन्दर वा समर्पक असे आहे .याचे लेखक वैद्य . विजय कुलकर्णी आहेत . या पुस्ताकास हिंदी भाषेतून लिहिण्यात आले आहे . जेने करून राष्ट्रभाषेतुन छापेले असल्याने संपूर्ण भारत भर याचे वाचन करण्यात यावे , हा उद्देश असावा . या पुस्ताकास वैद्य . स प्र सरदेशमुख प्राचार्य आयुर्वेद महाविद्यालय वाघोली ,पुणे  यांची प्रस्तावना लाभली आहे . प्रस्तावने नंतर लगेच ( चिकित्सक की आचार संहिता ) हा निर्देश आहे . .पश्च्यात अनुक्रमाणिका असून प्रथम चरक परिचय आहे .
स्वस्थ रक्षण ,चिकित्सा विभाग , चतुर्थ भाग हा व्याधि व चिकित्सा सूत्र विभाग आहे व्यवहारत उपयोगी पड़ाव असा हा ग्रंथाच आहे.
या पुस्तकात 
चरक संहिताचे व्यवहारिक अंश 
दैनादीन चिकित्सा में उपुक्त विवरण
चरक संहिता योग सूचि
महाकशाय    , अग्रसंग्रह, चरक वैशिष्ट्य ,
चरकोक्ता यवागू , लेप 
पथ्यापथ्य 

या पुस्तकाचे संभाव्य वाचक
आयुर्वेदीय  चिकित्सक
आयुर्वेद स्नातक/ विद्यार्थी
आयुर्वेदीय अध्यापक
आयुर्वेदीय पदव्युत्तर स्नातक
आयुर्वेद चे जिज्ञासु


                                              लेखक
                                                वैद्य . विजय कुलकर्णी 
                                               आयुर्वेदाचार्य ( BAMS)
                                                 PhD ( Ayu. student)
      


पुस्तक  मिलन्याचे    ठिकान 
विराम प्रकाशन 
विराम, व्यंकटेश सोसायटी
शिवाजी नगर,
नाशिक ४२२००६
फोन ०२५३ २४१४९२१





 
 



 

Monday, November 29, 2010

आपली मराठी

- जयवंत काकडे

किलला वार्ड, वरोरा

जि.चंद्रपुर

आपली मराठी भाषा अतिशय लवचिक आहे, एका शब्दाचे अनेक अर्थ असणे आणि एकाच अर्थाचे अनेक शब्द असणे हे चांगल्या आणि समृद्ध भाषेचे लक्षण मराठीत सुद्धा आहे. एखाद्या शब्दाची फोड केली की, त्यातूननवे शब्द तयार होणे आणि अनेक शब्द जोडून एक शब्द तोही चांगलाच लांबलचक हा प्रकार मराठीत सुद्धा आहे. असाच एक शब्द म्हणजे. `एकसमयावच्छेदेकरुन'! याच अर्थ `एकाचवेळी' असा होता. असे प्रयोग मराठीत अनेक आहेत. आता ही चार ओळींची कविता
बघा-बाई म्या उगवताच रवीला
दाट घालुनी दधी चरवीला
त्यात गे घुसळताच रवीला
सार काढुनी हरी चरविला
या चार ओळीपैकी पहिल्या ओळीतील रवीचा अर्थ `सुर्य' असा आहे. दुसऱ्या ओळीतील चरवी हे `भांडे,' तिसऱ्या ओळीतील रवी म्हणजे `दही घुसळण्याच उपकरण' आणि चौथ्या ओळीतील `चरविला' या अर्थ आहे `खाऊ घातला'.
गंमत बघा! `रामासा त्या गावे! भजन करावे गाढवाचे!' या ओळीतील गाढ आणि वाचे हे दोन शब्द एकत्र केले की `गाढव' हा प्राणी होतो आणि या ओळीचा अर्थ गाढवाचे भजन करावे असा होतो.
`मंच' म्हणजे व्यासपीठ आणि मंचक म्हणजे पकंग. या दोन शब्दांचा घोटाळा करुन वक्ते अनेकदा विनोद निर्माण करतात.
कविवर्य मोरोपंतानी आपल्या काव्यात शब्द चमत्कृतीचे विपुल प्रयोग केले आहेत.
पु.ल. देशपांडे यांनी सुद्धा अशाच प्रकारच्या शाब्दिक कोट्या करुन मराठी भाषेतील गंमती श्रोत्यपर्यंत पोचविल्या आहेत. पु.ल. देशपांडे एका मित्राकडे जेवायला गेले. भरपेट जेवण झाल्यानंतर आभार मानताना म्हणाले , "जेवण इतकं रुचकर झालं होतं की मी तर `अवाक' झालो" . ही शाब्दिक कोटी न समजलेल्या लोकांसाठी खुलासा करीत पु,ल. म्हणाले, "मी इतका जेवलोय की आता वाकूच शकत नाही".
`शंकरासी पुजिले सुमनाने' या ओळीतील सुमनाने या शब्दाचा अर्थ `फुलाने' असा होतो आनी `चांगल्य मनाने' असा सुद्धा होते. सुमन नावाच्य व्यक्तीने असाही होतो.
शब्दाचे उच्चार स्पष्ट असावे लागतात. उच्चारात गडबड केली. तरी भलताच अनर्थ होऊ शकतो. महिला म्हणजे स्त्री. पण मैला म्हणजे घाण. संबंध म्हणजे ऋणानुबंध आणि समंध म्हणजे भूत. संवर्ग म्हणजे उपविभाग आणि स्वर्ग म्हणजे ईश्वराचे निवासस्थान. अनेक जण उच्चारात गफलत करून गोंधळ उडवितात. विनोद निर्माण करतात. गृह म्हणजे घर आणि ग्रह म्हणजे आकाशातील तारे. गृहदशा आणि ग्रहदश यातील फरक कळला नाही तर पंचाईतच.
आपल्या मातृभाषेचा आपण सखोल अभ्यास करावा. भाषेचे बारकावे जाणून घ्यावे. शब्दांचे नेमके अर्थ आणि उच्चार आपल्याला माहित असायलाच हवेत. मातृभाषेसोबत आपण इतर भाषा शिकायला मुळीच हरकत नाही. पण मातृभाषेवर आपली हुकूमत असायला हवी. तिचा अभिमान असायला हवा.
सुदैवाने मराठी भाषेने देवनागरी लिपीचा स्वीकार केला आहे त्यामुळे महाराष्ट्रीयांना त्याच लिपीतील संस्कृत, हिंदी, गुजराथी या भाषा सहज अवगत करता येतात.http://www.marathimati.com/article/AapaliMarathi.asp

लिंबु

Limeलिंबाचे अनेक औषधी उपयोग आहेत. लिंबु उभे कापून त्यावर खडीसाखर घालून चोखल्यास ओकारी थांबते. पोटदुखी थांबण्यास आले व लिंबाचा रस साखर घालून सेवन करावा. अजीर्णावर लिंबू फार उपयुक्त आहे. ते आडवे कापून त्यावर सुंठ किंवा सैंधव (मीठ) घालून निखाऱ्यावर गरम करावे आणि वारंवार चोखावे. त्यामुळे करपट ढेकर, ओकारी, पोटफुगी वगैरे त्रास कमी होतो. पित्त झाले असल्यास रोज लिंबाचे सरबत घ्यावे. त्याने भूक वाढते. अन्न पचते व शौचास साफ होते. मेदवृद्धि म्हणजे लठ्ठपणा कमी करण्यासाठीही रोज लिंबाचा रस उन पाण्यात घालुन घेतल्याने उपयोत होतो. वाळलेले लिंबू मधात घालून चाटण म्हणून घेतल्यास उचकी तसेच ओकारी थांबण्यास मदत होते. अंगाला कंड सुटत असल्यास लिंबाचा रस खोबरेल तेलात मिसळून अंगास चोळावा व ऊन पाण्याने स्नान करावे. कंड कमी होतो. नायटे व डोक्यातील खवडे यावरही लिंबाचा रस चोळल्याने चांगला परिणाम होतो.

ऊस

ऊस खाण्यामुळे लघवी साफ होते. तसेच लघवीच्या वेळी आग होत असल्यासही तो उपयुक्त ठरतो. कावीळ झालेल्या रोग्यास तर ऊसासारखे दुसरे औषध नाही. काविळीचे रोग्याने रोज दोन वेळा जेवणापूर्वी ऊस खावा. चार पाच दिवसात प्रकृतीत सुधारणा होते. ऊस हा थंड आहे. त्यामुळे उन्हाळ्यात घेतल्यास उपकारक ठरतो. त्याचप्रमाणे कलिंगड हे एक थंड फळ आहे. त्याबद्दल एकच काळजी घेणे आवश्यक आहे. रस्त्यात गाडीवर मिळणाऱ्या उघड्या फोडी खाल्यामुळे एखाद्या वेळी अपाय होण्याचा संभव असतो. कारण त्याच्यावर माशा बसून व रस्त्यातील धूळ उडून त्या दूषित झाल्या असण्याचा संभव असतो

स्मृतीभ्रंश

  वृद्धावस्थेतील सर्वात नकोसा वाटणारा आजार म्हणजे विस्मरण. यामुळे त्या वृद्ध व्यक्तीनाही अतोनात त्रास होतो. या व्याधीची सुरवात छोट्याश्या गोष्टींनी होते. फ्रीजचं दार उघडणं आणि ते कशासाठी उघडलं हे ना आठवणं, कोणी घरी येणार असल्याचा निरोप सांगायला विसरणं. किल्या कुठे ठेवल्या हे ना आठवणं वगैरे.

कमलाबाई एकदा चष्मा हा शब्दच विसरल्या आणि सर्व घरात माझा गोपाळकृष्ण कुठे आहे म्हणून शोधू लागल्या. शेवटी त्यांच्या नातवाला त्यांनी विचारल्यावर नातवाने त्यांना सांगितलं, 'आजी, तुला गोपाळकृष्ण कशाला हवाय?' त्यावर त्या म्हणाल्या 'अरे, पेपर वाचण्यासाठी!' हे ऐकल्यावर ताबडतोब त्यांना काय हवंय ते नातवाला लक्षात येऊन त्यानेच चष्मा शोधून दिला. ही व्याधी पूर्णपणे टाळता येणे कठीण असते; यासाठी स्मरणाचं कार्य मेंदू कसं करतो ते पाहू.

