Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
Showing posts with label वार्धक्य. Show all posts
Showing posts with label वार्धक्य. Show all posts

Thursday, December 29, 2016

बस्ती, वाताचे आजार आणि आपले आरोग्य

*आयुमित्र*
*बस्ती, वाताचे आजार आणि आपले आरोग्य*    

     बस्ती हि आयुर्वेदातील एक श्रेष्ठ चिकित्सा आहे. आयुर्वेदीय पंचकर्मात बस्तीला फार महत्व आहे. वाताच्या विकारावर बस्ती रामबाण अशी चिकित्सा आहे. आयुर्वेदातील सर्व आचार्य, संहिता बस्तीच्या श्रेष्ठतेचे वर्णन करतात. औषधी काढा किंवा औषधी तेल वापरून बस्ती दिला जातो. सामन्य भाषेत ह्याला एनिमा म्हणतात. पण बस्तीला एनिमा म्हणणे योग्य नाही कारण बस्तीचे फायदे आणि उपक्रम त्याहून खूप वेगळे आहेत.

      बस्ती चिकित्सा वातविकार म्हणजे संधीवात, कंपवात, मांसपेशीगत वात( मस्कुलर पेन), सर्वप्रकारच्या वेदना डोके दुखी, पोटदुखी, मासिकपाळीच्या वेळेस होणारी पोटदुखी इत्यादी अनेक वेदनाशमन करण्यासाठी बस्ती चिकित्सा केली जाते. एव्हडच नव्हे तर स्थौल्यता कमी करण्यासाठी लेखन व कर्षण बस्ती, गर्भाशयाच्या विकारांसाठी उत्तर बस्ती, हाडांची झीज भरून काढण्यासाठी तिक्तक्षीर बस्ती केला जातो. साधे पोट साफ होत नसेल तर बस्ती फार उपयोगी आहे. अश्या अनेक विकारांसाठी बस्ती चिकित्सा केली जाते. जानू(गुडघे) बस्ती, कटी(कंबर) बस्ती, मन्या(मान) बस्ती, हृदय बस्ती इत्यादी बस्तीचे काही प्रकार आहेत जे त्या ठिकाणच्या वेदना/विकार कमी करतात.

      एकदा बस्ती घेतलेला व्यक्ती जेव्हा पुन्हा भेटून हे विचारतो- डॉक्टर आज पोट साफ नाही झाले बस्ती देता का?, डॉक्टर बस्ती घ्यायचा आहे कधी येऊ? डॉक्टर पिरेड येणार आहेत पोट दुखी सुरु व्हायच्या आत बस्ती घ्यायचा आहे कधी येऊ? तेव्हा मनात आयुर्वेदाबाद्दलचा अभिमान अजून उंचावतो. धुळ्याला आदरणीय वैद्य.नाना ह्याच्या कडे आयुर्वेदाचे प्रात्यक्षिक शिकण्याचा योग आला.  बस्तीचा उल्लेख आल्यावर ते विद्यार्थ्यांना आवर्जून सांगत *बस्ती घ्यावा बस्ती द्यावा बस्ती जीवीचा विसावा* तुम्ही स्वतः बस्ती घ्या आणि रुग्णांनासुद्धा द्या.

सध्या पंचकर्माचे रुग्ण वाढले आहेत. हिवाळ्याचा ऋतू आणि त्यात स्नेहन, स्वेदन करण्याचा मजा वेगळाच असतो. आनंद देणारी प्रक्रिया आणि आरोग्याचे इतके फायदे करून देणारी चिकित्सा पंचकर्माशिवाय कोणती असेल बर?

चला तर  पंचकर्म करूया, बस्ती घेऊया आणि  आनंदी व  निरोगी राहूया.

*–वैद्य भूषण मनोहर देव.*
*ज्योती आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय, जळगाव*
*8379820693/7588010703*
drbhushandeo@gmail.com

http://wp.me/p7ZRKy-5A

बस्ती, वाताचे आजार आणि आपले आरोग्य

*आयुमित्र*
*बस्ती, वाताचे आजार आणि आपले आरोग्य*    

     बस्ती हि आयुर्वेदातील एक श्रेष्ठ चिकित्सा आहे. आयुर्वेदीय पंचकर्मात बस्तीला फार महत्व आहे. वाताच्या विकारावर बस्ती रामबाण अशी चिकित्सा आहे. आयुर्वेदातील सर्व आचार्य, संहिता बस्तीच्या श्रेष्ठतेचे वर्णन करतात. औषधी काढा किंवा औषधी तेल वापरून बस्ती दिला जातो. सामन्य भाषेत ह्याला एनिमा म्हणतात. पण बस्तीला एनिमा म्हणणे योग्य नाही कारण बस्तीचे फायदे आणि उपक्रम त्याहून खूप वेगळे आहेत.

      बस्ती चिकित्सा वातविकार म्हणजे संधीवात, कंपवात, मांसपेशीगत वात( मस्कुलर पेन), सर्वप्रकारच्या वेदना डोके दुखी, पोटदुखी, मासिकपाळीच्या वेळेस होणारी पोटदुखी इत्यादी अनेक वेदनाशमन करण्यासाठी बस्ती चिकित्सा केली जाते. एव्हडच नव्हे तर स्थौल्यता कमी करण्यासाठी लेखन व कर्षण बस्ती, गर्भाशयाच्या विकारांसाठी उत्तर बस्ती, हाडांची झीज भरून काढण्यासाठी तिक्तक्षीर बस्ती केला जातो. साधे पोट साफ होत नसेल तर बस्ती फार उपयोगी आहे. अश्या अनेक विकारांसाठी बस्ती चिकित्सा केली जाते. जानू(गुडघे) बस्ती, कटी(कंबर) बस्ती, मन्या(मान) बस्ती, हृदय बस्ती इत्यादी बस्तीचे काही प्रकार आहेत जे त्या ठिकाणच्या वेदना/विकार कमी करतात.

      एकदा बस्ती घेतलेला व्यक्ती जेव्हा पुन्हा भेटून हे विचारतो- डॉक्टर आज पोट साफ नाही झाले बस्ती देता का?, डॉक्टर बस्ती घ्यायचा आहे कधी येऊ? डॉक्टर पिरेड येणार आहेत पोट दुखी सुरु व्हायच्या आत बस्ती घ्यायचा आहे कधी येऊ? तेव्हा मनात आयुर्वेदाबाद्दलचा अभिमान अजून उंचावतो. धुळ्याला आदरणीय वैद्य.नाना ह्याच्या कडे आयुर्वेदाचे प्रात्यक्षिक शिकण्याचा योग आला.  बस्तीचा उल्लेख आल्यावर ते विद्यार्थ्यांना आवर्जून सांगत *बस्ती घ्यावा बस्ती द्यावा बस्ती जीवीचा विसावा* तुम्ही स्वतः बस्ती घ्या आणि रुग्णांनासुद्धा द्या.

सध्या पंचकर्माचे रुग्ण वाढले आहेत. हिवाळ्याचा ऋतू आणि त्यात स्नेहन, स्वेदन करण्याचा मजा वेगळाच असतो. आनंद देणारी प्रक्रिया आणि आरोग्याचे इतके फायदे करून देणारी चिकित्सा पंचकर्माशिवाय कोणती असेल बर?

चला तर  पंचकर्म करूया, बस्ती घेऊया आणि  आनंदी व  निरोगी राहूया.

*–वैद्य भूषण मनोहर देव.*
*ज्योती आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय, जळगाव*
*8379820693/7588010703*
drbhushandeo@gmail.com

http://wp.me/p7ZRKy-5A

Wednesday, August 3, 2016

नेत्रविकार हेतु (भाग १)

                                                  !!! नेत्रविकार हेतु (भाग १) !!!

हेतु म्हणजे कारण –
डोळ्याच्या विकारांचे कारणांपैकी “उष्णाभितप्तस्य जलप्रवेशात्” हे एक कारण आहे. या कारणाचा अर्थ – उन्हाने किंवा उष्णतेने सर्वतः गरम झाल्यानंतर थंड पाण्यात प्रवेश केला किंवा थंड पाण्याचा उपयोग उष्णता निवारणासाठी शरीरावर केला तर नेत्रविकार होण्याची शक्यता असते. (जसे तंबाखू हे कर्करोगाचे कारण समजले जाते पण तंबाखू सेवन करणाऱ्याला किंवा धुम्रपान करणाऱ्याला कर्करोग होईलच असे नाही.) या कारणाचे २ भाग आहेत. ‘उष्णाभितप्त’ आणि ‘शीत जल उपयोग’. निरनिराळ्या कारणांसाठी सर्वांनाच उन्हात वारंवार जावे लागते. प्रत्यक्ष उन्हात जावे लागले नाही तरी उष्णतेने शरीर गरम होईल अशी अनेक कारणे घडतात. जसे घरी किंवा हॉटेलमध्ये नोकरी निमित्त भट्टी, गरम वारा, वाफ वा प्रत्यक्ष अग्नीचा संपर्क होणे. शेती, बांधकाम मजुरी, स्वयंपाकी इ. वातानुकूलित वातावरणातून बाहेर जाणे – येणे अशा सातत्याने होणाऱ्या घटना दैनंदिन जीवनात सतत होत असतात. त्यांचा परिणाम डोळे, नाक, घसा, कान, त्वचा ह्यांवर होत असतो. ‘अभि’ या उपसर्गाचा अर्थ – कडे, जवळ, प्रत्यक्ष, वरून किंवा सर्वबाजूंनी असे होतात. ह्यातील कडे शब्दाने पायास, विशेषतः तळपायास अधिक उष्णता लागली तर डोळे आणि डोक्याकडे त्याचा परिणाम होतो. तळपायाची आग मस्तकात जाणे हा वाक्प्रचार असला तरी शास्त्रीय पठडीवर आधारित आहे.
“द्वे पादमध्ये पृथुसन्निवेशे सिरे गते ते बहुधा च नेत्रे। ताम्रङ्क्षणोद्वर्तनलेपनादीन् पादप्रयुक्तान् नयनं नयन्ति॥ . . . . अष्टांगसंग्रह, उत्तरस्थान १६/६६
डोळ्याजवळ आणि प्रत्यक्ष या दोन्हीचा परिणाम प्रत्येकाच्या अनुभवाचा आहे.
वरून म्हणजे डोक्यावरून सूर्याचे ऊन किंवा गरम पाण्याने वारंवार डोक्यावरून स्नान करणे. गरम पाण्याने स्नान केल्याने चक्षुरेंन्द्रियाची शक्ती कमी होते असे दिनचर्येत स्पष्ट सांगितले आहे. “उष्णाम्बुना अध: कायस्य परिषेक: बलावह:। तेन एव तु उत्तम-अङ्गस्य बलहृत् केश-चक्षुषाम् l”
शेवटचा अर्थ ‘सर्व बाजूंनी’ – सर्व बाजूंनी उष्णतेचा परिणाम, ह्यात ‘त्वचा’ म्हणजेच सर्व शरीरावर आवरण असलेल्या स्पर्शनेन्द्रियाचा समावेश होतो. ह्याचा डोळ्यांशी फारच जवळचा संबंध आहे. अभ्यंगाने त्वचेचे आणि डोळ्यांचे स्वास्थ्य (दृष्टिप्रसाद) उत्तम राहते. त्वचेचे विकार डोळ्यांना अधिक त्रास देणारे असतात. उदा. कुष्ठ, श्वित्र, देवी, अतिसार (डीहायड्रेशन होऊन त्वचेवर सुरकुत्या) असे विकार डोळ्यांचे तेज घालवितात. शिवाय गर्भजनन शास्त्रानुसार (Embriyology), डोळ्यातील लेन्स, काही ग्रंथी, कॉर्नियाचा स्तर (कृष्ण / तेजोमंडल), वर्त्मांची त्वचा इ. primitive ectoderm पासून झाली आहे असे आधुनिक वैद्यकशास्त्र म्हणते. त्वचेत भरपूर पाणी असते त्याचप्रमाणे लेन्स मध्येही ६०.६५% पाणी असते. त्वचेला होणारा उष्णतेचा त्रास डोळ्यांपर्यंत पोचतो हे लक्षात येण्यासाठी सध्या एवढेच स्पष्टीकरण पुरे. ह्यात कंडक्शन, कन्व्हेक्शन व रेडिएशन द्वारा त्वचा आणि डोळ्यांवर परिणाम होतो. उष्णतेचे सर्वसामान्य श्रुत आणि दृश्य परिणाम म्हणजे उष्णता, लाली, दाह, स्रोतसांच्या सिरामुखाचा विस्फार होणे. Heat expands & cold contracts हे पदार्थ विज्ञानाचे तत्त्व सर्वत्र लागू आहे.
जल प्रवेशात – उष्णतेने शरीर इंद्रिये तप्त झाली म्हणजे पित्त वाढते आणि रक्तदुष्टी होण्यास मदत होते. श्वासामार्गे फुप्फुसात जाणारी गरम हवा रक्तात गरमपणा (पित्त) वाढविते आणि हा त्रास कमी व्हावा म्हणून बहुतेक सर्वजण बाहेरून आल्यावर थंड किंवा साध्या पाण्याने चेहरा आणि हातपाय धुतात, गळ्यापर्यंत व बगलेतही थंड पाण्याचा हात लावतात. टॉवेलने पुसून नंतर थंड पाणी पितात. म्हणूनच बाहेरहून आलेल्या पाव्हण्याला प्रथम पाणी देण्याची आपल्याकडे प्रथा आहे. ह्याला अपवाद क्वचितच आढळतो. एकूण काय तर उन्हातून आल्यावर थंड उपचार त्वरित केले जातात व हे केल्याने बरे वाटते, थकवा कमी होतो, मन प्रसन्न होते. “ल्हादनं जीवनं स्तंभं प्रासादं रक्तपित्तयोः” ही लक्षणे जाणवतात आणि म्हणून प्रायः सर्वत्र असे केले जाते.
बरे वाटते पण बरे आहे का?
बरे वाटणे बरे असतेच असे नाही, या बद्दल सूज्ञ वाचकांना अनेक गोष्टी माहीत असतीलच. उन्हाने तापल्यास शीतोपचार ही स्वाभाविक चिकित्सा आहे पण चिकित्सा केव्हां आणि कशी करावी हा मुद्दाही विचार करण्याचा आहे. उदा. ज्वरात काल हे औषध म्हणजे ‘काहीही औषध न घेता थोडी वाट पाहणे’. हा देखील एक उपचार आहे ना? प्रसूतीच्या वेळी अवींचा त्रास होतो पण योनिमुखाचा विस्तार होण्याची वाट पाहतात ना? अतिसारातही त्वरित रोकण्यासाठी उपचार करीत नाहीत. थोडक्यात ‘उष्णाभिताप्तस्य जल प्रवेश केव्हा करावा हे लक्षात घेतले पाहिजे.
उष्णाभितप्तस्य जल प्रवेश हा हेतु आणखीन कुठे आहे असा विचार केला तर ‘कुष्ठ विकाराकडे बोट दाखविता येईल. कुष्ठ हा त्वचेचा विकार आहे. त्वचा आणि नेत्राबद्दल नुकतेच विवेचन केले आहे, ते वाटल्यास पुन्हा वाचून विचार करा. ऊन थंड या विषयाचा उल्लेख शल्यतंत्रातील ‘पायना’ मध्ये झाला आहे. शास्त्राची धार तीक्ष्ण राहावी व ति तशीच टिकावी यासाठी शस्त्र चांगले तापवून लगेच थंड पाण्यात टाकले जाते. त्यामुळे धातूला कडकपणा त्येतो आणि त्याची धार अधिक काळ टिकते. आपल्या विळ्याची धार कडक – टिकावू होण्यासाठी शेतकरी आपला विळा लोहाराकडे देतो. लोहार घासून धार काढतो आणि तापवून त्याला पाणी देतो. अर्थात पायना क्रियेने धातूतील नरम आणि लवचिकपणा जाऊन कडकपणा आणि ठिसूळपणा येतो. तशीच क्रिया शरीरातल्या नेत्रावयवांवरही घडते. डोळ्यातील जे भाग त्वक जातीचे (Ectodermal) आहेत ते कडक होऊन त्यांचा लवचिकपणा जातो शिवाय ताण घेण्याची शक्ती कमी होते. दूरचे – जवळचे पाहण्यासाठी लेन्सची आणि त्यावर नियंत्रण करणाऱ्या स्नायूंची accomodation करण्याची क्षमता खालावते. गरम काचेवर पाणी टाकल्यास काच फुटते त्याचप्रमाणे उपरोक्त कारणांमुळे गरम झालले धातुघटक सतत गरम थंड असा हेतु होत राहिल्याने डोळ्यातील नाजुक आणि संवेदनशील भागांवर व्रण निर्माण होतात, ठिसूळपणा येतो व परिणामी दृष्टिदोष होतात.
एकदा गरम एकदा थंड –
असे लक्षण आणि चिकित्सा यांचाही विचार करावा असे मला वाटते. वैद्यकातील सान्निपातिक व्याधीकडे पहा.
ज्वर : सान्निपातिक ज्वरात क्षणे दाहः क्षणे शीतः असे लक्षण असते. चिकित्सेतही गरम वाटता थंड उपचार आणि थंड वाटता गरम उपचार करावा लागतो. बालकाला जन्मानंतर श्वसनात काही त्रास असेल तर अंगावर गरम व थंड पाणी आलटून पालटून टाकतात. उष्णतेने प्रसरण व थंडीने संकोच होतो. परिणामी जीवलक्षण प्राप्त होण्यासाठी ही चिकित्सा फलदायी होते. उष्णतेने वायु प्रसरण पावतो व पुढे जाऊन स्रोतोरोध नष्ट करतो. थंडीने पुन्हा संकोच पावून विरुद्ध गती मिळते. अशी पुढे – मागे गती झाल्याने श्वासोच्छवास सुरु होतो. कित्येकवेळा अनेक उपचार केलेले रोगी हे निसर्गोपचारकाचे थंड – गरम (व्यत्यास) चिकित्सेने बरे होतात. ह्या तत्त्वाचा अवलंब करून काही बरे न होणारे नेत्ररोग औषधांच्या जोडीला युक्तिपूर्वक योजना करून चिकित्सा करता येईल. पण नेहमी उन्हातून आल्यावर किंवा भट्टीकाम करून आल्यावर त्वरित थंडगार पाण्याचा वापर हा टाळला पाहिजे. आत्यायिक अवस्थेत अशी चिकित्सा करणे आवश्यक असले तरी सतत केल्याने डोळे, कान, नाक, त्वचा अशा इंद्रियांना नक्कीच हानिकारक ठरू शकते. हे टाळण्यासाठी गरम आणि थंड चिकित्सेत किमान १० मिनिटांचे अंतर ठेवणे आवश्यक आहे. एकदम माठातील किंवा फ्रीजचे पाणी, थंडपेय किंवा आईसक्रीम घेणे योग्य नाही हे ध्यानात ठेवावे. पुरेसा वेळ (अॅक्लमटायझेशन) देऊन नंतर स्नान केले तरी हरकत नाही. सिरा कडक होणे ह्या क्रियेला आधुनिक वैद्यकात स्क्लेरोसिस म्हणतात. यामुळे डोळ्यातील सिरा व सिराघटित अवयव यांतील कडकपणा वाढून रक्तदाब वाढतो व रक्तस्रावाची पार्श्वभूमी तयार होते. एकंदरीत मानेच्या वरच्या भागांतील रोगांना आमंत्रण दिल्यासारखे होईल. पूर्वी चुलीवरून तवा उतरवल्यावर तो इतर भांड्यांपासून लांब ठेवण्याची पद्धत होती. तो थंड झाल्यावर एकत्र ठेवला जात असे. तापलेल्या तव्यावर पाणी पडले तर तो लवकर फुटतो. अशा प्रकारची ओढाताण डोळ्यांना सहन होणे शक्य नाही. आधीच आहार, विहार आणि निरनिराळी औषधे डोळ्यांमध्ये ख वैगुण्य तयार करतातच त्यातून ही गरम – थंड ची भर पडली तर दोषवैषम्य होण्यास वेळ लागणार नाही.
आपले पूर्वज खरे आप्त होते. त्यांनी दिलेल्या सल्ल्याला आजच्या वैद्यकात पुरावा मिळो न मिळो, पण अंधश्रद्धा म्हणून का होईना, तो पाळला तर आपल्याला स्वास्थ्य उत्तम राखण्यास नक्कीच फायदा होईल. “आयुर्वेदोपदेशेषु विधेयः परमादरः ॥


