Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Wednesday, September 14, 2011

श्रावण मास, नको तब्येतीला त्रास !


श्रावण मास, नको तब्येतीला त्रास !

सणवार साजरे करणे यासारखा आनंद मनुष्याला इअतर कशात मिळत असेल असे मला वाटत नाही. वर्षभर आपण कोणते ना कोणते सण, उत्सव साजरे करीतच असतो. मात्र चातुर्मास म्हणजे या सगळ्या सणवारांचा राजा असे म्हणणे वावगे ठरणार नाही. या चातुर्मासाला धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्व आहे. मंगळागौर, नागपंचमी,नारळी पौर्णिमा, गणपती, नवरात्र, दसरा, द्वाळी असे अनेक सण, उत्सव याच काळात साजरे होतात. असे असले तरी या चार महिन्यांमध्ये श्रावण महिन्याचे महत्व जरा अधिकच आहे.
      धर्मशास्त्रानुसार चातुर्मासाचा आरंभ आषाढी एकादशीला होतो. या एकादशीलाच “शयनी एकादशी” असेही म्हणतात. कारण या दिवशी भगवान विष्णु शयन करतात, झोपी जातात आणि कार्तिकी / प्रबोधिनी एकादशीला ते जागे होतात अशी समजुत आहे. जेव्हा देव झोपलेले असतात त्या काळात असुरांचे, राक्षसांचे बळ वाढलेले असते. सर्वत्र त्यांचेच साम्राज्य पसरलेले असते. अशावेळी मनुष्याने या असुरांपासुन स्वतःचे रक्षण करणे आवश्यक आहे. हे राक्षस, असुर म्हणजे कोणी प्राणीमात्र आहेत असे समजण्याऐवजी काम, क्रोध, लोभ, द्वेष, असुया , मत्सर यासारखे षड्-रिपु म्हणजेच असुर होय असे मला वाटते. आयुर्वेदानुसार सत्व हा मनाचा गुण आहे आणि रज व तम हे मनाचे दोष आहेत. यापैकी रज व तम वाढले की काम-क्रोध आदी भाव मनात वाढीस लागतात. थोडक्यात कामक्रोधादी भावांचा नाश करण्यासाठी मनाचा सत्व गुण वाढविणे हा योग्य उपाय आहे. म्हणुनच चातुर्मासात किंवा श्रावणात यम, नियम, आहाराविषयीचे नियम, धार्मिक ग्रंथांचे पठण, तुलसीपूजन, दानधर्म, उपवास, लंघन, देवदर्शन यासारख्या सात्विकता वाढविणा-या गोष्टींचा अवलंब करणे फायद्याचे ठरते यात शंका नाही.
      ज्याप्रमाणे आपले वागणे आपल्या मनावर प्रभाव टाकत असते त्याचप्रमाणे आपला आहारदेखिल मनावर प्रभाव करीत असतो आणि मनाचा आहारावर प्रभाव पडत असतो. उदाहरणासाठी आपल्याला सांगता येईल कि नासके, खराब, व्यवस्थित न शिजवलेले अन्न मनामध्ये उद्विग्नता, घृणा निर्माण करते आणि परिक्षेच्या काळात मनावर आलेल ताण भूक कमी करतो, अपचन-अजीर्ण-अम्लपित्त यासारखे त्रास निर्माण करतो. थोडक्यात अन आणि आहार यांचा खुप जवळचा संबंध आहे. श्रावण महिना म्हणजे पावसाळ्याचा काळ आहे. त्यामुळे मुळातच निसर्गतः शरीरात वातदोष वाढलेला असतो, भूक मंदावलेली असते. जर या काळात पथ्य पाळले नाही तर पचन बिघडून वेगवेगळे शारीरिक त्रास सुरु होतो आणि मनालाही त्याचा त्रास होतो.
      चातुर्मास आणि त्यातही श्रावण म्हणजे नुसती उपास-तापासांची रेलचेल असते. खरंतर मूळ शब्द “उपास” हा नसून तो आहे “उपवास”. त्या शब्दाची फोड होते उप + वास. “उप” म्ह्णजे जवळ आणि “वास” म्हणजे राहणे. “देवाच्या जवळ राहणे” असा लाक्षणिक अर्थ उपवास या शब्दातून व्यक्त होतो आणि नुसतेच देवाच्या जवळ राहणे असे नाही तर देवाजवळ तहानभूक विसरून राहणे अपेक्षित आहे. व्यवस्थित खाऊन-पिऊन देवाची पूजा अचना करायला मन तयार होणार नाही. उपवासाला भरपूर खाल्लेल्या खाण्याने आलेले आळस , सुस्ती हे मनाला आणि शरीराला स्वस्थता लाभू देणार नाहीत आणि म्हणुनच उपवासाने पूर्ण लंघन, एकभूक्त किंवा लघ्वशन अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र “एकादशी आणि दुप्पट खाशी” ही म्हण प्रत्ययास येते. उपवासाला चालणा-या पदार्थांची यादी पाहिली कि ज्यांनी या गोष्टी उपवासाला चालतात असे ठरविले त्यांचे खूप कौतुक (?) वाटते. हे सगळे पदार्थ पचायला जड या श्रेणीत बसतात. उपवासाला आणि चातुर्मासात चालणारे आणि न चालणारे पदार्थ म्हणजे भगर, साबुदाणा, शिंगाडा, राजगिरा, बटाटा, रताळी, दही, ताक, कांदा आणि लसुण असे आहेत. यातील कांदा आणि लसुण सोडून इतर सगळे पदार्थ उपवासाला चालत असले तरी त्यांचे गुणधर्म बघितल्यानंतर आपण आपलेच ठरवायचे की त्यांचे सेवन उपवासाला करायचे कि नाही ?

