Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
Showing posts with label इतर. Show all posts
Showing posts with label इतर. Show all posts

Thursday, January 21, 2016

आयुर्वेदाची बदनामी करू नका


संतुलन ढासळलेले बरेच लोक आजकाल आयुर्वेदावर बोलत आहेत. नाही म्हणजे आयुर्वेदावर बोलायला आमचा अजिबात विरोध नाही आहे. प्रत्येकाने आपल्या जीवनात आयुर्वेद आणला तर आम्हाला आनंदच होईल कारण आयुर्वेद हि एक परिपूर्ण जीवनशैली आहे, निरोगी राहण्याचा मूलमंत्र आहे. पण आपल्या सोयीप्रमाणे जर कोण आयुर्वेदाचा वापर स्वताच्या व्यावसायिक संतुलनासाठी करत असेल तर नक्कीच आम्हाला ते सहन होणार नाही. वैद्यराज गोगटे, नानल, गाडगीळ , प्र ता जोशी (नाना ), पेंडसे यासारख्या अनेक दिग्गजांनी  हाच आयुर्वेद लोकांपर्यंत पोचवायला आपलं जीवन खर्ची घातल आहे. आणि जर ते चुकीच्या पद्धतीने लोकांपर्यंत पोचत असेल तर जाहीरपणे काहीतरी बोलावच लागेल. दुर्दैव हेच आहेच कि आपल्यातलेच काही लोक यांना उगाच खांद्यावर घेऊन नाचत आहेत.कुठलिही आयुर्वेदाची पदवी नसताना ,MCIM -CCIM च reg नसताना सुद्धा आपल्याच काही वैद्या नी स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून ठेवली आहे आणि या आयुर्वेदाच्या स्वयं घोषित गुरूंना आपले गुरू मानून आपली आयुर्वेदाची डिग्री गहाण ठेवली आहे.
बरं ठीक आहे तुमी तुमचं संतुलन घ्या बिघडवून आम्हाला त्याची खंत नाही पण आमच्या आयुर्वेदाचा संतुलन तरी राखून या गोष्टी करा जेणेकरून लोकांपर्यंत चुकीची माहिती अथवा गैरसमज पसरणार नाहीत.  आणि चरक सुश्रुत वाग्भट यांनी मांडलेले  आयुर्वेदातले सिद्धांत जर तुम्ही जसेच्या तसे स्वतःच्या नावावर खपवत असाल तर खरच आपण सर्वात मोठे वाङ्मय चोर आहात. यापुढे याच भान नक्की राखा कारण लोकांना तुम्ही मूर्ख बनवू शकता पण आयुर्वेदातील दिग्गजांनी निर्माण केलेल्या या सर्व शिष्याना नाही. कारण यापुढे आयुर्वेद हा आयुर्वेदाच्या मार्गाने जिवंत ठेवायचा त्यांना लोकांच्या मनात रुजवण्याचा विडा तर आम्ही उचलला आहेच पण बरेच विडे उचलण्याची ताकत पण आमच्यात आहे बरं का !!! आमचं एव्हढंच म्हणणं  आहे कि ज्या आयुर्वेदामुळे तुम्ही मोठे झालात त्या आयुर्वेदाला फक्त आदर द्या बदनाम नका करू. जय आयुर्वेद ।।।।।।
©वैद्य सचिन रामकृष्ण पाटील
      एम.डी. आयुर्वेद
      पंचकर्म तज्ञ
      9823347244

Tuesday, January 19, 2016

राजीव गांधी जीवनदायिनी आरोग्य योजना आणि अंजिओप्लास्टि - बायपासचा विळखा

राजीव गांधी जीवनदायिनी आरोग्य योजना आणि अंजिओप्लास्टि - बायपासचा विळखा

        नमस्कार मित्र हो आजकाल आपण नेहमी ऐकत असतो कि मित्रांच्या वडिलांची बायपास झाली शेजारच्या काकूंची प्लास्टि झाली, अशी बरेच उदाहरणे आपण सर्रास ऐकतो आहोत. त्यासोबत हे हि ऐकतो कि एक गोष्ट छान झाली कि ऑपरेशन हे अल्प खर्चात झालं किंवा राजीव गांधी आरोग्य योजनेअंतर्गत मोफत झालं.
याचा आनंद खूप लोकांना होतो कारण ऑपरेशन झालं ते पण मोफत.
           पण या गोष्टीचा खरच विचार आत्तापर्यंत कोणी केलाय का कि खरच बायपास किंवा प्लास्टि ची गरज होती का कि मोफत होत म्हणून आपण करून घेतलं किंवा आपल्याला भीती घालण्यात आली कि आठ दिवसाच्या आत ऑपरेशन झालं नाही तर धोका आहे. म्हणून आम्ही घाबरून करून घेतलं. बर घेतलं करून पुढे काय ??? खरच आपण हृदयरोग मुक्त झालो का ????
            खरच मला भविष्यात हृदय विकार होणार नाही का खरच मला अटॅक येणार नाही का ?????याच उत्तर कदाचित कोणीच देऊ शकणार नाही दिल तरी ""आम्ही गॅरंटी देऊ शकणार नाही "" असं असेल , खरंतर गॅरंटी ची अपेक्षा करणं चुकीच आहे पण पुढची दहा वर्ष मी चांगल आयुष्य जगायला पाहिजे हि अपेक्षा अगदी योग्य आहे. पण हे होत का ????
काल परवाचीच गोष्ट , असाच एक रुग्ण छातीत दखल म्हणून एका प्रसिद्ध रुग्णालयात दाखल झाला , अटॅक आला होता. रुग्ण ऍडमिट झाला सगळं झालं औषध उपचार झाले सोबत अंजिओग्राफी पण झाली. आणि त्यामध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लोकेजेस सापडले आणि रुग्णाला त्वरित सांगण्यात आलं इनफॅकट भीती घालण्यात आली कि 8 दिवसाच्या आत प्लास्टी नाही केली तर जीवाला धोका आहे काहीहि होऊ शकत.
रुग्ण घाबरून गेला आणि त्यांनी प्लास्टी करून मोकळे झाले आणि बिंदास्त झाले आपण रोगमुक्त झालो वेळीच प्लास्टी करून घेतली म्हणून!!!आणि ती हि मोफत !!!!!
            रुग्ण घरी गेला सगळ्या गोष्टी सुरळीत सुरु झाल्या बघता बघता 3 महिने गेले आणि अचानक रुग्णाला परत छातीत दुखू लागलं रुग्ण परत ऍडमिट झाला परंत अंजिओग्राफी झाली आणि सांगण्यात आलं मागे ज्या ठिकाणी प्लास्टी केले त्याच ठिकाणी पुन्हा 3 महिन्यात ब्लॉकेजेस तयार झालेत आणि आत्ताच्या आत्ता बायपास करावी लागेल!!!
आणि त्यासोबत हृदयाचि ताकत कमी झाले सो बायपास करताना सुद्धा जीवाला धोका आहे आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही!!!
रुग्णाच्या नातेवाईकांचा प्रश्न डाँक्टर मागे तुमीच सांगितलेलं कि प्लास्टी केल्यानंतर काही होणार नाही मग हे कस झालं????? उत्तर -नाही अस होऊ शकत आम्ही काही सांगू शकत नाही. रुग्ण हतबल .......सो मोफत ऑपरेशन होत म्हणून करून घेत असाल तर तुम्ही स्वताच्या जीवाशी खेळ करताय !!!
मित्रानो सांगायचं मुद्दा हा आहे कि हृदयविकार हा एक जीवनशैलीत बदल घडल्याने झालेला विकार आहे 70 % केसेस मध्ये नियमित औषध उपचार (प्लास्टी बायपास न्हवे ) आहारातील पथ्य आणि व्यायाम हे जर नियमित केलं तर आपण खूप छान आयुष्य जगू शकतो.
            असे बरेच लोक आहेत ज्यांच्या हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस आहेत पण ते अगदी निरोगी आहेत छान आहेत कारण त्यांचा आहार व्यायाम आणि औषध ..
एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते कि ब्लॉकेजेस या चरबीच्या गाठी असतात रक्ताच्या नाही , आणि अटॅक हा रक्ताच्या गुठळी मूळे येतो जो ब्लॉकेजेस नसलेल्या व्यक्तीला हि येऊ शकतो. अगदी मलासुद्धा जर मी नियमित व्यायाम आहारातील पथ्य सांभाळली नाहीत तर !!!!!
             व्यायामाचा अभाव आहारातील अपथ्य आणि मधुमेह या तीन गोष्टी हृदयरोगाला कारणीभूत आहेत या गोष्टींमुळेच रक्तवाहिन्यातील आतला स्तर खराब होऊन तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो ब्लॉकेजेस बनु शकतात ...
            जर तुम्हाला हृदयरोग टाळायचा असेल तर नियमित व्यायाम निदान रोज पहाटे अर्ध्या तासात 3km चे चालणे आणि आहारातील पथ्य हे सांभाळावे या गोष्टी कारण खूप गरजेचं आहे .
आणि जर तुम्ही हृदयरोगी असाल तर प्लास्टी बायपास पेक्षा नियमित व्यायाम आहारातील पथ्य औषध आणि पंचकर्म या गोष्टी तुम्हाला चांगलं आयुष्य (quality life) जगायला नक्कीच मदत करू शकतात.
©वैद्य सचिन रामकृष्ण पाटील
Ast. Professor at Late Kedari Redekar Ayurvedic Medical College And Research Institute and Chief Medical Officer at Amrutwel Ayurved Panchakarma Hospital
एम.डी. पंचकर्म
9823347244

Monday, February 18, 2013

औषध विषयी .......

बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांनी आपल्या नव्या औषधांच्या मानवी चाचण्या घेण्याकरता आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे आणि संबंधित कायदे यांची पूर्तता करणे अत्यावश्यक असते. परंतु भारतात मात्र कडक कायद्यांअभावी आणि सरकारच्या बेपर्वा कारभारामुळे या कंपन्यांचे चांगलेच फावले आहे. भारतीयांचा गिनीपिग म्हणून वापर करताना या कंपन्या कशाचीच भीडमुर्वत बाळगेनाशा झाल्या आहेत. त्याचा पंचनामा करणारे लेख..
'दे शात अनेक बहुराष्ट्रीय औषध कंपन्या बेकायदेशीरपणे 'क्लिनिकल ट्रायल'रूपी विध्वंस करत असून, त्यामुळे अनेक रुग्णांना जीव गमावावा लागला आहे. असे असूनही शासन या महत्त्वाच्या प्रश्नावर झोपा काढत आहे. चौकशी समिती नेमणे फार सोपे आहे. महत्त्वाच्या प्रश्नाबाबत लक्ष विचलित करण्यासाठीचा तो सर्वोत्तम मार्ग आहे..' हे उद्गार आरोग्य चळवळीतल्या कुणा कार्यकर्त्यांचे नाहीत, तर सर्वोच्च न्यायालयाचे आहेत! औषध कंपन्या भारतात गरीब रुग्णांवर करत असलेल्या 'क्लिनिकल ट्रायल'मधील (रुग्णांवरील औषधांच्या चाचण्या) गरप्रकार थांबवण्यासाठी त्वरित पावले उचलायची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला असे फटकारण्याएवढे काय घडले, हे थोडक्यात पाहू.
वैद्यकीय संशोधन आणि वैद्यकीय उपचार यांचे एक अतूट नाते आहे. मग तो एडवर्ड जेन्नरने लावलेला लसीचा शोध असू दे, वा फ्लेिमगने लावलेला पेनिसिलीनचा शोध असू दे! या प्रत्येक शोधामुळे वैद्यक तंत्रज्ञान व उपचार पुढे गेले आहेत. आज आढळणारी लसीकरण, गोळ्या, औषधे आदी वैद्यकीय आयुधे ही काही लोकांवर केलेल्या प्रयोगांतून पुढे आल्यामुळेच आपण त्यांचा आज लाभ घेत आहोत. म्हणूनच ते संशोधक आणि ज्यांच्यावर हे संशोधन केले गेले त्या व्यक्ती यांचे ऋण मानवी समाजावर कायम राहील. या संशोधनात विशिष्ट शिस्त पाळायची गरज असते. सुरुवातीला नवीन औषधाचे गुणधर्म प्रयोगशाळेत तपासले जातात. गिनीपिग, उंदीर, बेडूक, ससा अशा प्राण्यांवर त्याची चाचणी घेतली जाते. मगच माणसांसाठी ते कितपत गुणकारी आहे, त्याचे मानवी शरीरावर कोणते, किती, केव्हा दुष्परिणाम होतात, याचा अभ्यास करण्यासाठी काही व्यक्तींवर त्या औषधाची चाचणी घेतली जाते. त्याला 'क्लिनिकल ट्रायल' म्हणतात. हिटलरच्या फॅसिस्ट राजवटीत ज्यूंचा 'क्लिनिकल ट्रायल्स'मध्ये अमानुष दुरुपयोग केल्यामुळे त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, प्रयोगात सामील होणाऱ्या रुग्णांचे मानवी हक्क जपण्यासाठी दुसऱ्या महायुद्धानंतर 'न्युरेन्बर्ग कोड' ही आचारसंहिता अस्तित्वात आली. प्रगत देशांत आता 'हेलसिंकी डिक्लरेशन' ही सुधारित आचारसंहिता लागू आहे, तर भारतातील 'भारतीय आरोग्यविज्ञान संशोधन संस्थे'ची आचारसंहिता बंधनकारक आहे. तिचाही पाया 'हेलसिंकी डिक्लरेशन' हाच आहे. पण ही आचारसंहिता डावलून भारतात या चाचण्या करता येतात, हे हेरून गेल्या काही वर्षांत अनेक औषध कंपन्यांनी क्लिनिकल ट्रायलसाठी भारताची निवड केली आहे. 
भारतात १०० हून अधिक कंपन्यांनी 'क्लिनिकल ट्रायल'चा सुमारे २५०० कोटी रुपयांचा धंदा आज उभारला असला तरी शासनाकडे मात्र भारतात किती क्लिनिकल ट्रायल्स चालू आहेत, याची निश्चित माहिती वा आकडेवारी उपलब्ध नाही. 'स्वास्थ्य अधिकार मंच' या संस्थेच्या अहवालानुसार, २००६ ते २०११ या सहा वर्षांत भारतात सुमारे ४०४६ क्लिनिकल ट्रायल्स झाल्या. पण सरकारकडे मात्र जून २०११ पर्यंत फक्त १८५० क्लिनिकल ट्रायल्सचीच नोंद झाली. कारण तशी नोंद करणे जून २००९ पर्यंत बंधनकारकच नव्हते.
इंदौरमधील एका शासकीय रुग्णालयात ३३०० रुग्णांवर ७३ औषधांच्या ट्रायल करण्यात आल्या. त्यात १८३३ लहान मुले, तर २३३ मानसिक रुग्ण होते. यापकी ८१ रुग्णांना गंभीर दुष्परिणामांना तोंड द्यावे लागले. त्यातील काहींचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांना कोणतीच नुकसानभरपाई देण्यात आली नाही, हे नंतर उघडकीस आले. या चाचणीशी संबंधित पाच शासकीय डॉक्टरांच्या खात्यांवर औषध कंपन्यांनी ५.१ कोटी रुपये जमा केले, असे आíथक गुन्हे अन्वेषण विभागाला नंतर आढळून आले. पण मध्य प्रदेश सरकारने त्यांच्यावर अजूनही कारवाई केलेली नाही. २३३ मानसिक रुग्णांवरील चाचणीसंदर्भात एम. जी. एम. मेडिकल कॉलेज हॉस्पिटल या सरकारी हॉस्पिटलमधील डॉक्टर दोषी आढळले. परंतु त्यांच्यावरही कारवाई करण्यात आलेली नाही. 'स्वा.अ. मंच'ने हे सर्व प्रसिद्धीला आणले. भोपाळच्या गॅसकांडग्रस्त २५० रुग्णांवर भोपाळ मेमोरियल हॉस्पिटलमध्ये- २००४ ते २००८ दरम्यान रुग्णांना त्याबाबत माहिती न देता त्यांच्यावर क्लिनिकल ट्रायल करण्यात आल्या असेही उघडकीस आले आहे. 
रुग्णांना पुरेशी माहिती न देता, विशेषत: त्यांना औषधाचे संभाव्य दुष्परिणाम समजावून न सांगता, त्यांना नुकसानभरपाई न देता त्यांच्यावर 'गिनीपिग'सारखे प्रयोग केले जात आहेत. दुर्धर आजाराने ग्रस्त अनेक गरीब व अशिक्षित रुग्ण, मानसिक रुग्ण, अपंग व्यक्ती मोफत उपचाराच्या आमिषाने, अज्ञानामुळे आणि परिस्थितीमुळे अशा प्रयोगांना बळी पडत आहेत. त्यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन तर होतेच; पण अनेकांना गंभीर दुष्परिणामांनाही तोंड द्यावे लागते. तर काहींच्या जीवावरही बेतते. जानेवारी २००५ ते जून २०१२ या काळात भारतातील ५७,३०३ रुग्णांवर क्लिनिकल ट्रायल्स करण्यात आल्या. त्यात ११,९७२ जणांमध्ये 'गंभीर घटना' घडल्या व २६४४ जण दगावले. पकी ५०६ 'गंभीर घटना' व ८० मृत्यू यांना ही औषधे जबाबदार आहेत असे निष्पन्न झाले. पकी फक्त ३८ मृत व्यक्तींच्या नातेवाईकांनाच नुकसानभरपाई मिळाली आहे. तीसुद्धा सरासरी फक्त २.७ लाख रुपये! काहींना तर केवळ ५० हजार किंवा एक लाख रुपयेच भरपाईदाखल मिळाले. हे लोण महाराष्ट्रातही पोचले आहे. २००६ ते २००९ मध्ये झालेल्या ३१५२ ट्रायल्सपकी महाराष्ट्रात पुणे-३००, मुंबई- ३११, नागपूर- ८२, औरंगाबाद- ५०, नाशिक- ५६ इतक्या चाचण्या झाल्या आहेत. त्यात दगावलेल्यांची आकडेवारी मात्र मिळाली नाही. यापकी अनेक चाचण्या कर्करोग किंवा तत्सम गंभीर आजारांबाबत असल्याने त्यात एरवीही मृत्यूचे प्रमाण जास्त असते.
या पाश्र्वभूमीवर खोलात गेल्यावर दिसते की, निष्काळजीपणा किंवा गरप्रकारामुळेही मृत्यू होतात. उदा. डॉक्टरांसाठी असलेल्या 'मिम्स' या सुप्रसिद्ध मासिकाच्या नोव्हेंबर २०१२ च्या संपादकीयात डॉ. गुलाटी यांनी दिलेले उदाहरण पाहा- बेयर या जर्मन कंपनीच्या रीव्हॅरोक्झाबेन या औषधाच्या चाचणीत १३ भारतीय दगावले. (संसदेला दिलेल्या यादीत फक्त पाचजणांचाच समावेश आहे!) पकी पाचजण अशा चाचणीत दगावले, की ज्या प्रकारच्या चाचण्या करायचे बंधन अमेरिकत आहे; पण भारतीय कायद्यानुसार नाही. वर्तमानपत्रांतून गहजब झाल्यावर काही प्रकरणांमध्ये नुकसानभरपाई दिली गेली. तीही सरासरी फक्त २.५ लाख रुपयेच!
क्लिनिकल ट्रायल्सवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी 'ड्रग्ज कंट्रोलर'ची आहे. पण तिथला कारभार एकूणच औषध कंपन्यांच्या हिताची काळजी घेणारा आहे. हे मत औषधांबाबतच्या संसदीय स्थायी समितीनेही नोंदवले आहे! या समितीला 'ड्रग्ज कंट्रोलर'च्या कारभाराबद्दल पुढील धक्कादायक गोष्टी आढळल्या. २००१ ते २०१० या काळात ड्रग्ज कंट्रोलरने २१६७ औषधांना परवानगी दिली. त्या पकी तीन औषधांबाबतच्या फाइल्सच गायब होत्या! ती औषधे वाद्ग्रस्त होती. उरलेल्या ३९ औषधांबाबत पुढील आढळले - १) १३ (३९ टक्के) औषधांना अनेक विकसित देशांमध्ये परवानगी नव्हती.
२) २५ (६४ टक्के) औषधांबाबत नियमानुसार तज्ज्ञांचे मत घेतले नव्हते. जेव्हा मत घेतले तेव्हा अनेकदा कंपनीने बनवलेल्या पत्रावर 'तज्ज्ञां'नी सही केल्याचे स्पष्ट दिसत होते. 
३) ११ (२७ टक्के) औषधांबाबत पुरेशा रुग्णांवर संशोधन केले नव्हते. 
समितीला असेही आढळले की, जानेवारी २००८ ते ऑक्टोबर २०१० मध्ये ३३ औषधांना क्लिनिकल ट्रायल न घेताच परवानगी दिली गेली! खरं तर अशी सवलत फक्त तातडीच्या प्रसंगीच देता येते. या ३३ औषधांबाबत तशी तातडीची परिस्थिती नव्हती.
याचे कारण भारतात क्लिनिकल ट्रायलशी संबंधित नतिक आचारसंहिता अनेक औषध कंपन्या नावालाच पाळतात. आणि सरकारी यंत्रणाही त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करते. क्लिनिकल ट्रायलशी संबंधित नतिक आचारसंहिता पाळली जात आहे ना, रुग्णांचे मानवी हक्क उल्लंघले जात नाहीत ना, हे पाहण्यासाठी स्वतंत्र 'एथिक्स कमिटी' नेमण्याचे बंधन आहे. पण अशा समित्या नेमताना पाळायच्या पथ्यांबाबत सरकार आग्रही नाही. या समित्यांबाबत शासनाकडे पुरेशी माहितीही नाही. त्यांचे नियमन करण्याची पद्धत नाही. त्याचा फायदा घेऊन अनेक हॉस्पिटल्स किंवा संशोधन संस्था स्वत:च अशा समित्या तयार करतात, किंवा एखाद्या धंदेवाईक 'एथिक्स कमिटी'ला हे काम आऊटसोर्स करतात. ती कमिटी तपासणीचा फार्स करून आचारसंहिता पाळल्याचा दाखला देऊन टाकते.
क्लिनिकल ट्रायलवर देखरेखीचा अधिकार एथिक्स कमिटय़ांना देण्याचा प्रस्ताव आहे. पण कायदेशीर अधिकार असलेल्या 'ड्रग्ज कंट्रोलर' यंत्रणेने ते केले पाहिजे. क्लिनिकल ट्रायलमुळे संबंधित रुग्णाच्या आरोग्यावर दुष्परिणाम झाला आहे का, आणि झाला असल्यास किती नुकसानभरपाई द्यायची, हे 'एथिक्स कमिटी'ने ठरवावे, असे घाटते आहे. एकतर नुकसानभरपाई या विषयात या कमिटीचे सभासद तज्ज्ञ नसतात. मुख्य म्हणजे क्लिनिकल ट्रायल 'नतिकदृष्टय़ा ठीक आहे' असे म्हणून कमिटीने परवानगी दिल्यानंतर त्यांनीच हे निर्णय घेणे योग्य नाही. कारण दुष्परिणाम कमी आहेत, असे म्हणण्याकडेच त्यांचा कल असणे साहजिक आहे. नुकसानभरपाईची रक्कम ठरवताना दगावलेल्या व्यक्तीच्या उत्पन्नाच्या निम्मे उत्पन्नच हिशेबात धरले जाईल असा प्रस्ताव आहे. का, तर म्हणे कमावती व्यक्ती निम्मेच उत्पन्न कुटुंबावर खर्च करते! हा प्रस्ताव मान्य झाला तर कॉलेजच्या शेवटच्या वर्षांपर्यंत असलेल्या मुलाच्या वा मुलीच्या कुटुंबीयांना काहीच नुकसानभरपाई मिळणार नाही आणि गरीब माणसाचे कुटुंब तर वाऱ्यावरच सोडले जाईल. 
या अनागोंदीला जबाबदार आहे ती औषध कंपन्यांची नफेखोरी, वैद्यकीय संशोधनातील ढासळलेली नीतिमत्ता आणि कायद्यातील व नियमांतील त्रुटी. शिवाय त्यांची अपुरी, आपमतलबी अंमलबजावणीही.