    आपला मेंदू सर्वप्रथम विविध प्रकारची माहिती संवेदी ज्ञानेद्रीयांच्या द्वारे मिळवतो. म्हणजे आपण आपले डोळे, कान, जीभ, नाक आणि त्वचा या पाच इंद्रियांचा वापर त्यासाठी करतो. मिळालेली माहिती मेंदू साठवून ठेवतो.

यामध्ये दोन प्रकार आहेत. कित्येक वर्षापूर्वीची माहिती साठवणं उदा. आपण लहानपणी शिकलेली स्तोत्र, आरत्या, पाढे हे सर्व आपल्याला मुखोदगत असतं. हा झाला पहिला प्रकार. दुसरा प्रकार म्हणजे अगदी नजीकच्या काळात घडलेल्या घटनांची माहिती साठवणं. या मध्ये अगदी नजीकच्या काळात भेटलेली व्यक्ती, शिकलेल्या गोष्टी, पाहिलेल्या घटना, स्थळे अशा सर्वांचा समावेश होतो. आपण एखादा प्रवास करून येतो. त्यात भेटलेल्या व्यक्ति काही काळ आपल्या लक्षात राहतात, हे या प्रकारचं एक उदाहरण.

मेंदूने साठवलेली ही माहिती आपल्याला गरज पडेल तेव्हा आपल्याला आठवणं हे मेंदूचे माहितीसंबंधीचे तिसरे कार्य. ही सर्व कार्ये बिनबोभाट चालू असतात. कित्येक वर्ष ही कामं विनासायास चालू असतात. याची आपल्याला कल्पनाही नसते. वृद्धावस्थेत जेव्हा स्मृतीभ्रंश होतो तेव्हा प्रथम या बाबतीत आपण विचार आणि काळजी करायला लागतो. ही कार्ये आता वृद्धावस्थेतही व्यवस्थित चालावी यासाठी आपल्याला काही प्रयत्न करावे लागतात आणि ते कोणते याचाच विचार आता आपण करणार आहोत.

    सर्वप्रथम मेंदूच्या माहिती घेणा-या कार्यामध्ये म्हणजे संवेदी ज्ञानेद्रीयांच्या कार्यात सुधारणा करण्यासाठी दृष्टीने काय करता येईल ते पाहू. डॉ.आर्थर विंटर आणि श्रीमती रुथ विंटर यांनी या संदर्भात काही व्यायाम सुचवले आहेत. आपण आता विचार करणार आहोत. योगामध्येसुद्धा उत्तम व्यायाम असतात ते आपल्या क्षमतेप्रमाणे जरूर करावेत. पण यांनी सुचविलेले व्यायाम आणि उपाय अतिशय सोपे, सहज आणि कुणालाही करता येण्यासारखे आहेत.

    संवेदी ज्ञानेद्रीयांपैकी सर्वात महत्वाचं ज्ञानेद्रीय म्हणजे डोळा. त्यामुळे त्याची काळजी घेणं खूप महत्वाचं ठरतं. डोळ्यावर ताण येईल अशा प्रकारे मंद प्रकाशात, बारीक टाईप असलेल्या मजकुराचं वाचन करू नये. सलग दोन तास वाचल्यानंतर १५ ते २० मिनिटे डोळ्यांना विश्रांती घ्यावी. डोळ्यांवर गार पाण्याच्या गुलाब पाण्याच्या घड्या ठेवणे, डोळ्यांवर आपले पंजे ठेऊन थोडा वेळ डोळे मिटून बसणे हे यावरचे काही उपाय. अ जीवनसत्व असलेल्या भाज्या, फळं, मोड आलेली कडधान्य, जवसाची चटणी, मासे, अक्रोड, बदाम यापैकी परवडेल ते सर्व आहारात ठेवणं आवश्यक आहे. डोळ्यात काहीही अजिबात घालू नये. टी.व्ही.सुद्धा जास्त पाहू नये. फार प्रखर प्रकाशाकडे पाहू नये. ओमेगा ३ फॅटी असिड योग्य प्रमाणात पोटात जाईल याची काळजी घ्यावी.

वृद्धावस्थेत होणारे डोळ्यांचे प्रमुख आजार म्हणजे मोतीबिंदू, काचबिंदू, दृष्टी अधू होणं आणि डोळ्यातील पडदा खराब होणं हे आहेत. यापैकी योग्य चष्म्याच्या सहाय्याने काही अंशी तरी अधू दृष्टीवर मात करता येते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दर सहा महिन्यांनी डोळ्यांची डॉक्टरांकडे जाऊन नेत्रतपासणी करून घेणं. कारण यापैकी कोणतीही व्याधी लवकर लक्षात आली तर पूर्ण बरी होऊ शकते. मोतीबिंदूवर यशस्वी शस्त्रक्रिया करता येते. डोळ्यांच्या व्याधीवर आजकाल चांगली औषधेही आहेत.

    आता डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यासाठीचे व्यायाम पाहू. एक छोटा टॉर्च प्रकाशित करून उजव्या हातात धरा. समोर बघत टॉर्च डोक्यावर न्या. फक्त डोळे हलवून टॉर्चकडे पहा. पाच आकडे सावकाश म्हणेपर्यत पहा. हात फिरवून हनुवटीखाली पोटापाशी आणा. फक्त डोळे हलवून त्याकडे पाच आकडे म्हणेपर्यत पहा. आता हलवून टॉर्च उजव्या कानाच्या रेषेत अर्धा फुटावर आणा. फक्त डोळे डाव्या हातात टॉर्चकडे पहा. पाच आकडे सावकाश म्हणेपर्यत पहा. हात फिरवून टॉर्च हनुवटीखाली पोटापाशी आणा. फक्त डोळे हलूवून त्याकडे पाच आकडे म्हणेपर्यत पहा. आता हात हलवून टॉर्च उजव्या कानाच्या रेषेत अर्धा फुटावर आणा. फक्त डोळे हलवून त्याकडे पहा. आता याच तिन्ही गोष्टी डाव्या हातात टॉर्च धरून करा.

हे सर्व व्यायाम (उजव्या व डाव्या हातात टॉर्च घेऊन प्रत्येकी) पाच वेळा करा. आता उजव्या हातात टॉर्च घेऊन तो हात उजवीकडे खांद्याच्या रेषेत सरळ ठेवा. फक्त डोळे हलवून त्याकडे पहा.

    मग तो हळूहळू हात हलवून चेह-याकडे नाकाच्या रेषेत व फुटावर आणा. आता त्याकडे पहा. आता तो हात डाव्या खांद्याच्या रेषेत नेता येईल तेवढा नेऊन पुन्हा फक्त डोळे हलवून त्याकडे पहा. हीच कृती डाव्या हातात टॉर्च घेऊन करा.

 वरील सर्व व्यायामांचे वेळी डोकं अजिबात हलवायचं नाही. फक्त डोळे हलवायचे आणि पाच आकडे म्हणायचे. एक चेंडू किंवा झाडाची फांदी यापासून पाच फुटावर येईल अशा प्रकारे टांगा. त्याला झोका देऊन तो हलत असताना त्याकडे दोन मिनिटे खुर्चीत बसून पहा.

    मग खुर्ची पलीकडच्या बाजूला किंवा त्याच बाजूला दुसरीकडे सरकवून हीच  कृती पुन्हा करा हे सोपे व्यायाम आणि योग्य आहाराद्वारे आपण आपली दृष्टी सुधारू शकतो.

डोळे

डोळे येणे हा संसर्गजन्य आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु याचा संसर्ग कसा होतो, याबद्दल अनेक गैरसमज आहे. डोळे आलेल्या व्यक्तीकडी पाहिल्याने डोळे येतात. हा एक गैरसमज आहे. जर अशा प्रकारचा संसर्ग असता तर सर्वांचे डोळे आले असते. ज्यांचे डोळे आले आहेत त्या रुग्णाच्या डोळ्यातून येणारे पाणी यामध्ये जीवाणू असतात. असा संसर्ग होऊ नये म्हणून पुढील खरबरदारी घ्यावी.
  • रुग्णाने सारखा डोळ्यांना हात लावू नये, डोळे चोळू नये, यामुळे कुटुंबातील इतरांना संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.
  • रुग्णाचे डोळे स्वच्छ करणाऱ्या व्यक्तीनेसुद्धा डोळे स्वच्छ केल्यानंतर हात साबण लावून स्वच्छ धुवावेत.
  • दिवसातून ३ ते ४ वेळा स्वच्छ पाण्याने पुढील प्रमाणे डोळे स्वच्छ करावे. ग्लासभर पानी चांगले उकळुन त्यात थोडे मीठ टाकून त्यात स्वच्छ कापडाचे छोटे छोटे तुकडे टाकावेत. त्यामुळे ते कापडाचे तुकडे निर्जंतुक होतील.
  • डोळे आलेल्या व्यक्तीला हस्तांदोलन करू नये. तसेच त्यांच्या अधिक संपर्कात राहू नये.
  • डोळे आलेल्या व्यक्तीला एका कुशीवर अशा प्रकारे झोपवायचे की त्याचा निरोगी डोळा खालच्या बाजुस येईल.
  • स्वतःचा रुमाल, टॉवेल व अंथरुण नेहमी वेगळे ठेवावे. डोळ्यांना खाज सुटली तरी हाताचा उपयोग न करता स्वच्छ रुमालाने डोळे चोळावेत.
  • डोळे आलेल्या व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळून घरीच आराम करावा. तसेच डोळे आलेल्या आलेल्या मुलालासुद्धा शाळेत पाठवू नये. यामुळे डोळे येण्याच्या संसर्गाची साखळी तोडण्यास मदत होते.