१)     भगर – भगरीलाच वरी असेही नाव आहे. बहुधा जेथे नाचणी पिकते तिथेच भगरही पिकते. याचा भात, लाट्या, पीठ तयार करून वापर केला जातो. वरी गोड, तुरट रसाची असून वृष्य (मैथुनक्षमता वाढविणारी ) आहे. शरीरातील वात आणि पित्त यांचा नाश करणारी असल्याने थोड्या प्रमाणात खायला हरकत नाही.
२)     साबुदाणा – एका प्रकारच्या स्टार्चपासूनहा पदार्थ बनविला जातो. ताडासारख्या जातीच्या वृक्षापासून हा तयार होतो. खिचडी किंवा तळलेला वडा या स्वरूपात हा पचायला अतिशय जड असणारा हा पदार्थ आहे. त्यामुळे उपवासाला अजिबात खाऊ नये. अगदिच खायचाच असेल तर दुधात बनविलेली खीर बरी. पण आव, अपचन, भूक नसणे यात या कडे बघूही नये. मुळात ज्यांना साबुदाणा खुप आवडतो त्यांनी एकदा साबुदाण्याच्या कंपनीला भेट द्यावी. नंतर साबुदाणा खायची इच्छा मरते हे मात्र नक्की.
३)     शिंगाडा – पाण्यात तयार होणारी ही वेल आहे. याची फळे आपण वापरतो. शिंगाडा गोड रसाचा, थंड गुणाचा, पचायला जड, पित्त-रक्तविकार,दाह यांचा नाशक आहे. बळ देणारा शिंगाड्याच्या पीठाचा शिरा तहान, जुलाब, संग्रहणी, गर्भस्त्राव यात उपयुक्त असला तरी कमी मात्रेत खाण्यास योग्य आहे.
४)     राजगिरा – पुरुषभर उंचीचे हे झुडुप असते. याची लागवड केली जाते. याच्या बियांमध्ये पुष्कळ पौष्टीक गुण आहेत. लघवीला साफ करणार आणि रक्तातील दोष दूर करणारा राजगिरा मूळव्याधीतही फायद्याचा आहे. पचायला हलका असल्याने सर्व उपवासाला चालणा-या पदार्थांमध्ये याचा नंबर एक लागतो.
५)     बटाटा व रताळी – कंदमूळ या प्रकारात मोडणारे हे दोन्ही पदार्थ गोड रसाचे, थंड, पचायला जड, बळ वाढविणारे आहेत. कच्चा बटाटा दाह करणारा आणि कैफ आणणारा आहे. मात्र उकडल्यावर हे दोष कमी होतात ( नष्ट नाही. ). मधुमेही, संग्रहणी, जुलाब व पोटात मुरडा येणा-या रोग्यांनी बटाटा टाळावा. आग होणे, लघवीच्या तक्रारीत रताळी उपयुक्त आहे. पण हे दोन्ही पदार्थ तारतम्याने खावे.
६)     दही आणि ताक – दही हे उष्ण ( थंड अजिबात नाही ) , बूक वाढविणारे, पचायला जड, पचल्यावर आंबट रस तयार करणारे, पित्त-रक्तविकार-सूज-मेद-कफ वाढविणारे आहे. त्यामुळे उपवासाला इतर पदार्थ पचन बिघडविणारे असतांना त्यात भरीसभर म्हणुन दही अजिबात खाऊ नये. मात्र दह्यात चारपट पाणी टाकुन, रवीने घुसळुन लोणी काढलेले ताक मात्र ह्या पृथ्वीवरचे अमृत आहे. ताक हे तुरट गोड रसाचे, पचल्यावर गोड होणारे, पचायला हलके, उष्ण, तृप्ती देणारे आणि वातनाशक आहे. म्हणुन उपवासाला दह्यापेक्षा ताक चांगले. मात्र अंगाची आग, रक्तपित्त, चक्कर येणे यात ताक टाळावे.
७)     कांदा आणि लसुण – वर आपण उपवासाला आणि चातुर्मासात चालाणा-या (?) पदार्थांची माहिती पाहिली. पण कांदा आणि लसुण हे न चालणरे पदार्थ आहे. कांदा हा भरपूर औषधी गुणयुक्त असला तरी तो रज आणि तम दोष वाढविणारा आहे तसेच तो अमेध्य (बुध्दीला उपयुक्त नसणारा) आहे. त्यामुळे चातुर्मासात किंवा श्रावणात जेव्हा मनाचा सत्व गुण वाढणे अपेक्षित आहे तेव्हा कांदा त्याला मारक ठरतो कारण तो रजोतमोवर्धक आहे. राहू चोरून अमृत प्यायला, त्यामुळे त्याचा गळा कापतांना जे अमृताचे थेंब खाली पृथ्वीवर पडले त्यातुन लसुणाची उत्पत्ती झाली अशी एक कथा आहे. थोडक्यात असुरांपासुन लसणाची उत्पत्ते झाली आहे त्यामुळे तो याकाळात वर्ज्य आहे. अन्यथा लसुणामध्ये औषधी गुण ठासून भरलेले आहेत.
उपवासाला चालणारे पदार्थ, त्यांचे गुणधर्म बघितल्यानंतर “एकादशी अन दुप्पट खाशी” ही म्हण खोटी पाडली पाहिजे असे वाटते. कारण आपण फक्त उपवासाला भरपूर खातो आणि इतर वेळी मात्र फार पथ्याने राहतो अशी परिस्थीती नाही. आणि म्हणुनच इतर काळात केलेल्या अपथ्यामुळे शरीरात तयार झालेले दोष उपवासाने, लंघनाने कमी करण्यासाठी उपवास हा कडकडीत करून पचनशक्तीला  काम करायला अवसर दिला पाहिजे तर तो उपवास आपल्याला लाभेल.
      लंघनाने होणारे फायदे वाचले तर तुम्हीही माझ्या म्हणण्याला दुजोरा द्याल यात शंका नाही.
“विमलेन्द्रियता सर्गो मलानां लाघवं रुचिः ।
क्षुत्तृट्सहोदयः शुध्दहृदयोद्गारकण्ठता ॥
व्याधीमर्दवमुत्साहः तन्द्रानाश्चलंघिते ॥“ ( अष्टांग हृदय/सुत्र/१४)
थोडक्यात सर्व इंद्रिये (कर्मेन्द्रिय,ज्ञानेन्द्रिय,मन) प्रसन्न होणे, शरीरातील मळ बाहेर टाकला जाणे, अंगाला हलकेपणा येणे, रुची उत्पन्न होणे, भूक आणि तहान यांचा एकाचवेळी योग्य प्रादुर्भाव होणे, हृदय आणि कंठ शुध्द होणे, शुध्द ढेकर येणे ( कडवट-आंबट ढेकर नसणे), शारीरिक रोगांचा जोर कमी होणे, उत्साह वाढणे आणि झापड- तंद्रा कमी होणे हे सगळे फायदे लंघनाने होतात.
      हे सगळे पाळले गेले तर आपल्या पूर्वीच्या आचार्यांना उपवासाने अपेक्षित असलेले ध्येय आपण गाठू शकू, नाही का ?


                                                                 वैद्य . मनीष जोशी,
७, गुंजाळ एव्हेन्यु, महिला बँकमागे,
इंदिरानगर,
नाशिक – ४२२००९
फोन – ९४२०४६२०५ / ९८८११५०२७२


॥ एकांगवीर रस ॥

॥ एकांगवीर रस ॥

शुद्धगन्धं मृतं सूतं कांतं वंगं च नागकम्‌ ।
ताम्रं चाभ्रं मृतं तीक्ष्णं नागरं मरिचं कणा ॥
सर्वमेकत्र संचूर्ण्यं भावयेच्च पृथक्‌ त्र्यहम्‌ ।
वराव्योषकनिर्गुण्डीवन्हिकार्द्रकजैः द्रवैः ॥
शिग्रुकुष्टद्रवेणापि ततो धात्र्या द्रवेण च ।
विषमुष्ट्यार्कहाटैःश्च आर्द्रकस्य रसैस्तथा ॥
रसश्चैकांगवीरोsसौ सुसिद्धो रसराड्‌ भवेत्‌ ।

पक्षघातं चार्दितं च धनुर्वातं तथैव च ॥
अर्ध्दांगं गृध्रसीं वापि विश्वाचीमपबाहुकम्‌ ।
सर्वान्वातामयान्हन्ति सत्यं सत्यं न संशयः ॥

भारत भैषज्य रत्नाकर
प्रथम खण्ड
एकारादि-रस
पृष्ठ क्र॰ १९५
पाठ क्र॰ ५८५

मूळ पाठ
वृद्ध निघण्टुरत्नाकर॰ वातव्याधीचिकित्साप्रकरणम्‌
================================॥
मूळ पाठ

सर्व आर्ष ग्रंथांत 'एकांगवीर रस' ,
सर्वप्रथम वृद्ध निघण्टु रत्नाकर मध्ये लिखित स्वरुपात दिसतो.

भारत भैषज्य रत्नाकर पाहिल्यास
इतर कोणत्याही ग्रंथात हा पाठ नसल्याचे दिसते.

एक पाठ असल्याने विशेषशुद्धी किंवा पाठ विनिश्चयाची विशेषत्वाने
गरज नाही.

तरीही वृद्धवैद्यक परंपरेत काय सांगितले आहे हे जाणून घेणे ही
आवश्यक आहे.

त्यासाठी, उपलब्ध ग्रंथसंपदेतील, "आयुर्वेदीय औषधिगुणधर्मशास्र" ह्या
"वैद्यपंचानन गंगाधरशास्री गोपाळराव गुणेशास्रीं"च्या चिकित्सानुभव व
औषधी कल्पांचे सुस्पष्ट आयुर्वेद-शास्रीय विवेचन वाचनाचाच मार्ग
आद्य व अग्र्य ठरतो.