गेल्या आठवडय़ात सर्वोच्च न्यायालयानं भारत सरकारला फटकारलं- 'अनेक औषध कंपन्या आपल्या देशातल्या नागरिकांना गिनीपिग्ज म्हणून औषधांच्या चाचण्यांसाठी वापरत आहेत. तेव्हा काहीतरी करा.' या फर्मानाची सरकार काय घ्यायची ती दखल घेईलच. परंतु यानिमित्ताने बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांचे काळे उद्योग सर्वसामान्यांसमोर येणं गरजेचं आहे. या काळ्या कारवायांना 'जागतिक चेहरा' आहे. हा भयावह चेहरा उघड करणारा लेख..
आ ठ र्वषही झाली नाहीत या घटनेला. २००५ सालच्या नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेचे तत्कालिन अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी जगातला आतापर्यंतचा सर्वात मोठा असा आरोग्य सुधार कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार अध्यक्षमहोदयांना स्वत:च्या अधिकारात ७१० कोटी डॉलर्स इतकी प्रचंड रक्कम आरोग्यविषयक कार्यक्रमांसाठी खर्च करता येणार होती. रुपयांत धर्मातर केलं तर ही रक्कम भरते जवळपास ४० हजार कोटी रुपये. कसलाही आणि कोणालाही हिशेबच द्यायची गरज नव्हती त्यासाठी. बुश यांनी हा कार्यक्रम जाहीर केला आणि लगेचच त्या मुहूर्तावर जगभरात एका आजाराची साथ आली. सुरुवात झाली ती क्युबामधून. मग ब्राझील. मग मेक्सिको. नंतर तिसऱ्या जगातले आपल्यासारखे अन्य देश. बुश यांच्या कार्यक्रमानुसार जो आजार येण्याची शक्यता होती, त्यातलाच तो आजार होता. आणि बुश यांनी ज्या कंपनीला या कार्यक्रमानुसार घसघशीत मदत जाहीर केली होती, त्याच कंपनीचं औषध बरोबर त्या आजाराला लागू पडत होतं.
तो आजार होता- बर्ड फ्लु.
आणि ते औषध- टॅमी फ्लु.
आणि यातला दुसरा योगायोग म्हणजे ज्या कंपनीला बुश यांच्या आरोग्यप्रेमाचा फायदा मिळाला त्या कंपनीचं नाव- 'जिलाद लाइफ सायन्सेस.' या योगायोगाच्या पोटातला आणखी एक योग म्हणजे बुश यांचेच संरक्षणमंत्री डोनाल्ड रम्सफेल्ड हे या कंपनीचे संचालक होते. बुश यांच्या आरोग्यभानाचा इतका फायदा या कंपनीला झाला, की तो पाहून बहुअब्जाधीश झालेल्या रम्सफेल्ड यांनी ही कंपनी 'रोश' या बलाढय़ औषध कंपनीला विकून टाकली. या योगायोग मालिकेतला खरा योगायोग पुढेच आहे.
जिलाद लाइफ सायन्सेस विकली गेली, रम्सफेल्ड यांना गडगंज फायदा झाला आणि मग बर्ड फ्लुची तीव्रता कमी व्हायला लागली.
आता तिकडे क्युबाने आरोप केलाय की, हा आजार अमेरिकी कंपन्यांनी मुद्दाम पसरवला होता म्हणून. तीस वर्षांपूर्वी असाच आरोप अमेरिकेवर झाला होता.
तो होता- स्वाईन फ्लु हा कथित आजारही असाच ठरवून पसरवण्यात आल्याचा!

२००९ साली मी औषध कंपन्या, त्यांचं अर्थकारण आणि त्यामागचं राजकारण यावरच्या 'युद्ध जिवांचे' या पुस्तकाच्या कामात गर्क होतो. माझी त्यावेळची एक सहकारी पत्रकार लंडनमध्ये स्वाईन फ्लु या आजारानं आडवी पडली होती. तोपर्यंत या आजाराची हवा भारतात ताप ताप तापलेली होती. सर्व प्रसारमाध्यमांतून नुसता या आजार-वृत्ताचा पुर आलेला होता. या आजाराचं केंद्र पुण्यात होतं. त्याची दहशत इतकी होती, की समस्त पुणेकर तोंडाला फडकं लावून वावरू लागले होते. पुणेकरांचं बोलणं त्यामुळे आपोआपच गाळलं जात होतं. पुणेकरांच्या तोंडाला लगाम घालू शकतो म्हणजे हा आजार फार म्हणजे फारच तगडा असणार, याबाबत समस्त जनतेत एकमत होतं. या दहशतीच्या सचित्र कथा सर्वत्र प्रसिद्ध होत होत्या. हे सगळं वाचत असल्यानं लंडनमध्ये स्वाईन फ्लु या आजारानं आपण नक्की मरणार अशी माझ्या त्या सहकारी पत्रकाराची खात्रीच पटली. तिनं डॉक्टरांकडे 'मलाही टॅमी फ्लु हे औषध सुरू करा,' असा तगादा लावला.
लंडनमध्ये आपल्यासारखं नाही. म्हणजे औषधाच्या दुकानात जा आणि हवं ते औषध घ्या, असं करता येत नाही. इकडे आपल्या पुण्यात ज्यांची पोरं लहान होती ते आई-वडील दुकानांसमोर रांगा लावून लावून टॅमी फ्लु गोळ्या घेत होते आणि पोरांना चण्याफुटाण्यासारख्या देत होते. परंतु लंडनमध्ये तिला काही हे औषध मिळेना. तिथल्या डॉक्टरांनी तिला सांगितलं, 'तू रजा घे.. घरी आराम कर.. सारखं कोमट पाणी पित राहा.. जेवणात चांगली सुप्स वगैरे घे.. ताप आला तर पॅरासिटामोल घ्यायची. नाही तर काही नाही. आठ दिवसांनी परत चाचणी करू. त्यात स्वाईन फ्लु कायम राहिलेला दिसला तर टॅमी फ्लु सुरू करू.'
तिचा काही त्या डॉक्टरांवर विश्वास बसेना. 'भरगच्च औषधयादी देणारा तो चांगला डॉक्टर!' हे भारतीय संस्कार तिच्या रक्तात होते. त्यामुळे लंडनमधले डॉक्टर औषध देत नाहीत म्हणजे त्यांच्या ज्ञानशाखेची तपासणी करायला हवी असंच तिला वाटू लागलं. परंतु पर्याय नव्हता. तिला डॉक्टरांचं ऐकावंच लागलं. कारण स्वतंत्रपणे, मनाला येईल ते औषध घ्यायची सोय तिकडे नाहीच. त्यामुळे तिनं डॉक्टरांचा सल्ला मानला. आठ दिवस आराम केला. सांगितल्याप्रमाणे पथ्यपाणी केलं. मग ठरलेल्या वेळी चाचणीला गेली.
अन् तिला धक्काच बसला.
स्वाईन फ्लु गायब झाला होता. कोणतंही वेगळं औषध न घेता साध्या उपायांनी हा कथित जीवघेणा आजार बरा झाला होता. तिला ते इतकं अप्रुप वाटलं, की त्या आजारानुभवाची माहिती देणारा लेखच तिनं त्यावेळी रविवारच्या टाइम्स ऑफ इंडियात लिहिला.
तोपर्यंत इकडे महाराष्ट्रात जनकल्याणकारी सरकारने लक्षावधी टॅमी फ्लु गोळ्यांची ऑर्डर 'रोश' कंपनीकडे नोंदवली होती. 

१९३२ साली चीन आणि जपान यांच्यात युद्ध झालं होतं. तेव्हाचा जपान हा आक्रमक होता आणि चीन केविलवाणा. त्या युद्धात जपाननं चीनच्या हुनान प्रांतावर विमानहल्ला चढवला. विमानहल्ल्याचा सुगावा लागल्याने चिनी नागरिक पटापट लपले. पण त्यात विमानातून बॉम्ब पडले नाहीत. पडले ते ज्वारीसारखे दाणे. त्यावेळी कोणालाच काही वाटलं नाही. पण दोनेक दिवसांनी आसमंतातल्या कोंबडय़ा साथ आल्यासारख्या मरायला लागल्या. परिसरातली कोंबडी न् कोंबडी मेली आणि मग पाठोपाठ उंदरांचा सुळसुळाट झाला. नागरिकांना काही कळायच्या आतच हळूहळू एकेकाच्या काखेत गाठ यायला लागली. बघता बघता सारा परिसर प्लेगग्रस्त झाला.
काही दिवसांनी असाच विमानहल्ला झाला. त्यातून वेगळेच जंतू फवारले गेले. त्यातून 'ग्लँडर्स' या आजाराची लागण झाली. त्यात माणूस धडधाकटच राहतो, फक्त त्याचे पाय अक्षरश: सडतात.
पुढची कित्येक र्वष हजारो चिनी नागरिक सडक्या पायांचं हे ओझं ओढत जगत राहिले.
जपानच्या डॉ. शिरो इशी यानं नवनवे आजार शोधण्यासाठी इतके क्रूर प्रयोग केले आणि त्यात लाखोंचे जीव घेतले, की त्याची हकिकत कळली तर अनेकजण 'हिटलर हा कितीतरी दयाळू होता.. 'असं म्हणू लागतील. वास्तविक डॉ. इशी यानं दुसऱ्या महायुद्धात केलेल्या क्रौर्याची तुलना हिटलरच्या ऑशविझशीही होऊ शकत नाही. पण तरीही न्युरेंबर्ग खटल्यात डॉ. इशी याचा युद्ध-गुन्हेगार म्हणून उल्लेखदेखील झाला नाही.
कारण-
अमेरिकी औषध कंपन्यांनी त्याला शिताफीनं आपल्याकडं वळवलं. इतकंच नाही, तर अमेरिकेत त्याला आo्रयदेखील दिला. पुढे तो आणि त्याचे सहकारी औषध कंपन्यांसाठी काम करू लागले.

१९४२ साली अमेरिकेत जैविक अस्त्रनिर्मितीबाबतचा अहवाल तयार झाला. त्यानुसार अध्यक्ष रूझवेल्ट यांचे संरक्षणमंत्री हेन्री स्टिम्सन यांनी- अमेरिकेने जैविक, रासायनिक अस्त्रं बनवायलाच हवीत, असा आग्रह धरला. वास्तविक स्टिम्सन यांना माहीत होतं की, ही अस्त्रं किती भयंकर, अमानवी आहेत! परंतु तरीही ते ही अस्त्रं अमेरिकेने बनवायलाच हवीत, या मताचे होते. अध्यक्ष रूझवेल्ट मात्र त्याबाबत इतके उत्साही नव्हते. पर्ल हार्बरवरच्या हल्ल्यानं हादरलेल्या अमेरिकी प्रशासनातला एक गटदेखील या मताचाच होता. या सगळ्यांनी रूझवेल्ट यांचं मन वळवलं. या मतपरिवर्तनात सक्रिय सहभाग होता जॉर्ज मर्क यांचा. त्यानुसार पुढे वॉशिंग्टनपासून जवळच कॅम्प डेट्रिक इथं अमेरिकेचा अशा अस्त्रनिर्मितीचा कारखाना उभा राहिला.
त्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मर्क यांची त्याच नावाची औषध कंपनी आज जगातल्या बलाढय़ औषध कंपन्यांत गणली जाते.
याच कॅम्प डेट्रिक इथल्या जैविक अस्त्र केंद्रात महत्त्वाच्या संशोधनात मग्न असणारे डॉ. फ्रँक ओल्सन १९५३ सालच्या नोव्हेंबर महिन्यात न्यूयॉर्कमधल्या एका हॉटेलात अचानक मेलेले आढळले. त्यांचा मृत्यू त्यांच्या संशोधनाइतकाच गूढ होता. त्यावेळी त्यांनी आत्महत्या केली असं दाखवलं गेलं.
पण त्यांच्या मुलाचा त्यावर विश्वास बसेना. त्यानं त्यांच्या मृत्यूची चौकशी व्हायला हवी, ही मागणी लावून धरली. तो इतका इरेला पेटला, की त्यानं वडलांचं दफन केलेलं पार्थिव बाहेर काढलं. त्याचं पुन्हा शवविच्छेदन करवलं. तेव्हा त्यात नक्की झालं, की डॉ. ओल्सन यांचा खून झालाय आणि ती आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केला गेलाय. त्यामुळे डॉ. ओल्सन यांच्या मृत्यूची खरी कारणं कळावीत म्हणून त्यांच्या मुलानं प्रयत्न सुरू केले.
तेव्हा हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी त्याही वेळी अमेरिकी सरकारात मंत्री असलेल्या तिघांनी प्रयत्न केले होते. हे तिघे म्हणजे-डोनाल्ड रम्सफेल्ड, डिक चेनी आणि थोरले जॉर्ज बुश. या प्रयत्नांमागचं कारण असं की, डॉ. ओल्सन हे एका खास रसायन निर्मितीच्या प्रयोगात गुंतले होते आणि त्यांच्यावरच त्या औषधाची चाचणी अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएनं घेतली होती. या औषधानं वरकरणी शरीरावर काहीही परिणाम होत नाही, पण मनावर मेंदूचं असलेलं सदसद्विवेकबुद्धीचं नियंत्रण निघून जातं. या रसायनानं पुढे पिढीच्या पिढी बरबाद केली.
ते रसायन म्हणजे आजही नशाबाजांचं आवडतं असलेलं 'लायसर्जिक अॅसिड डायमिथाईल अमाईड' होय! याचंच साधं-सोपं लोकप्रिय नाव- एलएसडी! त्यावर बंदी आहे. पण ती कागदावरच! 