पिंपळी

पोटाचे विकार- पिंपळी चूर्ण गुणकारी

पिंपळीचे औषधात अनेक उपयोग आहेत. पण विशेषत: दमा, खोकला व सर्व प्रकारचे वातविकार व कफरोग यांवर अत्यंत गुणकारी आहे. कफयुक्त खोकल्यावर पिंपळीचे चूर्ण तूप व मध द्यावे. मात्र ते सर्व विषम प्रमाणात द्यावे म्हणजे आराम वाटतो. जेवण झाल्यावर पोट जड वाटणे अथवा पोटास तडस लागत असेल व अन्नपचन होत नसेल, तर जेवणानंतर पिंपळीचे चूर्ण मधाशी खावे. तसेच पोटात वात धरुन शूल होत असेल, तर पिंपळीचे चूर्ण सैंधव, आल्याचा रस व थोडा मध यातून दिल्याने दुखने थांबते. भुक अजिबात लागत नसेल व बारीक ताप असेल तसेच तोंड बेचव असून मळमळ , तोंडाला पाणी सुटणे इत्यादी लक्षणे होत असतील तर नुसते पिंप्ळीचे चूर्ण गुळाबरोबर घेतल्याने हे विकार कमी होतात. पिंपळीचे चूर्ण नुसते न घेता त्याबरोबर सुंठीचे चूर्णही थोडेसे घेतल्यास लवकर गुण येण्यास मदत होते. दमा, खोकला, ह्र्दयाचे विकार, कावीळ, पांडुरोग इत्यादी रोगही या उपायाने बरे होतात. पिंपाळीचे चूर्णाचे दुप्पट गुळ घ्यावा असे वैदक शास्त्रात सांगितले आहे.

मध व पिंपळीने चरबी कमी होते

दात दुखणे, हालणे, ठणका लागणे इत्यादीसाठी पिंपळी, जिरे, व सैंधव यांचे वस्त्रगाळ चूर्ण करुन दांताच्या मुळाशी घासल्याने त्या तक्रारी कमी होतात. शरीरात स्थूलता फार वाढली असेल तर पिंपळीचे चूर्ण सतत काही दिवस मधाबरोबर घेतल्याने शरीरातील चरबी कमी होते व त्यापासून होणारा रोग बरे होतात.

चौसष्टी पिंपळीने दमा बरा होतो

पिंपळाचा उपयोग अनेक रोगांवर होतो. याशिवाय तिचे काही विशेष प्रयोगही शस्त्रांत सांगितले आहेत. त्यापैकी चौसष्टी पिंपळी, वर्धमान पिंपळी, पाचक पिंपळी इत्यादी काही होत. नुसत्या पिंपळीचा सतत चौसष्ट दिवस अहोरात्र खल करतात. तिलाच चौसष्टई पिंपळी म्हणतात. ती अतिशय तीव्र, उष्ण, अतिसुक्ष्म व तीव्र असते. म्हणून ती फक्त मुगाच्या डाळीइतकी तूपमध किंवा मध साखर अथवा वासावलेहातून दोन वेळा घेतल्याने अति जुनाट दम्याचा विकारही बरा होतो. तसेस पडसे, खोकला, अग्निमांद्य, अनिमिया, जीर्णज्वर, ह्रुदयाची अशक्तता इत्यांदीवर फार गुनकारी आहे. चौसष्ट दिवसांऐवजी फक्त चौसष्ट प्रहरच खल करतात. तिलाही चौसष्टी पिंपळीच म्हणतात. पण ती जरा सौम्य आहे. पण इतके असुनही उष्ण्ता वाढल्यास गेण्याचे बंद करुन तुप व दूध पुष्कळ प्रमाणात घेतल्याने पित्त कमी होते. फारच उष्णप्रक्रुतीच्या माणसांनी मात्र पिंपळीचा उपयोग जपूनच करीत जावा.

वर्धमान पिंपळीने अशक्तता जाते

गाईचे दूध चार तोळे, पाणी सोळा तोळे घेऊन त्यात तीन पिंपळ्या घालून सर्व एकत्र करून कल्हईच्या भांड्यात आटवावे. पाणी आटले म्हणजे त्यात खडीसाखर घालून त्यातील पिंपळ्या चावुन खाऊन ते दूध प्यावे किंवा थंड-उष्ण या प्रकृतिभेदानुसार पिंपळ्या खाव्यात किंवा त्या काढून टाकुन, नुसते दुध प्यावे. याप्रमाणे रोज एक पिंपळी याप्रमाणे सात दिवस वाढवीत न्यावे व पुन्हा सात दिवस रोज एक पिंपळी कमी करीत आणावी. यासव वर्धमान पिंपळी म्हणतात. यात पिंपळीचे प्रमाण व ती वाढविण्याचे दिवस यात बरेच प्रकार आहेत. पण सर्वसाधारणपणे वरील प्रमाणे घेतल्यास जरा उष्ण प्रकृतीसही मानवण्यास सोईचे होते. हिच्या सेवनाने जीर्ण ज्वर, पांडुरोग, गुल्म, उदर, अग्निमांद्य, खोकला, अशक्तता व वातरोग दूर होतात. प्रमेह रोगावरही ही गुणकारी.

अजीर्णावर घ्यावयाच्या पिंपळ्या

बरेच दिवसांचा अजीर्णाचा उपद्रव असेल तर पिंपळ्या लिंबाच्या रसात भिजत घालून त्यात सैंदवाचे चूर्ण घालावे. दोन-चार दिवस भिजल्यावर सुकवून ठेवाव्यात व त्यातून दोन तीन नित्य जेवणावर किंवा जास्त त्रास होईल तेव्हा चावून खाव्यात म्हणजे तोंडात रुचि घेऊन पचनास मदत होते

पिंपळमुळाचे पाण्याने नारू जातो

पिंपळीचे गुणाप्रमाणेच पिंपळ मुळाचे गुण आहेत. पण त्यात काही विशेष गुण आएह्त. ते म्हणजे झोप येत नसेल तर पिंपळ मुळांचे चूर्ण गुळाबरोबर रात्री अथवा संध्याकाळी घ्यावे. म्हणजे झोप येते. तसेच ओकारीवर पिंपळमूळाचे वस्त्रगाळ चूर्ण करून त्यात त्याच्या बरोबरीने सुंठीचे चूर्ण घालुन त्यातून साधरणतः एक मासा दरवेळी मधातून चाटावे. म्हणजे ओकारी कमी होते. खोकल्यावरही या दोंहोच्या मिश्रणात थोडे बेहड्याचे चूर्ण मिसळुन मधाबरोबर अथवा कोमट पाण्याबरोबर घेतल्यास खोकला त्वरीत थांबतो. याशिवाय नारूवरही पिंपळमुळाचा अगदी सोपा उपाय सांगितला आहे. तो असा की, पिंपळगुळ थंड पाण्यात उगाळून प्याल्याने नारू बरा होतो. याप्रमाणे पिंपळगुळाचेहि अनेक औषधी उपयोग आहेत.

 

 

 

 

पिंपळमुळ

पिंपळीच्या झाडाच्या मूळाचा वापर पिंपळमूळ या नावाने होत. भूऱ्या खाती रंगाची ओबड धोबड मुळे काष्ठौषधींच्या दुकानात मिळतात. त्यांचा आकारमानावरून त्यांचा भाव ठरतो. पिंपळमूळ जुने झाल्यास त्याला पोरकिडा लागण्याची शक्यता असते. यामुळे ८-१५ दिवसांपेक्षा अधिक पिंपळमूळ आणून ठेवू नये.
इंपळमूळ हे अत्यंत तिखट अर्थात चव घेतल्यास जिभेच्या शेंड्याची, नाकाची चुणचुण करणारी, प्रसंगी घाम आणणारी असते. तिखट असूनही पिंपळमुळास एक सुगंध असतो. त्यामुळे पिंपळगुळाची उपयुक्तता मानसिक विकार, मतिमंदता, कफामुळे आलेले. हृदयविकार यांमध्ये दिसून येते. अतिशय तिखट असल्यामुळे पचनशक्ती वाढविणारे, साठून राहिलेली आव, पाचन करणारे, वाढलेल्या कफामुळे चोंदलेले नाक, जाड झालेल्या रक्तवाहिन्या, आतड्यांत बसलेला कफाचा लपेटा, डोकेदुखी, यकृताचा मार्ग बंद झाल्यामुळे झालेली कावीळ अशा सर्व विकारांत पिंपळगुळाचा उपयोग होतो.
मतिमंद मुलांमध्ये बऱ्याच वेळा सर्दी, लाळ गळणे, बोबडे बोलणे, अजिबात न बोलणे, सारखी लघवी होणे अशी लक्षणे असता पाव चमचा पिंपळगुळ व चिमूटभर वेखंड मधातून चाटवल्यास बालकाची कफ होण्याची प्रवृत्ती क्रमाने कमी होत मागे पडलेले बोलणे सुरू होऊ शकते.

मधमाशीपालनाचा यशस्वी उपक्रम

प्राचीन काळापासून आपल्याकडे मधाचा औषधी वापर केला जात आहे. सौंदर्य प्रसाधने, त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठीही मधाचा वापर केला जातो. आयुर्वेदामध्ये मधाचे अनेक औषधी महत्व सांगितले आहे. आयुर्वेदिक औषधामध्ये मधाचा वापर तर होतोच याशिवाय अनेक धार्मिक विधीतही मधास महत्वाचे स्थान दिले गेले आहे. यामुळे राज्यात व देशांतर्गत मधाला बाराही महिने मागणी असते. मधाची मागणी विचारात घेऊन मधमाशा पालनाचा व्यवसाय महिला बचत गटांमार्फत सुरु करुन त्यांना आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी बनवण्याची योजना नाबार्डमार्फत कोल्हापुरात यशस्वीपणे अंमलात आणली गेली.

कोल्हापूर जिल्ह्यात मध निर्मितीसाठी असलेले पोषक वातावरण, भौगोलिक परिस्थिती आणि मुख्य बाब म्हणजे उपलब्ध असलेली वनसंपदा पाहून पन्हाळा तालुक्यातील किसरुळ या गावाची निवड करण्यात आली. राज्यात प्रथमच करण्यात आलेला हा प्रयोग यशस्वी झाला असून डोंगराळ भागातील महिला आता मधमाशा पालनाचा व्यवसायही करु शकतात हे सिध्द झाले आहे.

मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक, गजानन महाराज बहुउद्देशीय संस्था तसेच युटीएमटी या संस्थेमार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील किसरुळ या नैसर्गिक वनसंपत्तीने नटलेल्या गावाची येथील मधमाशांसाठी असलेले पोषक वातावरण पाहून निवड करण्यात आली होती. या महिलांना स्थानिक सातेरी जातीच्या मधमाशा पकडणे, त्यांना पेटीत ठेवून त्यांचे संवर्धन करणे, पेटीतून मध काढणे, त्यांची विक्री करणे, याविषयीचे विशेष प्रशिक्षण या महिलांना देण्यात आले. बचत गटाच्या अध्यक्षा मालुताई पोवार या संदर्भात बोलतांना म्हणाल्या, आम्ही सुरवातीस २५ पेटय़ा ठेवून हा व्यवसाय सुरु केला. पहिल्यांदा आम्हाला २० किलो शुध्द मध मिळाला. हा सर्व मध आम्ही मधमाशांना न मारता काढला आहे. याबाबतचे प्रशिक्षण आम्ही घेतले आहे त्याचा आम्हाला फायदा झाला आहे. गटातील महिला आता उत्साहाने काम करीत आहेत. यावर्षी पावसाळा लांबल्याने मध थोडा कमी मिळाला आहे, पण येत्या हंगामात जास्तीत जास्त मध मिळेल असे आत्मविश्वासाने त्यांनी सांगितले.

पुढील वर्षी जानेवारी २०११ मध्ये या व्यवसायाला थोडा जास्त वेग येण्याची शक्यता आहे. कमी कष्ट आणि मुख्य बाब म्हणजे खर्चही कमी, त्यामुळे या व्यवसायात आता महिला बचत गट सहभागी होण्याची शक्यता वाढली आहे. किसरुळच्या या राज्यातील पहिल्या मधमाशी पालन व्यवसाय करणार्‍या महिला गटाची माहिती लंडनस्थित एक अभ्यासक श्री. सोफी यांना समजल्याने त्यांनी स्वत: येथे येऊन या ग्रामीण महिलांशी संवाद साधला. महिलांच्या कामाची पाहणी करुन कौतुकही केले. जिल्हा बँकेचे गोरख शिंदे, गजानन महाराज संस्थेचे राजेंद्र जाधव यांची मदत या महिलांना लाभली आहे. महिलांनी पारंपारिक लोणची, पापड, लाडू, चकली सारखे चाकोरीबध्द व्यवसाय तर करावेत पण त्याहून जास्त लाभ देणारे मधमाशा पालन सारखे व्यवसाय त्याला जोडधंदा म्हणून करावयास हरकत नाही. डोंगराळ, दुर्गम भागात इतर व्यवसाय करणे फारच अवघड असते. मग अशा ठिकाणी नैसर्गिक विपुलता, वनसंपदा भरपूर असते. मधमाशा पालनाचा व्यवसाय अशा ठिकाणी करावयास कोणतीच हरकत नाही हे यावरुन सिध्द झाले आहे.

या दुर्गम भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या मधाला मागणीही आता येत आहे. शिवाय श्रीमती मालुताई पोवार महिलांना प्रशिक्षण देत असतात. आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेले आपले गाव या व्यवसायामुळे प्रकाश झोतात आल्याबद्दल त्या समाधानी आहेत. इतर महिलांना जर प्रशिक्षण घ्यावयाचे असेल किंवा जर शुध्द मध घ्यावयाचा असेल तर ९६३७६८६२३५ या आपल्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा अशी विनंती त्यांनी केली आहे. चला तर मध खरेदी करुन या आपल्या भगिनींच्या व्यवसायाला हातभार लावू या http://mahanews.gov.in

सौंदर्य

चेहऱ्यावर काळे डाग :

ज्यांच्या चेहऱ्यावर काळे डाग पिंपल्स असेल तर त्यांनी एक चमचा दही, १ चमचा मसूरदाळ यांची पेस्ट करुन चेहऱ्यावर लावणे. १५-२० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुणे.

पिंपल्स व डोळ्याखाली काळी वर्तुळे :

पिंपल्स व डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील तर कच्ची पपई किसून लावणे.

निस्तेज चेहरा :

चंदन पावडर, एक चमचा मांजिष्ठ पावडर, एक चमचा कापूर कचरी पावडर, आर्धा चमचा आंबे हळद हे सर्व दुधात मिक्स करुन चेहऱ्यावर लावणे व २० मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुणे. यामुळे चेहऱ्यावर एक प्रकारची चमक येते.
पिंपल्स असेल तर कोरफडचा गर चेहऱ्यावर मसाज करणे, कोरफडने रंग गोरा होतो. व चेहऱ्याला चमक येते. ज्यांच्या चेहऱ्यावर फार प्रमाणात पिंपल्स आहेत. त्यांनी आपल्या चेहऱ्यावर कोरफडच्या गराने फेशिअल करावा. कोरफडचा गर केसांना लावल्यास केसातील कोंडा कमी होतो. व केसांना पण प्रकारची चमक येते.

गव्हाचा कोंडा :

गव्हाच्या कोंड्यात भरपूर प्रमाणात (इ) व्हिटॅमिन असते. तो साईसकट दुधात करुन जाडसर लेप चेहऱ्यावर लावावे. त्यामुळे रंग निखरतो.
तेलकट त्वचा असेल तर मलई ऐवजी दही व मध घेणे.
  • एक चमचा मध.
  • एक चमचा काकडीचा रस
  • एक चमचा संत्र्याचा रस.
हे सर्व मिक्स करुन चेहऱ्याला लावणे. १५-२० मिनिट लावणे. याचा क्रिम म्हणून उपयोग होतो.
  • जायफळ पाण्यत उगळून पिंपल्स व डोळ्याभोवती काळी वर्तुळ असेल तर लावावे.
  • टोमॅटोचा रस १ चमचा, काकडीचा रस एक चमचा, कोबीचा रस एक चमचा हे सर्व मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास काळे डग व वर्तुळे कमी होतात.
  • पिंपल्स जास्त असेल तर कोबी किसुन त्यात जायफळ पेस्ट मिसळुन जाडसर भार चेहऱ्यावर देणे.
  • टोमॅटोच्या आतील गर स्मॅश करुन चेहऱ्यावर लावणे. चेहऱ्यावर चमक येते व चेहरा निखरतो.
  • चेहऱ्यावर सुरकुत्या असेल तर सफरचंद किसून त्यात एक चमचा कच्चे दुध टाकुन व ही पेस्ट चेहऱ्यावर लावणे.
  • चेहऱ्यावर पिंपल्स व पिंपल्सचे डाग असेल तर तुळशीच्या पानाचा रस १ चमचा पुदीन्याचा रस व थोडे हळद पेस्ट करून हे मिश्रण पाण्यात करुन घेणे.
  • सर्दी खोकला असेल तर नेपाली अमृता काढा दिवसातून दोनदा, ३ दिवस घेणे.
  • उन्हाळ्याच्या दिवसात उन्हापासून रक्षण करण्यासाठी काकडीचा रस चेहऱ्याला लावून बाहेर पडणे.
  • केस गळत असेल तर जास्वंद जेलने केसांची मसाज करणे.
  • कोरफड जेलने केसांची मसाज केल्यास केसातील कोंडा कमी होतो व केसांना चमक येतो.
  • पापी तेल याने चेहऱ्याची मसाज केल्यास रोम छिद्र भरुन येतात व चेहऱ्यावरील लव कमी होते. रोज लावले तरी चालते.
  • चेहऱ्याव्रील व अंगावरील लव कमी होण्यासाठी पपिता पावडर, नीमा पावडर, मंजिष्ठा समप्रमाणात घेऊन त्यात पाव चमचा आंबेहळद टाकणे व त्याच्या चार पट मसूर डाळीचे पीठ टाकणे. कच्चा दुधात पेस्ट करून केसांच्या उलट्या दिशेने लावावे. पीठी ज्याप्रमाणे काढतो त्याप्रमाणे चोळावे नंतर साय / लोणी लावणे. कोल्ड क्रीम लावणे.
१) म्हसूर डाळ आर्धा किलो
२) आंबे हळद तोळा
३) गुलाब पावडर ५० ग्रॅम
४) संत्र्याची साल ५० ग्रॅम
५) चंदन पावडर ५० ग्रॅम
६) कडूलिंबाच्या पानाची पावडर
७) वाळा ५० ग्रॅम
८) मुलतानी माती ५० ग्रॅम
९) पपई पावडर ५० ग्रॅम
हे सर्व मिक्स करुन बरणीत भरुन ठेवावे. पाहिजे तेवढे उटणे घेऊन कच्चा दुधात पेस्ट करणे व ती सर्व अंगास लवुन आंघोळ करणे. ज्यांची कोरडी त्वचा असेल, हिवाळ्यात अंगाची फार खाज सुटत असेल तर त्यांनी हे मिश्रण लावुन आंघोळ करावी. फार चांगले असते.
  • चेहरा स्वच्छ व चमकदार होण्यासाठी एक चमचा त्रिफळा चूर्ण, १० मिनिट पाण्यात भिजवून चेहऱ्यावर लेप देणे.
  • चेहऱ्यावर सुरुकुत्या असेल तर त्यावर केशर व बदामची कच्च्या दुधात पेस्ट करुन लावणे.
  • मेरी गोल्ड जेल :
    चेहऱ्यावर पिंपल्स असेल तर याने मसाज करावा.
  • केस गळत असेल तर एक मध्यम आकाराचे डाळींब सालीसकट मिक्सरमध्ये बारीक करणे. जास्वंद फुल, १०-२० ब्राम्हीपाने, १ चमचा आवळा पावडर, मेहंदी पाने अंदाजे हे सर्व बारीक करून २०० ग्रॅम तिळाच्या तेलात लोखंडीच्या कढईत मंद गॅसवर तडतड येईपर्यंत गरम करून कोमट असतानांच एका बाटलीत भरुन ठेवावे व ते केसांना लावावे.
  • जांभळीची बी पिंपल्सवर लावणे.
  • डोक्यात उवा झाल्यास सीताफळ बीची पावडर तेलात मिक्स करुन केसांच्या मुळांन लावणे. तेल लावतांना डोळ्यात जाणार नाही याची काळजी घेणे.
  • आवळा, हिरडा, बेरडा समप्रमाणात घेऊन याची पावडर करणे, यालाच ‘त्रिफळा चूर्ण’ म्हणतात.
  • केस गळत असेल तर :
    त्रिफळा चूर्ण (दर महिन्यात २ चमचे वाढवत जाणे) रात्री झोपताना कोमट पाण्याबरोबर घ्यावे. जंत कृमी असेल तर ३ चमचे त्रिफळा चूर्ण, एक चमचा वावडींग पावडर मिक्स करुन ३ दिवस रात्री झोपतांना कोमट पाण्याबरोबर घेणे.
  • रोज मुठ मुठ फुटाणे खाण्याने हार्ट ऍटकचा त्रास होत नाही.
  • रोजच्या आहारामध्ये पुदिन्याचा वापर करावा म्हणजे पोटाचे कोणतेही विकार होत नाहीत. सीतोपलादी चूर्ण व मध याची पेस्ट करुन चाटण घ्यावे व कोबींच्या पाण्याची वाफ घ्यावी.
  • चेहऱ्यावर पिंपल्स असेल तर चेहऱ्यावर बाजरीच्या पिठाचा लेप देणे. चेहरा निखरतो.My Beautiful Dark Twisted Fantasy [Explicit]