वैद्य श्रीनिवास जळूकर
माजी अधिष्ठाता, पोदार वैद्यक महाविद्यालय व रुग्णालय, मुंबई
+919969106404
shriniwasjalukar@gmail.com

Saturday, July 23, 2016

दूर ठेवा संधीवात

दूर ठेवा संधिवात
वयाच्या चाळिशीनंतर हाडांची झीज होणे, त्यामुळे सांधे दुखी सुरू होणे हे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. मात्र, जीवनशैलीतील   बदल, आहारावरील नियंत्रण , नियमित व्यायाम, आयुर्वेदिक औषधी व पंचकर्म याच्या योगाने संधीवात दूर ठेवता येऊ शकतो.
वृद्धत्व ही निसर्गचक्रातील एक अवस्था आहे. शरीरातील अवयवांची आणि त्यांच्या क्रियांची झीज व्हायला लागते. या झिजेच्या प्रक्रियेत एक प्रमुख अवयव चाळिशीनंतर झिजायला लागतो, तो म्हणजे हाडे. आणि त्यामुळे होते वेगवेगळ्या प्रकारची सांधेदुखी किंवा संधिवात.
संधिवात होण्याची अनेक कारणे आहेत. काहींच्या हाडांत जन्मजात विकृती असते. सूज, दाह, जंतूंचा प्रादुर्भाव झाल्याने अपघातामुळे हाडांना मार लागण्यामुळे किंवा तुटणे सरकण्यामुळे विविध प्रकारच्या कर्करोगांनी हाडांना पोचणाऱ्या इजेमुळे, वयोमानानुसार मणक्‍यांची/ हाडांची होणारी झीज, शिवाय हाडे ठिसूळ होण्यामुळे, या आणि अशा अनेक कारणांमुळे संधिवात होत असतो.
आपल्याला काही सवयी लागलेल्या असतात त्यामुळे अशा दुखण्यांना आपण स्वतःहूनच निमंत्रण देत असतो. उदाहरणार्थ- बसण्याची, उभे राहण्याची पद्धत, जास्त वजन असणाऱ्यांच्यासुद्धा शरीराचा भार गुडघ्यांवर पडल्यामुळे तेथील सांध्यांतील हाडांवर, संधिबंधांवर परिणाम होऊन पायांना बाक येणे, गुडघे दुखणे, सुजणे, हालचाली करताना त्रास होणे, खाली उठता-बसता न येणे, अशा तक्रारी सुरू होतात. वाकण्याची पद्धत, व्यायामाचा अभाव, जास्त वजन उचलणे, नैराश्‍य, मानसिक ताण, व्यावसायिक चिंता या सर्वांमुळेही सांधेदुखी आपल्या नकळत सुरू होऊन वाढत जाते. स्त्रियांमध्ये खाली बसून भांडे धुणे, कपडे धुणे, स्वंयपाक करण्याची पध्दत यामुळे गुडघ्याच्या स्नायुंवर, हाडावर ताण पडतो.
पचनाच्या तक्रारींमुळे किंवा जास्त प्रमाणात अनियमित खाल्ल्याने, मलप्रवृत्तीच्या अनियमितपणामुळे अन्नपचन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे शरीरात एक प्रकारची विषारांची किंवा आमाची निर्मिती होते. तो “आम’ सांध्यांच्या ठिकाणी साठून वातदोषांच्या साह्याने तेथे विकृती निर्माण करून आमवाताची सुरवात होते. तसेच स्त्रियांच्या रजोनिवृत्तीच्या काळात शरीरात जे काही अंतःस्रावी ग्रंथीच्या स्रावात बदल होतात त्यामुळे वजन वाढते. हाडे झिजायचे प्रमाणही या काळात अधिक असल्याने संधिवात या वयात सुरू होतो.
सध्या मध्यम व उच्च वर्गातील रुग्णांमध्ये वाढती सांधेदुखी घेऊन येणारे रुग्ण अतिप्रमाणात येत आहेत. त्यावरुन त्यांचे निदान आम्ही करत असतांना ते बहुधा संधिवाताच्या, आमवात, वातरक्त इत्यादी गंभीर प्रकारातील आढळतात. लड्डा आयुर्वेदिक मधील पंचकर्म चिकित्सा संधिवातासाठी खूप उपयोगी पडते. यात स्नेहन-स्वेदनपूर्वक बस्तिचिकित्सा, रक्तमोक्षणासारखी चिकित्सा केली जाते.
स्नेहन – यात स्नेहन/मसाज हा विशिष्ट औषधी तेलाने दुखणाऱ्या सांध्याला विशिष्ट पद्धतीने करावा. हा तज्ज्ञ व्यक्तींकडूनच करून घ्यावा. सांध्याच्या रचनेनुसार मसाज करण्याची दिशा ठरते. यासाठी विविध औषधी तेलांचा उपयोग होतो. दुखणाऱ्या सांध्यांबरोबरच सर्वांगाला औषधी तेलाचा मालिश केल्यास फायदा होतो. मसाजामुळे अस्थिधातूतील वाताचे शमन होते. हाडांची झीज होत नाही. अस्थिसंधी, मांस, स्नायू यांचे पोषण होते. पर्यायाने दृढता वाढून तेथील दुखणे कमी होते, सूज कमी होते. हालचालींना सुलभता येते.
स्वेदन – विशिष्ट औषधी द्रव्यांची वाफ विशिष्ट पद्धतीने दुखणाऱ्या सांध्यांना देण्यात येते. उदाहरणार्थ – नाडीस्वेद, पिण्डस्वेद, वालुकापोट्टली स्वेद. जेव्हा एखाद्या हाडाला पोषणाची आवश्‍यकता ?सेल, तेथील रक्तपुरवठा सुरळीत करावयाचा असेल तेव्हा पिण्डस्वेद पत्रपोट्टली स्वेद करता येतो. यासाठी साठेसाठीचा भात, गाईचे दूध, गुळवेल, देवदार- निर्गुंडीसारखी औषधी द्रव्ये वापरली जातात. त्यांचा उपयोग हाडांची झीज कमी होण्यास आणि तेथील घनता वाढवण्यात होतो.
बस्ती – या स्नेहन-स्वेदनानंतर, म्हणजेच मसाज आणि शेकानंतर काही औषधी द्रव्यांच्या काढ्यांचा आणि औषधी तेलांचा बस्ती किंवा एनिमा दिला जातो. बस्तिचिकित्सा ही वातावरची श्रेष्ठ चिकित्सा सांगितली आहे. सांधेदुखीबरोबरच पचनाच्या तक्रारीसाठी वजन कमी करून पर्यायाने गुडघ्यांवरील भार कमी करण्यासाठी या उपचारांचा उपयोग होतो. या सर्व पंचकर्मांच्या क्रिया या तज्ज्ञ वैद्यांकडूनच करून घ्याव्यात. याशिवाय आभ्यंतर औषधोपचारामध्ये गुग्गुळ कल्प उपयोगी पडतात.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सर्वसामान्य जनतेत कामाच्या व्यापाने व इतर कारणाने अवेळी भोजन, विरुध्द आहार, भूक लागली नसतांना पण जेवणे, तेल तुपाचे पदार्थ, अति स्निग्ध, जड असे भोजन करणे व लगेचच फिरणे, तसेच सदा काही ना काही खात राहणे. नुसते पडुन वा बसून राहणे. थंड कुलरसमोर वा वातानुकुलीन रुममध्ये जास्त काळ राहणे. रोज दिवसा झोपणे, लठ्ठ होण्याच्या इच्छेपोटी अति स्निग्ध पदार्थ जसे तूप, बदाम, काजू, शेंगदाणे, दूध व त्याची विकृती, बासुंदी, दही, श्रीखंड आदी खाणे. आईसक्रीम खाणे, फ्रीजचे अतिथंड पाणी सतत पिणे, रात्री कामास कंटाळून रोज भात, खिचडी खाणे अशा आहार व विहाराने दुषित अशा (विकृत आहार रस भाव) आम या विषारी घटकाची, मेदाची वृध्दी होते. त्यामुळे लठ्ठपणा (मेदवृध्दी), आमवात (सांधेदूखी) आदि आजारांचे पाहुणे शरीरात येतात. तेव्हा अशा सांधेदुखीच्या रुग्णांना त्यांचे पथ्य म्हणजे त्यांनी भूक लागल्याशिवाय जेवू नये. आहारात स्निग्ध पदार्थ, तांदळासारखे पदार्थ, दूध व त्यांची विकृती, तसेच जड अन्न इ. खाणे टाळावे. तसेच फ्रीजचे अतिथंड पाणी पिणे, थंड पेय इ. टाळावे. कोष्ण पाणी पिणे, दिवसा शरीरास शक्यतोवर सतत व्यायामात राहील असे शरीर हालचालीत ठेवणे. यातच प्रात: फिरणे, घरची कामे करणे इ. पथ्यांनी वरील रोग्यास बराच फायदा होईल. तसेच सांधेदुखीत सांधे हालचालीत राहिल्याने पुढील उपद्रव होणे टळतील. सांधेदुखीचे पथ्यापथ्य सांगताना सध्याच्या बदलत्या हवामानाचा (काळाचा) विचार पण एक प्रमुख मार्गदर्शक ठरतो. तेव्हा उन्हाळ्यात ऊन न पडणे, पाऊस पडणे तसेच हिवाळ्यात पाऊस पडणे वा पावसाळ्यात उन पडणे या बदलत्या वातावरणाचा शरीरावर तसेच सांधेदुखीवर प्रभाव हा पडतो. पण कालाचा परिणाम टाळणे हे अपरिहार्य आहे. त्यावर तोडगा म्हणजे आयुर्वेदातील व्यापक असा पंचकर्म उपचार, स्वस्थ वृत्त, व ऋतकालीन दिनचर्या इ. होय. तसेच काही रुग्णांत आढळणारे सांधेदुखीचे आगळे वेगळे स्वरुप म्हणजे सांध्यात ठणका असणे, दिवसा व रात्री झोप न लागणे, छोटे सांधे दुखणे, अतिशय वेदना, स्पर्शसहत्व, सार्वदेहीक दाह, दौर्बल्य , पांडुता असणे, भूक न लागणे इत्यादी लक्षणे, जी श्रीमंत व सामान्य वर्गात पण आढळतात, त्यांची कारणमिमांसा लावली असता ती म्हणजे दूषित रक्ताची (वात रक्तांची) सांधेदुखी लक्षणे होत.  अश्या रुग्णात मंदाग्नी असताना जेवणे, अजीर्ण झाले तरी खाणे तसेच आंबलेली खारट, आंबट, गोड असे पदार्थ खाणे, त्यातच चाट भांडारवरील पदार्थ अधिक सातत्याने खाणे, दही सतत खाणे, थंड पेये, फळांचा रस थंड असा पिणे, मांसाहार इ. खाणे, अति चहा पिणे, अति मद्यपान करणे, धुम्रपान करणे, रात्री जागरण करणे, अति फिरणे, तसेच आहार व विहार वात व रक्त अशा दोन्ही गोष्टीस प्रकुपित व दुषित करतो. असे दुष्ट व वात संधिस्थानात, शोथ, ठणका आदी पूर्वरुपात्मक लक्षणे उत्पन्न करतात. अशा रोग्यात त्यांनी आपला आहार विहार बदलला पाहिजे. व प्रामुख्याने वरील सातत्याने घडणा­या गोष्टी टाळल्या पाहिजेत. त्यामुळे त्यांच्या सांधेदुखीचे निराकरण व उपचार हा पथ्याने साधता येईल. अशा प्रकारे सांधेदुखीच्या आजारावर व इतर अनेक आजारांवर आपल्याच आहार विहारातून प्रारंभी पथ्यापथ्याने व आयुर्वेदातील इतर व्यापक उपचाराने विजय मिळविणे सहज शक्य होईल.
डॉ. पवन लड्डा
लड्डा आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सालय
पद्मा नगर, बार्शी रोड लातूर.
मो. ०९३२६५११६८१