गेल्या आठवडय़ात सर्वोच्च न्यायालयानं भारत सरकारला फटकारलं, की अनेक औषध कंपन्या आपल्या देशातल्या नागरिकांना गिनीपिग्ज म्हणून औषधांच्या चाचण्यांसाठी वापरत आहेत. तेव्हा काहीतरी करा. आता सर्वोच्च न्यायालयानंच दणका दिल्यामुळे त्याची बातमी झाली आणि काही जुजबी का होईना, तपशील बाहेर आला. त्यावरून दिसतं ते असं की, आपल्या देशात गेल्या काही वर्षांत किमान ८० जणांचा मृत्यू झालाय आणि जवळपास दीडशे भारतीय नागरिक गंभीर जायबंदी वा अपंग झालेत. आपण कशामुळे मेलो, हे मरताना त्या ८० पैकी एकालाही माहीत नव्हतं. आणि आपली ही अवस्था का झाली आहे, हे या दीडशेमधल्या एकालाही अजून माहीत नाही. वास्तविक अमेरिकेत असा नियम आहे की, औषधाची चाचणी करायची असेल तर रुग्णाला त्याची पूर्ण कल्पना द्यावी लागते. त्याच्याकडून 'ना हरकत पत्र' घ्यावं लागतं. सरकारलाही त्याची माहिती द्यावी लागते.
पण ही चैन पहिल्या जगातल्या o्रीमंतांसाठी! तिसऱ्या जगातल्या गरिबांचं मरण म्हणजे केवळ आकडाच तर असतो! तेव्हा सव्वाशे कोटींच्या भारत देशात इतकी माणसं दररोज मरत असतात, त्यातली काही अशी औषध चाचण्यांमध्ये मेली तर कुठे बिघडलं? असा विचार त्या कंपन्यांनी केला असेल तर त्यांचंही बरोबरच म्हणायला हवं.
गिनीपिग्जनी असंच मरायचं असतं!
सर्वोच्च न्यायालयानं त्याचीच तर जाणीव आपल्याला करून दिली आहे, हे आपल्या ध्यानात यावं यासाठीच हा प्रपंच. आपल्याला आपल्या गिनीपिग्जतेची जाणीव व्हावी यासाठी..!

loksatta Published: Sunday, January 20, 2013

Tuesday, September 25, 2012

स्वयंपाकाचे शास्त्र

भारतीय जीवनशैलीत आहारशास्त्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येक स्त्री किंबहुना पुरुषसुद्धा येनकेन प्रकारे आहारशास्त्राशी निगडित आहे. रॉबर्ट मॅककॅरिसन नावाच्या आहारतज्ज्ञांच्या मते योग्य प्रकारचा आहार आरोग्य शाबूत ठेवण्याचा, तर अयोग्य आहार हा रोगवाढीसाठीचा एकमेव महत्त्वपूर्ण घटक आहे.

आंघोळ करणे, रात्रीची झोप घेणे या गोष्टी जशा आपण बेमालूमपणे करतो. तसाच रोजचा स्वयंपाकही बेमालूमपणे किंवा सवयीने पार पाडला जातो. पण कसातरी स्वयंपाक उरकून पोट भरणे हा आपला हेतू नसतोच. तो सुद्धा शास्त्रशुद्ध पद्धतीने होणे गरजेचे आहे.

रोजच्या जेवणातला वरणभात तयार करणे हेसुद्धा शास्त्रच आहे. तांदूळ धुताना ब-याच जणींना तो खूप रगडून भरपूर पाण्यात धुण्याची सवय असते. तांदळात अळ्या होऊ नयेत म्हणून बोरिक पावडर लावण्याची गरज असते. ही पावडर निघून जाण्यासाठी खूप चोळून आणि अतिरिक्त पाण्याचा वापर करून तांदूळ धुतल्यास त्यातील 40 टक्क्यांपर्यंत थायामिन आणि ‘निकोटिनिक अ‍ॅसिड’ वाढत जाते.

हॉटेलमधला स्टीम राइस ब-याचदा आपण घरी करतो. जास्त पाण्यात तांदूळ शिजवून जास्तीचे पाणी फेकून दिल्यावर मोकळा भात तयार होतो. पण या पाण्यासोबत मिनरल्सदेखील जातात. त्यासाठी माफक पाण्याचा वापर करावा. यामुळे अन्नातील मोडियम, पोटॅशियम आणि कॅल्शियमचा आपल्याला पुरेपूर वापर करता येईल.

ब-याच कुकरी शोजमध्ये असे सांगितले जाते की, पालेभाज्या शिजवताना त्यावर झाकण ठेवले नाही तर त्या हिरव्यागार दिसतात. पण भाज्या न झाकता शिजवल्यास त्यातील व्हिटॅमिन सी नष्ट होते. म्हणूनच शक्यतोवर अन्न पे्रशर कुकरमध्ये शिजवावे. अन्नाला जितकी जास्त काळ उष्णता दिली जाते, तितकी त्यातील पोषणमूल्ये कमी-कमी होत जातात. स्निग्ध पदार्थ म्हणजे तेल, तूप, जितके जास्त गरम करू तितके त्यातील हानिकारक पदार्थांचे प्रमाण वाढते. ब-याचदा तळण केलेले तेल-तूप आपण पुन्हा फोडणीसाठी वापरतो, पण हे तेल-तूप वापरणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे.

अन्नाच्या पोषक तत्त्वांची जपणूक करण्यासाठी काही गोष्टींचे पालन करा-
* भाज्या शिजवताना झाकून ठेवा.
* डाळ, तांदूळ धुताना रगडून धुणे टाळा.
* भाज्या वाहत्या पाण्यात आधी धुवा, मग चिरा.
* वारंवार अन्न गरम करणे टाळावे.
* वरण, भाज्या शिजवताना शक्यतो आम्लरसाचा वापर करा.
* अन्न जपून वापरा, वाया घालवू नका. आपण वाचवलेल्या अन्नात इतर शेकडो व्यक्तींना भोजन मिळू शकते.
 
 
 
 

Sunday, September 23, 2012

तुळस ही गणेश पूजनात निषिद्ध का?

भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा अपवाद वगळता तुळस ही गणेश पूजनात निषिद्ध का? त्याची कथा...

धर्मध्वज राजाची लावण्यवती कन्या 'वृंदा' ही उपवर झाली होती. तीने आपल्या पित्यास माझे लग्न विष्णूशी लावून द्या असा हट्ट धरला. त्यावर धर्मध्वजाने तिला दैवी वरा
चा ध्यास सोडून मानवी वर सुचविण्यास सांगितले. परंतु वृंदाने त्यांचे ऐकले नाही. ती विष्णूवनात जाऊन चतुर्भुज विष्णूचे ध्यान व जप करुन लागली. वृंदेने एकचित्ताने एक लक्ष वर्ष उग्र तप केले व त्याच्या प्रभावाने तिला अंतर्ज्ञान प्राप्त झाले.

एकदा वृंदेने भागीरथी नदीच्या तिरावर विघ्नेश्वर गणेशास ध्यानमग्न पाहिले. अंतर्ज्ञानाने तिला गणेश हा विष्णूरुप असल्याचे ज्ञान झाले व ती गणेशावर मोहित झाली. वृंदेने श्रीगणेशाचे ध्यान भंग केले. डोळे उघडताच तो म्हणाला, "हे माते, तू कोण आहेस? माझ्या ध्यानाचा भंग का करत आहेस? गणेशउपासनेत एकचित्त असणा-याची एकाग्रता भंग करणा-यास नरकात जावे लागते, त्यामुळे पुन्हा माझ्या ध्यानात भंग आणू नकोस" त्यावर वृंदा म्हणाली "मी धर्मध्वजाची कन्या असून नाना तपांनी प्रभावयुक्त आहे, मला तुझ्याशी विवाह करायचा आहे तरी माझा त्वरित स्वीकार कर ". त्यावर गणेशाने तिला समजावले, "मी तुझ्याशी विवाह करु शकत नाही. विवाह करुन मी मोहपाषात अडकणार नाही. तू तुझ्या तपासम तुल्यबळ असा वर पहा".

गणपतीच्या नकाराने संतापलेल्या वृंदेने, "तू विवाह करशीलच" असा शाप दिला. शापास प्रतिउत्तर म्हणून गणेशाने वृंदेस, "तू वृक्ष होऊन मूढ योगीत पडशील" असा शाप दिला. हा दारुण शाप ऐकताच वृंदा घाबरुन थरथर कापू लागली व तिने गणाधीशाची क्षमा मागितली.

दयावान गणेशाने तिची तपश्चर्या लक्षात घेऊन तिला सांगितले, "देवी तू येथून जा, वनात तुला असूर भेटेल त्यावर तू आसक्त होशील, असूर मरताच पतिव्रते तू आपल्या देहास चितेच्या अग्नीत त्यागशील व वृक्षरुप तुळस होशील. महाविष्णूस शाप देऊन शिळारुपी शाळीग्राम करशील. त्यानंतर भावी काळात विष्णूची पत्नी म्हणून निरंतर रममाण होशील. माझ्या कृपेने तू धन्य होशील. देवांना तुझी पुत्रपुष्पे सदैव मान्य होतील. अन्य काष्ठासम तुला त्रैल्योक्यात कोणीही मानणार नाही तर तुझ्या काष्ठांच्या माळा सकळ जन गळयात भक्क्तीभावाने घालतील. विष्णूची पत्नी म्हणून मानव तुजला पुजतील. तथापि, मला तू वर्ज्य असशील यात मात्र संशय नाही."

गणेशास वंदन करुन चिंताक्रांत वृंदा वनात तप करण्यासाठी निघून गेली. वृंदा एकचित्त 'गणेश नाममंत्र जपत ' तप करत होती. दीड लक्ष वर्षे उलटून गेल्यावर गणेश प्रसन्न झाले व तिच्यासमोर प्रकट झाले. हर्षभरीत वृंदा त्यांना प्रणाम करुन स्तुतिस्तोस्त्र गाऊन पूर्वी केलेल्या चुकीची क्षमा मागू लागली. त्यावर गणेशाने तिला वरदान दिले "तू गाणपत्य होशील. वर्षातून एकदा तुला माझ्या पूजेत स्थान मिळेल. भाद्रपद शुक्ल चतुर्थीस तुझे पत्र मला भक्तीभावाने वाहिल्यास ते मला पावन होतील. भाद्रपद शुक्ल चतुर्थीस मला वाहिल्या जाणा-या एकवीस प्रकारच्या पत्रीत तुझ्या पत्रांचाही समावेश असेल व केवळ त्या दिवशीच तुझे पत्र मला वाहिलेले चालेल अन्य दिवशी तुझे पत्र माझ्या पूजनात चालणार नाही."

असे बोलून श्रीगणेश अंतर्धान पावले व वृंदेचे मन प्रसन्न व हर्षोत्फुल झाले.

सर्व पूजांमध्ये महत्त्वाचे स्थान असणा-या तुळशीस गणपती पूजनात निषिद्ध मानले जाते. परंतु, वर्षातून एकदा गणेश चतुर्थीस (भाद्रपद शुक्ल चतुर्थीस) तिचा समावेश गणेश पूजनात केला जातो. त्या दिवशी गणपतीला वाहिल्या जाणा-या एकवीस पत्रींमध्ये तुळसही असते.