द्राक्षे

द्राक्षे हे मलावरोधावर उत्तम औषध आहे. तसेच त्यापासून तयार केलेला मनुकाही एक चांगले टॉनिक आहे. पचनाच्या सर्व विकारांवर द्राक्षे उपयोगी आहेत. घसा जळजळणे, घशाशी येणे, पोटदुखी, आंबट ढेकरा, उलटी या अपचन व आम्ल पित्ताच्या लक्षणावर द्राक्षे खावी. मूठभर द्राक्षे व मूठभर बडीशेप ठेचून कपभर पाण्यात रात्री भिजत घालून ठेवावी व सकाली कुसकरून थोडी खडीसाखर घालून सेवन केल्याने वरील सर्व तक्रारी दूर होतात. मोठ्या तापानंतर आलेल्या अशक्ततेवर मनुका मनुका उपयुक्त आहेत. रोज सकाळी १०-१५ मनुका बिया काढुन खाव्या आणि त्यावर १-१.५ कप दूध घ्यावे. त्यामुळे भूक वाढते. अन्न पचन होते व शक्ति येते. घसा बसणे, कावीळ व अन्नाबद्दल रूचिहीन वाटणे या विविध विकारांमध्ये मनुका खाण्याने फायदा होतो. मनुका तुपावर परतून व त्यात चवीपुरते सैंधव घालून खाल्याने चक्कर येण्याचे थांबते. मनुका, जेष्ठमध व गुळवेल समप्रमाणात एकत्र करून तयार केलेला काढा पित्तावर उपयुक्त ठरतो. क्षय इत्यादी छातीच्या विकारांत खोकल्याबरोबर रक्त पडते, त्या वेळी हा काढा घ्यावा क्षयरोगांमध्ये येणारी अशक्तता मनुक खाण्यामुळे कमी होते.

काकडी

काकडीचे दोन प्रकार असतात. लहान आणि मोठी. दोन्हीचा रस उपयुक्त असतो. काकडी ही उन्हाळ्यात जास्त प्रमाणात दिसून येते. काकडी थंड असल्याने तहान भागवली जाते. अंगाची आग होत असेल तर नुसती काकडी चिरुन त्यात साखर घालून खावी. आग थांबते. लघवी साफ होत नसेल उन्हाळी लागली असेल. लघवी वारंवार व थोडी थोडी होते असेल तर काकडी चिरून साखरेबरोबर खावी म्हणजे लघवी साफ होते. काकडीचे बी अंगातील कडकी कमी होण्यासाठी देतात. पुष्कळ दिवस एकसारखा येणारा ताप काकडीच्या बियांच्या काट्याने निघतो.

गुणधर्म :

काकडी मधुर, शितल, पाचक, मुत्रगामी आणि अग्निदिपक तसेच पित्तहारक व थंड आहे. सर्व प्रकारचे मुत्रविकार नाहीसे करते. शरीरातील आग व चक्कर येणे नाहीसे करते.

उपयोग :

काकडीचा रस बियांसह गुणकारी आहे. रिकाम्या पोटी एक ग्लास रस घेतल्यास जास्त उपयोगी होतो. काकडीचा उष्मांक (कॅलरीज) कमी असतात. त्यामुळे स्थुलतेवर उपयोग होतो.

फायदे :

काकडीचा संधीवात, मुत्रविकार, मधुमेह ह्यांसाठी काकडी चांगली अंगातील आग कमी व्हावी, म्हणून काकडी घेत असल्यास आंबट-गोड फळे व तेलयुक्त पदार्थ त्या प्रयोगात खाऊ नये. प्रयोग दोन महिने करावा. त्याने शरीरावरील गळवे, पुळ्य कमी होतात.

जीवनसत्वे :

‘बी’ ९०%
The Complete Book of Ayurvedic Home Remedies

केस

केस हे शरीरिक सौंदर्याचे एक मुख्य आकर्षण आहे. लांबसडक घनदाट केशसंभार स्त्रीचे सौंदर्य पटींनी वाढवतो. मात्र सुंदर राखण्यासाठी त्यांची देखभाल करणेही तितकेच आवश्यक असते. अन्यथा केसांचे काही विकार उत्पन्न होऊन घटण्यास सुरुवात होते.
Triphala (Triphlax) 750mg (100 Vegi-Capsules) Brand: Ayurved formulas

अकाली केस पांढरे होणे :

वाढत्या वयानुसार केस पांढरे होणे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. परंतु कमी वयात केस पांढरे होऊ लागणे हा निश्चितच चिंतेचा विषय होतो. अकाली केस पांढरे होण्याची अनेक करणे असतात. केसांना तेल न लावणे हलक्या किंमतीच्या साबण व शाम्पूचा अधिक वापर करणे, सतत औषधे घेणे, डोकेदुखी, सर्दी-पडसे, बद्धकोष्ठता, मानसिक तणाव, अशक्तपणा, केसांत कोंडा होणे, निद्रानाश, आनुवंशिकता इ.कारणांमुळे केस अकाली पांढरे होतात.
शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता असल्यानेही केस अकाली पांढरे होतात. अकस्मात दुर्घटना किंवा शोक संदेश मिळाल्यासही लोकांचे केस पांढरे झाल्याचे आढळले आहेत.
एकाच वेळी सगळे केस पांढरे होणे असे प्रकार विचित्र या सदरातच मोडतात. सर थॉमस मूर तसेच मेरी ऍन्टोनेट अशा प्रसिद्ध व्यक्तींचे सर्व केस काही क्षणातच पांढरे झाले होते. असेही काही लोक आढळले आहे की ज्यांचे केस हिवाळ्यामध्ये पांढरे होतात व उन्हाळ्यामध्ये पुन्हा काळे होतात. वैद्यकीय तज्ज्ञांना अद्यापही या गोष्टीचे खरे कारण समजू शकलेले नाही.
केस अकाली पांढरे होण्याच्या समस्येपासून वाचवण्यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक असते. त्याकरीता नियमित दिनचर्या, केसांची उचित सफाई, संतुलित आहार, व्यायाम उत्तम झोप यांची आवश्यकता असते. केस काळे राखण्यासाटःई शरीराला प्रोटिन व्हिटॅमिन ए. बी. सी. डी. ई. कॅलशीअम आयोडीन, फॉस्फोरस, खनिज क्षार, कार्बोहायड्रेट, आयर्न, कॉपर इ. पदार्थ पर्याप्त प्रमाणात मिळाले पाहिजेत. व्हिटॅमिन व कॉम्लेक्स मध्ये आढळणारे पॅन्टोर्थेनिक ऍसिड फॉलिक ऍसिड इ. पदार्थ केस काळे राखण्यात महत्वाची भुमिका बजावतात.
शरीराला सर्व द्रव्य योग्य प्रमाणात मिळवीत या करिता आपल्या आहारात दूध, दही, लोणी, पनीर, अंडे, गाजर, मुळा, टोमॅटो, मटार, पालक, लिंबू, आवळा, खजूर, द्राक्षे, सफरचंद, मोसंबी, पालेभाज्या, ताजी फळे, अंकुरीत धान्ये आदिंचा समावेश असावा.

अकाली केस पांढरे होण्याच्या संदर्भातील महत्त्वाच्या गोष्टी :

  • एक-दोन केस पांढरे झाले असल्यास ते केस तोडू नका. असे केल्याने केस पांढरे होऊ लागता.
  • थोडे केस पांढरे झाले असल्यास डाय करू नका. त्यामुळे काळ्या केसावरही प्रभाव पडतो. केस आणखी वेगाने पांढरे होऊ लागतात.
  • केस धुण्यासाठी साबण व शाम्पू ऐवजी आवळा, रिठे, शिकेकाई, बेसन, दही इ. चा वापर करा. खुप गोड पदार्थ, तेलकट, मसालेदार भोजन, दारु, अमली पदार्थ यांचे सेवन करु नक.
  • केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करावा.
  • केसांमध्ये हेयर स्प्रे व केस वालविण्यासाठी हेयर ड्रायरचा वापर कमीत कमी वापर करावा.