Tuesday, July 19, 2016

मधुमेह आणि रक्त तपासणी

मधुमेह आणि रक्त तपासणी : मधुमेहाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत , त्यामुळे त्याबद्दलची जागरुकता असणे हि तितकेच महत्वाचे आहे . आज आपण थोडक्यात समजून घेऊ कि आपल्याला कोणकोणत्या रक्त तपासणी करून घ्याव्या लागतात . सद्या बरेचसे मधुमेही रुग्ण उपाशी पोटाची आणि जेवनांनंतर 2 तासा नंतरची साखर तपासत असतात , FBSL n PPBSL . किमान या तपासण्या करणे हि गरज आहे , जर आपल्याला मधुमेहाची लक्षणं दिसत असतील तर किमान लघवीतील साखर , वरती सांगितल्याप्रमाणे उपाशी पोटी आणि जेवनांनंतरची साखर तपासणे गरज आहे . हे झाले नवीन रुग्णांसाठी मग ज्यांना ऑलरेडी  मधुमेह आहे जे औषध अथवा इन्सुलिन घेतात त्यांच्यासाठी काय फक्त वरील तपासण्या पुरेश्या आहेत का ? याच उत्तर निश्चितच नाही अस आहे , कारण जेव्हा आपण उपाशी पोटी व जेवणानंतर 2 तासानी शुगर तपासतो तेव्हा आपल्याला त्यात्या वेळेची रक्तशर्करा समजत असते, मात्र जेव्हा आपण औषध घेत असतो तेव्हा त्या औषधांच्या परिणाम होण्याच्या कालावधी नुसार दिवसभरात रक्तातील साखरेचे प्रमाण हि कमी अधिक होत असते जे आपल्याला वरील तपासण्या करून समजत नाही अथवा खरच आपली साखर नियंत्रणात आहे का हे देखील समजत नाही . मग आपली साखर नियंत्रणात आहे हे कळणार तरी कसे ?? या साठी आपल्याला एक HbA1C या तपासणीचा आधार घ्यावा लागतो , सध्या भाषेत सांगायचं झालं तर हिमोग्लोबिन ला चिकटलेली साखर , या तपासणीत आपल्याला मागील 90 दिवसात आपली साखर किती नियंत्रणात होती याची माहिती कळते व त्यावरून आपल्याला हे पण कळते कि खरच आपली साखर नियंत्रणेत आहे का , म्हणून मधुमेही रुग्णांनी दर 3 महिन्यांनी हि तपासणी करून घेणे गरजेचे आहे , तसेच जर तुमी इन्सुलिन घेत असाल तर आपली साखर रात्री , सकाळी , दुपारी , संध्याकाळी अशा वेगवेगळ्या वेळी तपासून पाहिली पाहिजे जेणेकरून आपल्याला आपल्या रक्तातील साखरेचा अंदाज येईल . योग्य तपासण्याचा आधार , आहार , व्यायाम व योग ,औषध  आणि पंचकर्म यांचा वापर केल्यास आपण मधुमेह आटोक्यात ठेवू शकतो.
   डॉ.सचिन रामकृष्ण पाटील एम.डी. पंचकर्म   9823347244
डॉ.निलेश पाटील एम.डी. पंचकर्म
 9970278707
 वेदाग्नी डायबेटिस केअर क्लिनिक व पंचकर्म सेंटर पुणे ,बेळगाव

Friday, July 8, 2016

आहाराचा आयुर्वेदोक्त क्रम

#आयुर्वेदाकडुन_आरोग्याकडे

🌺 आहाराचा आयुर्वेदोक्त क्रम 🌺

अश्नीयात्तन्मना भुत्वा पूर्वं तु मधुरं रसम्|
मध्ये$म्लसवणौ पश्चात्कटुतिक्तकषायकान्|| सार्थ भावप्रकाश

जेवनाच्या सुरूवातिला गोड पदार्थ, जेवनाच्या मध्ये आंबट खारट पदार्थ, तर जेवणाच्या शेवटी तिखट, कडु, तुरट पदार्थ खावेत.
            वरील प्रमाणे आहार का घ्यावा याविषयी शास्रोक्त माहिती...
   १. आयुर्वेदीय शास्रानुसार आहार पचनाचा पहिला काळ हा कफाचा असतो. मुखापासुन पोटाच्या वरच्या भागापर्यंत खालेल्या अन्नामध्ये कफ मिसळुन अन्नाचा संघात मोडतो. पचनाची क्रिया योग्य रितीने पुढे नेतो. त्यामुळे अन्नपचनाच्या सुरूवातिला कफवर्धक गोड पदार्थ खावेत.
२ पोटातील खालच्या भागातुन अन्न पुढे आतड्यात जात असताना पित्ताद्वारे अन्नाचे पचन होते. आंबट खारट पदार्थ शरीरात पित्त वाढवितात. ज्यामुळे गोड कफयुक्त अन्नाचे पचन सुस्ती आळस न येता होते. त्यामुळेच जेवणाच्या मध्ये आंबट खारट पदार्थ घ्यावेत.
३. पित्ताद्वारे अन्नाचे पचन पुर्ण झाल्यानंतर शेवटी आतड्यामधुन तिखट तुरट कडु रसांच्या साहाय्याने आवश्यक पोषक भाग शरीरात शोषला जातो आणि मलभाग शरीराच्या बाहेर पडतो. यामुळेच आहाराच्या शेवटी तिखट तुरट कडु पदार्थ खाणे उपयोगी असते...
  गोड पदार्थंत गहु ज्वारी भात यांचा समावेश होतो. ह्यात गोडवा कमी प्रमाणात असतो...
                 या क्रमाशिवाय आहार घेणे जसे sweet dish icecream जेवणाच्या शेवटी घेतले तर मलभाग जास्त तयार होतो पोषक रस योग्य रितीने शोषला जात नाही, पचन बिघडते. तसेच जेवणाच्या सुरूवातिला starters सुप मसाला पापड आदी खाल्ली असता अन्नाचा संघात ज्या कफाने मोडतो तो कफ योग्य मात्रेत तयार होत नाही. अन्नाच्या पचनाची दिशाच बिघडते.
          त्यामुळेच नेहमी हॉटेलात जेवणारया लोकांत पचनाशी संबधीत आजार तक्रारी अधिक असतात. कारण क्रमाच्या विरूध्द घेतलेला आहार hoteling चा परिणाम म्हणता येइल याला....
योग्य मात्रेतच नाही तर योग्य क्रमानेही आहार घेणे आवश्यक. अन्नपचनासाठी व शरीराच्या पोषनासाठी (अन्न अंगाला लागण्यासाठी)  आयुर्वेदीय क्रमानुसारचे आहारसेवन आवश्यक आहे.

वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड
 9028562102,  9130497856
(for what's up post send your messege on above mob no)

कानात दडे, बहिरेपणा – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

कानात दडे, बहिरेपणा – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

कानात दडे बसून ऐकायला कमी येणे हा एक न दुखणारा पण त्रासदायक आजार आहे. ह्या आजाराचा त्रास रोग्याला कमी होतो पण त्याच्याशी बोलणाऱ्यांचा घसा मात्र नक्कीच दुखायला लागतो. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून हा विकार नेमका काय आहे, त्याची कारणे आणि सोपे घरगुती उपाय अशी ह्या लेखाची रूपरेषा आहे.

आयुर्वेदानुसार कानात दडे किंवा बहिरेपणा म्हणजे कानाची सर्दी. सर्दी झाल्यावर ज्याप्रमाणे वास येत नाही, म्हणजेच त्या इंद्रियाचे काम मंदावते त्याचप्रमाणे कानाला सर्दी झाली की ऐकू येणे मंदावते. म्हणून सर्दीसाठी जे उपचार सांगितले आहेत तेच उपचार ह्या कानाच्या सर्दीसाठी करावेत. नाकाच्या सर्दीमध्ये नाकाच्या आतल्या श्लेष्मल त्वचेला (म्युकस मेम्ब्रेनला) सूज येते तशीच सूज इथे कानाच्या पडद्याला येते. सर्दी म्हणजे ओलेपणा. नाकाच्या भागात जास्त झालेले किंवा साठलेले पाणी शरीर बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सतत नाक वहाते. पडद्याच्या सूजेमुळे श्वासमार्ग आकुंचित होऊन शिंका येतात. श्वासोच्छवासाच्या क्रियेत बाह्य वातावरणाचा सतत संपर्क येत असल्यामुळे नाकाला सर्दी लवकर होते. अशी सर्दी जास्त काळ टिकून राहिली तर त्याचा विस्तार वाढून पुढे कानाच्या पडद्यापर्यंत पोचतो. म्हणून सर्दी बरेच दिवस राहिल्यामुळे कानात दडे बसण्याची सुरुवात होते आणि बहिरेपणा सुरु होतो.

तबला किंवा डमरूचे चामडे ओले झल्यावर त्याचा नाद किंवा आवाज बरोबर येत नाही त्याचप्रमाणे कानाचा पडदा ओला - दमट झाल्यामुळे त्याचा आवाज बरोबर येत नाही आणि तो मेंदूपर्यंत सहजगत्या पोचत नाही. काहीवेळा कानाच्या पडद्याचा ताण कमी होऊनही कानात दडे बसतात. तबल्याच्या वाद्या घट्ट करून जसा त्याचा नाद सुधारता येतो त्याप्रमाणे तोंडात हवा दाबून हा ताण कमीअधिक करता येतो. घाटात प्रवास करतांना किंवा विमानप्रवासात असा अनुभव बहुतेक सर्वांनाच येतो. असे दडे सहजपणे सुटतात, त्यासाठी काही औषधोपचार करण्याची गरज नसते. कानाच्या सर्दीमध्ये दडे बसून बहिरेपणा येण्याच्या आजाराला नाकाच्या सर्दीप्रमाणे पथ्यपाणी आणि औषधोपचार करावे लागतात.

पथ्यपाणी विचार –
ओलसरपणा किंवा दमटपणा हे ह्या आजाराचे मुख्य कारण आहे. त्यामुळे तहान नसतांना उगाचच जास्त पाणी पिऊ नये हे सर्वात महत्वाचे पथ्य लक्षात ठेवावे. विशेषतः झोपण्यापूर्वी किमान तासभर अगोदर पाणी पिणे टाळले पाहिजे. अर्थातच सरबत, दूध, चहा, कॉफी, मद्य किंवा तत्सम कोणताही द्रव पदार्थ पाण्याप्रमाणेच ओलसरपणा किंवा दमटपणा वाढवेल हे ध्यानात ठेवावे. रोज डोक्यावरून स्नान करणे टाळावे. पाण्यामुळे निर्माण झालेला ओलेपणा कमी करण्यासाठी ह्याठिकाणी ऊब निर्माण करणे गरजेचे आहे. तबला किंवा डमरूच्या चामड्याला शेक देऊन ज्याप्रमाणे कोरडे करण्याची पद्धत आहे तसेच ह्यात करण्याची गरज आहे.