गणेशास भाद्रपद शुक्ल चतुर्थीस वाहिल्या जाणा-या एकवीस पत्री पुढीलप्रमाणे आहेत: (१) पिंपळ, (२) देवदार, (३) बेल, (४) शमी, (५) दूर्वा, (६) धोतरा, (७) तुळस, (८) भृंगराज / माका, (९) बोर, (१०) आघाडा, (११) रुई/मांदार, (१२) अर्जुन/अर्जुनसादडा, (१३) मरवा, (१४) केवडा/केतकी, (१५) अगस्ती/ हादगा, (१६) कन्हेर/ करवीर, (१७) मालती/मधुमालती, (१८) डोरली/बृहती, (१९) डाळिंब, (२०) शंखपुष्पी/विष्णुकांत, (२१) जाई/चमेली.
http://www.facebook.com/umesh.kulkarni.35

'लक' (Luck) म्हणजे काय?

'लक' (Luck), नशीब, तकदीर नांवाचा काहीतरी प्रकार आस्तित्वात आहे. त्याच्या आपल्या आयुष्याशी फार जवळचा संबंध आहे. त्याचे आपल्या आयुष्यावर अनेक बरे वाईट परिणाम होत असतात ही गोष्ट मला वाटते सगणेजणच मान्य करतील.
आपल्या मनासारखी एखादी गोष्ट झाली नाही तर ' I am unlucky', ' माझे नशीबच खराब आहे किंवा ही गोष्ट माझ्या नशीबातच नाही, ' मेरी तकदीरही खराब है!' असे म्हणत आपण आपल्या नशीबाला दोष देत बसतो. जर दुसर्यार कोणाला एखादी गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे मिळाली तर मग आपण लगेचच ' Oh! He is a lucky guy!', 'त्याचे नशीब जोरदार आहे किंवा त्याला नशिबाची साथ आहे.', 'उसकी तकदीर बहोत अच्छी है! उसको तकदीरकी साथ है!' असे म्हणुन त्याच्या नशीबाला आपण त्याचे 'क्रेडीट' देतो. 
थोडक्यात आपण आपल्या यायुष्यातल्या पराभवाला, कमी प्रगतीला, स्वप्नभंगाना 'लक' किंवा 'नशीब' जबाबदार धरतो. तर ई
तरांच्या विजयाला, प्रगतीला त्यांच्या 'अचीव्हमेन्टसना' पण त्यांच्या 'लक' किंवा नशीबाला जबाबदार धरतो.
तर असा हा न दिसणारा, कोणत्याही सायंटिफीक पद्धतीने ज्याचे आस्तित्व सिद्ध होऊ शकत नाही, पण ज्याची आपल्याला पावलोपावली जाणीव होत असते असा हा 'लक फॅक्टर'!
पण 'लक'(Luck) म्हणजे नक्की काय? त्याची नक्की अशी कांही डेफीनेशन आहे कां? कीस चीज का नाम 'लक' है? असे अनेक प्रश्न माझ्या मनांत गेली अनेक वर्षे निर्माण होत होते. हा बहुतकरुन मनाचा खेळ आहे असे मी समजत होतो. शेवटी सगळे कांही नशीबावर अवलंबुन असते असा एक घातक वाकप्रचार आपल्याकडे शिकवला जातो. आपण बरेच जण याचे शिकार होऊन अनेक गोष्टी नशिबावर सोडुन देण्याची घातक सवय लाऊन घेतो. 'असेल हरी तर देईल खाटल्यावरी' या प्रकारची मनोवृत्ती तयार करुन प्रयत्नवाद सोडून देतो किंवा मर्यादीत प्रयत्नांवर भिस्त ठेवतो. मी सुद्धा थोडाफार याच कॅटेगरीतला आहे.
पण अचानक मला 'Luck' या शब्दाची व्याख्या मिळाली. ती खालील प्रमाणे.
L – Labor
U- Under
C-Correct
K- Knowledge
Labor under correct knowledge means LUCK!
अचूक ज्ञानाच्या जोरावर केलेले कष्ट किंवा मेहेनत म्हणजे नशीब.
या ठिकाणी अचूक ज्ञानाबरोबरच कष्ट किंवा मेहेनत पण महत्वाची! नुसतेच कष्ट किंवा मेहेनतिचा उपयोग नसतो तर नुसतेच अचून ज्ञान उपयोगाचे नसते. तर नशीब घडवण्यासाठी या दोन्हिंचेही उत्तम कॉम्बीनेशन करावे लागते. ज्यांना हे जमते ते भराभर पुढे जातात व नशीबवान ठरतात. ज्यांना हे जमत नाही ते मागे रहातात व कमनशिबी ठरतात.
ही नवीन दृष्टी घेऊन मी अनेक यशस्वी व्यक्तींचा अभ्यास केला. दिवसाला बारा बार तास, चौदा-चौदा तास कष्ट करणे त्यांच्या अंगवळणी पडले होते. पण त्याच बरोबर आपण ज्या क्षेत्रांत काम करीत आहोत त्या क्षेत्राचे ज्ञान अद्ययावत किंवा अप टु डेट ठेवण्यासाठीपण ते प्रचंड मेहेनत घेत असतात. त्यासाठी ते खुबिने ईतरांचा उपयोग करुन घेत असतात. वेळ प्रसंगी तज्ञांचा सल्ला घेण्यामधे त्यांना कमीपणा वाटत नाही. शाळा कॉलेजमधील शिक्षणापेक्षा किंवा डिग्रयांच्या सर्टिफिकेटपेक्षा अनुभवातुन मिळणार्याज ज्ञानावर त्यांचा भर असतो. म्हणुनच इंजिनीयरींगचे कोणत्याही प्रकारचे क्वालिफिकेशन नसताना ईयता चौथीपर्यंत शिकलेला थॉमस अल्वा एडीसन किंवा अमेरीकेतील बारावी पर्यंत शिकलेला स्टीव्ह जॉब्ज जागातील सर्वात हुषार इंजिनीयर्स समजले जातात, ते केवळ 'Lucky' किंवा नशीबवान होते म्हणुन नव्हे!
तुम्हाला 'Lucky' व्हायचे आहे कां 'Unlucky' रहायचे आहे हे तुमचे तुम्हीच ठरवायचे आहे.....














Monday, August 27, 2012

संशोधन

१८व्या शतकात दक्षिणेतील तंजावर येथील सत्ताधीश सर्फोजी राजे भोसले (दुसरे) डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करत होते, अशी माहिती नुकतीच उजेडात आली आहे. त्यामुळे भारतही याक्षेत्रात त्याकाळी मागे नव्हता, ही बाब अधोरेखित होत आहे. त्यांनी तंजावरवर १७९८ ते १८३२ या काळात राज्य केले आणि ते एक उत्तम नेत्ररोगतज्ज्ञ होते. त्यांनी अनेक प्रजाजनांच्या डोळ्यांच्या तक्रारींवर औषधपाणी तर केलेच पण अनेक नेत्र शस्त्रक्रियाही केल्याचे पुरावे आता मिळाले आहेत. 

चेन्नईतील शंकर नेत्रालयातील तज्ज्ञ, तामिळनाडूच्या पुरातत्व खात्याचे माजी संचालक आणि कांचीपुरम विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. आर. नागस्वामी यांनी काही ऐतिहासिक दस्तावेज सर्फोजी राजांचे सध्याचे वंशज एस. बाबाजी राजा भोसले यांच्याकडून हस्तगत केले. त्यात सर्फोजी राजे यांनी केलेल्या नेत्र शस्त्रक्रियांची शास्त्रीय वर्णने आणि नोंदी आहेत. या हस्तलिखितांवर आधारीत शोधनिबंध 
त्यांनी इंडियन जर्नल ऑफ ऑप्थॅल्मोलॉजी या शास्त्रीय नियतकालिकात नुकताच प्रसिद्ध केला.

या नोंदीच्या आधारे अशी माहिती पुढे आली आहे की सर्फोजी राजे धन्वंतरी महाल नावाने नेत्र रुग्णालय चालवत असत. आज ज्या ठिकाणी सेंट पीटर्स चर्च आहे त्या जागेवर पूर्वी हे रुग्णालय होते. राजांना आपल्या कामात डॉ. मॅकबीन नावाचे इंग्लिश नेत्रतज्ज्ञ मदत करत असत. राजांनी उपचार केलेल्या रुग्णांविषयीच्या नोंदी मोडी लिपीत तसेच इंग्रजी भाषेतही उपलब्ध आहेत. या विषयावरील माहिती आम्ही या वर्षी दुबई येथे भरलेल्या वर्ल्ड ऑप्थॅल्मोलॉजी कॉन्फरन्समध्ये मांडली. आजवर आधुनिक नेत्र शस्त्रक्रियांचे श्रेय युरोपीय शास्त्रज्ञांना दिले जात असे. पण ही बाब खरोखरच आश्चर्यकारक आहे की त्याच काळात भारतातील लोकही या क्षेत्रात तितकेच महत्त्वाचे कार्य करत होते, असे मत शंकर नेत्रालयाचे तज्ज्ञ डॉ. ज्योतिर्मय विश्वास यांनी व्य्कत केले. डॉ. जॅक्स डॅव्हिएल या फ्रेंच नेत्रविशारदाने मोतीबिंदूवरील प्रभावी शस्त्रक्रियेची माहिती सर्वप्रथम १७५२ मध्ये फ्रेंच अ‍ॅकॅडेमी ऑफ डर्जरीला सादर केली.

साधारण त्याच काळात सर्फोजी राजांच्या नोंदीत कॉर्निया, लेन्स, कंजक्टिव्हा आदि शास्त्रीय परिभाषेतील संज्ञा वापरलेल्या आढळतात. सर्फोजी राजे यांनी त्या काळी ५ ते ६० वर्षे वयोगटातील ४४ रुग्णांवर केलेल्या इलाजांची माहिती ५० हस्तलिखितांमध्ये सापडली आहे. त्यात सुईच्या साह्याने मोतीबिंदू काढणे, तसेच आज ज्याला ल्युकोमा आणि अ‍ॅमॉरॉसिस म्हणतात त्या व्याधींवरही उपचार केल्याच्या नोंदी आहेत. त्यात ९ सप्टेंबर १८२७ रोजी एका ४५ वर्षांच्या रुग्णावर केलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या आणि १५ ऑगस्ट १८२७ रोजी एका १५ वर्षे वयाच्या मुलीच्या जंतुसंसर्ग झालेल्या डोळ्यांवर केलेल्या शस्त्रक्रियेचे उल्लेख आहेत.

या उपचारांत निळी गोळी, जळू, एरंडाचे तेल, रेवाचिनी (रूबार्ब) चूर्ण अशा भारतीय औषधींबरोबरच खडूचे चूर्ण, पेपरमिंटचा द्राव, सिल्व्हर नायट्रेट यांसारख्या युरोपीय द्रव्यांचाही वापर केल्याच्या नोंदी आहेत. निळी गोळी नावाने उल्लेख असलेल्या देशी पदार्थाचे नेमके स्वरूप आता माहित नसले तरी जंतुसंसर्ग कमी करण्यासाठी आणि वेदनाशामक म्हणून त्याचा व्यापक आणि प्रभावी वापर होत असल्याचे दिसून आले आहे. डोळ्यांची सूज उतरवण्यासाठी आणि शस्त्रक्रियेनंतर वेदना शमवण्यासाठी जळूंचा वापर केला जात असे. बरे होऊन घरी परतताना रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी संमती दिल्याबद्दल आणि प्रकृतीत सुधारणा झाल्याबद्दल इनाम म्हणून २ रुपये दिले जात, अशाही नोंदी सापडल्या आहेत.

Wednesday, May 18, 2011

आयुर्वेद संशोधन

मतिमंद मुलांसाठी शंखपुष्पीचा वापर लाभदायक
मुंबई - मतिमंद मुलांमधील दोष निवारण करण्यासाठी केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेकडून हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पामध्ये शंखपुष्पी ही अत्यंत महत्त्वाचे योगदान देऊ शकते, असा निष्कर्ष पुढे आला आहे. महाराष्ट्रातील 100 मतिमंद मुलांची निवड या संशोधन कार्यासाठी झाली असून, त्यांच्यावर करण्यात आलेल्या उपचारपद्धतीमध्ये शंखपुष्पीचा वापर हा लाभदायक ठरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. मागील तीन वर्षांपासून चालू असणारा हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात असून, वैद्यकीय क्षेत्रामधील आयुर्वेदाचे महत्त्व त्यामुळे अधोरेखित होणार असल्याचा विश्‍वास संशोधन संस्थेकडून व्यक्त केला जात आहे.

