Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Wednesday, October 21, 2015

आयुर्वेद्वारे त्वचेची काळजी

आयुर्वेद्वारे त्वचेची काळजी 
आयुर्वेदामध्ये त्वचा, केस आणि शरीरासंबंधी विविध समस्यावर उपचार आहेत. खाली असे काही उपचार दिले आहेत. पण या उपचारांचा वापर करण्यापुर्वी छोट्या प्रमाणात वापर करून बघा.

विविध त्वचा प्रकारात वनौषधी फेस पॅक
त्वचेला उजाळा आणण्यासाठी व कांती चमकदार होण्यासाठी फेस पॅककोरड्या रुक्ष व सुरकुतलेल्या त्वचेसाठी
तेलकट त्वचेसाठी फेस पॅकऍक्‍ने व मुरमे होणाऱ्या त्वचेसाठी
डागयुक्त त्वचेसाठी फेस पॅकडाग आणि रंगासाठी
डोळ्याखाली काळी वर्तुळे कमी करण्यासाठी क्रिमत्वचा उजळ करण्यासाठी
सर्वोपयोगी वनौषधीयुक्त फेस पॅककातडी वरील पांढऱ्या डांगासाठी

आरोग्यपुर्ण व तजेलदार त्वचेसाठी फेस पॅक
हा फेस पॅक सर्व प्रकारासाठी उपयुक्त आहे. यामुळे मधील मृत पेशी काढुन टाकल्या जातात. यामुळे त्वचा ताणली जाउन त्वचेवरील डाग जातात. व त्वचा तजेलदार होते.

घटककृती
ज्येष्ठमध १/२ टीस्पुन, त्रिफळा १/२ टीस्पुन, मुलतानी माती १/२ टीस्पुन, मंजिष्ठा १/८ टीस्पुनपाणी किंवा दुध यामधे मिसळुन वापरा

वर उल्लेख केलेल्या सर्व वनौषधी पावडर वर सांगितल्या प्रमाणात घेउन योग्य मिश्रण करा. त्यामधे योग्य प्रमाणात पाणी किंवा दूध घालुन पेस्ट तयार करा. पाण्याऐवजी उन्हाळ्यात गुलाबपाणी वापरू शकता. नीम व त्रिफळा त्वचा साफ करते व ताणते. मंजिष्ठा आणी चंदन कांती सुधारण्यास मदत करते.

तेलकट त्वचेसाठी फेस पॅक
हा फेस पॅक तेलकट त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे त्वचा थंड होते. व रंध्रे मोकळी/स्वच्छ होतात. व ताणली जातात. यामुळे मुरूमे/ऍक्‍ने होण्यास प्रतिबंध होतो.

घटककृती
नीम १/२ टीस्पुन, ज्येष्ठमध १/२ टीस्पुन, चंदन १/२ टीस्पुन, त्रिफळा १/२ टीस्पुन, मंजिष्ठा १/२ टीस्पुनपाणी किंवा दुधात मिसळून वापरा