सोपा घरगुती उपचार –
हिंगाचा मुगाएवढा खडा आणि लसणाच्या पाकळीचा चण्याएवढा तुकडा एका तलम सूती कापडात गुंडाळून रात्री झोपतांना कानात ठेवावा व सकाळी काढून टाकावा. ह्याने कानाच्या पडद्याला शेक मिळतो आणि त्यातील ओलसर दमटपणा नाहीसा होतो. सर्दी ज्याप्रमाणे नाकातून पुढे कानात प्रवेश करते त्याच तत्वावर औषधी चिकित्सा करण्याचा मार्ग देखील नाकातूनच करावा. सर्दीमध्ये ज्याप्रमाणे नस्य चिकित्सा केली जाते, त्याचप्रमाणे षड्बिंदू तेल, पंचेंद्रियवर्धन तेल, अणु तेल ह्या तेलांचा उपयोग प्रकृती आणि लक्षणांनुसार करावा. पोटातून घेण्यासाठी नागगुटी, लक्ष्मीविलास, चित्रकहरीतकी अवलेह ह्यापैकी सुयोग्य औषधाची निवड करावी.  

कानाचे यंत्र –
कानात दडे बसून ऐकायला कमी येणे सुरु झाले की सामान्यतः कानाचे यंत्र लावून घेण्याची पद्धत आहे. ह्या यंत्रात मायक्रोफोन, अॅम्प्लीफायर आणि स्पीकर असे मुख्य तीन भाग असतात. मायक्रोफोनमुळे बोलण्याचा आवाज ग्रहण केला जातो, अॅम्प्लीफायरच्या सहाय्याने तो मोठा (लाऊड) केला जातो व स्पीकरच्या सहाय्याने हा आवाज कानाच्या पडद्यावर पोचवला जातो. मोठा किंवा कर्णकर्कश आवाज कानाच्या वातनाड्यांना कमकुवत बनवतो आणि पडद्याला अधिकच कमजोर बनवतो. वर निर्देशित साध्या सोप्या घरगुती आणि विना खर्चाचे प्रयोग करूनही उपयोग झाला नाही तरच फक्त असे यंत्र बसविण्याचा विचार करावा. कान हे एक महत्वाचे ज्ञानेन्द्रीय आहे, त्याच्या चिकित्सेत हेळसांड करून कायमचे अपंगत्व येणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे.

डॉ. संतोष जळूकर
संचालक, अक्षय फार्मा रेमेडीज, मुंबई

दूरध्वनी - +917208777773

ईमेल – drjalukar@akshaypharma.com

Saturday, May 7, 2016

मुळव्याध


# आयुर्वेदातुन आरोग्याकडे
        🍀 मुळव्याध ☘
मुळव्याधचा त्रास होण्यापुर्वी भुक कमी होणे, मल साफ न होणे, मांड्या गळुन जाणे, पिंडरया दुखणे, चक्कर येणे, अंगास ग्लानी वाटणे, डोळे सुजणे, मलावरोध असणे वा पातळ मल होणे, आतड्यात कुरकुर शब्द होणे, पोटात गुडगुड होणे, वजन कमी होणे, ढेकरा फार येणे, लघ्विला अधिक होणे, मल कमी प्रमाणात तयार होणे, अन्नावर वासना नसणे, घशाशी आंबट येणे, पाठ उरप्रदेशी दुखणे, आळस, शरीराचा रंगात बदल, इंद्रिय निशक्त होणे, राग फार येणे, इतर आजार होतील अशी भिती वाटणे अशी लक्षणे मुळव्याध होण्यापुर्वी कमी अधिक प्रमाणात दिसतात. यातील जेवढी जास्त लक्षणे दिसतात. तेवढा आजार जास्त बलवान असतो. मुळव्याध होण्याच्या पुर्विच अटकाव घालता येतो. पण बहुतेक वेळा रक्त पडायचे स्वतः थांबत नसताना उपचाराचा विचार केला जातो. तोपर्यंत भुक कमी झाल्याने आजार लगेच पुर्ण दुरूस्त होत नाही.उपचाराने रक्त पडायचे थांबते पण आजाराचा पुनरूद्भव टाळण्यासाठी भुक वाढविणे आवश्यक असते. भुक वाढली असता पुन्हा त्रास सहज होत नाही. भुक कमी असेल तर पुन्हा पुन्हा त्रास सहन करावा लागतो. आयुर्वेद औषधी उपचारही सल्ल्याशिवाय घेउ नयेत. कारण काही औषधी गरम गुणधर्माच्या असल्याने त्रास वाढण्याचा धोका असतो. चांगल्या ताकाचा उपयोग आहारात थोडे शेंदेलोण घालुन करावा. ताकाने भुक वाढावयास मदत होते..
मुळव्याधीत दुषीत रक्त अडवण्याचे उपद्रव
रक्तपित्तं ज्वरं तृष्णामग्निसादमरोचकम् |
कामला श्वयथुं शुलं गुदवक्षंणसंश्रयम् ||
कण्ड्वरूःकोठपिडकाः कुष्ठं पाण्ड्वाह्रयं गदम् |
वातमुत्रपुरीषाणां विबन्धं शिरसो रूजम्||
स्तैमित्यं गुरूगात्रत्वं तथा$न्यान् रक्तजान् गदान् |
तस्मात् स्रुते दुष्टरक्ते रक्तसंग्रहणं हितम् ||
मुळव्याध या आजारातुन शरीर स्वतःच दुषीत झालेले रक्त शरीराबाहेर टाकते. मुळव्याधीचा विशेषतः रक्तस्रावाचा त्रास मुख्यतः रक्त बिघाडाच्या काळात जेंव्हा पावसाळा संपुन ऊन वाढत त्यावेळीे ( शरद रूतुत oct heat वेळी ). पुन्हा जेंव्हा हिवाळा संपुन उन्हाळा लागावयाचा असतो ( feb march मध्ये ) याकाळात होत असतो. कारण या काळात रक्तबिघाड अधिक असल्याने शरीर रक्ताला स्वतःच बाहेर काढते. एरविही रक्त बिघडवणारी कारणे घडत असतिल तर मुळव्याधीचा त्रास होऊ शकतो जसे मद्यपान, मसालायुक्त मांसाहार, हिरवी मिरची ठेचा, चनाडाळीचे तळीव पदार्थ, मिरची भज्जे सारखे पदार्थ खाल्यानंतर दुसरया दिवशी लगेच काही लोकांत त्रास होतो. हा तात्काळ उत्पन्न होणारा त्रास असतो.
          अशावेळी जर दुषित रक्ताला बाहेर पडु न देता अडविण्याचे प्रयत्न केले तर दुषीत रक्ताद्वारे पुढील त्रास सुरू होऊ शकतात.
        रक्तपित्तं ( शरीरातील इतर विवरातुन रक्तस्राव ),ताप, तहान अधिक लागणे, भुक कमी होणे, तोडांला चव नसणे, कावीळ, सुज, वेदना, खाज, त्वचेवर चकते पिटिका निर्मिती, पांडु सहित अनेक आजार होऊ शकतात.
    तसेच मल मुत्र अधोवायुचा अवरोध होणे कष्टाने मल मुत्र होणे, डोकेदुखी, ओलसरपणाची जाणीव होणे, सर्वांग जड पडणे तसेच अन्य रक्तदुष्टी जन्य आजार उत्पन्न होऊ शकतात.
         त्यामुळे दुषीत रक्त शरीराबाहेर पडल्यानंतर रक्त थांबवण्यासाठी प्रयत्न करणे शरीरासाठी हितकारक असते. अन्यथा रक्त शरीराबाहेर पडावयाचे थांबते पण दुषीत रक्त आडवल्यामुळे उत्पन्न अन्य आजारांचा सामना करावा लागु शकतो. कुठल्या प्रकारे त्रास कमी करायचाय हे स्वतः च ठरवावे..
वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड
 9028562102, 9130497856
( for what's up post send your request messege on above mob no or add 9028562102 what's up no in your group )

Friday, December 4, 2015

वार्धक्य ,आज़ार व आरोग्य

वार्धक्य ,आज़ार व आरोग्य



लहानपन देगा देवा
मुंगीसाखरेचा रवा
वार्धक्य आले देवा
सोबती आयुर्वेद हवा...!!
लहानपणात मुलांचे लाड,आजारपने आई वडील प्रेमाने काढतात ,पन वार्धक्य आले की येनार्या आजाराला काढतांना मुले सोबत असो वा नसों पन आयुर्वेद नक्की च जवळ असावा... तो मित्र आहे ,सखा आहे...!!
४० - ५० शी नंतर वार्धक्यात आपन कधी पोहचलो हे लक्षातही येत नाही,आयुष्यभर जे कधीच आपलें नसते त्यासाटी दिन रात मेहनत करुन शरीर झिजवुन सुख सोयी जमवल्या पन ते करतांना वाढलेले वजन,रक्तदाब ,शुगर,तानतणाव हे ही जमवतो .. व आज़ार सुरु होतात.....
असे का होते बरे? मग मोठ्या डाँक्टरकडे आपन जातो तो औषधे लिहुन देतों व म्हनतो ही औषधे आता कायमस्वरुपी घ्या.....!! विचार करनारी गोष्ट आहे ... त्यावेळी वाटते... पन त्या विचाराला उत्तर हे आयुर्वेद हे मिळते...
स्वस्थस्य स्वास्थ रक्षणम्..!! मानसाला स्वस्थ कसे राहता येईल व त्याचे स्वास्थ्य कसे निरोगी ठेवता येईल तेच आयुष्याचा वेद आयुर्वेद सांगते . दिनचर्या ,रुतुचर्या,ह्याचे सुंदर वर्णन आयुर्वेदात केले आहे,सकाळीं लवकर उठुन मुखमार्जन , मलमुत्रविसर्जन केल्यानंतर १ ग्लास कोमट पाणी प्यावे.. तसेच तेल अभ्यंग ,स्नान केल्यानंतर प्राणाचा आयाम- प्राणायाम करावे.. त्यात अनुलोम विलोम ई करावे
न्याहारी मग ते सकाळी काहीही पन ते अन्न ताजे असने गरजेचे आहे,मग ते उकमा,पोहे, ई तसेच आहारात तेलकट,शिळे पदार्थ कटाक्षाने टाळावे कारन शिळे अन्न च मलबध्दतेसाठी कारणीभुत ठरते व परिनामी आजार उद्भवतात तसेच मीठ कमी असने नेहमी चांगलेच....!!
दुपारचे जेवन हे सुर्यमध्यावर गेल्यास होने गरजेचे आहे कारन सुर्याचा आपल्या जाठराग्नीवर फार परीनाम पडत असतो,सुर्योदयावेळेनुसार उठने तसेच सकाळच्या कफ वर्धक वातावरनात व्यायाम तसेच गरम पदार्थाचे सेवन महत्वाचे...हि सर्व प्रकिया हि कफनाशक असली पाहीजे तसेच दुपारी सुर्य मध्य असता पित्तकाळ सुरु होतो त्यामुळे जेवनही होने गरजेचे काळ १२-२
आहार - चपाती( गहु/ ज्वारी/ नाचनी/ बाजरी)
सर्व पालेभाज्या व कप भर ताक जेवल्यानंतर घ्यावे..तसेच जेवल्यानंतर ३० मि नंतर पाणी प्यावे ..
जेवल्यानंतर लगेच झोपु नये तर थोडे चालावे जेने करुन अण्न पचन चांगले होते.. व पाणी नेहमीच पिताना कोमट घ्यावे...!!
संध्याकाळी सुर्यास्तानंतर जेवन अल्प करुन म्हनजेच ७ -८ दरम्यान चपाती भाजी घ्यावे,उगाच फार उशीरा जेवने हे अपचनास कारन ठरते.. रात्री झाेपतांना १ कप भर दुध नियमाने घ्यावे...
असा आहार व विहार हा रुतुनुसार बदलतोही त्यामुळे योग्य आयुर्वेद तज्ञ कडुन मार्गदशन घ्यावे....
वार्धक्यात गुडघेदुखी ,कंबरदुखी व मनक्याचे आजार ,दमा,पोटाचे विकार हे सतत त्रास देत असतात त्यामुळे औषधि चिकित्सा व पंचकर्म चिकित्सा ही फार लाभदायक ठरते,पंचकर्म शरीर शुध्दी चिकिक्सेने शरीरातील वाढलेले आज़ार कमी होतात ,त्यात स्नेहन,स्वेदन म्हनजेच शरीराची औषधी तेलाने मालीश व औषधी द्रव्याची वाफ दिली जाते जेनेकरुन शरीरावरील सुज,वेदना कमी होतात तसेच वाढलेल्या दोशांना एकमार्ग मिळुन ते कोष्टात जमा होतात व वमन,विरेचन ,बस्ती ,शिरोधारा,नस्य ह्या पंचकर्म चिकित्सेने वाढलेल्या दोषांना शरीराबाहेर काढता येते ...
हि पंचकर्म चिकित्सा हि शरीरातील बारीक पेशी मधील Toxic (दुष्य ) बाहेर काढन्यास मदत करते जेनेकरुन गुडघे मनके ई मघील झिज असो वा पोटाचे विकार असो वा हाता पायाची सुजीत असो हि कमी होन्यास मदत होते...
ज्याप्रमाने रुतुनुसार आहार बदलतो त्याप्रमाने रुतुनुसार पंचकर्म करनेही चांगलेच..
पावसाळ्यात वाताचे आज़ार जास्त होतात त्यात गुडघे,मनक्याचे आज़ाराचे वेदना प्रबळ होतात त्यामुळे त्यात बस्ती चिकित्सा म्हनजेच औषधी तेल वा काढ्याचा (Enema)बस्ती घ्यावा हे प्रकर्षाने Nervous system चेतनासंस्थेवर काम करते ह्या सर्व नसा Neutrition आहार शोषनासाठी पक्वाशयात प्रविष्ट असतात ,झाडाची मुळें जसे पानी व इतर मुलद्व्य मुळातुन शोषतात त्याप्रमानेच ह्या नसाही पक्वाशयातुनच आहार शोषुन घेतात त्यामुळे ह्या नसांमध्ये वा पर्यायी हाडांमध्ये काही बिघाड झाल्यास तर त्याचे मुळ कारन हे पक्वाशयच असते म्हनजेच मल मुत्र विघटन वा अन्नपचन ह्यात बिघाड हा होतोच,त्सामुळे ह्या चेतना संस्थेचे आज़ार बरे करतांना पक्वाशयाचा विचार करने गरजेचे ठरते व गुदमार्गे दिलेल्या बस्ती मध्ये आजारानुसार औषधी तेल वा काढ़े वापरुन ते आज़ार काही दिवसातच बरे होतात.
तसेच हिवाळ्यात पित्ताचे आज़ार वाढतात त्यात अम्लपित्त,अंगावर खाज ई आज़ार हे स्नेहन,स्वेदन करुन औषधी तुप पिन्यास देवुन दोषांना एकत्रित करुन जुलाब एकाच दिवशी देवुन बाहेरसकाढले जातात.. ह्यात कुठलाही त्रास होत नाही
ह्यात एक गोष्टी लक्षात घेतली पाहीजे ती हि की,औशधी तुप जे पिन्यास दिले जाते ते शरीरातील सुक्ष्मातीसुक्ष्म पेशीपर्यत पोहचुन तेथील वाढीव दोशांना कोष्ठात म्हनजेच पोटात घेवुन येते व मग शरीरातुन ते जुलाबावाटे काढावे,ह्यात पुरवीं स्नेहन स्वेदन केल्याने शरीराला काही त्रास होत नाही परंतु वैद्याच्याच मार्गद्शनाने पंचकर्म करावे..
तसेच उन्हाळा पुरवी कफासाठी वमन म्हनजेच उल्टी देवुन कफ बाहेर काढला जातो हि प्रकिया विरेचनासारखी स्नेहन व स्वेदन
दिले जाते व नंतर वमन .. देतात...
तसेच रुतुवितरित आजारांनुसार कधीही पंचकर्म केले तर ते वैद्याच्या सल्यानुसार करावे....
जसी गाडीची सर्विसींग केल्यानंतर चांगले आँईल व पेट्रोल गरजेचे असते तसेच रसायन औषधे हि गरजेची असतात.. जेने करुन शरीराला बल,प्रतिकार शक्ती व अपुनर्भव चिकित्सा म्हनजेच तो आज़ार परत होवु नये हि चिकित्सा... पंचकर्मनंतर केली जाते....!!
वर्षातुन एकदा पंचकर्म केल्याने शरीर रोगमुक्त व त्याची प्रतिकार शक्ती नक्कीच वाढते व आज़ार होन्यापासुन आपन तो रोखु शकतो...!!
त्यामुळे वार्धक्य हो शाप नसुन आयुर्वेद संगे वरदान आहे..
आयुर्वेद सर्वासाठी....!!!
साईनाथ आयुर्वेद
ठाणे/ पुणे.
9821832578