१.    शुद्धगन्धं    =    शुद्ध गंधक
२.    मृतं सूतं     =    मारीत पारद
३.    कांतं     =    कान्त लौह भस्म
४.    वंगं च     =     वंग भस्म
५.    नागकम्‌ ।    =    नाग भस्म
६.    ताम्रं     =    ताम्र भस्म
७.    चाभ्रं मृतं     =    अभ्रक भस्म
८.    तीक्ष्णं     =    तीक्ष्ण लौह भस्म
९.    नागरं     =    सुंठ
१०.    मरिचं     =    मिरे
११.    कणा ॥    =    पिप्पली
सर्वमेकत्र संचूर्ण्यं ,
भावयेच्च पृथक्‌ त्र्यहम्‌ ।
१.    वरा        =    त्रिफळा क्वाथ  
२.    व्योषक        =    त्रिकटु क्वाथ  
३.    निर्गुण्डी        =    निर्गुडी क्वाथ
४.    वन्हि        =    चित्रक क्वाथ
५.    शुद्धार्द्रकस्य रसैस्तथा ॥    =    शुद्ध आल्याचा स्वरस
६.    शिग्रु        =    शेवगा त्वक् क्वाथ
७.    कुष्टद्रवेणापि ततो     =    कोष्ठ क्वाथ
८.    धात्र्या द्रवेण च ।    =    धात्री क्वाथ
९.    विषमुष्टी        =    कुचलाबीज क्वाथ
१०.    अर्क        =    रुई मूळ क्वाथ
११.    हाटैःश्च         =    कांडवेल क्वाथ
१२.    आर्द्रकस्य रसैस्तथा ॥    =    आल्याचा स्वरस *

मात्रा     =    १/२ ते १ गुंज      
    =    ६० mg to १२० mg

काल    =    स, व्यानोदान /  व्यानोदान / अपानौ

फलश्रुती    =  
१.    पक्षाघातं
२.    अर्दितं
३.    अनुर्वातं
४.    अर्धाड्गं
५.    गृध्रसीं
६.    विश्वाची
७.    अवबाहुकम्‌
८.    सर्वान्वातामयान्‌
॥ =============॥ पक्षाघाते एकांगवीर रसः ॥ ===============॥
पक्षाघात अथवा अर्धांगवायु => (कोणाला होतो ?)
हा विकार १. त्रासिक, चिडखोर, संतापी

२. ज्यांच्या रक्तवाहिन्या उपदंशादिक विकारांच्यामुळे विकृत झालेल्या असतात,
अश्या माणसांना होतो.
 पक्षाघाताची सम्प्राप्ति कशी घडते ??=================>>
मनाच्याविरुद्ध काही गोष्टी झाल्यामुळे
असल्या तिडतिड्या माणसात
एकाएकी संताप येऊन
एकदम सर्व शरीरभर खळबळ उडून जाते,
त्यामुळे =>
१ } विकृत झालेल्या रक्तवाहिन्यांत रक्तसंचय जास्त होऊन
त्याचा दाब हा मेंदू व वातवाहि केंद्रे ह्यांवर होऊन
पक्षाघात उत्पन्न होतो;

किंवा

२} रक्तवाहिनी फुटून तिच्यातून रक्तस्राव होऊ लागतो.
आणि
रुधिराचा साठा...
ज्ञानकेंद्राच्या बाजूला झाल्यामुळे
त्या माणसाची जाणीवनेणीव नष्ट होते,
किंवा
थोड्या अंशाने कमी होते.
शरीरातीळ संचालनक्रियेवर त्याचा ताबा रहात नाही.
स्नायुंच्यामुळे शरीरातील चलनवलनादि व्यापार सुरु असतात.
स्नायुंवरचा ताबा कमी झाल्यामुळे
ते व्यापार होईनासे होऊन
रोगी विगलित झाल्यासारखा होतो,
चलनवलनादिकाच्या कार्यास विरोध येतो,व्यत्यय येतो
म्ह्णून
आयुर्वेदात त्याची गणना "वातविकृतीत" केली आहे.

ह्या आजारात साधारणतः
अवस्थाभेदाने दोन तर्‍हेची चिकित्सा करता येते.
अ ] तीव्र अवस्थेत
रक्तवाहिनी फुटून रक्ताचा स्राव झालेला असतो,
त्याचे
१ .प्रसादन करणे
२. फुटलेल्या रक्तवाहिनीचे घटक नवीन तयार होऊन
ती सांधली जाऊल अशी तजवीज करणे,
आणि

ब ] जुनाट अवस्थेत
रक्तवाहिनी फुगण्याची अथवा फुटण्याची शरीरास लागलेलि सवय नाहीशी
करण्याचा प्रयत्न करणे.
आपल्या इकडे रक्तप्रसादन करणारी जी औषधे आहेत;
त्यात =>
१. ताप्यादि लौह
२. स्वर्णमाक्षिक भस्म
३. शिलाजतु
४. गुग्गुल
ही मुख्य आहेत.
याच्या योगाने रक्ताचे प्रसादन होऊन फुटलेली रक्तवाहिनी सांधते.
रक्तवाहिनी सांधली गेली म्हणजे थोडा कालपर्यंत बरे वाटते.
परंतु पुनः पूर्ववत्‌ कारण घडल्यास रोग्यास पुनः पक्षाघाताचा झटका येतो.
म्हणून रक्तवाहिन्यांना जडलेली ही सवय नाहीशी करणारे असे एखादे औषध या

जुनाट अवस्थेत देणे जरुर असते.
आयुर्वेदाच्या उपपत्तीप्रमाणे रक्ताचे वहनकार्य वायूच्या प्रेरकत्वामुळे घडून येत असते.
वाताच उद्रेक जास्त झाला म्हणजे रक्ताचे उद्वहन कार्यही जास्त वेगाने होते.
रक्तवाहिनीची फुटण्याची सवय नाहीशी करावयाची असल्यास
रक्ताचे उद्वहनकार्य बेतावर आणने जरुर असते.
हे कार्य एकांगवीराच्या योगाने चांगल्या प्रकारे घडून येते. ॥ =============॥ अर्दिते धनुर्वाते अर्धाड्गे एकांगवीर रसः ॥ ===============॥

पक्षाघात हा केवळ शरीराच्या अर्ध्या भागालाच होतो असे नाही,
तर कित्येक वेळेला
फक्त
एका हाताला
किंवा
एका पायाला
किंवा
कमरेच्या खालील भागाला
किंवा
तोंडाच्या एका बाजूला
अशा प्रकाराने
निरनिराळे पक्षाघात होतात.

ह्या सर्व ठिकाणी विशिष्ट स्नायूंची चलनवलनादि शक्ति कमी झालेली असते.
ह्या सर्व प्रकारात
एकांगवीर रस निरनिराळ्या अनुपानांबरोबर द्यावा.

धनुर्वाताच्या विकारात शरीराच्या कोणत्या तरी भागात अभिघातजन्य
किंवा
इतर अशी जखम झालेली असते
आणि ती जखम व्रणचिकित्सेच्या अनुरोधाने नीट चिकित्सित न झाल्यास आणि

दूषित झाल्यास त्या जखमेतून धनुर्वाताचे विवक्षित जंतू शरीरात प्रविष्ट होऊन

वातप्रकोपास निमित्तकारण होतात,
वातदोष स्नायू, व शिरा यात प्रकुपित होऊन सर्व शरीराला धनुष्याप्रमाणे वाकवितो,
आणि म्हणूनच यास धनुर्वात म्हणतात.
यालाच अपतानक, आयाम इत्यादि संज्ञा लक्षानुरोधे प्राप्त झालेल्या आहेत.

ह्या रोगाच्या प्रथमावस्थेत=>मोठ मोठाले झटके येऊन सर्वांग वाकते,
दाभाड बसते,
मनुष्यास शुद्धि असते,
परंतु गिळण्याची सोय असत नाही,
ह्या अवस्थेत ==>>"कालकूट रसा"<<== चा चांगला उपयोग होतो.
परंतु
दवीतीयावस्थेत =>तीव्रावस्था नाहीशी झाल्यानंतर, सर्वांगास एक प्रकारचा लुळेपणा आलेला असल्यास व स्नायूंची शक्ति क्षीण झाल्यासारखी असल्यास
==>>"एकांगवीरा"चा<<== त्यानंतर उपयोग होतो. ॥ ==========॥गृध्रसीं / विश्वाचीम्‌ / अपबाहुके एकांगवीर रसः ॥==========॥

कुल्ल्यापासून प्रारंभ होऊन
कंबर => मांड्या => गुडघे => जांघाडे व पायापर्यंत
वारंवार चमका निघतात.
सगळा पाय ताठल्यासारखा होतो.
पाय लुळा पडल्या सारखा होतो.
अति तीव्र वेदना कित्येक वेळेला होतात.
सुयांनी टोचल्यासारखे होते.
पण जागच्या जागी जखडल्यासारखा होतो
आणि
जरा वेळ पाय उभा केला,
की वारंवार त्यात स्पंद उत्पन्न होतात.
ह्या विकारास गृध्रसी अशी संज्ञा आहे.
गृध्रसीत वातप्रधान लक्षणे असता एकांगवीर द्यावा.