मतिमंद मुले ही इतर सामान्य मुलांपेक्षा वेगळी असतात. त्यांचा बौद्धिक विकास हा उशिरा होतो; तसेच काही मुलांमध्ये शारीरिक वाढीमध्येही मर्यादा आढळून येतात. या मुलांमध्ये हे व्यंग नेमक्‍या कोणत्या कारणांमुळे निर्माण होते, त्यात आनुवांशिकता, रक्तगट, जीवनशैली, तणाव यासारख्या गोष्टींप्रमाणे अन्य कोणत्या बाबी कारणीभूत असतात यांचाही विचार करणे गरजेचे असते. या मुलांमधील न्यून पूर्णपणे संपुष्टात आले नाही तरीही त्यांचे परावलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीने काय करता येईल यासाठी विशेषत्वाने विचार करण्याची गरज या प्रकल्पामध्ये करण्यात आल्याचे डॉ. कुणाल पाटील सांगतात. याच विचाराचा पुढचा टप्पा म्हणून आयुर्वेदिक औषधांबाबतही विविध प्रयोग करण्यात आले. त्यातून शंखपुष्पीचा एका विशिष्ट प्रमाणात या मुलांमध्ये केलेला वापर हा सकारात्मक परिणाम देतो, असे संशोधनांती सिद्ध झाले. यासाठी निवड करण्यात आलेल्या या मुलांचा वयोगट चार वर्षांपेक्षा कमी असावा, जन्मानंतर आवश्‍यक त्या सर्व प्रकारचे लसीकरण करण्यात आलेले असावे, डोक्‍याला अथवा मेंदूला कोणत्याही प्रकारची दुखापत यापूर्वी झालेली नाही हेदेखील यात कटाक्षाने पाहण्यात आले आहे. तसेच या मुलांच्या आई-वडिलांमध्ये रक्तदाब, मधुमेहासारखा कोणताही आनुवंशिक आजार नसणे हा मुद्दाही या संशोधनातील निवडीच्या वेळी महत्त्वाचा मानला गेला आहे.

डॉ. वैशाली इंगले -घोलप 
लन्दन 
dr.vaishali.ingle@gmail.com

आंबे

आंबे खा जपून...
पिवळ्याधम्मक आंब्याच्या प्रेमात पडला नाही, असा माणूस मिळणे विरळच. मे महिना आणि आंबा हे दोन्ही हातात हात घालून येतात. आंब्याची चव जिभेवर रेंगाळत
राहते आणि बस एक और... चा नारा बुलंद होतो. यात लहानांसोबत मोठ्यांचाही सहभाग असतो.

फळांच्या या राजाचे आहारात भरपूर उपयोगही आहेत. अ आणि क जीवनसत्वांचा मोठा सोत असलेला आंबा त्वचेवरील सुरकुत्या कमी करून ती तरूण ठेवतो. त्यात बी कॉम्प्लेक्स असल्याने त्वचा तजेलदार करतो. कैरीमध्ये अॅण्टि ऑक्सिडन्ट वैशिष्ट्ये असतात. त्यामुळे अमृतचवीचा आंबा खाण्यात भरपूर फायदेही आहेत. अर्थात पदार्थ कितीही चांगला असला तरी अति तेथे माती होते.

आंब्यामध्ये भरपूर काबोर्हायड्रेट््स आणि कॅलरीज असतात. त्यामुळे पटकन वजनही वाढते. त्यामुळे वजनाबाबत कॉन्शस असलेल्या व्यक्तींनी फार आंबे खाऊ नयेत. आंब्यात शर्करेचे प्रमाण जास्त असल्याने मधुमेहींनीही त्यापासून चार हात दूर राहिलेलेच चांगले. आंबा उष्ण असतो आणि त्यातच मे महिन्यामधील तापमानवाढ या दोहोंचा एकत्रित परिणाम शरीरावर होऊ शकतो. त्यामुळे उष्णतेचा पटकन त्रास होत असेल तर जपून आंबे खा. खूप आंबे खाल्ले की पोटही बिघडते.

आंब्याचा दिसून येणारा परिणाम म्हणजे शरीरावर येणारे उष्णतेचे फोड. आंब्यांमुळे शरीरात वाढलेली उष्णता या फोडांच्या स्वरुपात दिसते. या फोडांना गंमतीत आंबे फुटले का, असेही म्हटले जाते. लहान मुलांमध्ये हा प्रकार अनेकदा होतो. या फोडांना खाजही सुटते. याचा सरळ उपाय म्हणजे आंबे कमी करणे असा असला तरी केवळ मोसमात मिळणाऱ्या या फळांच्या राजाचा मोह सुटत नसतो, हेदेखील खरे. लहान मुलांच्या बाबतीत आंब्याची अॅलजीर् लक्षात येत नसल्याने तीन-चार वर्षांच्या लहानग्यांना भरपूर आंबे देऊ नका. एखाद्या वषीर् अनुभव आल्यानंतरच आंब्याचे प्रमाण ठरवा. आंबे द्यायचेच असले तर ते फ्रीजमध्ये गार करून द्यावेत. त्यामुळे त्यातील उष्णतेचा गुण जाणार नसला तरी थोडा कमी होतो. याशिवाय रोज एकापेक्षा अधिक आंबा खायला देऊ नका. एवढे करूनही फोड आलेच तर त्यावर गरम टॉवेल लावा. त्यामुळे ते लवकर बरे होऊ शकतील.

काही वेळा आंब्याच्या सालीमधील चिक लागून ओठाशेजारचा भाग तसेच गालावर रॅशेस येतात. हा प्रकार दुमिर्ळ असला तरी त्याबाबतही काळजी घेतली पाहिजे. आंबा नीट धुवावा. सालासकट आंंबा चोखून खाणे टाळावे. तसेच रॅशेस आले तर त्यावर मध लावावा. खूपच अॅलजीर् होत असेल तर आंबे टाळणे चांगले. अर्थात ज्यांना अशी अॅलर्जी असेल त्यांच्यासाठीच हे सारे आहे. इतरांनी आंब्याचा आनंद लुटायला हरकत नाही.



http://www.facebook.com/drjiteshpathak

वैद्य . जितेश पाठक
धुले 
  • 8275007220
  • 9960507983

निद्रा भव!

निद्रा भव!
झोपेतून मध्येच जाग आल्यावर झोपण्यासाठी बराच वेळ शिल्लक असल्याची जाणीव होणे यासारखा आनंद नाही . झोपण्यासारखे सुख नाही आणि उत्त
म आरोग्यासाठी शांत झोप हा महत्त्वाचा घटक आहे .

झोप आवश्यक का आहे ?
दिवसभर पूर्ण क्षमतेने काम करण्यासाठी रात्रीची झोप खूप गरजेची आहे . पण आपले आयुष्य अधिक धावपळीचे झाल्यावर झोपेकडे कमी लक्ष दिले जाते . उत्तम आरोग्यासाठी चांगला आहार आणि व्यायामासोबतच पुरेशी झोपही झाली पाहिजे .

किती तास झोपायचे ?
वय वाढत जाते तसे झोपेचे तास कमी होत जातात . अगदी तान्हे मूल १८ ते २० तास झोपते . थोडे मोठे झाल्यावर झोपेची वेळ कमी होते आठ ते दहा तासांवर स्थिरावले . मोठ्यांना दिवसभरात सहा ते आठ तास झोप लागते .

झोपेवर परिणाम करणारे घटक
दररोजच्या आयुष्यातील अनेक घटक झोपवर परिणाम करत असतात . सगळ्यात महत्त्वाचा ठरतो तो तणाव . काम , दैनंदिन आयुष्यातील प्रश्न यामुळे मनावर आलेल्या दडपणामुळे शांत झोप लागत नाही . याशिवाय बेडरुममधील जास्त प्रकाश , आवाज , उच्च तापमान , जेवणापूर्वी घेतलेले खूप आणि जड जेवण , झोपेपूर्वी दोन तासात केलेला थकवणारा व्यायाम आणि जेवणापूर्वी चार तासांदरम्यान घेतलेली कॉफी , चहा यामुळेही झोपेवर परिणाम होतो .

सध्या सुरू असलेल्या तापमानवाढीचा झोपेवर परिणाम होतो ?
जास्त गरम होत असल्याचा झोपेवर निश्चितच परिणाम होतो . जास्त आर्द्रता आणि त्यामुळे येत असलेल्या घामामुळे त्रास होतो .

झोपेसंबंधी समस्या ...

पुरेशी आणि शांत झोपेआड अनेक समस्या येतात .

१ . झोपेत घोरणे
२ . झोप न लागणे
३ . झोपेत बोलणे किंवा चालणे
४ . चित्रविचित्र स्वप्ने पडणे
५ . खूप जास्त वेळ झोप लागणे .

अपुरी किंवा जास्त झोप यांचा शरीरावर आणि मनावर प्रभाव पडतो ?
झोप कमी झाली की स्वभाव कार्यक्षमता घसरते . अपुरी झोप घेत असलेल्या व्यक्तींमध्ये थकवा , चिडचिड , उच्च रक्तदाब , विसरभोळेपणा , विचारांमध्ये संभ्रम असल्याचे दिसून आले आहे . घोरण्यामुळे झोप अपुरी राहत असेल तर त्याचा संबंध स्मृतिभ्रंश , हृदयविकार , आकडी किंवा मधुमेहाशी जोडता येऊ शकतो .

झोप कशी सुधारावी ?
झोपेशी सुसंगत असलेली जीवनशैली पाळा .
दैनंदिन धावपळीत झोपेसाठी पुरेसा वेळ द्या .
बेडरुममधील प्रकाश कमी करा . आवाज , तापमान यावर नियंत्रण ठेवता आल्यास उत्तम .
झोपेपूर्वी जड आहार टाळा . हलका आहार घेतल्यास हरकत नाही . पचायला जड असलेल्या पदार्थांमुळे पचनसंस्था कार्यरत राहते आणि त्यामुळे झोपेत अडथळे येतात .
झोपायला जाण्याआधी दोन तासांदरम्यान दमछाक करणारा व्यायाम टाळा . त्यामुळे शरीराचे तापमान वाढते आणि झोप येण्यास अडथळा येतो .
झोपेपूर्वी चार तासांदरम्यान चहा , कॉफी यांच्यासारखे उत्तेजक पेय टाळा







http://www.facebook.com/drjiteshpathak

वैद्य . जितेश पाठक 
धुले ..

  • 8275007220
  • 9960507983


मुलाखत

मानसिक आरोग्य तज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांची गिरीश कुबरे यांनी घेतलेली मुलाखत...

प्रश्न : मानसिक दृष्ट्या एखादी व्यक्ती निरोगी अथवा रोगी आहे, हे कसे ठरवावे?
उत्तर : एखादी व्यक्ती मानसिक दृष्ट्या निरोगी अथवा रोगी आहे, हे ठरविणे तारेवरची कसरत आहे. त्यासाठी काही पॅरामीटर्स आहेत. मला पूर्वी पेक्षा किती ताण जाणवतो किंवा मला मिळणारी झोप पुरेशी आहे काय याचा विचार करावा. माझा स्वभाव पूर्वीपेक्षा भित्रा झाला आहे काय, किती वेळा भिती वाटते. दैनंदिन कार्यातून समाधान मिळते काय. ही पॅरामीटर्स आहेत. व्यक्तीने त्याबाबत स्वत:च विचार करुन उपचार घ्यावा किंवा तिसर्‍या व्यक्तीशी चर्चा करुन उपचार घ्यावा.

प्रश्न : मनाची ताकद वाढविण्यासाठी काय करावे?
उत्तर : वास्तविक भारतीय संस्कृतीने मनाच्या सुदृढतेसाठी मोठे योगदान दिले आहे. संत वाडमय, अभंगातून मनाची शक्ती, एकाग्रता वाढविण्याबाबत सांगितले आहे. मन आणि शरीर एकच आहे. ते अव्दैत आहे. मन प्रसन्न ठेवले तर शरीरही निरोगी राहिल. विचार पध्दतीत बदल करणे, जास्तीत जास्त हसल्याने मन सुदृढ होते. चिंता करु नये, रागावर नियंत्रण ठेवावे, मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त कराव्यात, कसलीही भिती बाळगू नये, या गोष्टी केल्यास मनाची ताकद वाढेल.