Wednesday, September 14, 2011

॥ एकांगवीर रस ॥

॥ एकांगवीर रस ॥

शुद्धगन्धं मृतं सूतं कांतं वंगं च नागकम्‌ ।
ताम्रं चाभ्रं मृतं तीक्ष्णं नागरं मरिचं कणा ॥
सर्वमेकत्र संचूर्ण्यं भावयेच्च पृथक्‌ त्र्यहम्‌ ।
वराव्योषकनिर्गुण्डीवन्हिकार्द्रकजैः द्रवैः ॥
शिग्रुकुष्टद्रवेणापि ततो धात्र्या द्रवेण च ।
विषमुष्ट्यार्कहाटैःश्च आर्द्रकस्य रसैस्तथा ॥
रसश्चैकांगवीरोsसौ सुसिद्धो रसराड्‌ भवेत्‌ ।

पक्षघातं चार्दितं च धनुर्वातं तथैव च ॥
अर्ध्दांगं गृध्रसीं वापि विश्वाचीमपबाहुकम्‌ ।
सर्वान्वातामयान्हन्ति सत्यं सत्यं न संशयः ॥

भारत भैषज्य रत्नाकर
प्रथम खण्ड
एकारादि-रस
पृष्ठ क्र॰ १९५
पाठ क्र॰ ५८५

मूळ पाठ
वृद्ध निघण्टुरत्नाकर॰ वातव्याधीचिकित्साप्रकरणम्‌
================================॥
मूळ पाठ

सर्व आर्ष ग्रंथांत 'एकांगवीर रस' ,
सर्वप्रथम वृद्ध निघण्टु रत्नाकर मध्ये लिखित स्वरुपात दिसतो.

भारत भैषज्य रत्नाकर पाहिल्यास
इतर कोणत्याही ग्रंथात हा पाठ नसल्याचे दिसते.

एक पाठ असल्याने विशेषशुद्धी किंवा पाठ विनिश्चयाची विशेषत्वाने
गरज नाही.

तरीही वृद्धवैद्यक परंपरेत काय सांगितले आहे हे जाणून घेणे ही
आवश्यक आहे.

त्यासाठी, उपलब्ध ग्रंथसंपदेतील, "आयुर्वेदीय औषधिगुणधर्मशास्र" ह्या
"वैद्यपंचानन गंगाधरशास्री गोपाळराव गुणेशास्रीं"च्या चिकित्सानुभव व
औषधी कल्पांचे सुस्पष्ट आयुर्वेद-शास्रीय विवेचन वाचनाचाच मार्ग
आद्य व अग्र्य ठरतो.

१.    शुद्धगन्धं    =    शुद्ध गंधक
२.    मृतं सूतं     =    मारीत पारद
३.    कांतं     =    कान्त लौह भस्म
४.    वंगं च     =     वंग भस्म
५.    नागकम्‌ ।    =    नाग भस्म
६.    ताम्रं     =    ताम्र भस्म
७.    चाभ्रं मृतं     =    अभ्रक भस्म
८.    तीक्ष्णं     =    तीक्ष्ण लौह भस्म
९.    नागरं     =    सुंठ
१०.    मरिचं     =    मिरे
११.    कणा ॥    =    पिप्पली
सर्वमेकत्र संचूर्ण्यं ,
भावयेच्च पृथक्‌ त्र्यहम्‌ ।
१.    वरा        =    त्रिफळा क्वाथ  
२.    व्योषक        =    त्रिकटु क्वाथ  
३.    निर्गुण्डी        =    निर्गुडी क्वाथ
४.    वन्हि        =    चित्रक क्वाथ
५.    शुद्धार्द्रकस्य रसैस्तथा ॥    =    शुद्ध आल्याचा स्वरस
६.    शिग्रु        =    शेवगा त्वक् क्वाथ
७.    कुष्टद्रवेणापि ततो     =    कोष्ठ क्वाथ
८.    धात्र्या द्रवेण च ।    =    धात्री क्वाथ
९.    विषमुष्टी        =    कुचलाबीज क्वाथ
१०.    अर्क        =    रुई मूळ क्वाथ
११.    हाटैःश्च         =    कांडवेल क्वाथ
१२.    आर्द्रकस्य रसैस्तथा ॥    =    आल्याचा स्वरस *

मात्रा     =    १/२ ते १ गुंज      
    =    ६० mg to १२० mg

काल    =    स, व्यानोदान /  व्यानोदान / अपानौ

फलश्रुती    =  
१.    पक्षाघातं
२.    अर्दितं
३.    अनुर्वातं
४.    अर्धाड्गं
५.    गृध्रसीं
६.    विश्वाची
७.    अवबाहुकम्‌
८.    सर्वान्वातामयान्‌
॥ =============॥ पक्षाघाते एकांगवीर रसः ॥ ===============॥
पक्षाघात अथवा अर्धांगवायु => (कोणाला होतो ?)
हा विकार १. त्रासिक, चिडखोर, संतापी

२. ज्यांच्या रक्तवाहिन्या उपदंशादिक विकारांच्यामुळे विकृत झालेल्या असतात,
अश्या माणसांना होतो.
 पक्षाघाताची सम्प्राप्ति कशी घडते ??=================>>
मनाच्याविरुद्ध काही गोष्टी झाल्यामुळे
असल्या तिडतिड्या माणसात
एकाएकी संताप येऊन
एकदम सर्व शरीरभर खळबळ उडून जाते,
त्यामुळे =>
१ } विकृत झालेल्या रक्तवाहिन्यांत रक्तसंचय जास्त होऊन
त्याचा दाब हा मेंदू व वातवाहि केंद्रे ह्यांवर होऊन
पक्षाघात उत्पन्न होतो;

किंवा

२} रक्तवाहिनी फुटून तिच्यातून रक्तस्राव होऊ लागतो.
आणि
रुधिराचा साठा...
ज्ञानकेंद्राच्या बाजूला झाल्यामुळे
त्या माणसाची जाणीवनेणीव नष्ट होते,
किंवा
थोड्या अंशाने कमी होते.
शरीरातीळ संचालनक्रियेवर त्याचा ताबा रहात नाही.
स्नायुंच्यामुळे शरीरातील चलनवलनादि व्यापार सुरु असतात.
स्नायुंवरचा ताबा कमी झाल्यामुळे
ते व्यापार होईनासे होऊन
रोगी विगलित झाल्यासारखा होतो,
चलनवलनादिकाच्या कार्यास विरोध येतो,व्यत्यय येतो
म्ह्णून
आयुर्वेदात त्याची गणना "वातविकृतीत" केली आहे.

ह्या आजारात साधारणतः
अवस्थाभेदाने दोन तर्‍हेची चिकित्सा करता येते.
अ ] तीव्र अवस्थेत
रक्तवाहिनी फुटून रक्ताचा स्राव झालेला असतो,
त्याचे
१ .प्रसादन करणे
२. फुटलेल्या रक्तवाहिनीचे घटक नवीन तयार होऊन
ती सांधली जाऊल अशी तजवीज करणे,
आणि

ब ] जुनाट अवस्थेत
रक्तवाहिनी फुगण्याची अथवा फुटण्याची शरीरास लागलेलि सवय नाहीशी
करण्याचा प्रयत्न करणे.
आपल्या इकडे रक्तप्रसादन करणारी जी औषधे आहेत;
त्यात =>
१. ताप्यादि लौह
२. स्वर्णमाक्षिक भस्म
३. शिलाजतु
४. गुग्गुल
ही मुख्य आहेत.
याच्या योगाने रक्ताचे प्रसादन होऊन फुटलेली रक्तवाहिनी सांधते.
रक्तवाहिनी सांधली गेली म्हणजे थोडा कालपर्यंत बरे वाटते.
परंतु पुनः पूर्ववत्‌ कारण घडल्यास रोग्यास पुनः पक्षाघाताचा झटका येतो.
म्हणून रक्तवाहिन्यांना जडलेली ही सवय नाहीशी करणारे असे एखादे औषध या

जुनाट अवस्थेत देणे जरुर असते.
आयुर्वेदाच्या उपपत्तीप्रमाणे रक्ताचे वहनकार्य वायूच्या प्रेरकत्वामुळे घडून येत असते.
वाताच उद्रेक जास्त झाला म्हणजे रक्ताचे उद्वहन कार्यही जास्त वेगाने होते.
रक्तवाहिनीची फुटण्याची सवय नाहीशी करावयाची असल्यास
रक्ताचे उद्वहनकार्य बेतावर आणने जरुर असते.
हे कार्य एकांगवीराच्या योगाने चांगल्या प्रकारे घडून येते. ॥ =============॥ अर्दिते धनुर्वाते अर्धाड्गे एकांगवीर रसः ॥ ===============॥

पक्षाघात हा केवळ शरीराच्या अर्ध्या भागालाच होतो असे नाही,
तर कित्येक वेळेला
फक्त
एका हाताला
किंवा
एका पायाला
किंवा
कमरेच्या खालील भागाला
किंवा
तोंडाच्या एका बाजूला
अशा प्रकाराने
निरनिराळे पक्षाघात होतात.

ह्या सर्व ठिकाणी विशिष्ट स्नायूंची चलनवलनादि शक्ति कमी झालेली असते.
ह्या सर्व प्रकारात
एकांगवीर रस निरनिराळ्या अनुपानांबरोबर द्यावा.

धनुर्वाताच्या विकारात शरीराच्या कोणत्या तरी भागात अभिघातजन्य
किंवा
इतर अशी जखम झालेली असते
आणि ती जखम व्रणचिकित्सेच्या अनुरोधाने नीट चिकित्सित न झाल्यास आणि

दूषित झाल्यास त्या जखमेतून धनुर्वाताचे विवक्षित जंतू शरीरात प्रविष्ट होऊन

वातप्रकोपास निमित्तकारण होतात,
वातदोष स्नायू, व शिरा यात प्रकुपित होऊन सर्व शरीराला धनुष्याप्रमाणे वाकवितो,
आणि म्हणूनच यास धनुर्वात म्हणतात.
यालाच अपतानक, आयाम इत्यादि संज्ञा लक्षानुरोधे प्राप्त झालेल्या आहेत.

ह्या रोगाच्या प्रथमावस्थेत=>मोठ मोठाले झटके येऊन सर्वांग वाकते,
दाभाड बसते,
मनुष्यास शुद्धि असते,
परंतु गिळण्याची सोय असत नाही,
ह्या अवस्थेत ==>>"कालकूट रसा"<<== चा चांगला उपयोग होतो.
परंतु
दवीतीयावस्थेत =>तीव्रावस्था नाहीशी झाल्यानंतर, सर्वांगास एक प्रकारचा लुळेपणा आलेला असल्यास व स्नायूंची शक्ति क्षीण झाल्यासारखी असल्यास
==>>"एकांगवीरा"चा<<== त्यानंतर उपयोग होतो. ॥ ==========॥गृध्रसीं / विश्वाचीम्‌ / अपबाहुके एकांगवीर रसः ॥==========॥

कुल्ल्यापासून प्रारंभ होऊन
कंबर => मांड्या => गुडघे => जांघाडे व पायापर्यंत
वारंवार चमका निघतात.
सगळा पाय ताठल्यासारखा होतो.
पाय लुळा पडल्या सारखा होतो.
अति तीव्र वेदना कित्येक वेळेला होतात.
सुयांनी टोचल्यासारखे होते.
पण जागच्या जागी जखडल्यासारखा होतो
आणि
जरा वेळ पाय उभा केला,
की वारंवार त्यात स्पंद उत्पन्न होतात.
ह्या विकारास गृध्रसी अशी संज्ञा आहे.
गृध्रसीत वातप्रधान लक्षणे असता एकांगवीर द्यावा.

हाताच्या बोटांपासून वेदना सारख्या चढत चढत जाऊन हात अगदी भारावून जातात. बोटांनी काही काम होऊ शकत नाही यत्किंचित उचलले किंवा काही धरले, की सर्व बोटांतून सारख्या मुंग्या येऊन धरलेला जिन्नस पडून जातो, व तो केव्हा पडला ही जाणीव रहात नाही. या अवस्थेत एकांगवीर चांगला उपयोग होतो.

एकांगवीरात
कांत-वंग-नाग -ताम्र-अभ्रक-तीक्ष्णलोह ही बॄंहण, जीवन व रसायन औषधे आहेत.
वातरोगांत बृंहण हेच शमन असते. या न्यायाने ही वातशामक औषधे आहेत.