मेंदी :

पांढऱ्या केसांसाठी वनौषधी संच -
(मेंदी, आवळा, मंडूर, जास्वंद, माका, मुलतानी माती, मोतिया, रोशा तेल)
मेंदी स्थाननि गुणाने ‘केश्य’ म्हणजे केशवर्धक व केशरंजक आहे,तसेच शोथहार दाहप्रशसन व वेदना स्थापनही करते. म्हणूनच एक थंडावा देणारी वनौषधी म्हणून उष्ण कटिबंधात हिचा सर्रास वापर होत होता. हळूहळू ही मेंदी सौंदर्य प्रांतात शिरकाव करती झाली आणि आता तर एखाद्या राणीच्या थाटशत पूर्ण जगभर प्रस्थापित झाली आहे. परदेशातून तर हेना हेअर कंडिशनर व हेना शांपू चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. दरवर्षी भारतातून निर्यात होणाऱ्या मेंदीची टनावारी वाढतच आहे.
केसांकरिता मेंदीच्या वापरावे अनेक फायदे आहेत. मुख्यत्वेकरून मेंदी जरी केस रंगवण्यासाठी वापरली जात असली तरी अशीच नियमित लावण्याने केसांचे आरोग्य सुधारते. केसांवर एक छान तकाकी येऊन केस सुटे सुटे होऊन खुलतात. ज्याला कंडिशन असे म्हणले जाते. केस अकाली पांढरे होत नाहीत. डोक्याला कोंडा होण्याचा थांबतो व केसांची वाढ होते. तुरळक पांढरे झालेल्या केसांन मेंदी लावून झाकता येते. मात्र पूर्ण किंवा जास्त पांढरे केस असणारे बहुधा रासयनिक डायच लावतात. परंतु त्यांनीही या द्रव्यांचे दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून १५ दिवसांतून एकदा मेंदी लावावी.
मेंदी फक्त पांढऱ्या केसांनाच रंगवते (काळे केस तसेच राहतात.) बऱ्याचजणांना नुसत्या मेंदीने केसांना येणारा रंग आवडत नाही. म्हणून या संचात मंडूर (लोह) व आवळा यांचे मिश्रण सोबत वापरले जाते. मंडूर व आवळ्याच्या रासायनिक संयोगाने काळा रंग तयार होतो. माका व जास्वंद या दोन्ही वनौषधी केशरंजक मान्यता पावल्या आहेत.अ मुलतानी मातीने मिश्रणाला चिवटपणा येऊन केसांवर पसरता येते. हा अनुभव अल्हाददायी व्हावा. म्हणून केशवर्धक मोतियारोशा तेलही संचातच दिले जाते.
आजकाल तरुण मुलां-मुलीतच पांढरे केस दिसू लागले आहेत. आहारातल्या चुका, मानसिक ताण व रासायनिक प्रसाधनांचा जबरदस्त प्रचार याला बळी पडलेल्या आमच्या नव्या पिढीला या वनौषधी हे एक वरदान आहे.

एरंडेल

एरंडेल तेलाला अमृताची उपमा :

एरंड ही वनस्पती अशी आहे की आने, फुले, साल, मुळी व लाकूड सर्व काही अत्यंत उपयुक्त आहे. एरंडाचे कोळसेसुद्धा काही प्रमाणात मसाल्यात घालतात. आरोग्यशास्त्रदृष्ट्या हे अत्यंत महत्त्वाचे. अशा वनस्पतीचा परिचय माहित असणे जरून आहे. एरंडेल तेलास अमृताची उपम दिली आहे. अंगास लावल्यास, पोटात घेण्यास डोके व तळ पायांना शांतता येण्याकरीता हे तेल अवश्य वापरतात. या तेलाच्या दिव्यानेसुद्धा डोळ्यांना थंडावा येतो. यामध्ये तांबडा अशा दोन जाती आहेत. दोन्हीहि जाती श्रेष्ठ आहेत.

गुणधर्म :

तिखट, तीक्ष्ण, उष्ण, गोड, कडू, वृष्य, जड, स्वादू, सारक आहे. वातरोग, उदावर्त, कफ, ज्वर, खोकला, उदर, सूज, शूळ, कंबर, बस्ति, मस्तक यातील शूल दमा अनाह, कोड, गुल्म, प्लीहा, आम्लपित्त, प्रमेह, उष्णता, वातरक्त, मेद, वृषण वृद्धी, रक्तदोष, अरुचि, कृमि, अर्श, मुत्रकूच्छ यांचा नाश करणारा आहे.

कमला ( कावीळ ) :

सर्व शरीर पिवळे झाले आहे. डोळे पिवळे आहेत, नखे पिवळी झाली. थोडाफार ताप येत असेल, यकृताची वाढ झाली आहे, अशा वेळी एरंडाच्या पानाचे कोवळे मोख व मेंदीचा पाला एकत्र वाटुन तो दुधात मिसळावा ते दूध रोज सकाळी व सायंकाळी घ्यावे अगर एरंडाच्या सालीचा रस काढून त्या रसात दूध घालून ते दूध रोज प्यावे. कसलीही कावीळ बरी होते.

शूल :

पोटात बारीक बारीक व राहून राहून दूखत असेल तर, भुक लागत नाही, अन्नाचे पचन होत नाही, अस्वस्थता वाटते. अपचन, करपट ढेकर, अन्नावर वासना नसते अशा वेळी एरंड मुळाचा काढा एक अष्टमांश करावा व त्यामध्ये हींग, पादेलोण, व सुंठीची पूड घालून निदान चार सप्तके द्यावा.

संदिवात बरा होण्यास मदत :

- आमवात संधिवात

सांध्यांना विचंवाने दंश करावा अशा वेदना. हातापायाची हालचाल होत नाही. साध्यांना सूज, चालता येत नाही, उठता बसता येत नाही, थोडा ताप असतो, कष्ट सहन होत नाहीत, अशा वेळी रोज सकाळी रात्री अर्धा तोळा ते एक तोळा एरंड तेल ज्वारीच्या पिठात घालावे व त्याची भाकरी करून दिवसातून दोन्ही वेळा खावी. एरंड तेल एरंडाच्या पानास लावून दुखाच्या सांध्यांना ही पाने बांधावी, हातपायाची हालचाल नियमित व्हावी. जितके फिरता येईल तितके फिरावे. संधिवात अगर आमवात दोन्हीहि बरे होण्यास फार मोठी मदत होते.

कंबरेचा व पाठीचा शूल :

कंबर वाकता येत नाही. पाठही दूखत असते, कोणत्याही परिस्थितीमध्ये ते कमी होत नाही. चालताना चमका मारतात. अशा वेली एरंडमुळ व सुंठ यांचा काढा करावा. या काढ्यामध्ये दोन ते तीन गुंजा जवखार घालून तो रोज घेत जावा शूल थांबतो.

गळवे :

अनेकांना गळवे होतात. लवकर फुटत नाहीत. गळवावर एरंडाची मुळी पाण्यात उगळावी व गरम करुन गळवावर लेप द्यावा. लेप सुकला म्हणजे एरंडाचे पान वर बांधावे. आराम वाटतो.

रक्तदोष :

अंगावर बारीक पुरळ उठते, खाज सुटते, अंगावर गजकर्ण, नायटे उठलेले असतात. अशा वेळी एरंडतेल एक चमचा, दोन चमचे तूप व एक चमचा मध एकत्र करून पोटात देत जावे. एरंडाच्या सालीचा गंध अंगास लावावे.

झोप येत नाही, डोके गरम - विकार:

अनेक व्यक्तींना बिछान्यावर पडल्यानंतर ताबडतोब झोप लागत नाही. डोके गरम राहते. टाळुचा भाब गरम होतो, डोक्यावर घण मारल्यासारखे होते, सारखे डोके दुखत असते, चैन पडत नाही, विचार मालिका सुरु झाली म्हणजे झोप अजिबात येत नाही. असा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी रोज डोक्यास व तळपायास सावकाशपणे एरंडेल तेल काशाचे पात्राने चोळून तेल जिरावावे व तळपायांनाहि तेल लावावे व डोके, तळहात व तळपाय यांना एरंडाचे पान बांधवे. हि गोष्ट सातत्याने व्हावी. गुण खात्रीने येतो.

उदर :

हात, पाय, नाभी यांन सूज येते, सांधे ढिले पडतात. कंबरेपासून जड वाटते, पोट मोठे होते. अशावेळी ताजे गोमुत्र एक कप गाळुन घ्यावे व त्यात दोन तोळे एरंडेल तेल घालुन रोज घेत जावे म्हणजे जुलाब होऊन पोट साफ राहते व उदर बरा होण्यास मदत होते.

वृषण वृद्धि :

वृषणाची वृद्धि होते व हवेने भरलेल्या पिशवीसारखे वृषण लागते.या अवस्थेत सुरुवातीस एरंडेल तेलाचे सावकाश मसाज करावे व एरंडास पानतूप लावून वृषणास बांधून घट्ट पट्टा अगर लंगोट घालावा.

दमा :

सारखा श्वास लागतो. चावत नाही छाटी भरल्यासारखी वाटते. चढण चढवत नाही. अशावेळी एक पट एरंडेल तेल, दुप्पट मध एकत्र करून घेतले असता बरे वाटते. सर्वच दमेकऱ्यांना हे औषध उपयोगी पडते. त्यामुळे कोठा साफ होतो व मलाची सुद्धता झाली म्हणजे श्वास कमी होतो.

गंडमाळा :

गळ्याभोवती गाठी उठतात. त्या गाठी ओळीने येतात. क्वचित प्रसंगी त्या गाठी पिकतात. पिकण्यापूर्वी त्यास एरंडमूळ, शेवग्याचे मूळ, पळसाचे मूळ, गोमूत्र अगर तांदळाचे धुण्यात उगाळून लेप करावा व त्यावर एरंडाचे पान बांधावे. रोज नियमाने ही गोष्ट करत जावी.

‌ऋदयशूल :

पुष्कवेळा छातीत दुखण्याचा तक्रार असतात. सारखे बारीक छातीत दुखत असते. क्वचित बारीक कळा येतात. हे सर्व पोटातील वायुमुळे होण्याचा संभव बऱ्याच वेळा असतो. यावेळी एरंडाचा प्रथम जुलाब घ्यावा. नंतर एरंडमुळाचा काढा दोन गुंजा जवखार घालुन देत जावा. गर्भारशीबाईने नियमीतपणे एरंड तेल निदान चार दिवसांनी तरी घेत जावे. यामुळे सुलभ प्रसुती होते.
पोटासंबंधी कोणत्याही विकारावर एरंडेल तेल हे एक रामबाण औषध आहे. अगदी लहान मुलांना (जन्माला आलेल्या बालकालासुद्धा) मध आणि एरंडेल तेल देतात. हे अत्यंत चांगले रेचक आहे. इंजिनाला ज्याप्रमाणे तेल घालून साफसूफ करतात त्याप्रमाणे एरंडेल तेलाच्या विरेचनाने साध्य होते.

ओठ फुटणे :

अनेक वेळा थंडीने किंवा उष्णतेने सुद्धा ओठांना भेगा पडतात. भेगा तडतडतात, रक्त येते. अश वेळी रात्री एरंड्या बारीक वाटुन त्यात थोडे दुध घालावे व ते मिश्रण ओठांना लावावे. भेगा मऊ पडून आराम वाटतो.

पीनस :

नाक ओढल्यासारखे होते. नाकातून वारंवार पांढरा अगर धुम्रवर्ण कफ निघतो. श्वासाला दुर्गंधी येते. नाकातून रक्त पडते. वास येत नाही. अशा वेळी एरंडेल तेल व थोडे तूप एकत्र करुन नाकात वरचेवर घालीत जावे.