हाताच्या बोटांपासून वेदना सारख्या चढत चढत जाऊन हात अगदी भारावून जातात. बोटांनी काही काम होऊ शकत नाही यत्किंचित उचलले किंवा काही धरले, की सर्व बोटांतून सारख्या मुंग्या येऊन धरलेला जिन्नस पडून जातो, व तो केव्हा पडला ही जाणीव रहात नाही. या अवस्थेत एकांगवीर चांगला उपयोग होतो.

एकांगवीरात
कांत-वंग-नाग -ताम्र-अभ्रक-तीक्ष्णलोह ही बॄंहण, जीवन व रसायन औषधे आहेत.
वातरोगांत बृंहण हेच शमन असते. या न्यायाने ही वातशामक औषधे आहेत.

पारद कज्जली - रसायन, योगवाही  व जंतुघ्न अशी आहे.
भावना = वातप्रशमन करणार्‍याच औषधांच्याच आहेत.
हे औषध अत्यंत तीक्ष्ण आहे.
त्यामुळे त्याचा उपयोग वातप्रधान कीवा कफप्रधान विकारांत करावा.
पित्तानुबंध सता उपयोग करणे इष्ट नसते.
संदर्भ ग्रंथ = 
"आयुर्वेदीय औषधिगुणधर्मशास्र" By
"वैद्यपंचानन गंगाधरशास्री गोपाळराव गुणेशास्रीं




वैद्य प्रशांत प्रभाकर वाघमारे


श्री पुनर्वसु आयुर्वेदिक चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्रयश श्री प्लाझा ; दुकान क्रमांक : ०६ ; सेक्टर - ८;
सानपाडा ; नवी मुंबई -४००७०५.
vdppwaghmare@gmail.com
vdppw.punarvasuacpc@yahoo.in
९८६७ ८८८ २६५
--
Vd. P.P.W.Shree Punarvasu AcPc & RcYashShree Plaza.
Shop  No. - 6 ; Sector - 8.
Near 7th Day Heigh-School.
Sanpada;Navi Mubai- 400705.
vdppwaghmare@gmail.com
vdppw.punarvasuacpc@yahoo.in
9867 888 265
 
JOIN US ON facebook :
श्री पुनर्वसु आयुर्वेदीक चिकित्सालय ; सानपाडा ; न. मुं.-७०५
 
VISIT OUR WEBSITE :

Wednesday, June 29, 2011

मासिक पाळी

मासिक पाळी नेहमी अनियमितच येते, कधी दर महिनाआड येते; तसं होणं हा आजार आहे का? आणि त्याचे काही दुष्परिणाम होतात का..?

        हल्ली सुमारे ८० ते ९० टक्के मुलींना अनियमित मासिक पाळीची समस्या आहे. मासिक पाळी उशीरा येणे, दर महिना आड येणे किवा दोन दोन महिन्यांनी येणे अशी अनियमितता मुलींमधे सर्रास आढळते. त्याला वैद्यकीय परिभाषेत पीसीओडी म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज असं म्हणतात. स्त्रीच्या गर्भातशयात बीज परिपक्व झालं आणि त्यादरम्यान त्याचा पुरुष बीजाशी संयोग झाला नाही तर ते परिपक्व झालेलं बीज गर्भाशयातून बाहेर टाकण्यात येतं. मात्र अनेक मुलींच्या शरीरात ही प्रक्रिया पूर्णच होत नाही. एकाचवेळी अनेक बीजं परिपक्व व्हायला लागतात. त्यातून एकही बीज पूर्ण परिपक्व होत नाही आणि तसे न झाल्याने ते गर्भाशयातून बाहेर टाकण्यात येत नाही. त्यामुळे मासिक पाळी सुरू होत नाही. एकच बीज परिपक्व व्हायला वेळ लागतो तसतशी मासिक पाळी उशीरा आणि अनियमित होऊ लागते.

या अनियमिततेची कारणं काय..?

मुलींची सध्याची बदललेली लाईफस्टाईल हे मुख्यत: या समस्येचे कारण आहे. सतत बाहेरचं खाणं, पोषक नसलेला आहार, व्यायामाचा अभाव यामुळे बहुतांश मुलींमधे ही समस्या उदभवते. पुर्वी मुली घरात काम करत असत, शरीराला त्यातून चलनवलन, व्यायाम होत असे. आता घरकाम अतिशय कमी झालं, पायी चालणंही बंद त्यामुळे शरीराची हालचालच कमी होते. पोटाला तर अजिबातच व्यायाम मिळत नाही.
हे सारं एका दिवसात घडतं असं अजिबात नाही. दोन-चार वर्षे हे सतत असंच घडत राहतं आणि त्यातून मासिक पाळी अनियमित होण्याची तक्रार सुरू होते.

या समस्येवर उपाय काय..?

      आपली बदललेली जीवनपद्धती सुरळीत करणे हा या समस्येवरचा पहिला उपाय. मात्र सतत मासिक पाळी अनियमित असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आपल्या आहारात तातडीने बदल करावा वजन वाढणार नाही याची काळजी घ्यावी. हॉटेलमधले खाणे, फास्ट फूड, खूप तेलकट-तूपकट पदार्थ कमी करावे. रोज वेळा ठरवून पोषक आणि चौरस आहार घ्यावा. पोषक आहाराचा अभाव आणि अशक्तपणा हेदेखील अनियमिततेचं कारण असू शकतं. त्याचबरोबर व्यायाम सुरू करावा. पुर्वी अशी काही समस्या असेल तर बायकांना रोज पिपळाला दहा प्रदक्षिणा घालायला सांगत. त्यामागे अंधश्र्रद्धा नव्हती तर त्या बाईला रोज ठराविक वेळेला ठराविक व्यायाम करायला लागावा, चालणं व्हावं म्हणून खरं तर ती रीत होती. पुरेसा व्यायाम आणि योग्य आहार यातून ही अनियमितता दूर करता येऊ शकते.
      मात्र हे सारे करत असताना वैद्यकीय सल्ला घ्यावा. जर अनियमिततेची सुरूवात असेल तर ठीक पण तसे नसेल तर औषधोपचारांची गरज पडू शकते. मात्र समस्या मोठी आणि दीर्घकाळ असेल तर मात्र औषधोपचार करावेच लागतात.

पाळी येण्यासाठी दिल्या जाणाऱ्या गोळ्या घेतल्या तर हा प्रश्न सुटू शकतो का..?

       पाळी येण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या गोळ्या म्हणजे काय तर शरीरातील हार्मोन्स वाढवणं. ते वाढले की चक्र सुरळीत होऊन मासिक पाळी येते. पण सतत अशा गोळ्या घेऊन हे चक्र सुरू ठेवण्याचा उपयोग नाही, केवळ पाळी येतेय एवढंच समाधान त्यातून मिळू शकतं. मात्र गर्भाशयात जर स्त्री बीज परिपक्व होण्याचं चक्र सुरळीत होणार नसेल तर त्या व्यवस्थेत झालेला बिघाड दुरुस्त होणार नाही. तो दुरुस्त होण्यासाठी योग्य आहार, व्यायाम आणि आवश्यक तो औषधोपचारच करून घ्यावा लागेल. तरच ही अनियमितता दूर होऊ शकते.
       तसं पाहता पाळीची अनियमितता ही मुलींमधे सर्रास दिसणारी समस्या आहे; पण त्यावर वेळीच औषधोपचार झाले नाहीत, पाळीचं चक्र सुरळीत सुरू झालं नाही तर त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होतातच. वजन वाढतं, कधीकधी अचानक जास्त वजन वाढतं. अनियमित पाळी येण्याच्या समस्येतून गर्भाशयात गाठी तयार होऊ शकतात. त्यातून भविष्यात गर्भधारणा होण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. मासिक पाळी येणंच अकाली बंद होण्याची समस्याही यातून उदभवू शकते. त्यामुळे मासिक पाळी सतत अनियमित असेल तर वेळीच औषधोपचार करणं आणि त्यापेक्षाही आपल्या जीवनपद्धतीत बदल करणं महत्वाचं.
 
मासीक पाळीत स्वयंपाक का करू दिलं जात नाही?