पारद कज्जली - रसायन, योगवाही  व जंतुघ्न अशी आहे.
भावना = वातप्रशमन करणार्‍याच औषधांच्याच आहेत.
हे औषध अत्यंत तीक्ष्ण आहे.
त्यामुळे त्याचा उपयोग वातप्रधान कीवा कफप्रधान विकारांत करावा.
पित्तानुबंध सता उपयोग करणे इष्ट नसते.
संदर्भ ग्रंथ = 
"आयुर्वेदीय औषधिगुणधर्मशास्र" By
"वैद्यपंचानन गंगाधरशास्री गोपाळराव गुणेशास्रीं




वैद्य प्रशांत प्रभाकर वाघमारे


श्री पुनर्वसु आयुर्वेदिक चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्रयश श्री प्लाझा ; दुकान क्रमांक : ०६ ; सेक्टर - ८;
सानपाडा ; नवी मुंबई -४००७०५.
vdppwaghmare@gmail.com
vdppw.punarvasuacpc@yahoo.in
९८६७ ८८८ २६५
--
Vd. P.P.W.Shree Punarvasu AcPc & RcYashShree Plaza.
Shop  No. - 6 ; Sector - 8.
Near 7th Day Heigh-School.
Sanpada;Navi Mubai- 400705.
vdppwaghmare@gmail.com
vdppw.punarvasuacpc@yahoo.in
9867 888 265
 
JOIN US ON facebook :
श्री पुनर्वसु आयुर्वेदीक चिकित्सालय ; सानपाडा ; न. मुं.-७०५
 
VISIT OUR WEBSITE :

Friday, December 17, 2010

हृदय

हृदय शरिराच्या वेगवेगळ्या भागांना रक्त पुरवठा करते. हृदयाला प्राणवायूयूक्त रक्तपुरवठा करणाऱ्या शुध्द रक्तवाहिन्यांना हृदयधमन्या (कोरोनरी आर्टरी )असे म्हणतात.
जर अशा धमन्यांमध्ये अडथळे येऊ लागले तर हृदयाला रक्त मिळत नाही व ते मरते. ह्यालाच हृदयविकार म्हणतात.
हृदयविकारात धोक्याची पातळी हृदयाच्या स्नायुंना किती दुखापत झाली आहे यावर अवलंबून असते. मृत स्नायुंमूळे हृदयाला होणार्‍या रक्त पुरवठ्याचा वेग कमी होतो (कंजेस्टीव हार्ट फेल्यूअर) होतो व त्यामुळे पाऊलांना घाम फुटून श्वसनास त्रास होतो.
कारने आपण जसजसे मोठे होत जातो, शरिराच्या वेगवेगळ्या भागातल्या रक्त वाहिन्यांमध्ये आतून कोलेस्ट्रॉलचे थर साठू लागतात, ज्यात कोरोनरी आर्टरीचा देखील समावेश असतो. त्याचा परिणाम म्हणजे रक्तपुरवठ्यात अडथळा येतो. रक्तवाहिन्यांच्या अशा पद्धतीने चिंचोळ्या होण्याला अथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हृदयविकार जास्त प्रमाणात आढळतो. सामान्यत: महिला सेक्स हार्मोन इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉनमूळे सुरक्षित आहेत. ह्याचा प्रभाव कमीतकमी पाळी जाईपर्यंत तरी राहतो. भारतीयांसहित अनेक आशियाई विकासनशील देशांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढलेला दिसून येतो. ज्यात खालील कारणांचा समावेश आहे :
•धूम्रपान करणे •मधूमेह •उच्च रक्तदाब •लठ्ठपणा •उच्च कोलेस्ट्रॉल, आणि कमी एचडीएल व वाढीव कोलेस्ट्रॉल •शारिरीक श्रमाची कमतरता •अनुवंशिकता •तणाव, रागीटपणा आणि चिंता •वंशानुगत मुद्दे
लक्षणे
काहीवेळा लक्षणे ओळखणे फार अवघड असते आणि अन्य लक्षणे दिसू शकतात. सामान्यतः •छातीच्या मध्यभागी खूप तीव्र वेदना होतात आणि श्वसनास त्रास होतो. •घाम येणे, मळमळ आणि चक्कर येणे ही देखील काही लक्षणे आहेत. •साधारणपणे या वेदना छाती व पोटाच्या मधोमध किंवा पाठीच्या मणक्यात असतात •तिथून त्या मान किंवा डाव्या हातात जाऊ शकतात. •इतर लक्षणे जसे मळमळ, ऊलट्या, अस्वस्थता, कफ, कंप अशी आहेत व ह्या वेदना सुमारे २० मि. पेक्षा जास्त काळ टिकतात. •काही वेळा रुग्ण पांढरा पडलेला दिसतो, रक्तदाब एकदम कमी होऊन मृत्यू येतो.
•डॉक्टर रुग्णाची सूक्ष्म तपासणी करतात आणि हृदयाची स्पंदने मोजतात आणि रक्तदाब पाहतात. •इलेक्ट्रोकारडिओग्रॅम, ईसीजी घेतला जातो ज्याने हृदयाची विद्युतीय सक्रियता टिपली जाते. •ईसीजी मुळे हृदय किती व कसे स्पंदन करते ते कळते, त्यात काही असामान्य लय आहे का ते दिसते आणि जर ह्रदयविकारामुळे हृदयाच्या मांसपेशींचे नुकसान झालेले असल्यास ते दिसते. •मात्र प्रारंभिक टप्प्यातल्या सामान्य ईसीजीमुळे हृदयविकाराची संभावना होत नाही हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. •हृदयाच्या मांसपेशींचे नुकसान झालेले असल्यास ते रक्ताच्या परिक्षणात दिसून येते. •छातीचा एक्सरेदेखील घेतला जातो. •हृदयाच्या माहितीसाठी इकोकारडिओग्रॅम करता येतो. ही एक प्रकारची स्कँन चाचणी आहे • ज्यात हृदयाच्या समुचित कार्याची माहिती मिळते. •कोरोनरी वाहिकांमध्ये अडथळे पाहण्यासाठी कोरोनरी एंजियोग्राम हा निर्णायक साबीत होतो.

हृदयविकारावर झटकन ऊपचार मिळाल्यास जीवन वाचवता येते. •जोपर्यंत वैद्यकिय मदत मिळत नाही तोपर्यंत रुग्णाला आडवे झोपवावे व त्याचे सर्व घट्ट कपडे सैल करावे. •जर ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध असेल तर रुग्णाला त्वरीत ऑक्सिजन द्यावे. •जर नायट्रोग्लीसरीन किंवा सॉरबिटरेटच्या गोळ्या उपलब्ध असतील तर त्वरीत त्यातील एक गोळी जिभेखाली द्यावी. •पाण्यात ढवळून अँस्प्रीन द्यावे.
•हृदयविकारावर झटकन वैद्यकिय उपचार व इस्पितळात भरती करणे गरजेचे असते. •पहिले काही मिनीटे आणि तास जरा संकटपूर्ण असतात. . प्राथमिक काळात कोरोनरी आर्टरीमधील अडथळे विरघळवण्यासाठी औषधे दिली जातात.
हृदयाच्या स्पंदनांवर लक्ष ठेवले जाते व जर काही अनपेक्षीत स्पंदने आढळली तर त्यावर ऊपचार केले जातात. वेदना कमी करण्याची औषधे दिली जातात व रुग्णास आराम करण्यास व झोपण्यास सांगितले जाते. •जर रक्तदाब जास्त असेल तर रक्तदाब कमी करण्यासाठी औषधे दिली जातात. •प्रत्येक रुग्णाची व त्याला आलेल्या हृदयविकाराची गंभीरता, हृदयाचे नुकसान आणि अडथळ्यांचे प्रमाण व रुग्णाचे वय लक्षात घेऊन ऊपचार पद्धती ठरवली जाते. •कितेक वेळा अडथळे दूर करण्यासाठी काही निश्चित प्रक्रिया आवश्यक असते. ह्यात कोरोनरी एंजियोप्लास्टी, फुग्याने वाहिकांचा अडथळा दूर करणे किंवा कोरोनरी बाईपास सर्जरीचा ऊपयोग केला जातो.

हृदयविकारापासून ज्यांना धोका आहे किंवा वाचायचे आहे त्यांनी खालील नियम पाळावेत : जीवन शैलीत परिवर्तन: 1.आहार स्वस्थ ठेवा ज्यात चरबी आणि मिठ कमी असावे, फाइबर आणि जटिल कार्बोहाइड्रेट उच्च मात्रेत असावे. 2.वजन जास्त असणा-यांनी वजन कमी करावे. 3.शारिरीक व्यायाम रोज करण्याचीदेखील फार गरज आहे. 4.धूम्रपान करु नये व करत असल्यास त्वरित बंद करावे. मधूमेह, रक्तदाब किंवा जास्त कॅलेस्ट्रोल असणा-यांनी त्यांची रोजची औषधे नियमित चालू ठेवून रोगास अटोक्यात ठेवावे.

Monday, November 29, 2010

स्मृतीभ्रंश

  वृद्धावस्थेतील सर्वात नकोसा वाटणारा आजार म्हणजे विस्मरण. यामुळे त्या वृद्ध व्यक्तीनाही अतोनात त्रास होतो. या व्याधीची सुरवात छोट्याश्या गोष्टींनी होते. फ्रीजचं दार उघडणं आणि ते कशासाठी उघडलं हे ना आठवणं, कोणी घरी येणार असल्याचा निरोप सांगायला विसरणं. किल्या कुठे ठेवल्या हे ना आठवणं वगैरे.

कमलाबाई एकदा चष्मा हा शब्दच विसरल्या आणि सर्व घरात माझा गोपाळकृष्ण कुठे आहे म्हणून शोधू लागल्या. शेवटी त्यांच्या नातवाला त्यांनी विचारल्यावर नातवाने त्यांना सांगितलं, 'आजी, तुला गोपाळकृष्ण कशाला हवाय?' त्यावर त्या म्हणाल्या 'अरे, पेपर वाचण्यासाठी!' हे ऐकल्यावर ताबडतोब त्यांना काय हवंय ते नातवाला लक्षात येऊन त्यानेच चष्मा शोधून दिला. ही व्याधी पूर्णपणे टाळता येणे कठीण असते; यासाठी स्मरणाचं कार्य मेंदू कसं करतो ते पाहू.

    आपला मेंदू सर्वप्रथम विविध प्रकारची माहिती संवेदी ज्ञानेद्रीयांच्या द्वारे मिळवतो. म्हणजे आपण आपले डोळे, कान, जीभ, नाक आणि त्वचा या पाच इंद्रियांचा वापर त्यासाठी करतो. मिळालेली माहिती मेंदू साठवून ठेवतो.

यामध्ये दोन प्रकार आहेत. कित्येक वर्षापूर्वीची माहिती साठवणं उदा. आपण लहानपणी शिकलेली स्तोत्र, आरत्या, पाढे हे सर्व आपल्याला मुखोदगत असतं. हा झाला पहिला प्रकार. दुसरा प्रकार म्हणजे अगदी नजीकच्या काळात घडलेल्या घटनांची माहिती साठवणं. या मध्ये अगदी नजीकच्या काळात भेटलेली व्यक्ती, शिकलेल्या गोष्टी, पाहिलेल्या घटना, स्थळे अशा सर्वांचा समावेश होतो. आपण एखादा प्रवास करून येतो. त्यात भेटलेल्या व्यक्ति काही काळ आपल्या लक्षात राहतात, हे या प्रकारचं एक उदाहरण.

मेंदूने साठवलेली ही माहिती आपल्याला गरज पडेल तेव्हा आपल्याला आठवणं हे मेंदूचे माहितीसंबंधीचे तिसरे कार्य. ही सर्व कार्ये बिनबोभाट चालू असतात. कित्येक वर्ष ही कामं विनासायास चालू असतात. याची आपल्याला कल्पनाही नसते. वृद्धावस्थेत जेव्हा स्मृतीभ्रंश होतो तेव्हा प्रथम या बाबतीत आपण विचार आणि काळजी करायला लागतो. ही कार्ये आता वृद्धावस्थेतही व्यवस्थित चालावी यासाठी आपल्याला काही प्रयत्न करावे लागतात आणि ते कोणते याचाच विचार आता आपण करणार आहोत.

    सर्वप्रथम मेंदूच्या माहिती घेणा-या कार्यामध्ये म्हणजे संवेदी ज्ञानेद्रीयांच्या कार्यात सुधारणा करण्यासाठी दृष्टीने काय करता येईल ते पाहू. डॉ.आर्थर विंटर आणि श्रीमती रुथ विंटर यांनी या संदर्भात काही व्यायाम सुचवले आहेत. आपण आता विचार करणार आहोत. योगामध्येसुद्धा उत्तम व्यायाम असतात ते आपल्या क्षमतेप्रमाणे जरूर करावेत. पण यांनी सुचविलेले व्यायाम आणि उपाय अतिशय सोपे, सहज आणि कुणालाही करता येण्यासारखे आहेत.

    संवेदी ज्ञानेद्रीयांपैकी सर्वात महत्वाचं ज्ञानेद्रीय म्हणजे डोळा. त्यामुळे त्याची काळजी घेणं खूप महत्वाचं ठरतं. डोळ्यावर ताण येईल अशा प्रकारे मंद प्रकाशात, बारीक टाईप असलेल्या मजकुराचं वाचन करू नये. सलग दोन तास वाचल्यानंतर १५ ते २० मिनिटे डोळ्यांना विश्रांती घ्यावी. डोळ्यांवर गार पाण्याच्या गुलाब पाण्याच्या घड्या ठेवणे, डोळ्यांवर आपले पंजे ठेऊन थोडा वेळ डोळे मिटून बसणे हे यावरचे काही उपाय. अ जीवनसत्व असलेल्या भाज्या, फळं, मोड आलेली कडधान्य, जवसाची चटणी, मासे, अक्रोड, बदाम यापैकी परवडेल ते सर्व आहारात ठेवणं आवश्यक आहे. डोळ्यात काहीही अजिबात घालू नये. टी.व्ही.सुद्धा जास्त पाहू नये. फार प्रखर प्रकाशाकडे पाहू नये. ओमेगा ३ फॅटी असिड योग्य प्रमाणात पोटात जाईल याची काळजी घ्यावी.

वृद्धावस्थेत होणारे डोळ्यांचे प्रमुख आजार म्हणजे मोतीबिंदू, काचबिंदू, दृष्टी अधू होणं आणि डोळ्यातील पडदा खराब होणं हे आहेत. यापैकी योग्य चष्म्याच्या सहाय्याने काही अंशी तरी अधू दृष्टीवर मात करता येते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दर सहा महिन्यांनी डोळ्यांची डॉक्टरांकडे जाऊन नेत्रतपासणी करून घेणं. कारण यापैकी कोणतीही व्याधी लवकर लक्षात आली तर पूर्ण बरी होऊ शकते. मोतीबिंदूवर यशस्वी शस्त्रक्रिया करता येते. डोळ्यांच्या व्याधीवर आजकाल चांगली औषधेही आहेत.