Tuesday, October 20, 2015

गर्भसंस्कार आणि काम परमात्म्याची सृजनशक्ती

गर्भसंस्कार आणि काम परमात्म्याची सृजनशक्ती
लेखक – प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार
आयुर्वेद वाचस्पति
सहयोगी प्राध्यापक, पोदार वैद्यक महाविद्यालय व रुग्णालय, वरळी, मुंबई
भ्रमणध्वनी - +९१७७३८०८६२९९/ +९१९८१९६८६२९९
ईमेल – subhashmarlewar@gmail.com
रशियातील एका वैज्ञानिकाने माकडांवर काही प्रयोग केले. माकडांचे त्याने दोन गट बनवले. एका गटामध्ये हुबेहूब कृत्रिम माकडीण बनवली. नकली हात, नकली चेहरा सर्वकाही हुबेहूब माकडासारखेच. दुसऱ्या गटामध्ये जिवंत माकडीण ठेवण्यात आली. माकडाच्या १० नवजात पिल्लांना कृत्रिम माकडीणीमार्फत चांगल्या प्रकारचे दूध पाजण्यात आले, कृत्रिम प्रेम करून पालन – पोषण करण्यात आले. ही पिल्ले त्या कृत्रिम माकडीणीच्या पोटाला बिलगून राहत. कालांतराने ही पिल्ले धष्टपुष्ट, स्वस्थ अशी माकडे बनली. मात्र मानसिकदृष्ट्या ती कमकुवत होती, विक्षिप्त व विकृत बनली होती. पिल्लांना दूध मिळाले, त्यांचे शरीरही चांगले धष्टपुष्ट झाले. परंतु ती विक्षिप्त का झाली? वैज्ञानिक गोंधळात पडले. वैज्ञानिकांच्या प्रयोगशाळेमध्ये प्रेम ही वस्तू मिळतच नाही. दुसऱ्या गटातील पिल्लांना प्रेमासहित दुध मिळाले व ती शारीरिक व मानसिकदृष्ट्या आरोग्यसंपन्न घडली.
पहिल्या गटातील पिल्लांच्या परिस्थितीप्रमाणे आपल्या देशातील समाजाची परिस्थिती बनली आहे. अभिनय करणारी आई मिळते. अभिनय करणारा बाप मिळतो. नकली बाप नकली आई मुलांसाठी अंगाई गीत गाते. पण मुले विक्षिप्त होतात. आपण म्हणतो ही अशांत कशी झाली. ही मुले एखाद्याच्या पोटात सुरा भोसकतात, मुलींच्या अंगावर अॅसीड टाकतात, कॉलेजला आग लावतात, बसवर दगड फेकतात. शिक्षकांना मारहाण करतात.
आजचा समाज प्रेमाच्या केंद्रावर निर्मित नाही. त्यामुळे समाजात विक्षिप्तता व गुन्हेगारी प्रवृत्तीचे प्रमाण जास्त आहे. युद्ध, आत्महत्या, कुरूप-समाज आणि रुग्ण-मनुष्य ही प्रेमाच्या अभावातून निर्माण झालेली परिस्थिती आहे. प्रेमातून विवाह निर्माण झाल्यास सुसंस्कृत समाज निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे. जे पति-पत्नी प्रेमपूर्ण संभोगात लीन होत नाहीत, ते केवळ भौतिकवादी मुलास जन्म देतील. त्यांचे जीवन भौतिकतेच्या पुढे जाणार नाही. जे आई-वडील एकमेकांवर प्रेम करून मुलास जन्म देतील, त्या मुलांच्या जीवनात वसंताची बहार येईल, त्यांचे जीवन गतिमान व समृद्ध बनेल. प्रेम हे बीज आहे व सुप्रजनन हे या बीजास आलेले फळ आहे. प्रेम जर कुटुंबाचे केंद्र बनेल तर स्वामी अरविंद घोषांची सुपर-मॅन ची कल्पना, ओशोंची महामानवाची संकल्पना या पृथ्वीवर साकार होईल. भृण ज्याचा पहिला अणु प्रेमाचा त्याचा अंतिम श्वासही प्रेमाचाच असेल. ह्यातूनच एक सात्विक मानवता उत्पन्न होऊ शकते.