         मासीक पाळी सुरू असताना स्त्रीयांना सर्व प्रकारच्या धार्मिक कार्यापासून दूर ठेवले जाते. या काळात महिलांना अन्य लोकांपासून वेगळे राहण्याचाही नियम आहे. या दिवसांत महिलांनी अधिक तीव्र वास असलेल्या परफ्युमस वापर करू नये. आजकाल अधिकांश युवा या रुढींना अंधश्रद्धा मानून त्यावर विश्वास ठेवत नाहीत.

         परंतु यामागे वैज्ञानिक कारणे आहेत, याची फार कमी लोकांना माहिती असते. मासिक पाळी सुरू असतांना महिलांना विविध शरीरिक व्याधींना तोंड द्यावे लागते. या दिवसांमध्ये महिला इतर वेळेपेक्षा जास्त दुर्बल झालेल्या असतात. महिलांच्या गर्भाशयाचे मुख या काळात उघडे राहते. यामुळे मासीक पाळी सुरू असताना महिलांना विश्रांतीची आवश्यकता असते.

        धर्मशास्त्र सांगतात की मासिक पाळी सुरू असताना एखाद्या महिलेने केलेले स्वयंपाक घरातल्या सर्वांसाठीच हानीकारक असते. यामुळे घराला उतरती कळा लागते. त्यामुळेच महिलांना मासीक पाळी सुरू असताना स्वयंपाक करू दिले जात नाही
.
वैद्य . जितेश पाठक 
धुले
  • 8275007220Mobile
  • 9960507983Mobile
 

महिलांमधील लठ्ठपणा -

भारतीय महिलांमध्ये स्थूलतेचं प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक आहे. हे प्रमाण ६०: ४० असं आहे.

यामागची काही कारणं :

* गरोदार महिलांना गर्भाच्या वाढीसाठी अधिक प्रमाणावर खायला दिलं जातं.

* बाळाला सांभाळण्याच्या जबाबदारीमुळे बाळंतपणानंतर स्त्रियांचं आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. गरोदरपणाच्या काळात वाढलेलं वजन आटोक्यात आणण्यासाठी फारसे प्रयत्न करताना त्या दिसत नाहीत.

* फास्ट फूड आणि स्निग्ध पदार्थांचा अधिक वापर.

* पाटीर् किंवा अशाच काही प्रसंगांमध्ये करण्यात येणारं मद्यप्राशन आणि भरमसाठ खाणं.

* पाण्याऐवजी सॉफ्ट ड्रिंक तर फळांऐवजी कॅन्ड फ्रुटज्यूस घेतल्यानेही लठ्ठपणा वाढतो.

* नोकरी करणाऱ्या महिलांमध्ये तणावाचं प्रमाण अधिक आहे. घरातील आणि कामाच्या ठिकाणच्या तणावामुळे त्यांना स्वत:कडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. लठ्ठपणामुळे महिलांना सांधेदुखी, उच्च रक्तदाब, मणक्याचा त्रास अशा अनेक समस्यांना सामोरं जावं लागते.
.....

उपाय :

* फ्रुटज्यूसपेक्षा फळं खाणं.

* पाटर््यांमध्ये भरपूर कॅलरीज असणारे अन्नपदार्थ टाळायला हवेत.

* बाहेरचे पदार्थ न खाता घरगुती पदार्थ खाण्याचा आग्रह धरा.

* गरोदपणात सकस आहार घ्या. यामध्ये आयर्न, प्रोटिन्स, कॅल्शियम अधिक असावेत.
गोड पदार्थ टाळा.

* लठ्ठपणाची फॅमिलीहिस्ट्री असेल, तर आहारातील तेलाचं प्रमाण कमी करा.

* रोजच्या रोज व्यायाम करायला हवा.

* बॉडी मास इण्डेक्स (बीएमआय) नियमित तपासा.

* वजन कमी करण्याचे शॉर्टकट् हे तात्पुरते असतात. वजन योग्य प्रकारे कमी करायचं, तर डायटिशियन, कौन्सिलर्स, डॉक्टर्स यांच्याकडून सल्ला घ्या.
 
वैद्य . जितेश पाठक 
धुले
  • 8275007220Mobile
  • 9960507983Mobile


Sunday, May 22, 2011

इन्टर्नशिप एक आव्हान..