    आता डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यासाठीचे व्यायाम पाहू. एक छोटा टॉर्च प्रकाशित करून उजव्या हातात धरा. समोर बघत टॉर्च डोक्यावर न्या. फक्त डोळे हलवून टॉर्चकडे पहा. पाच आकडे सावकाश म्हणेपर्यत पहा. हात फिरवून हनुवटीखाली पोटापाशी आणा. फक्त डोळे हलवून त्याकडे पाच आकडे म्हणेपर्यत पहा. आता हलवून टॉर्च उजव्या कानाच्या रेषेत अर्धा फुटावर आणा. फक्त डोळे डाव्या हातात टॉर्चकडे पहा. पाच आकडे सावकाश म्हणेपर्यत पहा. हात फिरवून टॉर्च हनुवटीखाली पोटापाशी आणा. फक्त डोळे हलूवून त्याकडे पाच आकडे म्हणेपर्यत पहा. आता हात हलवून टॉर्च उजव्या कानाच्या रेषेत अर्धा फुटावर आणा. फक्त डोळे हलवून त्याकडे पहा. आता याच तिन्ही गोष्टी डाव्या हातात टॉर्च धरून करा.

हे सर्व व्यायाम (उजव्या व डाव्या हातात टॉर्च घेऊन प्रत्येकी) पाच वेळा करा. आता उजव्या हातात टॉर्च घेऊन तो हात उजवीकडे खांद्याच्या रेषेत सरळ ठेवा. फक्त डोळे हलवून त्याकडे पहा.

    मग तो हळूहळू हात हलवून चेह-याकडे नाकाच्या रेषेत व फुटावर आणा. आता त्याकडे पहा. आता तो हात डाव्या खांद्याच्या रेषेत नेता येईल तेवढा नेऊन पुन्हा फक्त डोळे हलवून त्याकडे पहा. हीच कृती डाव्या हातात टॉर्च घेऊन करा.

 वरील सर्व व्यायामांचे वेळी डोकं अजिबात हलवायचं नाही. फक्त डोळे हलवायचे आणि पाच आकडे म्हणायचे. एक चेंडू किंवा झाडाची फांदी यापासून पाच फुटावर येईल अशा प्रकारे टांगा. त्याला झोका देऊन तो हलत असताना त्याकडे दोन मिनिटे खुर्चीत बसून पहा.

    मग खुर्ची पलीकडच्या बाजूला किंवा त्याच बाजूला दुसरीकडे सरकवून हीच  कृती पुन्हा करा हे सोपे व्यायाम आणि योग्य आहाराद्वारे आपण आपली दृष्टी सुधारू शकतो.

Wednesday, November 24, 2010

वार्धक्यातील दिनचर्या कशी असावी

वार्धक्यातील आजार टाळण्यासाठी दिनचर्या आहार-विहार, नियमितपणा फार महत्वाचा आहे. ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे स्वस्थो रक्षार्थमायुष:

ब्रह्म मुहूर्तावर म्हणजे पहाटे उठावे, बाहेर फिरायला जावे. यावेळी वातावरणात प्रदूषण कमी असते व शरीरातील मलमूत्र इ. अधारणीयवेग निर्माण होण्यास त्याचप्रमाणे मन व शरीर उल्हासित, आनंदी रहायला उपयुक्त आहे. कोमट पाणी तोंडावाटे प्यावे. जमल्यास वातप्रकृती व्यक्तीने तुप व कोष्ण जल प्यावे. तसेच कफ प्रकृतीच्या व्यक्तीने फक्त गरम पाणी प्यावे. मध हा गरम पाणी किंवा गरम पदार्थाबरोबर कधी घेऊ नये.

अभ्यंग- संपूर्ण शरीराला स्निग्ध अशा तेलाने मर्दन करणे, म्हणजे मालिश करणे. आयुर्वेदात प्रत्येकाने रोज न चुकता अभ्यंग केलेच पाहिजे, असे आवर्जून सांगितले आहे. क्षणोक्षणी झिजणाऱ्या शरीरयंत्राला तेल दिल्याने त्या शरीरयंत्राच्या सर्व अवयवरूपी लहान मोठ्या भागाची झीज कमी होते. आयुष्यमान वाढते. शरीराला रोज अभ्यंग करणे शक्य नसल्यास डोके, पाय व कान यांनातरी तेल मर्दन करावे. अभ्यंग साधारणपणे संपूर्ण पाच मिनिटे करावे. अभ्यंगासाठी तिळतेल हे सर्व श्रेष्ठ आहे. ते नसल्यास साधे गोडतेल, खोबरेल तेल वापरावे. त्यानंतर उटण्याने स्नान करावे. साबण शक्यतो टाळावा. त्यामुळे होणाऱ्या त्वचारोगाला आळा बसतो. उटणे नसल्यास डाळीचे पीठ व त्रिफळाचूर्ण वापरावे.

वार्धक्यातील आहार- सर्व सहा रसांनीयुक्त ( मधुर, आंबट, खारट, तुरट, तिखट, कडू) असा आहार असावा, परंतू त्यासाठी जठराग्नि चांगला प्रदिप्त असावा. म्हणजे पचन सुलभ होते. यातही म्हातारपणी अडथळे येतात. उदा. दातांचा अभाव, आर्थिक अडचणीमुळे आहार हा सर्व गुणसंपन्न मिळू शकत नाही. तसेच स्त्रियांना काटकसरी धोरणामुळे शिळे अन्न खाण्याची सवय असते. म्हातारपणी काय करायचे जिभेचे चोचले, वगैरे विचारधारणेमुळे शरीराकडून आपोआप व्यक्त होणाऱ्या इच्छा दडपल्या जातात. तसेच म्हातारपणी एकभूक्त म्हणजे एकदाच जेवून राहावे इ. दृढसमज असतात, त्यासाठी आयुर्वेद सांगतो निसर्गाला शरण जा. जेव्हा भूक लागेल तेव्हाच खा, भूक नसेल तर पाणीसुध्दा पिवू नका.
निवृत्तीनंतर येणाऱ्या औदासिन्याला तोंड कसे द्याल?
वयस्कर व्यक्तींच्या आजारांचं विश्लेषण करताना सामान्यपणे बहुतेक डॉक्टर्स निवृत्तीचं वय हे आयुष्याचे दोन प्रवाह वेगळे करणारी रेषा आहे असं मानतात.

कारण कोणत्याही विशिष्ट कारणाशिवाय धडधाकट व निरोगी आयुष्य असणाऱ्या व्यक्ती शारीरिक व मानसिक तक्रारी करायला सुरूवात करतात. वापर नसेल तर उपयोगिता संपते, हा निसर्गाचा सर्वसाधारण नियम आहे. हाडांचा ठिसूळपणा हा वयस्कर स्त्रियांमधे नियमित व्यायामाचा अभाव असणाचा परिणाम असतो. यामुळे कार्यक्षमता कमी होते. कार्यक्षमता कमी म्हणून हाडांच्या दुखण्यांच्या तक्रारी जास्त व हाडाचा अशक्तपणा कमी करता येतो. व कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. बहुतेक व्यक्तींमध्ये ‘माझं आता वय झालं’ अस म्हणण्याची मनोवृत्ती वाढीला लागली आहे असं दिसून येते.

आपल्या समाजामध्ये सर्वसाधारणपणे घरकाम व संसाराची जबाबदारी स्त्रियांवर सुपूर्द केलेली असते. पण पुरूष मात्र व्यवसाय व अर्थकारण सांभाळतात. निवृत्त झाल्यानंतर अशा कामकरी व्यक्तींच्या आयुष्यात पोकळी निर्माण होते. काही करण्यासारखं नाही अस वाटायला लागलेलं असतं. साधारणपणे निवृत्तीच्या वयाच्यावेळी कोणत्याही व्यक्तीची कार्यक्षमता पूर्णपणे वाढीला लागून ही सर्वोत्तम पातळीची असते. त्यामुळे निवृत्त व्यक्ती ही रीकाम टेकडी, निरूपयोगी व अनावश्यक आहे असे मानणं हे चुकीचं असते.

अकुशल कामगारांच्या बाबतीत मात्र अशी परिस्थिती नसते. ते निवृत्त होऊ शकत नाहीत. त्यांचं हातावर पोट असतं. दिवसा कमावलं नाही तर रात्री खाण्याचे हाल असतात. औद्योगीकरण झालेल्या शहरात अशा प्रकारची सक्ती जर परिस्थितीने निर्माण झाली तर काम करू न शकणाऱ्या वयस्कर व्यक्ती हे एक समाजापुढे मोठं संकट निर्माण होईल. वयस्कर व्यक्तिंच्या बाबतीत शारीरिक ताकद कमी झालेली असते, मानसिक इच्छा कमी झालेली असते पण आयुष्याचा अनुभव गाठीशी असतो, परिस्थितीचा साकल्याने विचार करण्याची क्षमता आलेली असते. अडचणींवर मात करण्याची परिणामकारक उपाययोजना कोणती हे ठरवण्याची परिपक्वता आलेली असते. त्यामुळे मुलगा व वडील ह्यांच्या मध्ये पडणार पिढीचं अंतर हे नातू व आजोबा यांच्यामध्ये मात्र कमी झालेलं दिसून येते.

वयस्कर व्यक्तींमध्ये आढळणाऱ्या बहुतेक मानसिक तक्रारींचं मूळ हे निवृत्तीनंतर आलेल्या मोकळेपणामध्ये असतं असं म्हणता येईल. त्यामुळे निवृत्तीनंतरचं आयुष्य कसं काढायचं हे अगोदर पासून व्यवस्थित ठरवणं व त्याची आखणी करणं हे शहाणपणाचं ठरेल. अगोदरच्या वयामध्ये जे जे करायचे इच्छा होते, आवडी निवडी होत्या, जे छंद जोपासायचे होते जसे बागकाम करणे, संगीत शिकणे, चित्रकला, हस्तकला, स्वयंपाक करणे, या व अशा अनेक गोष्टी निवृत्त झाल्यानंतरच्या काळामध्ये करता येण्यासारख्या असतात. कमावलेल्या पैशांची सुयोग्य आखणी व सुविहीत ठेव योजना ह्यांच्या द्वारे वृध्दापकाळ विनाकष्ट व विनाअडचणींचा काढण्यास सोपं जाईल.

निरनिराळ्या कार्यक्षेत्रात काम केलेल्या वयस्कर नागरिकांचा एक गट जमवून समाजामधील गरजू घटकांना त्यांच्या अनुभवाचा फायदा करून देणं, सल्ला देणं, मार्गदर्शन करणं, ह्या गोष्टी वयस्कर नागरीकांना करता येते. अध्यात्म वा तत्सम विषयांची आवड असणारे त्या विषयाचा अभ्यास करू शकतील. स्त्रियांच्याबाबतीत सुध्दा हे सर्व शक्य आहे काही स्त्रिया समाजकार्य म्हणून समाजातील निम्नस्तरातील अडचणी समजावून घेऊन त्यांच्या अडचणींचं निवारण करण्याचा प्रयत्‍न करू शकतील.

अशक्य, भलतंच, आदर्श असं तुम्ही म्हणाल, दक्षिण भारतातल्या एका स्त्रिबद्दल नुकतीच वर्तमानपत्रात बातमी आली होती. ती घरामध्ये पुल-अप्स काढायची. ती सडपातळ, धडधाकट व चटपटीत आहे. व तिचं वय फक्त शंभर आहे.
एकाकीपणाला हाताळणे
एकटेपणा सहसा विशिष्ट दिवसांत, म्हणजेच सुट्ट्यांचे दिवस, वाढदिवस यांसारख्या खास मोक्याच्या क्षणी जाणवतो. त्यातुनच मग औदासिन्यतेला सुरवात होते. स्वतःला व्यस्त ठेवणे हा त्या एकटेपणावर मात करण्यासाठी सर्वोत्तम उपाय ठरू शकतो.

१. स्वतःला व्यस्त ठेवणे
जर आपण स्वतःला एकाकी मानत असाल तर एक गोष्ट नियमीत करु शकता, की येणारा प्रत्येक दिवस हा उत्साहानेच सुरु झाला पाहिजे. फिरायला जाणे, नवीन ओळखी वाढवणे, छंद जोपासणे, नियमीत पत्र व्यवहार ठेवणे तसेच काहीना काही आयुष्याच्याबाबतीत सकारात्मक ठरवत राहणे हे आयुष्याला नवीन दिशा देतात. इंटरनेट तर संबंधीत विषयाची माहिती भरपुर प्रमाणात उपलब्ध असते. आपले लक्ष आकर्षित करणारी प्रत्येक गोष्ट आत्मसात करावी. छोट्या छोट्या गोष्टीतही स्वतःला व्यस्त ठेवता येतं. जगातील सर्व आनंदी लोक हेच करतात. म्हणजेच जे आनंदी दिसतात ते स्वतःला व्यस्त ठेवायला शिकलेले असतात.

२. स्वतःला गुतंवून ठेवणे.
जर तुम्ही एकाकी असाल तर स्वतःला तुमच्या समाजात सामाविष्ट करुन घ्या. एखादे देऊळ किंवा त्याच प्रकारची ठिकाणे ज्याठिकाणी प्रार्थना केली जाऊ शकते अशा ठिकाणी नियमित जात जावे. सेवानिवृत्त व्यक्ती स्वतःला खूप अडचणीत आणतात. काही खुर्चीत बसून फक्त आकाशाकडे पाहत राहतात तर काही फक्त दुरदर्शन संच पाहण्यात वेळ वाया घालवतात. या दृष्टिकोनामुळे आपण स्वतःला आणखी अडचणीत आणतो. हाच दृष्टिकोन पुढे कायम राहिला तर कायमस्वरूपी एकटेपण अटळ आहे.

३. इतरांना मदत करत राहणे.
तुमच्या औदासिन्यतेत स्वतःबरोबरच इतरांचेही एकटेपण दूर करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. यात तुम्हालाच जास्त फायदा आहे. ज्यांनी आपल्या वृद्धापकाळाच्या योजना बनवल्या नाहीत अशांना चांगल्या प्रकारे मदत केली जाऊ शकते. जगात असे भरपुर लोक आहेत की ज्यांना मदतीची नितांत गरज आहे.