प्रश्न : शहरातील व्यक्तींप्रमाणे खेड्यातील व्यक्ती देखील मानसिक विकाराने त्रस्त असल्याचे जाणवते, याबाबत काय सांगाल?
उत्तर : मानसिक आरोग्य हे भावनांवर अवलंबून आहे आणि भावना एखाद्या संसर्गजन्य रोगाप्रमाणे असते. सभोवताली आनंदी किंवा दु:खी व्यक्ती असेल तर त्या पध्दतीने वातावरण तयार होते. नेहमीच जर मन खच्चीकरण करणारे विचार देणार्‍या व्यक्तीबरोबर राहिल्यास सभोवतालच्या व्यक्तीची मानसिकता देखील तशीच होते. त्यातून मनोविकार जडतो. त्यामुळे शहराप्रमाणे खेड्यातही मानसिक रुग्ण आढळू शकतात.

प्रश्न : मानसिक दृष्ट्या सुदृढ राहण्यासाठी काय करावे?
उत्तर : माणसाने प्रचंड प्रगती केली आहे, मात्र मनाचे प्रश्न आपण सोडविले नाहीत. हा बेसिक प्रश्न आहे. मानसिक सुदृढतेसाठी सदैव आनंदी राहावी. विनाकारण कसल्याही गोष्टीची चिंता करुन नये. स्वत:शी संवाद साधावा. भावनांवर नियंत्रण ठेवावे.

Friday, March 25, 2011

ग्रहांचे स्वभावगुण दर्शन



सर्व ग्रहांचे आपल्या स्वभावावर कशा प्रकारचे परिणाम होतात याची माहिती घेऊ.
रवी :
नीतीमान, करारीपणा, तत्वज्ञानी, स्पष्टवक्तेपणा,परखडपणा, अधिकारी वृत्ती, नेतृत्वगुण,कर्तुत्व, शासक, न्यायी, निर्भीडपणा, सत्यवादी, विश्वासू, उत्साह, खिलाडू वृत्ती,परोपकारीपणा, मानसन्मान,
बिघडला असता दिमाख, दिखाऊ वृत्ती, अहंकारी,गर्विष्ठपणा, हेकटपणा, अरेरावी. अट्टाहास,कर्मठपणा      
चंद्र :       
कोमलता, शीतलता, वात्सल्य,प्रेम,माया,ममता,सात्विकता,निरागसपणा,कुटुंब प्रेमी, जीवना विषयी आसक्ती, स्वप्नाळू शांतताप्रेमी, आशावादी, भावनाशील,वाचेतील गोडवा,लोकप्रियता, मातृभक्त, बदलाची आवड असते,गतिमान जीवन
बिघडला असता अति चंचलता, धरसोडपणा, हळवेपणा, भावनाप्रधानता, अति संवेदनाशील, केव्हाही मूड बदलणारा, भावनातिरेक,हिस्टेरिक,झटकन निराश होणारा,   
मंगळ:
धाडसी,साहसी,पराक्रमी, महात्वाकांशी,सामर्थ्यवान,अधिकारी वृत्ती,प्रभुत्व गाजविणे,लढवय्या,अन्य्याय सहन न करणारा,  सत्तत संघर्ष करणारा, कठोर मेहनती,
बिघडला असता तापट. आततायी, अतिरेकी, एक घाव दोन तुकडे करण्याची वृत्ती, दूरदृष्टीचा अभाव, अविचारी, क्रूरपणा, नमते न घेणारा, जुलुमी वृत्ती, तामसी, भोगी,उतावळेपणा दुराग्रही.
बुध:
चांगली आकलन शक्ती, ग्रहण शक्ती, चिकित्सक वृत्ती, तार्किक वृत्ती, उत्कृष्ट वक्तृत्व, वादविवादपटू, विनोदी खेळकर स्वभाव, थोडासा वात्रटपणा, समयसूचकता., वाचन लेखनाची आवड,
बिघडला असता धरसोड वृत्ती, बालिशपणा, अति बडबडी वृत्ती, एकाच वेळी अनेक विषयात रस, एक ना धड भाराभार चिंध्या, स्वताचे ठोस मत नसणारा, बिनबुडाचा लोटा.
गुरु:
संयमी,भारदस्त,शांत,धार्मिक,सात्विक,रुढी प्रिय, सभ्य, सुसंस्कृत,सौजन्यपूर्ण, श्रेष्ठ विचार असणारा, परिपक्व वृत्ती, आस्तिक, परोपकारी, न्याय्यी वृत्ती, अध्ययन अध्यापनाची आवड असणारा, सल्लामसलत करणारा, वृद्धीकारक, प्रसरणक्षमता असलेला.
बिघडला असता मोठेपणाचा हव्यास असणारा, अव्यवहारी, कोणतेही बंधन न मानणारा, क्षमतेबाहेर जाऊन कार्य करणारा, चांगुलपणाचा अतिरेक करणारा.
शुक्र:
रसिक, सौंदर्य दृष्टी, कलासक्त, प्रणयी हलकी फुलकी वृत्ती, छानछोकीची आवड असणारा, नीटनेटकी राहणी, लडिवाळपणा, तारुण्य सुलभ अवखळपणा, भिन्न लिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण, जगा आणि जगू द्या वृत्ती. 
बिघडला असता व्यसनी, विलासी वृत्ती, चैनी स्वभाव, केवळ स्वताच्या सुखाचा विचार करणारी, उधळपट्टी करण्याची वृत्ती, स्वैर वृत्ती.
शनी:
विचार पूर्वक संथ गतीने काम करणारा, धोरणी,मुत्सद्दी,शांत, चिकाटी वृत्ती, चिवटपणा, सहनशील,मितव्ययी, अंथरूण पाहून पाय पसरणारा, चिंतन प्रिय, पारमार्थिक उन्नतीकडे कल असणारा, गुढ शास्त्राची आवड असणारा.
बिघडला असता नैराश्यवादी, वैरागी वृत्ती, काहीशी रुक्ष वृत्ती, नकारात्मक बाजूचा अधिक विचार करणारा, अतिमंद काम करणारा, थंड वृत्तीचा, प्रतिसाद न देणारा,
राहू:
हा ग्रह नाही तर छाया बिंदू आहे. सर्पाचे तोंड किवा शरीराचा कमरेवरील भाग आहे. या ग्रहाकडे चांगले गुण नाहीत. क्षुद्र विचार, लबाडीची वृत्ती,फसवाफसवी,संशयी वृत्ती, व्यभिचारी, चौर्य कर्म करणारा,असत्य बोलणारा, कारस्थानी वृत्ती,  संभ्रमात टाकणारा, ज्या स्थानात असेल त्या स्थानाचे फळ बिघडविणारा, गारुडी विद्येची आवड असणारा, अघोरी शक्तीचा कारक, मातंग वृतीचा, उलथापालथ करणारा, विजोड, विषम गोष्टींचा कारक., शापित वृत्तीचा.
केतू :
हा ग्रह नाही तर छाया बिंदू आहे. सर्पाची शेपटी किवा शरीराचा कमरेखालील भाग आहे.संन्यस्त वृत्ती, पारलौकीक जीवनाचा कारक,अध्यात्मिक वृत्ती, पूर्व जन्मातील अतृप्त वासनाचा कारक, कुंडलिनी शक्तीचा कारक. पत्रिकेत ज्या स्थानात असेल त्या स्थानाने दर्शविलेल्या गोष्टी संबंधी अतृप्त वासना दर्शवितो.
हर्शल, नेपच्यून आणि प्लुटो
ग्रह मालेतील हे अर्वाचीन ग्रह आहेत. पारंपारिक ज्योतिषात या ग्रहांना नक्षत्र दिलेले नाही त्यामुळे कालगणनेसाठी वापरल्या जाणाऱ्या दशा  पद्धतीत या ग्रहांना स्थान नाही.गोचर भ्रमणा वरून या ग्रहांच्या फळाचा विचार करावा लागतो. हे ग्रह अतिमंद गती आहेत त्यामुळे सर्व साधारण सामान्य जीवन जगणाऱ्या माणसाच्या आयष्यात या ग्रहांचा विशेष प्रभाव दिसत नाही. दुसऱ्या ग्रहाबरोबर शुभ अथवा अशुभ योग करत असतील तर त्यांचे परिणाम विशेषत्वाने जाणवतात. या ग्रहांचा प्रभाव सामाजिक, धार्मिक, राजकीय,जागतिक, वैज्ञानिक जीवनाशी अधिक संबंधित आहे. असे असले तरी त्या ग्रहांचे मनुष्य स्वभावावर होणारे परिणाम पुढे दिले आहेत. 
हर्शल:
हा ग्रह म्हणजे मंगळ आणि बुध या ग्रहांची अधिक शक्तिशाली आवृत्ती आहे. कुशाग्र बुद्धिमता,संशोधक वृत्ती,शास्त्रज्ञ, गुढ शास्त्राची आवड, सुधारणावादी, परिवर्तनवादी,पुरोगामी विचारशैली, 
बिघडला असता पराकोटीचा नास्तिक, क्रूर,उग्र स्वभाव, तिरसट,एककल्ली, रुढीबाह्य वर्तन, विक्षिप्त.लहरी स्वभाव, ध्यानीमनी नसता आकस्मिक बदल घडविणारा. कृष्णमूर्ती पद्धती प्रमाणे ज्या स्थानाचा उपनक्षत्रस्वामी या ग्रहाशी संबंधित असेल त्या स्थाना संबंधी विचित्र फळ दर्शवितो.
नेपच्यून:
हा ग्रह म्हणजे चंद्र,गुरु आणि शुक्र या ग्रहांची अधिक प्रभावशाली वृत्ती आहे.शांत, गुढ,अति संवेदनाशील स्वभाव, तत्वज्ञानी,आध्यात्मिक,कवी वृत्तीचा,स्वप्नाळू, चांगली अंतः स्फूर्ती,वैचारिक प्रगल्भता. अनामिक संकेत देणारा, तंतू वाद्याची आवड असणारा,
बिघडला असता अतिगूढ,अंतरमनाचा ठावठिकाणा न लागणारा, हळवा, अति स्वप्नाळू, एखादी गोष्ट गृहीत धरून चालणारा, गैरसमजातून घोटाळे निर्माण करणारा.
प्लुटो:
हा ग्रह अतिमंद गती आहे. या ग्रहाचा शोध लागल्यापासून राशि चक्राचा एक फेरा अजून पूर्ण झालेला नाही. त्यामुळे या ग्रहाच्या गोचर भ्रमणाविषयी अजून पुरसे संशोधन झालेले नाही. या ग्रहाचा संबंध अतिसूक्ष्म मानसिक जाणिवेशी आहे,हा ग्रह अद्वैत तत्व ज्ञान दर्शविणारा आहे, सामाजिक क्रांती,लढाया,निरनिराळी संक्रमणे या ग्रहाखाली येतात, कोणत्याही गोष्टीचा पूर्ण विध्वंस करून नवनिर्निती करणे हा या ग्रहाचा गुणधर्म आहे. पत्रिकेतील अष्टम स्थान म्हणजे मृत्यू स्थानाचा कारक आहे. पत्रिकेत जय स्थानात असेल त्या स्थानासंबंधी एखादे अशुभ फळ देतो.
जेव्हा एखाद्या ग्रहाला स्थानबल,राशिबळ चांगले असेल, जर तो लग्नेश ग्रहाचा मित्र असेल आणि त्याच्याशी शुभयोग  करत असेल तर त्या ग्रहाचे जातकाच्या स्वभावावर शुभ परिणाम झालेले दिसतील. या उलट जेव्हा एखाद्या ग्रहाला स्थानबल,राशिबळ चांगले नसेल, जर तो लग्नेश ग्रहाचा शत्रू असेल आणि त्या ग्रह बरोबर अशुभ योग करत असेल तर त्या ग्रहाचे जातकाच्या स्वभावावर अशुभ परिणाम झालेले दिसतील.
रामराम.                                   
.                       

Sunday, January 2, 2011

ओरल पर्ल्स

सर्वागीण आरोग्याच्या विचारात दंत आणि मुखारोग्यही महत्त्वाचं ठरतं. मासिक पाळी, गर्भावस्था, रजोनिवृत्ती या अवस्थांमध्ये स्त्रियांच्या शरीरातील बदलणा-या हार्मोन्स लेव्हल्समुळे दात आणि हिरडय़ांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. दातांची हानी फक्त चेह-याच्या सौंदर्यावरच नव्हे तर शरीरावरही विपरीत परिणाम करते.