आशा या वैद्यकीय व्यवसायाची  निवड केल्याचा सार्थ अभिमान बालगत प्रत्येक विद्यार्थी ४ १/२ वर्षा एकाच दिवसाची वाट पाहत असतो ,तो दिवस म्हणजे अंतिम वर्षाच्या निकालाचा . निकालाचा दिवस !! मनात प्रचंड  भीती ,डोक्यावर मणाचे ओजे - पालकांच्या अपेक्षांचे अणि आपन पाहिलेल्या स्वप्नांचे.. वेबसाइट वर बैठक क्रमांक, वर्ष टाकुन जाला की निकल येई परेन्त ४ १/२ सेकंड मधे ४ १/२ वर्ष च कल ज़र्ज़र निघून जातो...वर्गातील पहिलाच दिवस ,रात्र रात्र जागुन केलेला आभ्यास ,dissection  चुकवून पाहिलेला सिनेमा ,चहा ची टपरी, १ अणि २ वर्ष ज़ल्यावर केलेला दंगा, कळत  नकळत निर्माण जालेली नाती अणि रुनानुबंध ....यात वेळ कसा जातो समजतच  नाही अणि १६' स्क्रीन वर आयुष्याचा निकाल लागतो  ,डोळ्यातून एकाच वेळी असू अणि तोंडातून आरोळी बाहेर पड़ते " मी डॉक्टर जालो sssssssss"" याच वेळी  काही मित्रांचा स्वप्नभंग जाला आहे हे पाहून वाईट वाटते  पण मनाच्या  संवेदानावर "डॉक्टर" मात करतो अणि जीना इसीका नाम है बोलून पेढे वाटायला बाहेर पडतो.....
              आनंदी आनंद ,पेढे वाताप ,बक्शिसने खीसे अणि कौतुकाने मन भरल्यावर इन्तेर्न्शिप च्या पहिल्या दिवशी हॉस्पिटल मधे पाउल  पड़ते , सर नि विचारलेले प्रश्न bounsar सारखे जातात ( तिथे no ball denare कोणी नसते अणि अहो त्यावेळी मुन्नी बदनाम जाली होती, शीला  जवान जाली होती त्यामुले वाचायचे राहिले हे सांगायची सोय नसते ) सर आपल्याकडे पाहून कुत्सित हसत असतात अणि त्यातूनच सन्देश मिळतो " बेट्या ,वैद्यकीय व्यवसायात तुजे स्वागत आहे "
                   इन्टर्नशिप ही मुलातच असते ती वैद्यकीय व्यवसायाची ओळख होण्यासाठी ,पुस्तकी ज्ञान प्रत्यक्ष रुग्नावर वापरण्यासाठी कारण पुस्तकातून ज्ञान घेण सोप असत पण ते  रुग्नावर वापरना कठिन असत अणि "बहुतेक जमेल मला " असा न म्हणता " होय जमते मला " असा आत्मविश्वास डॉक्टर ला देण्यासाठी ,काही शिकायचा राहिला असेल तर ते शिकण्या साठी हे वर्ष असत .....घाना,इंग्लैंड,साउथ अफ्रीका  मधे हा काल २ वर्षाचा,इरान अणि स्वीडन  मधे १८ महीने आहे .
           या  काळात इन्टर्न खुपच विभ्रमावास्थेत असतो ,आधीच कसा बसा पास ज़लेला असतो ,basic clear नसते , pathological reports,ECG,CT,MRI reports ,USG, Xray अजुन नीट समजत नसतात ,एकाच रुग्णत सगळ्याच रोगांची लक्षणे दिसू लागतात ,medicine dose  नीट adjust करायला जमत नसतात ,यामुले एक डोळा davidson वर अणि एक डोळा  CIIMS वर आसतो, या सगळ्यात तो गोंधालुन जातो ..फक्त ज्यानी अधि clinic केले असते त्यांचा मार्ग थोडा सुकर असतो . नकळत होत असलेल्या लहान सहन चूका, अपुरे ज्ञान ,कसा विचारायच  हा न्यूनगंड यामुले आतल्या आत तो अस्वस्थ होत असतो..अणि खरी अस्वस्थता निर्माण होते ती रुग्नाच्या  च्या नजरेने ..प्रतिस्पर्धी संघास विजयासाठी ६ चेंडूत १० धावा हव्या असताना धोनी जेवा मुनाफ / नेहरा कद चेंडू देतो तेवा कोत्यावधि भारतीयांच्या मनात जी भावना येते तीच रुग्णच्या चेहेर्यावर ज़लाकते " आता हा काय करणार ??" रुग्नाची भावना त्याच्या दृष्टीने बरोबर असली तारी या नजरेची सवय नसलेल्या  इन्टर्न च्या अत्मविश्वाचे खच्चीकरण होते अणि असे वारंवार घडले की येते विमनास्कता !!
       या वर्षाच्या काळात एक प्रश्न सताव्तो तो म्हणजे पुढे काय करायच?त्याच्या जोडीला ही विमनास्कता आली की विचार्चाकरे वेगाने फिरू लागतात ..सर्वांची पैसे भरून एम्.डी/ एम्.एस व्हायची आर्थिक ताकद नसते ,तर मेरिट ने व्ह्यायची बौद्धिक ताकद नसते अणि ज़लेच तर रुग्णालय काढणे व चलवाने  सोपे नसते , इतर courses अणि त्यांची उपयुक्तता याची प्रतेकला माहिती असतेच असे नसते त्यामुले अडचणीचा  डोंगर वाढतच जातो .. 
              डॉक्टर जेवा I.P.S/I.A.S होउन देशाचे आव्हान पेल्तात, किंवा "नटसम्राट " होउन कलेचे आव्हान पेलतात तेवा मन अभिमानाने फुलून येते ,पण सग्ल्यानाच हे जमते असे नाही..शैक्षणिक कर्जाचा वाढत जाणारा आकड़ा ,खांद्यावर असणारी जबाबदारी, काही गुंता गुन्तिचे घरघुति प्रश्न अणि त्यामुले आयुष्यात स्थिर व्हयाची गड़बड़ यमुले पिचून एखादा मित्र मला म्हणतो "गड्या बस जाला आता,आपन बर अणि G.P बरी " तेवा मनात कोठेतरी वाईट वाटता ...G.P वाईट नक्कीच नसते पण त्याने पाहिलेली स्वप्न अणि प्रत्यक्ष परिस्थिति यात खुप तफावत असते ..माज्यासारखा वैद्यकीय वारसा असनारा इन्टर्न कदाचित आशा समस्या कधीच समजणार नाहीत कारन शून्यापासून सुरु करणे अणि दहा पासून सुरु करणे यात खुप फरक आहे ...
                               या सगळ्या अव्हानाचा विचार करतानाही हे मन प्रचंड आशावादी असते..कारण आज या व्यवसायात जे निष्णात आहेत ते पण या अवस्थेतून गेले आहेत हे माहित  असते ..प्रकाशाचा वाटा,के.इ.एम् सारखी पुस्तके वाचल्यावर आपल्या समोरचे आव्हान काहीच नाही असे वाटू लागते. माज्या अयुर्वेदास आज राजश्रय मिळत आहे अणि त्याच्या उत्कर्षा साठी परिश्रम करायची तयारी असते ..अशावेळी " चांगले रुग्णालय म्हणजे काय?तर समाजातील दिन दुबल्या ,अनाथना नाथ करणारे, वैद्याकतिल सर्वोत्तम ज्ञान जिथे शिश्योत्तमानना प्रदान केले जाते ,जिथे नवा विचार संशोधनाचे स्फुल्लिंग फुलवतो , जिथे वैद्याकाचे शास्त्र सुश्रुशेच्या कलेशी एकरूप पावते,प्रत्येक  शाखेतील शिक्षकाला जेथून प्रेरणेचा  स्त्रोत मिळतो ,अणि जेथे वैद्यकीय सल्लामसलत ही सदभावना अणि वैचारिक देवानघेवानिच्या भक्कम पायावर उभी असेल अशी गंगोत्री म्हणजे रुग्णालय " हे विल्यम ऑस्लर यांचे शब्द अताव्तात अणि पाय अपोआप रुग्णालय कड़े पडतात ...एक नव्या अव्हानाला सामोरे जायला......
   (वैद्य) अंकुर रविकांत देशपांडे
       B.A.M.S INTERN
          SANGLI 416416
    CELL NO- +91 9175338585
                   

Wednesday, May 18, 2011

आयुर्वेद संशोधन

मतिमंद मुलांसाठी शंखपुष्पीचा वापर लाभदायक
मुंबई - मतिमंद मुलांमधील दोष निवारण करण्यासाठी केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेकडून हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पामध्ये शंखपुष्पी ही अत्यंत महत्त्वाचे योगदान देऊ शकते, असा निष्कर्ष पुढे आला आहे. महाराष्ट्रातील 100 मतिमंद मुलांची निवड या संशोधन कार्यासाठी झाली असून, त्यांच्यावर करण्यात आलेल्या उपचारपद्धतीमध्ये शंखपुष्पीचा वापर हा लाभदायक ठरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. मागील तीन वर्षांपासून चालू असणारा हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात असून, वैद्यकीय क्षेत्रामधील आयुर्वेदाचे महत्त्व त्यामुळे अधोरेखित होणार असल्याचा विश्‍वास संशोधन संस्थेकडून व्यक्त केला जात आहे.

मतिमंद मुले ही इतर सामान्य मुलांपेक्षा वेगळी असतात. त्यांचा बौद्धिक विकास हा उशिरा होतो; तसेच काही मुलांमध्ये शारीरिक वाढीमध्येही मर्यादा आढळून येतात. या मुलांमध्ये हे व्यंग नेमक्‍या कोणत्या कारणांमुळे निर्माण होते, त्यात आनुवांशिकता, रक्तगट, जीवनशैली, तणाव यासारख्या गोष्टींप्रमाणे अन्य कोणत्या बाबी कारणीभूत असतात यांचाही विचार करणे गरजेचे असते. या मुलांमधील न्यून पूर्णपणे संपुष्टात आले नाही तरीही त्यांचे परावलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीने काय करता येईल यासाठी विशेषत्वाने विचार करण्याची गरज या प्रकल्पामध्ये करण्यात आल्याचे डॉ. कुणाल पाटील सांगतात. याच विचाराचा पुढचा टप्पा म्हणून आयुर्वेदिक औषधांबाबतही विविध प्रयोग करण्यात आले. त्यातून शंखपुष्पीचा एका विशिष्ट प्रमाणात या मुलांमध्ये केलेला वापर हा सकारात्मक परिणाम देतो, असे संशोधनांती सिद्ध झाले. यासाठी निवड करण्यात आलेल्या या मुलांचा वयोगट चार वर्षांपेक्षा कमी असावा, जन्मानंतर आवश्‍यक त्या सर्व प्रकारचे लसीकरण करण्यात आलेले असावे, डोक्‍याला अथवा मेंदूला कोणत्याही प्रकारची दुखापत यापूर्वी झालेली नाही हेदेखील यात कटाक्षाने पाहण्यात आले आहे. तसेच या मुलांच्या आई-वडिलांमध्ये रक्तदाब, मधुमेहासारखा कोणताही आनुवंशिक आजार नसणे हा मुद्दाही या संशोधनातील निवडीच्या वेळी महत्त्वाचा मानला गेला आहे.

डॉ. वैशाली इंगले -घोलप 
लन्दन 
dr.vaishali.ingle@gmail.com

आंबे

आंबे खा जपून...
पिवळ्याधम्मक आंब्याच्या प्रेमात पडला नाही, असा माणूस मिळणे विरळच. मे महिना आणि आंबा हे दोन्ही हातात हात घालून येतात. आंब्याची चव जिभेवर रेंगाळत
राहते आणि बस एक और... चा नारा बुलंद होतो. यात लहानांसोबत मोठ्यांचाही सहभाग असतो.

फळांच्या या राजाचे आहारात भरपूर उपयोगही आहेत. अ आणि क जीवनसत्वांचा मोठा सोत असलेला आंबा त्वचेवरील सुरकुत्या कमी करून ती तरूण ठेवतो. त्यात बी कॉम्प्लेक्स असल्याने त्वचा तजेलदार करतो. कैरीमध्ये अॅण्टि ऑक्सिडन्ट वैशिष्ट्ये असतात. त्यामुळे अमृतचवीचा आंबा खाण्यात भरपूर फायदेही आहेत. अर्थात पदार्थ कितीही चांगला असला तरी अति तेथे माती होते.