४. स्वतःला चुकीच्या पद्धतीने जगवू नका.
जरी तुम्ही एकाकी असला तरी जास्त झोप काढणे, अती दुरदर्शन पाहणे तसेच दिवसाढवळ्या स्वप्ने पाहणे धोकादायक आहे. कारण त्यामुळे आपण स्वतःला अपराधी गृहित धरायला लागतो. स्वतःच्या या अवस्थेला स्वतःच जबाबदार असल्याचे मानू लागतो. कदाचित यामुळे नैराश्यही येऊ शकते. स्वतःला मद्यपाशात अडकवू नका.

५. आनंदी राहण्याचा पर्याय निवडा.
या औदासिनतेमुळेच नैराश्य व दुःख पदरी येतं. अपयशाशी झुंज देऊन दुःखांवर मात करा. आनंदाने सद्यपरिस्थितीचा स्विकार करा. नैराश्याने काहीच साध्य होणार नाही हे जाणून घ्या. जर एखादा मद्दपी एखादा स्वमदत गट आपलासा करुन आपला मद्यपाश सोडवू शकतो तर आपण अश्याच प्रकारच्या स्वमदत गटाच्या आधारे आपल्या नैराश्यावर मात का करु शकणार नाही. इतरांची मदत घ्या. एखादा समुपदेशक निवडा आणि त्याच्या मार्गदर्शनाने आपला दृष्टिकोन बदला. आजकाल सर्व शहरांमधे, सर्व भागांमधे जेष्ठ नागरिक संघ असतात. त्यामधे आपण सामील होऊ शकता.

६. चांगली विचारसरणी ठेवा.
आपल्या औदसिन्यावर आपल्याला मात करायची असेल तर आपल्याला प्रेरणा देणारे विचार बाळगणे अपरिहार्यच आहे. स्वःताला प्रेरणा देण्यासाठी चांगले संगीत, कविता, विनोद आणि ग्रंथालयाची पुस्तके यांसारख्या सकारात्मक साधनांचा वापर करा. जर आपल्याला वयोमानामुळे कमी दिसत असेल तर वाचनासाठी आपण एखाद्या मित्राची मदत घेऊ शकतो. त्याच्या मदतीने आपण पुस्तकालयातही खरेदीसाठी जाऊ शकतो.

७. सामजिक समुह आपलासा करा.
आज आपल्या आसपास असे असंख्य सामाजिक समुह आहेत. त्या असंख्य समुहांमधून एका सामाजिक समुह्ची निवड करा. वरीष्ठ नागरिकांच्या चर्चासत्रात सहभागी व्हा, नवीन लोकांशी ओळख वाढवा. सामाजिक संमेलनात आपल्याला विभिन्न प्रकारचे व्यक्ती भेटतात. स्वतःला फक्त एका समुहापुरते बांधिल ठेवू नका. आपल्या नजिकच्या बागेत चालणारे हास्य गटात सामील व्हा.

८. अध्यात्मिक जागी जायला हवे.
जर आपण एकाकी झाले असाल तर अशा अध्यात्मिक जागा वरिष्ठ नागरिकांना आकर्षित करतात. हिच आता वेळ आहे ज्यामध्ये आपला जास्तीत जास्त वेळ देवाची आराधना करण्यासाठी द्यायचा आहे. आपली सर्व कर्तव्य पार पडली आहेत. आता ही वेळ स्वतःच्या मनःशांतीसाठी द्यायला हवी.

विचार करा, जागे व्हा, आपले विचार जगापुढे मांडा, सभोवतलचा विचार करा आणि स्वतःबद्दल जास्त विचार करणे टाळा, अन पहा आपला एकटेपणा, आपली औदासिनता आपोआप नाहीशी होईल.
विश्रांती घेण्याची सोपी पध्दत - स्नायू पूर्णपणे शिथिल करणे.
डार्विनच्या ‘सर्वायव्हल ऑफ दि फिटेस्ट’ ह्या सिध्दान्ताप्रमाणे आजच्या वेगवान काळात तग धरून रहायचं असेल तर आपणा सगळ्यांनाच सतत ताण सहन करणं भाग आहे.

तो आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक झालेला आहे. आपल्या पैकी बहुतेकांना हे ताण तणाव सहन करण्याचे निरनिराळे मार्ग उपलब्ध आहेत. मात्र काहीना अशी काहीच सोय नसते. त्यामुळे दुसऱ्या वर्गातली माणसे अशा तणावांच्या भाराने पूर्ण वाकतात व त्याच्या मध्ये उच्च रक्तदाब, अस्वस्थपणा, चिडचिड उतावळेपणा, इत्यादी गोष्टी उद्‌भवतात. खाली एक विशिष्ट स्नायू शिथिल सोडून विश्रांती घेण्याची पध्दत देत आहोत. ज्यांनी अजून पर्यंत असे ताण कमी करण्याचे दृष्टीने काही प्रयत्‍न केलेले नाहीत. त्यांनी ही सुरूवात करावी ज्यामुळे त्यांना ताण कमी करण्यासाठी फायदा होईल अशी आम्हाला आशा आहे.

त्यातल्या त्यात शांत अशी जागा शोधा. तुमचे कपडे सैल करा. चष्मा, शूज इत्यादी काढून टाका. पाठीवर झोपा. दोन पायामध्ये अंतर ठेवा. हात मागे घेऊन तळवे वरच्या दिशेला ठेवा हळुहळू डोळे मिटा. सखोल श्वास घ्या. पाच पर्यंत अंक मोजा व पाच अंक मोजत श्वास हळुहळू सोडा. हे सर्व चार-पाच वेळा परत परत करा. स्वत:च स्वत:ला ‘विश्रांती घे’ असं सांगा. किंवा ‘जाऊन दे’ असं सांगा. तुम्हाला जे सोईस्कर वाटेल ते करा. ही सर्व क्रिया लक्ष केंद्रित करून करा म्हणजे तुमचं तुम्हाला ताण व शिथीलता यातील फरक जाणवेल.

पायाच्या अंगठ्याकडून सुरूवात करून डोक्याच्या दिशेनं हळुहळू प्रत्येक अवयवावर लक्ष केंद्रित करून हे सर्व हळु हळू करा. प्रत्येक अवयवाचे स्नायू घट्‌ट करून हळुहळू शिथिल करा. हे सर्व सखोल श्वास घेऊन करा. परत शिथिल व्हा. शैथिल्य पूर्णपणे अनुभवा. मगच शरीराची अवस्था बदला. घाई करू नका. हाच अभ्यास ह्ळुहळू केल्यानंतर ताणतणाव कमी होणं व विश्रांती मिळणं यातील फरक कळेल व शांतता आणि विश्रांती म्हणजे काय याचे मूळ उमजेल. http://marathi.aarogya.com

वृद्धत्त्वामुळे नेहमी येणा-या अडचणी

वृद्धत्त्वामुळे नेहमी येणा-या अडचणी अनेक असतात. मुत्राशयाच्या समस्या, दृष्टीमध्ये येणा-या अडचणी, अलझायमर, डिमेंशिया, ह्रदयविकार अशी अनेक उदाहरणे आहेत. सुरवातीला आपण मुत्राशयातील समस्यांबद्दल माहिती घेणार आहोत.

वयोमानामुळे घडत जाणारे बदल
मुत्राशयावर संयम न रहाणे ही फक्त वृद्ध स्त्रीयांमधील व्याधी नसून पुरुषांमधेही दिसून येते. खरे तर ही अडचण कोणत्याही वयात येऊ शकते. परंतु वृद्धत्त्वामधे सर्वात जास्त दिसते. मूळव्याध, बद्धकोष्ठ, काही ठराविक औषधे घ्यावी लागणे, मुत्राशयावर एखादा रोग-संचार (इन्फेक्शन) होणे अशी कारणे सुद्धा मुत्राशयावर संयम न रहाण्यासाठी पुरतात. मुत्रपिंडाचा एखादा स्नायू दुबळा झाला, मुतखडा (किडनी स्टोन) झाला, पार्किन्सन्स किंवा अर्थ्रायटीस सारखा मुत्रपिंडावरचा संयम जाऊ शकणारा आजार झाला तर काही वेळा त्यामुळे आलेली मुत्रपिंडावरची अस्वस्थता ही जास्त कालावधीसाठी टिकून रहाते. वृद्धत्वामधे लघवी करत असताना मुत्राशयातले स्नायू कधी कधी आकुंचित पावतात. त्यमुळे योनीमार्गात जळजळ होऊ शकते. आणि त्याच वेळी मुत्राशयाच्या आजुबाजूचे अवयव शिथील होतात आणि संयम नसताना लघवी होऊ शकते.

मुत्राशयावर ताबा नसलेली अनेक माणसे ह्या व्याधीबद्दल डॉक्टरांशी बोलण्याचे टाळतात. पण खरे तर प्रथम थोडा त्रास होत असेल तरीही डॉक्टरांशी बोलणे अत्यंत जरूरीचे असते. कारण उपचारामुळे मुत्राशयाचा थोडा जरी त्रास असेल तरीही तो आटोक्यात येऊ शकतो. अशावेळी तुम्ही डॉक्टरांकडे गेलात तर डॉक्टर तुमच्या अनेक चाचण्या घेतील, तुमच्या आरोग्याचा पूर्व इतिहास विचारतील, कौटुंबिक आरोग्याचा इतिहास विचारतील, आणि त्यावरून तुमच्या उपचारांचा निर्णय घेऊन सुरवात करतील. डॉक्टर कदाचित तुमची मल-मूत्र चाचणी, रक्त तपासणीही करायला सांगतील आणि तुमचे मुत्रपिंड कितपत रिकामे होऊ शकते ह्याचीही चाचणी घेतील.

मुत्राशयावर संयम न रहाण्याची अनेक कारणे असू शकतात.
१. तणाव असंयमन
व्यायाम करताना, खोकला येताना, कफ असेल तेव्हा, शिंकताना, जोरात हसताना, एखादी जड वस्तू उचलताना किंवा शरिरावर ताण येणारी कोणतीही हलचाल करताना जेव्हा थोडी लघवी होते, त्याला मुत्राशयाचे तणाव असंयमन म्हणतात. मध्यम वयीन स्त्रीयांमध्येसुद्धा ही व्याधी दिसून येते. बाळंतपण झाल्यावर किंवा मेनॉपॉझ सुरू झाल्यावर स्त्रीयांना ही अडचण येऊ शकते.

२. घाई होणे, आणि ताबा न रहाणे
लघवीसाठी जाताना त्या जागी पोहोचे पर्यन्तसुद्धा काहीजण स्वत:वर ताबा ठेउ शकत नाहीत इतकी त्यांना घाई होते. सुदृढ-निरोगी व्यक्तींमधे सहसा ही अडचण दिसत नाही, परंतु मधुमेह झालेल्या व्यक्ती, स्ट्रोक, अल्झायमर, पार्किन्सन्स ह्या व्याधींसहीत जगणा-या व्यक्तींमधे लघवीवरील ताबा न रहाण्याची अडचण ब-याचदा दिसून येते. ही काहीवेळा ब्लॅडर कॅन्सरची पूर्वसूचनाही असू शकते.

३. अतिप्रवाह असंयमन
मुत्रप्रवाहावर असंयमन होते, जेव्हा थोडी लघवी न होता खूपच जास्त होते. पुरुषांचे प्रोस्टेट जेव्हा वाढते तेव्हा त्यांना अनेकदा ह्या व्याधीला सामोरे जावे लागते. मधूमेह किंवा मणक्याची काही व्याधी ह्यामुळे सुद्धा अतिप्रवाह असंयमनाची अडचण वाढू शकते.

४. सामान्य असंयमन
वृद्ध व्यक्तींमधे मुत्राशयावरील सामान्य असंयमनाची अडचण अनेकदा येते. ही अडचण अशांवर येते, ज्यांचे मुत्राशयावरील संयमन सर्वसामान्य आहे परंतु त्यांना लघवी लागल्यावर इतर काही कारणांमुळे उठायला त्रास होतो, चालायला त्रास होतो, अर्थ्रायटीस, गुडघे दुखी, अशक्तपणा ह्या व्याधींमुळे ही अडचण येऊ शकते. फक्त त्याचे गांभीर्य कितपत आहे आणि ते त्या वृद्ध व्यक्तीने कशा त-हेने घेतले आहे, आणि त्यांची जीवनशैली कशी आहे ह्यावरही ते अवलंबून असते.

५. मुत्राशयावरील नियंत्रणाचे प्रशिक्षण
आपल्या मुत्राशयाची काहे व्याधी सुरू झाली असेल लघवीवरील नियंत्रण जात असेल तर डॉक्टर आपल्याला ते नियंत्रण कसे ठेवायची ह्याचे प्रशिक्षण देतात. ह्यासाठी खरं तर अनेक मार्ग आहेत, परंतु आपल्या मुत्राशयाची व्याधी नेमकी काय आहे ह्यावर सुद्धा ते प्रशिक्षण अवलंबून असते. आणि प्रशिक्षण आत्मसात केल्यास आपण योग्य असे नियंत्रण मुत्राशयावर ठेऊ शकतो.

६. पेल्विक स्नायूंचा व्यायाम
पेल्विक स्नायूंच्या व्यायामाला केगल व्यायाम असेही म्हणतात. हा व्यायाम आपले मुत्राशयाजवळचे काही स्नायू बळकट करण्यासाठी उपयोगी ठरतो. हा स्नायू बळकट झाल्याने वृद्ध व्यक्तींना लघवीवर संयम राखणे सोपे जाते. तसे पहाता हे व्यायाम खूप सोपे आहेत. त्यामुळे आपला ताणही हलका होतो.

बायोफीडबॅक
तुमच्या शरिराकडून येणारे संदेश ओळखण्यासाठी बायोफीडबॅकची मदत होते. त्यामुळे मुत्राशयाजवळच्या स्नायूंवर संयम आणण्यासाठी सुद्धा मदत होते. पेल्विक स्नायूंचा व्यायामासाठी सुद्धा बायोफीडबॅकचा उपयोग केला जातो.

मुत्राशयावरील नियंत्रणाचे प्रशिक्षण हा एकच मार्ग नसून इतरही अनेक मार्ग आहेत. काहीजणांना असंयमनावर नियंत्रण आणण्यासाठी डॉक्टर औषधे देतात. त्या औषधांनी नुसते नियंत्रणच येते असे नाही, तर स्नायू बळकट होतात, मुत्राशय पूर्ण रिकामे व्हायला मदत होते. परंतु ह्या औषधांचे काहीवेळा दुष्परिणामही दिसून येतात. तोंड कोरडे पडणे, डोळे कोरडे पडणे इत्यादी.
http://marathi.aarogya.com

Visit Our Page