खुपऱ्या :

डोळ्यात खुपऱ्या असतात. डोळे लाल होतात. पाणी येते. चिकटतात. लाल एरंडाचा चीक डोळ्यात घालीत जावा.
शरीरामध्ये होणाऱ्या कोणत्याही शुलावर एरंडाचा युक्तीने उपयोग करावा.

जुन्या संधिवाताचा त्रास :

तोळाभर एरंडमुळ, थोडे कुटुन अर्धा लिटर पाण्यात अष्टमांश काढा करावा (मंदग्नीवर). तो गाळून त्यात अर्धा चमचा मध टाकुन ते प्यावे. त्याने सांध्याची सूज कमी होते. एरंडाचाई पाने वाटून गरम करऊन सुजेवर बांधावी किंवा आस्कंदाचे वस्त्रगाळ चूर्ण पावलीभार, सांजसकाळ ३ मासे तुपातून, चारच दिवस घ्या. संधिवातचे दुखणे आटोक्यात येईल.

कावीळीवर उपयुक्त : एरंड :

एरंडाचे झाडे हे बहुतेक जागी आढळणारे आहे. याच्या बियापासून तेल काढले जाते. कुंपणासाठी व बहुधा पडिक जागेवर आढळणारे हे झाड तसे औषधोपयोगी आहे. एरंडाचा कावीळीवर फार चांगला उपयोग होतो. गोड्या एरंडाची पाने बारीक वाटून त्याची साधारण बोराएवढी गोळी करुन दुधात कालवून घ्यावी. एका आठवड्यात कावीळ बरी होते. अथवा एरंडाच्या पालाचा रस अर्धा कप सकाळ-संध्याकाळ दुधाबरोबर घ्यावा.

आयुर्वेदिक औषधे

आयुर्वेद (Ayurveda) हा संस्कृत भाषेतील शब्द असून त्याचा संधिविग्रह (आयुः) जीवन + विद्या (वेद) अशाप्रकारे होतो. आयुर्वेद आणि त्यासारख्या विद्याशाखांमधून भारतात प्राचीन काळापासून असलेल्या वैद्यकीय ज्ञानाची कल्पना येते. आयुर्वेदाला सुमारे ३००० वर्षापासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे. आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी, आहाराविषयक नियम, व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तीला वाढविण्यावर भर दिला जातो.
आयुर्वेदातील काही वनस्पती औषधांचे संदर्भ हे मुख्य चार वेदांपैकी एक असलेल्या अथर्ववेद या इसवी सनपूर्व सुमारे १२०० मध्ये रचल्या गेलेल्या वेदामधून घेतले आहेत. आणि त्यामुळे आयुर्वेद हा अथर्ववेदाचा एक घटक समजला जातो. तथापि, विशेषतः गौतम बुद्ध यांच्या आणि त्यानंतरच्या काळात, आयुर्वेदामध्ये अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींची भर घालण्यात आली. समुद्रमंथनातून निघालेले भगवान धन्वंतरी (Dhanvantari) हे आयुर्वेदातील परंपरेनुसार आद्य वैद्य मानले जातात.

Sunday, November 28, 2010

ऋतुचर्या

वेगवेगळ्या ऋतुमध्ये करावयाचे आचरण/आहार विहारादि कर्म ही ऋतुचर्या होय. भारतात वेगवेगळ्या ऋतुत वेगवेगळे वातावरण राहते. त्याला अनुसरुन आहार विहार योग्य ठेवल्यास शारीरिक त्रास / रोग होत नाहीत. शरीर,मन सुद्रुढ् राहते.सर्व कर्म योग्य तर्‍हेनी करता येतात.आजारी होउन मग औषध घेण्यापेक्षा ऋतुचर्येचे पालन करुन रोगमुक्त राहणे केव्हाही चांगले.
वर्षाचे(year) साधारणतः दोन भाग पडतात.उत्तरायण व दक्षिणायन. उत्तरयणात रात्र लहान व दिवस मोठा असतो.त्यामुळे सुर्याच्या प्रखर किरणांमुळे जीवसृष्टीमधील शक्तिचे शोषण होते.याविरुद्ध परिस्थिती दक्षिणायनात असल्यामुळे प्राणीमात्रांचे पोषणाचे काम या काळात होत असते.या अयनांचे(अयन=सुर्य)-उत्तरायण व दक्षिणायन-तीन उपविभाग होतात, ज्याला ऋतु म्हणतात.उत्तरायण -शिशिर,वसंत,व ग्रिष्म आणी दक्षिणायन-पावसाळा,शरद व हेमंत या प्रकारे ते ऋतु होत. आयुर्वेदातील दोषसंचय,प्रकोप व उपशमनासाठी याच सहा ऋतुंना मान्यता आहे. ऋतुसंधीकाल म्हणजे प्रत्येक ऋतु संपण्याचा शेवटला पंधरवाडा व नविन ऋतुचा पहिला पंधरवाडा असा सुमारे महिन्याचा काळ.

वसंत

चैत्र व वैशाख महिने - या वेळेस वातावरण प्रसन्न असते. थंड व सुगंधीत हवा वाहत असते.पुर्वीच्या, शिशिर ऋतुतिल गोड व स्निग्ध आहारामुळे श्लेष्माचा शरीरात संचय होउन या ऋतुत सुर्याचे तापामुळे तो पातळ होतो व जठराग्नी कमी(मंद) करतो.अतः कफशामक औषधे घेउन त्याचे शमन करावे.वसंत ऋतुत भ्रमण हितकारक आहे.वमन,व्यायाम,कडू व तिखट रसांचे सेवन चांगले. गोड, आंबट व पचावयास जड पदार्थ, थंड पदार्थ, दही इ. टाळावे.

ग्रिष्म (उन्हाळा)

ज्येष्ठ व आषाढ महिने - वातावरण उष्ण होत जाते.त्यामुळे प्राणीमात्रांचे बल व आर्द्रतेचा नाश होतो. जलाशयांचे पाणीपण सुकत जाते.म्हणुन शरीरातिल कफ पण कमी होतो.त्याने वायु वाढतो.त्यामुळे गोड, मधुररसयुक्त,शीतल,सुपाच्य,रसयुक्त(काकडी,टरबुज)फळे,गोड थंड पेय,दही, ताक इ. चे सेवन करावे.थंड्या पाण्याने आंघोळ,दिवसा झोप हितकारक आहे. अत्याधिक मिठाचे पदार्थ,कडू पदार्थ,अति व्यायाम,उपास,उन्हात पायी चालणे,पचावयास जड जेवण हानीकारक आहे.

पावसाळा

श्रावण,भाद्रपद - या वेळेस पाणी दुषित असते.वायु बाष्पयुक्त(humid)असतो.त्याने जठराग्नी मंद होतो.उन्हाळ्यात शरीरात जमा वायु कोपतो.वातावरणातील थंडाव्यामुळे कफ पण वाढतो.पाण्यातील अम्लता वाढल्यामुळे पित्तप्रकोप पण होतो.त्यामुळेच या दिवसात शरीर जास्त रोगग्रस्त होते.पाणी उकळुन प्यायला हवे.जास्त पावसाचे वेळी आंबट,खारट,व स्निग्ध पदार्थ खायला हवे.दिवसा झोप,जास्त परिश्रम,रुक्ष पदार्थ सेवन करु नये.

शरद ऋतु

महिने-आश्विन,कार्तिक - हा ऋतु स्वास्थ्याच्या द्रुष्टीने उत्तम आहे.पावसाळ्यात वाढलेले पित्त सुर्यकिरणांमुळे कुप्त होते.दुध-साखर,आंवळा,गोड,तिखट व कडु रसयुक्त पदार्थ,मनुका इ. सेवन चांगले. गुळ,लसुण इ. पित्तकारक पदार्थ त्याज्य करावे.ताक,दही,वांगे,क्रोध दिवसा झोप त्याज्य.

हेमंत ऋतु

मार्गशिर्ष व पौष मास - या दिवसात वातावरण थंड राहते.रात्र मोठी होते तर दिवस लहान.थंडीमुळे शरीराची रोम छिद्रे आकुंचन पावतात.याचा परीणाम म्हणुन शरिरात उष्णता वाढते. या काळात, भुक लागुन जेवण न मिळाल्यास हा वाढलेला अग्नी शरीरबलाचा नाश करतो.म्हणुन,या ऋतुत,मधुर,स्निग्ध,अम्ल व लवणयुक्त(खारट)पदार्थ,दुध वा दुधापासुन केलेले पदार्थांचे सेवन करणे उचित. सकाळी लवकर भोजन,ताजे व गरम अन्न,शरीरची मॉलिश,शरीर उष्ण ठेवणे,कठोर श्रम इ. करावे.कडु,तिखट,कोरडे अन्न,केळे, आलु,त्याज्य आहेत.

शिशिर ऋतु

माघ व फाल्गुन महिने -या ऋतुची लक्षणे व चर्या साधारणतः हेमंत ऋतुसारखीच असते.अती थंड वातावरणामुळे कफाचे प्रमाण वाढते. गरम पाणी पिणे,चांगले तुपयुक्त जेवण,खिचडी इ.चे सेवन करावे.हेमंत ऋतुत त्याज्य पदार्थ येथेही लागु आहेत.
चांगल्या आरोग्यासाठी ही ऋतुचर्या पाळणे हितावहच आहे. ऋतुसंधीकालात संपुर्ण कुटुंबासाठी कुटुंब काढ्याचे सेवन पथ्थ्यकारक(हितकारक) आहे.