आंब्यामध्ये भरपूर काबोर्हायड्रेट््स आणि कॅलरीज असतात. त्यामुळे पटकन वजनही वाढते. त्यामुळे वजनाबाबत कॉन्शस असलेल्या व्यक्तींनी फार आंबे खाऊ नयेत. आंब्यात शर्करेचे प्रमाण जास्त असल्याने मधुमेहींनीही त्यापासून चार हात दूर राहिलेलेच चांगले. आंबा उष्ण असतो आणि त्यातच मे महिन्यामधील तापमानवाढ या दोहोंचा एकत्रित परिणाम शरीरावर होऊ शकतो. त्यामुळे उष्णतेचा पटकन त्रास होत असेल तर जपून आंबे खा. खूप आंबे खाल्ले की पोटही बिघडते.

आंब्याचा दिसून येणारा परिणाम म्हणजे शरीरावर येणारे उष्णतेचे फोड. आंब्यांमुळे शरीरात वाढलेली उष्णता या फोडांच्या स्वरुपात दिसते. या फोडांना गंमतीत आंबे फुटले का, असेही म्हटले जाते. लहान मुलांमध्ये हा प्रकार अनेकदा होतो. या फोडांना खाजही सुटते. याचा सरळ उपाय म्हणजे आंबे कमी करणे असा असला तरी केवळ मोसमात मिळणाऱ्या या फळांच्या राजाचा मोह सुटत नसतो, हेदेखील खरे. लहान मुलांच्या बाबतीत आंब्याची अॅलजीर् लक्षात येत नसल्याने तीन-चार वर्षांच्या लहानग्यांना भरपूर आंबे देऊ नका. एखाद्या वषीर् अनुभव आल्यानंतरच आंब्याचे प्रमाण ठरवा. आंबे द्यायचेच असले तर ते फ्रीजमध्ये गार करून द्यावेत. त्यामुळे त्यातील उष्णतेचा गुण जाणार नसला तरी थोडा कमी होतो. याशिवाय रोज एकापेक्षा अधिक आंबा खायला देऊ नका. एवढे करूनही फोड आलेच तर त्यावर गरम टॉवेल लावा. त्यामुळे ते लवकर बरे होऊ शकतील.

काही वेळा आंब्याच्या सालीमधील चिक लागून ओठाशेजारचा भाग तसेच गालावर रॅशेस येतात. हा प्रकार दुमिर्ळ असला तरी त्याबाबतही काळजी घेतली पाहिजे. आंबा नीट धुवावा. सालासकट आंंबा चोखून खाणे टाळावे. तसेच रॅशेस आले तर त्यावर मध लावावा. खूपच अॅलजीर् होत असेल तर आंबे टाळणे चांगले. अर्थात ज्यांना अशी अॅलर्जी असेल त्यांच्यासाठीच हे सारे आहे. इतरांनी आंब्याचा आनंद लुटायला हरकत नाही.



http://www.facebook.com/drjiteshpathak

वैद्य . जितेश पाठक
धुले 
  • 8275007220
  • 9960507983

निद्रा भव!

निद्रा भव!
झोपेतून मध्येच जाग आल्यावर झोपण्यासाठी बराच वेळ शिल्लक असल्याची जाणीव होणे यासारखा आनंद नाही . झोपण्यासारखे सुख नाही आणि उत्त
म आरोग्यासाठी शांत झोप हा महत्त्वाचा घटक आहे .

झोप आवश्यक का आहे ?
दिवसभर पूर्ण क्षमतेने काम करण्यासाठी रात्रीची झोप खूप गरजेची आहे . पण आपले आयुष्य अधिक धावपळीचे झाल्यावर झोपेकडे कमी लक्ष दिले जाते . उत्तम आरोग्यासाठी चांगला आहार आणि व्यायामासोबतच पुरेशी झोपही झाली पाहिजे .

किती तास झोपायचे ?
वय वाढत जाते तसे झोपेचे तास कमी होत जातात . अगदी तान्हे मूल १८ ते २० तास झोपते . थोडे मोठे झाल्यावर झोपेची वेळ कमी होते आठ ते दहा तासांवर स्थिरावले . मोठ्यांना दिवसभरात सहा ते आठ तास झोप लागते .

झोपेवर परिणाम करणारे घटक
दररोजच्या आयुष्यातील अनेक घटक झोपवर परिणाम करत असतात . सगळ्यात महत्त्वाचा ठरतो तो तणाव . काम , दैनंदिन आयुष्यातील प्रश्न यामुळे मनावर आलेल्या दडपणामुळे शांत झोप लागत नाही . याशिवाय बेडरुममधील जास्त प्रकाश , आवाज , उच्च तापमान , जेवणापूर्वी घेतलेले खूप आणि जड जेवण , झोपेपूर्वी दोन तासात केलेला थकवणारा व्यायाम आणि जेवणापूर्वी चार तासांदरम्यान घेतलेली कॉफी , चहा यामुळेही झोपेवर परिणाम होतो .

सध्या सुरू असलेल्या तापमानवाढीचा झोपेवर परिणाम होतो ?
जास्त गरम होत असल्याचा झोपेवर निश्चितच परिणाम होतो . जास्त आर्द्रता आणि त्यामुळे येत असलेल्या घामामुळे त्रास होतो .

झोपेसंबंधी समस्या ...

पुरेशी आणि शांत झोपेआड अनेक समस्या येतात .

१ . झोपेत घोरणे
२ . झोप न लागणे
३ . झोपेत बोलणे किंवा चालणे
४ . चित्रविचित्र स्वप्ने पडणे
५ . खूप जास्त वेळ झोप लागणे .

अपुरी किंवा जास्त झोप यांचा शरीरावर आणि मनावर प्रभाव पडतो ?
झोप कमी झाली की स्वभाव कार्यक्षमता घसरते . अपुरी झोप घेत असलेल्या व्यक्तींमध्ये थकवा , चिडचिड , उच्च रक्तदाब , विसरभोळेपणा , विचारांमध्ये संभ्रम असल्याचे दिसून आले आहे . घोरण्यामुळे झोप अपुरी राहत असेल तर त्याचा संबंध स्मृतिभ्रंश , हृदयविकार , आकडी किंवा मधुमेहाशी जोडता येऊ शकतो .

झोप कशी सुधारावी ?
झोपेशी सुसंगत असलेली जीवनशैली पाळा .
दैनंदिन धावपळीत झोपेसाठी पुरेसा वेळ द्या .
बेडरुममधील प्रकाश कमी करा . आवाज , तापमान यावर नियंत्रण ठेवता आल्यास उत्तम .
झोपेपूर्वी जड आहार टाळा . हलका आहार घेतल्यास हरकत नाही . पचायला जड असलेल्या पदार्थांमुळे पचनसंस्था कार्यरत राहते आणि त्यामुळे झोपेत अडथळे येतात .
झोपायला जाण्याआधी दोन तासांदरम्यान दमछाक करणारा व्यायाम टाळा . त्यामुळे शरीराचे तापमान वाढते आणि झोप येण्यास अडथळा येतो .
झोपेपूर्वी चार तासांदरम्यान चहा , कॉफी यांच्यासारखे उत्तेजक पेय टाळा







http://www.facebook.com/drjiteshpathak

वैद्य . जितेश पाठक 
धुले ..

  • 8275007220
  • 9960507983


नखदर्पण

नखदर्पण

हातांवरील रेषांप्रमाणेच नखांवरुनही भविष्य जाणून घेता येते. अस म्हणतात कि चेहरा हा मनाचा आरसा असतो, तर नख हे मन व शरीर दोघांचेही प्रतिबिंब दाखवते. आयुर्वेदानुसार नखे ही अस्थिधातुचा मल आहेत. नखांची परीक्षा त्यांचा आकार व रंग यावरून मुख्यत्वे केली जाते.