कुटुंब आणि समाजाच्याही आरोग्याची गुरुकिल्ली स्त्रीकडेच असते. पण ब-याचदा स्त्री स्वत:च आपल्या आरोग्याबद्दल सजग नसल्याचं दिसून येतं. सर्वागीण आरोग्याच्या विचारात दंत आणि मुखारोग्यही महत्त्वाचं ठरतं. कारण शरीराचं द्वार असणारं ‘मुख’ बळकट नसेल तर प्रकृतीही निरोगी असू शकत नाही. दातांची हानी फक्त चेह-याच्या सौंदर्यावरच नव्हे, तर शरीरावरही विपरीत परिणाम करते.
मासिक पाळी, गर्भावस्था, रजोनिवृत्ती या अवस्थांमध्ये स्त्रियांच्या शरीरातील बदलणाऱ्या हार्मोन्स लेव्हल्समुळे दात आणि हिरडय़ांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. वयात येणा-या मुलींमध्ये हिरडय़ांच्या विकारांचं प्रमाण अधिक दिसतं. मुखदुर्गंधी, तोंडात आणि गालाच्या आतील त्वचेवर फोड येणं (अल्सर), हिरडय़ांतून रक्त येणं इत्यादी समस्या उद्भवतात. याकडे दुर्लक्ष न करता वेळीच योग्य उपचार करून घेणं गरजेचं ठरतं.
गर्भावस्थेत हार्मोनल लेव्हलच्या चढ-उतारामुळे स्त्रीच्या शारीरिक आणि मानसिकतेवर परिणाम दिसून येतो. या अवस्थेत हिरडय़ा संवेदनशील, नाजूक बनतात. अशा स्थितीत जर दाताभोवती किटण जमलेलं असेल, तर हिरडय़ांना इजा होऊन त्यांचा दाह होतो. कालांतराने त्यातून रक्त, पू येऊन दात हलायला लागतो. हिरडय़ांच्या विकारासोबतच जर एखादा दात किडला असेल तर ही कीड दाताच्या मुळाशी पोहोचून आतल्या पल्पला इजा पोहोचवते. परिणामी दाताच्या मुळाशी सूज येऊन असहय़ वेदना होतात.

सर्वसामान्यपणे दंतविकारात आढळून येणारी लक्षणं गर्भावस्थेत प्रकर्षाने जाणवतात आणि भयंकर त्रासदायक ठरतात. शिवाय उपचाराच्या वेळी भीतीने चक्कर येणं, दम लागणं, धडधडणं, रक्तदाब वाढणं अशी लक्षणं संबंधित स्त्रीच्या गर्भावस्थेत अडचणीची आणि त्रासदायक ठरतात. उपचाराच्या वेळी वापरण्यात येणारी औषधं आणि बधिरीकरणासाठी लागणारी द्रव्याऔषधे स्त्रीच्या उदरात वाढणा-या बाळाच्या आरोग्यासाठी अयोग्य ठरतात. म्हणूनच गर्भ राहण्यापूर्वीच स्त्रीने आपलं आरोग्य निरोगी ठेवणं आवश्यक आहे.
इतर चाचण्यांसोबतच दंतवैद्याकडे जाऊन आपले दात व मुख नीट तपासून घेऊन शक्य असेल, तर उपचार करून घ्यावेत. गर्भावस्थेतील अडचणी लक्षात घेता पहिले तीन महिने आणि शेवटचे तीन महिने तसे सुरक्षित असले तरी या दिवसांत शस्त्रक्रिया, किचकट उपचार, एक्स-रे आणि विविध औषधी यांचा मारा टाळावा. आई होताना वाढलेली जबाबदारी पेलताना स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणं साहजिक असतं. या काळात मुखारोग्य नीट न जोपासलं गेल्यास दंतक्षय, दातांची कीड या विकाराचं प्रमाण बळावतं. शिवाय दंत स्वच्छतेमध्येही अनियमितता आल्यास हिरडय़ांच्या विकारांचं प्रमाणही वाढतं. परिणामी पायोरियासारखा रोग होऊन दात गमवावे लागतात. त्यामुळेच वेळीच संबंधित उपचार करून घ्यावेत. गर्भातील अर्भक सुदृढ राहण्यासाठी गर्भवती स्त्रीने स्वत:च्या आरोग्याबद्दल जागरूक असणं महत्त्वाचं असतं. फॅशनच्या नावाखाली स्त्रियांमध्येही आजकाल व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढत आहे. मद्यपान, धूम्रपान, गुटखा, तंबाखूचं सेवन स्त्रीच्या आरोग्यासाठीही घातक ठरतं. त्यामुळे मुख कर्क रोगासारख्या जीवघेण्या आजारालासुद्धा आमंत्रण मिळण्याची शक्यता असते. रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांनी आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. या काळात शरीराच्या इतर व्याधीसोबतच दातांशी निगडित समस्याही जोर धरतात. दात शिवशिवणं, हलणं, दातांची मुळं उघडी पडणं, अकाली दात काढल्यामुळे चर्वणांवर परिणाम होऊन संपूर्ण आरोग्य ढासळणं, दात, हिरडय़ा, जबडा आणि त्यांचा सांधा दुखणं, दात किडणं असे अनेक विकार जडतात. आधीच ढासळत चाललेल्या शारीरिक शक्ती आणि रजोनिवृत्तीच्या वेळेस होणाऱ्या शारीरिक बदलांमुळे दंतसमस्या जास्त त्रासदायक ठरतात. आज दंत-तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे चाळिशीनंतरही दात न काढता अनेक आधुनिक पर्यायांद्वारा उपचार करणं शक्य झालं आहे. या नवनवीन उपचार पद्धतींचा अवलंब करून दंत आरोग्यासोबतच संपूर्ण आरोग्यही अबाधित ठेवता येतं.

दिवसांतून दोन वेळा ब्रश करावा.
हिरडय़ांना नियमित मसाज करावा.
काहीही खाल्ल्यास लगेच चूळ भरावी म्हणजे अन्नकण अडकून हिरडय़ांचे विकार व दंतक्षय होणार नाही.
आहारात रेषेयुक्त, भाज्या, फळं, कडधान्य इत्यादींचा समावेश करावा.
वर्षातून किमान दोनवेळा दंततज्ज्ञांकडून आपल्या दातांची तपासणी करून घ्यावी.
गर्भावस्था राहण्यापूर्वीच आपले दंतारोग्य तपासून घ्यावं. रोग आढळल्यास लगेच उपचार करून घ्यावेत.
औषधांचा अयोग्य, निर्थक, अनावश्यक वापर टाळावा.
दंतारोग्यास घातक ठरणा-या सवयींपासून दूर राहावं.
आजकाल अनेक आधुनिक उपचार पद्धती सहज उपलब्ध आहेत. दात किडल्यावर सिमेंट, चांदी किंवा कम्पोझिट, सिरॅमिक फीलिंग यांसारखे दातांच्या सौंदर्यात भर घालणारे पर्याय उपलब्ध आहेत.
चेह-याचं सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी दात काढणं शक्यतो टाळावं. ‘रूट कॅनेल ट्रीटमेंट’ करून दात पुन्हा क्रियाशील ठेवता येतो.
दात अकाली काढल्यास, स्ट्रोक पडल्यास उपलब्ध विविध पर्याय निवडून वेळेत दात बसवून घ्यावेत.
स्वत:सोबत आपल्या कुटुंबाचं आरोग्य आपल्या हाती आहे, ही जाण स्वत: स्त्रीने ठेवायला हवी. स्वत:च्या आरोग्याकडे जागरूकतेने पाहून आपणच आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.


डॉ. संगीता अंभोरे




http://www.prahaar.in/mukta/4353.html



Thursday, December 23, 2010

गतस्मृतीतिल कविता (बहिणाबाई चौधरींची )

बहिणाबाई चौधरी ह्या  प्रसिध्द मराठी कवयत्री होत्या . बहिणाबाई चौधरी ह्यांचा जन्म सन १९८० साली जळगाव जिल्ह्यातील असोदा ह्या गावी लेवा पाटील परिवारात झाला होता .त्याचा मूळ कविता ह्या सर्व 'अहिराणी' भाषेत होत्या .मानवी जीवनाची त्याची समाज हि  फार गाढ होती . बहिणाबाई ह्या लग्नानंतर  विधवा झाल्या परंतु त्या न डगमगता आत्मनिर्भर व स्वतंत्र राहिल्या .त्यांच्या काव्य ह्या मराठी साहित्य साठी अमूल्य खजाना आहे.त्यांनी आपल्या वास्तविक दैनदिन जीवनातील प्रतिबिंबाच्या  त्यांनी मराठी लेवा भाषेतील ओवीन मध्ये सुरेख रचना केलेल्या आहे .ह्या  ओवी मध्ये अविश्वनीय रुपात मानवी जीवनाचे ज्ञान त्याची प्रकुती वनस्पती ,जीव ,हिरवळ ,नदी ,विहीर ह्या जिवंत  रुपात प्रकट केलेल्या  आहे .त्याची कविता ह्या जणू काही समोर उभ्या केलेल्या चित्र सारख्याच वाटतात .बहिणाबाई ह्या महाराष्ट्र ला नैतिक रुपात मिळालेली एक भेट होती.त्यांचा मृत्यू  हा ३/१२/१९५० साली झाला.


बहिणाबाई चौधरींची कविता रसिकांपुढे जरा उशिरानेच आली. १९ व्या शतकाच्या अखेरीस म्हणजे भा. रा. तांबेच्या समकालीन असलेल्या ह्या कवयत्रिची कविता मात्र तिच्या पश्चात प्रसिद्ध झाली. सुप्रसिद्ध कवी सोपनदेव चौधरी याच्या त्या मातोश्री. बहिणाबाई अजिबात शिकलेल्या नव्हत्या. खनदेशात शेतकरी कुटूम्बात राहाणा-या या कवयत्रीला अकाली वैधव्य आलं  पण त्या डगमगल्या नाहीत शेतात काबाडकष्ट करता करता त्या गाणी गायच्या त्या कुणी टिपून ठेवल्या., काही गेल्या. जात्यावर दळता दळता त्यांनी ज्या कविता रचल्या त्या आज उभ्या महाराष्ट्राला परिचित झाल्या आहेत. अहिराणी भाषेत असलेलं अत्यंत गोड रसाळ सुमधुर असं हे काव्य.  कोकिळेने तोंड उघडलं कि आपोआप संगित वाहु लागतं तशी बहिणाबाईंची कविता सहजपणे आपल्या मनात आणि जोभेवर नाचु लागते, असं त्यांच्या कवितेबद्द्ल आचार्य अत्र्यांनी म्हणून ठेवलं आहे.त्यांच्या कवितेला इथल्या मातीचा सुगंध आहे. शेतक-यांच्या अपेक्षांच चित्र आहे.  विधवा स्त्रीच दु:ख आहे आणि त्याच बरोबर निसर्गाच सौंदर्य आहे. डोंगराच्या कडिकपारीतून  झरा उचंबळत यावा तसे तिचे शब्द नाचत बागडत येतात. याच बरोबर अधुनिक पंडितांना आचंबित करून टाकणारे जीवनाचे तत्त्वज्ञान त्यांच्या कवितेतून मांडले गेले आहे. आपल्या सहज सुंदर तरिही विलक्षण प्रतिभेने सा-या महाराष्ट्राला वेड लावणा-या या कवयत्रिला सलाम !
आज बहिणाबाईंची एक कविता देत आहे


मन

मन वढाय वढाय
उभ्या पिकातलं ढोर
किती हाकला हाकला
फिरी येतं पिकावरं

मन मोकाट मोकाट
त्याले ठायी ठायी वाटा
जशा वा-याने चालल्या
पान्या व-हल्यारे लाटा

मन लहरी लहरी
त्याले हाती धरी कोन
उंडारलं उंडारलं
जसं वारा वाहादन

मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर
अरे विंचु साप बरा
त्याले उतारे मंत्तर

मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगु मात
आता व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायात

मन चप्पय चप्पय
त्याले नही जरा धीर
तठे व्हयीसनी ईज
आलं आलं धर्तीवर

मन एवढं एवढं
जसा खाकसचा दाना
मन केवढं केवढं
आभायात बी मायेना

देवा, कसं देलं मन
आसं नही दुनियात
आसा कसा रे तू योगी
काय तुझी करामत

देवा, आसं कसं मन
आसं कसं रे घडलं
कुठे जगेपनी तुले
असं सपान पडलं....?

http://www.facebook.com/note.php?note_id=126302360766580 

Visit Our Page