चिंच

हिन्दी इमली (तेलुगू भाषा చింత చెట चिंता चेट्टू चिंतापंडू) Tamarindus indica

लागवड

1) चिच लागवडी विषयी(जमिन स्‍वरूपाची आहे)
  • रोपे कोणत्‍याजातीची असावित
  • रोपे कोठे व किती दराने मिळतील
  • खड्यांचे स्‍वरूप व खड्डे भरण्‍याची पध्‍दत
  • लागवड कोणत्‍या महिण्‍यात करावी
  • उन्‍हाळ्‍यात पाण्‍याची गरज भासते का?
  • बाजार पेठे विषयी माहिती द्‍यावी
  • चिंचलागवड फायदेशिर ठरूशकेल का?
  • सध्‍या शासनाची कोणती योजना आहे का?
चिच हे फळझाड अनेक प्रकारच्या जमिनीत तसेच विविध पाऊसमानाच्या प्रदेशात चांगले वाढते. चिंचेच्या फळाच्या गरातील रंगावरून चिंचेचे पिवळी चिंच आणि लाल चिंच असे दोन प्रकार पडतात. चिंचेच्या झाडाची अभिवृध्दी बियांपासून रोपे तयार करून तसेच कलमे तयार करून केली जाते. इतर फळझाडांचा चिंचेच्या बागेत आंतरपिके म्हणून वापर करता येतो. चिंचेच्या २० वर्षे वयाच्या एका झाडापासून बिया आणि टरफले वेगळी केलेली सुमारे ५०० किलो चिंच मिळते. चिंच रोपांची अथवा कलमांची लागवड करण्यासाठी १ बाय १ बाय १ मीटर आकाराचे खड्डे खणून घ्यावेत. खड्डे भरताना तळाशी १०-१५ सेंटीमीटर उंचीपर्यंत पालापाचोळा टाकावा नंतर खड्डे चांगले कुजलेले शेणखत आणि माती यांच्या मिश्रणाने भरावेत. मातीत १०० ग्रँम बी.एच.सी. (१०टक्के) फॉलीडॉल पावडर मिसळावी. पावसाळ्याच्या सुरुवातीला प्रत्येक खड्ड्यात चिंचेचे एक रोप लावावे आणि लगेच पाणी द्यावे.
चिंच जात- प्रतिष्ठान, आवळा जात- एन.ए.-7, चकैया, कृष्णा, कांचन, एन.ए.-10, सदर जातीची कलमे कृषी विकास प्रतीष्ठानच्या फार्मवर 40 रु. प्रती कलम दराने उपलब्ध आहेत. फोन संपर्क – 02112-254313 किंवा- महात्मा फुले कृषी विद्यापिठ, राहुरी, नर्सरी विभागाशी संपर्क साधावा.
महत्वाचा किडी आणि त्यांचे नियंत्रण - चिंचेच्या फळझाडांवर नुकसानकारक रोग आणि किडींचा उपद्रव शक्यतो होत नाही. काही वेळा खोडअळी आणि गॉलमाशीचा प्रादुर्भाव झाडावर दिसून येतो. खोडअळीच्या नियंत्रणासाठी, खोडावरील छीद्रामध्ये रॉकेल अथवा पेट्रोलने भिजवलेल्या कापसाच्या बोळा टाकून छिद्रे ओल्या मातीने बंद करावीत. गॉलमाशीच्या नियंत्रणासाठी माशीने उपद्रव केलेल्या फांद्या छाटून टाकाव्यात.
फळांचे उत्पादन - चिचेच्या १० वर्षे वयाच्या एका झाडापासून बिया आणि टरफले वेगळी केलेली. १०० ते १५० किलो चिंच मिळते. झाडांच्या विस्तार वाढल्यानंतर चिंचेच्या उत्पादनात वाढ होते. चिंचेच्या पूर्ण वाढ झालेल्या वीस वर्षे वयाच्या झाडापासून ५०० किलोपर्यंत चिंच मिळते. टरफले, शिरा आणि बिया वेगळी केलेली चिंच बाजारात विक्रीसाठी पाठवितात. वाळविलेल्या चिंचेच्या गराची विक्री पूर्ण वर्षभर केली जाते.[१]

पहिला चिंच महोत्सव

औरंगाबादमध्ये कृषी विभाग आणि मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय चिंच महोत्सवाला पाच आणि सहा मार्च २००८ सुरुवात झाली.

आहारातील स्थान

गुणधर्म

  • चिंच सौम्य रेचक म्हणून काम करते.

शेवगा

शेवगा

शेवग्याच्या शेंगा
शेवगा (शास्त्रीय नाव: मॉरिंगा ओलेफेरा) ही भारतातील वनस्पती आहे. शेवगा ही भारतातील खाद्य भाजी आहे. शेवगा या वनस्पतीचे जगभर गेले दशकात महत्त्व वाढले.[ संदर्भ हवा ]

वनस्पतीची रचना

शेवग्याच्या झाडाच्या खोडाचे चित्र
शेवग्याच्या झाडाला आलेला फुलोरा व पाने

उपयोग

  • शेवगा बियापासून जे तेल निघते, त्याला बेन ऑइल म्हणतात. हे तेल सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूत वंगण म्हणून वापरतात.
  • वाळलेल्या शेवगा बियांचे चूर्ण पाणी र्निजंतूक करण्यासाठी जगभर वापरल्या जाते. जागतिक आरोग्य संघटनेने दर १०००लि.पाणी र्निजंतुक करण्यास ८०० ग्रॅम चूर्ण वापरावे असे सुचित केले आहे. त्यामुळे शेवगा बियांचे चूर्ण भारतातून जगभर निर्यात होते.

प्रजाती  

  • जाफना प्रजाती - ही स्थानिक प्रजाती आहे. याच्या शेंगा चवदार असतात. वाणाचे वैशिष्टय़ - एका देठावर एकच शेंग येते. ती २० ते ३० सें.मी. लांब असते.
  • कोकण रुचिरा - हा वाण कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केला आहे. कोकणासाठी शिफारस केली आहे. या झाडाची उंची ५ ते १६ मीटर इतकी असते.
  • पी. के. एम. १ - हा वाण तामीळनाडू कृषी विद्यापीठाचे पेरीया कुलम फळबाग संशोधन केंद्राने विकसित केला आहे. हा वाण चवदार आहे.
  • पी. के. एम. २ - हा वाणही तामिळनाडू कृषी विद्यापीठाने विकसीत केला आहे. - बेन ऑइलसाठी व पाणी शुद्ध करण्यासाठी याच वाणाला प्राधान्य दिले जाते.

इतर प्रकार

  • दत्त शेवगा कोल्हापूर
  • शबनम शेवगा
  • जी.के.व्ही.के. १ आणि जी.के.व्ही ३
  • चेन मुरिंगा
  • चावा काचेरी

अधिक वाचन

खालील पुस्तके उपलब्ध आहेत.
  • शेवगा - लेखक  वि. ग. राऊळ
  • शेवगा लागवड -लेखक डॉ. ठोंबरे
  • शेवगा -  लेखकडॉ. राहूडकर.

Saturday, November 27, 2010

आयुर्वेद ग्रंथ

Arogya Kalpadruma आरोग्य  कल्पद्रुम    
Arka Prakashan अर्क  प्रकाशन्    
Arya Bhishak आर्य  भिशक्    
Ashtanga Hridaya अष्टांग  ह्रिदय    
Ashtanga Samgraha अष्टांग  संग्रह    
Ayurveda Kalpadruma आयुर्वेद  कल्पद्रुम    
Ayurveda Prakasha आयुर्वेद  प्रकाश    
Ayurveda Samgraha आयुर्वेद  संग्रह    
Bhaishajya Ratnavali भैषज्य  रत्नावलि    
Bharat Bhaishajya Ratnakara भरत्  भैषज्य रत्नाकर   
Bhava Prakasha भव  प्रकाश    
Brihat Nighantu Ratnakara ब्रिहत्  निघन्तु रत्नाकर   
charka Samhita चरक  संहिता    
Chakra Datta चरक  दत्त    
Gada Nigraha गद  निग्रह    
Kupi Pakva rasayana कुपि  पक्व रसयन   
Nighantu Ratnakara निघन्तु  रत्नाकर    
rasa Chandanshu रस  चन्दन्शु    
rasa Raja Sundara रस  रज सुन्दर   
rasaratna Samuchaya रसारत्न  समुचय    
rasatantra Sara Va Siddha Prayoga Sangraha Part-1 रसतन्त्र  सार सिद्ध प्रयोग सन्ग्रह
rasa Trangini रस  त्रन्गिनि    
rasa Yoga Ratnakara रस  योग रत्नाकर   
rasa Yoga Samgraha रस  योग संग्रह   
rasa Pradipika रस  प्रदिपिका    
Rasendra Sara Samgraha रसेन्द्र  सार संग्रह   
rasa Pradipika रस  प्रदिपिका    
Sahasrayoga सहस्रयोग      
Savaroga Chikitsa Ratnam सवरोग  चिकित्सा रत्न   
Sarvayoga Chikitsa Ratanam सार्वयोग  चिकित्सा रत्न   
Sharangadhara Samhita शरन्गधर  संहिता    
Siddha Bhaishajaya Manimala सिद्ध  भैशजय मनिमल   
Siddha Yoga Samgraha सिद्ध  योग संग्रह   
Sushruta Samhita सुश्रुत  संहिता    
Vaidya Chintamani वैद्य  चिंतामणी    
Vaidyaka Shabda Sindu वैद्यक  शब्द सिन्दु   
Vaidyaka Chikitsa Sara वैद्यक  चिकित्सा सार   
Vaidya Jiwan वैद्य  जिवन्    
Basava Rajeeyam बसव  रजीयं    
Yoga Ratnakara योग  रत्नाकर    
Yoga Tarangini योग  तरन्गिनि    
Yoga Chintamani योग  चिंतामणी    
Kashyapa Samhita कश्यप  संहिता    
Bhela Samhita भेल  संहिता    
Vishwanatha Chikitsa विश्वनाथ  चिकित्सा    
Vrinda Chikitsa व्रिन्द  चिकित्सा    
Ayurveda Chintamani आयुर्वेद  चिंतामणी    
Abhinava Chintamani आभिनव  चिंतामणी    
Ayurveda Ratnakar आयुर्वेद  रत्नाकर्    
Yogaratna Sangraha योगरत्न  सन्ग्रह    
rasamrita साम्रित      
Dravyaguna Nighantu द्रव्यगुन  निघन्तु    
rasamanjari रसमन्जरि    
Bangasena Samhita बन्गसेन    
Ayurveda Sara Samgraha आयुर्वेदिक  सार संग्रह  

मुद्रा

Apana Mudra------अपान मुद्रा


Apana vaayu Mudra------अपान वायू मुद्रा

Prana Mudra------प्राण मुद्रा


Linga Mudra------लिन्ग मुद्रा

Gyan Mudra------ञान मुद्रा


Shunya Mudra------शून्य मुद्रा

Varuna Mudra------वरूण मुद्रा





Visit Our Page