आकारावरुन नखांचे प्रकार:
१)लांब नखे:
(१) खुप लांब नखे ही शारीरिक शक्ति कमी असल्याचे द्योतक आहेत. अशा व्यक्तिंची फुफ्फुसे कमजोर असतात. त्यांना छातीचे विकार होण्याची शक्यता असते. या बरोबरच जर नखांचा रंग निळसर रेखायुक्त असेल तर हा विकार बळावलेला असतो. याचप्रकारची पण कमी लांबीची नखे असलेल्या लोकांना श्वासनलिकेसंबधी आजार होऊ शकतात.
(२) लांब व अरूंद नखे असणाऱ्यांनी आपल्या मणक्याची काळजी घ्यावी कारण त्यांना मणक्याचे आजार होण्यची शक्यता जास्त असते.

२) छोटी नखे:
(१) छोटी मांसात खोल रुतलेली, मुळशी चपटी असलेली नखे असलेल्यांना मज्जासस्थेचे विकार होण्याची शक्यता जास्त असते. अशातच जर नखे पांढुरकी व तुटकी असल्यास विकार फारच बळावतो.
(२) शिंपल्याच्या आकाराची नखे असलेल्यांना अर्धांग वायु होण्याची शक्यता असते.
(३) छोटी चौकोनी पण वरच्या बाजुस गोलसर नखे असलेल्यांना गळ्याचे विकार जसे टॊन्सिलाइटिस, फॅरींजाइटिस ई. होण्याची शक्यता असते.
(४) छोटी व मुळाच्या बाजुला चपटी, पातळ नखे तसेच नखावरील चंद्राचा आकार लहान असणाऱ्या व्यक्तिंमध्ये रक्ताभिसरणची क्रिया नीट होत नाही. त्यामुळे त्यांना हृदयाचे रोग होण्याची शक्यता जास्त असते.
कोणत्याही नखाच्या मुळशी असलेले नखचंद्र मोठे असलेल्या व्यक्तिच्या हृदयाची रक्ताभिसरणची क्रिया चांगली असते.
नखांवर ठीपके व डाग असलेली व्यक्ति घाबरट असते. जर त्यांच्या मुळाशी लहान चंद्र असेल तर किंवा चंद्र नसेल तर त्यांन मज्जातंतुंचे विकार होण्याची शक्यता असते. नखांवर उभ्या रेषा असतील तर नुकतेच आजार होऊन गेले आहेत असे समजावे.
जर व्यक्तिच्या बोटांची पहिली पेरे चेंडूप्रमाणे गोल व नखे ही गोल असतील व नखचंद्र नसतील तर त्यांना हृदयरोग होण्याची शक्यता जास्त असते.
नखे खुप पातळ असतील तर त्यांचे तुकडे पडतात अशा व्यक्तिंची प्रकृति फार नाजुक असते.

शारीरिक प्रकृतिप्रमाणेच नखांवरुन मानसिक प्रकृतीही ओळखता येते.
एखाद्याच्या नखाची रुंदी लांबी पेक्ष जास्त असेल तर ती व्यक्ति भांडखोर असते. नखे छोटी असतील तर टीका करण्याची प्रवृत्ती असते. अशा व्यक्तिची तर्कब जास्त असेल तरौद्धी चांगली असते, ते चांगले विश्लेषक असतात. व्यवहारी व शीघ्र निर्णय घेणारे असतात. अशा व्यक्ति रागीट व वादविवाद करणाऱ्या असतात. एखाद्या कामाला सुरुवात केल्यावर ते संपल्याशिवाय त्या थांबत नाहीत. लांब नखे असणारे लोक शांत, नम्र, आदर्शवादी, स्वप्नाळू, कलाप्रेमी असतात. ते वादविवादात न पडता आपले मतभेद शांतपणे तोडगा काढून संपवतात.

नखांचा रंग:
नखांच्या रंगावरूनही बऱ्याचशा गोष्टी कळतात. नखांचा रंग पिवळा असल्यास यकृताची कमजोरी किंवा य्कृताचे विकार दर्शवते. नखांचा रंग सफेद असल्यास रक्ताल्पता दखवते. अशी व्यक्ति कायम आजारी व चिडचिडी असते. त्यांना शारीरिक कष्ट जमत नाहीत. नखे निळी असलेल्या व्यक्तिंची फुफ्फुसे अशक्त व आजारी असतात. प्रकृती गंभीर असते. गुलाबी रंगाची नखे असलेल्या व्यक्ति उत्साही व रसिक असतात. प्रेमळ व स्वस्थ असतात. लाल नखे असलेली व्यक्ति पित्तप्रकृतीची, रागीट, भांडखोर आणि मेहनती असते.

अशाप्रकारे नखांद्वारे विविध शारीरिक व मानसिक गोष्टींची माहिती करुन घेता येते, पण ही माहीती करून घेताना हातावरील अन्य लक्षणे, चिन्ह व रेषा यांचाही विचार करणे आवश्यक आहे ..

http://vindhya-astro-ayurved.blogspot.com/


http://www.facebook.com/profile.php?id=100000883922742&sk=इन्फो



  • Lake -hieghts , Powai
  • Mumbai (Bombay), इंडिया
  • 9221509969


मुलाखत

मानसिक आरोग्य तज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांची गिरीश कुबरे यांनी घेतलेली मुलाखत...

प्रश्न : मानसिक दृष्ट्या एखादी व्यक्ती निरोगी अथवा रोगी आहे, हे कसे ठरवावे?
उत्तर : एखादी व्यक्ती मानसिक दृष्ट्या निरोगी अथवा रोगी आहे, हे ठरविणे तारेवरची कसरत आहे. त्यासाठी काही पॅरामीटर्स आहेत. मला पूर्वी पेक्षा किती ताण जाणवतो किंवा मला मिळणारी झोप पुरेशी आहे काय याचा विचार करावा. माझा स्वभाव पूर्वीपेक्षा भित्रा झाला आहे काय, किती वेळा भिती वाटते. दैनंदिन कार्यातून समाधान मिळते काय. ही पॅरामीटर्स आहेत. व्यक्तीने त्याबाबत स्वत:च विचार करुन उपचार घ्यावा किंवा तिसर्‍या व्यक्तीशी चर्चा करुन उपचार घ्यावा.

प्रश्न : मनाची ताकद वाढविण्यासाठी काय करावे?
उत्तर : वास्तविक भारतीय संस्कृतीने मनाच्या सुदृढतेसाठी मोठे योगदान दिले आहे. संत वाडमय, अभंगातून मनाची शक्ती, एकाग्रता वाढविण्याबाबत सांगितले आहे. मन आणि शरीर एकच आहे. ते अव्दैत आहे. मन प्रसन्न ठेवले तर शरीरही निरोगी राहिल. विचार पध्दतीत बदल करणे, जास्तीत जास्त हसल्याने मन सुदृढ होते. चिंता करु नये, रागावर नियंत्रण ठेवावे, मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त कराव्यात, कसलीही भिती बाळगू नये, या गोष्टी केल्यास मनाची ताकद वाढेल.

प्रश्न : शहरातील व्यक्तींप्रमाणे खेड्यातील व्यक्ती देखील मानसिक विकाराने त्रस्त असल्याचे जाणवते, याबाबत काय सांगाल?
उत्तर : मानसिक आरोग्य हे भावनांवर अवलंबून आहे आणि भावना एखाद्या संसर्गजन्य रोगाप्रमाणे असते. सभोवताली आनंदी किंवा दु:खी व्यक्ती असेल तर त्या पध्दतीने वातावरण तयार होते. नेहमीच जर मन खच्चीकरण करणारे विचार देणार्‍या व्यक्तीबरोबर राहिल्यास सभोवतालच्या व्यक्तीची मानसिकता देखील तशीच होते. त्यातून मनोविकार जडतो. त्यामुळे शहराप्रमाणे खेड्यातही मानसिक रुग्ण आढळू शकतात.

प्रश्न : मानसिक दृष्ट्या सुदृढ राहण्यासाठी काय करावे?
उत्तर : माणसाने प्रचंड प्रगती केली आहे, मात्र मनाचे प्रश्न आपण सोडविले नाहीत. हा बेसिक प्रश्न आहे. मानसिक सुदृढतेसाठी सदैव आनंदी राहावी. विनाकारण कसल्याही गोष्टीची चिंता करुन नये. स्वत:शी संवाद साधावा. भावनांवर नियंत्रण ठेवावे.

Visit Our Page