क्षितिजाच्या पलीकडे जाऊन नवनिर्माण करणे खरच कठीण काम आहे. खर तर ती एक जोखीम आहे. मात्र अशी जोखीम जे घेत नाहीत, ते जमिनीवरच्या किड्या-मुंग्यांप्रमाणे जगतात व जे क्षितिजाच्या पलीकडे झेप घेतात. ते “बाज” पक्षी म्हणून सिद्ध होतात. अलिकडचा समाज हा घराची कवाडे बंद करून यशप्राप्तीची आराधना करणारा आहे.
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जीवनाचे चार पुरुषार्थ आहेत. समाज धारण करणारी सुव्यवस्था म्हणजे ‘धर्म’. निर्वाहाचे साधन म्हणून उपयोगात येतो तो ‘अर्थ’. प्रजननातील महत्त्वपूर्ण घटक म्हणजे ‘काम’. या तिन्ही पुरुषार्थांचा उपभोग घेऊन साक्षी भावाने निवृत्त होणे म्हणजे ‘मोक्ष’. काही प्रवृत्तींनी कामजीवनाचे विकृतीकरण करून समाजापुढे मांडले, म्हणून समाजाला त्याचा आनंद घेता आला नाही. खरं तर कामशक्ती म्हणजे परमात्म्याची सृजनशक्ती, ह्यातूनच ऊर्जाशक्ती निर्माण होते. प्रेमभावाने पति-पत्नीचे मिलन घडले तर ‘कामाचे’ रुपांतर सृजनशक्तीमध्ये होईल. अपवित्र किंवा पापदृष्टीने कामशक्तीकडे पाहिले तर ‘काम’ कुरूप होऊन जाईल आणि प्रेमभावे बघितले तर ‘दिव्यशक्ती’ बनून राहील.
पति-पत्नीच्या शारीरिक मिलनापूर्वी त्यांचे मानसिक मिलन होणे अत्यावश्यक आहे. लैंगिक शक्ती ही इंद्रियांमध्ये नसते तर ती मनामध्ये असते. विवाहानंतर शरीरे एकत्र आली म्हणजे मिलन झाले असे नाही. एकमेकांना समजून घेणे, एकमेकांच्या प्रश्नांशी एकरूप होणे व त्यानंतरचे शारीरिक मिलन अद्वितीय असते, दिव्य आनंद देऊन जाते.
प्रेम हे परमात्म्याचे द्वार आहे, पण आमचे त्याकडे लक्ष नाही. भौतिक माणसांनी आणि भौतिकवादी प्रवृत्तीने ही दारे बंद करून टाकली आहेत. ह्या प्रवृत्तीने प्रेमाची हत्या करून मनुष्य जीवन सुव्यस्थित करण्याचा तथाकथित प्रयत्न केला आहे. जीवनात प्रेमाची संभावनाच राहणार नाही ह्याकडे लक्ष दिले आहे. समाजाची संपूर्ण व्यवस्था निष्प्रेम आहे आणि त्यातून होणारे विवाद जीवनाच्या अंतापर्यंत टिकून राहतात ही त्याची शोकांतिका. हजारो वर्षांपासून आपण भगवान श्रीकृष्ण, श्रीराम, गौतमबुद्ध, जीझसक्राईस्ट, मोहम्मद पैगंबर, गुरुनानक, संत ज्ञानेश्वर, चक्रधरस्वामी अशा अनेक संत महात्म्यांची स्तुती करत आलो आहोत. ह्या सर्वांना ईश्वरप्राप्ती झाली मात्र आजच्या समाजात अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच माणसे पूर्णत्वाला गेली. ह्याचा विचार करण्याची नितांत गरज आज निर्माण झालेली आहे.
शेतकऱ्याने लाखो बीजे पेरली आणि त्यातील एखादेच बीज जर अंकुरले तर त्याला तुम्ही शेतकरी म्हणाल का? ही बीजे जमिनीवर नुसती जरी फेकली असती तरी त्यातील एखादे नक्कीच उगवले असते! तेव्हां लाख बीजे पेरली आणि ती सर्व उगवली तर तो खरा शेतकरी. त्यापैकी दोन-चार उगवली नाही तरी ठीक आहे. पण आता तर उलटेच होत आहे. कोट्यावधी मुले जन्माला येतात, त्यात एखादा डॉ. होमी भाभा असतो, कधी डॉ. माशेलकर तर कधी डॉ. अब्दुल कलाम.
फुलाच्या सुगंधाची उधळण ही प्रत्येक बीजाची क्षमता . . . .
प्रेमसंपन्न वैवाहिक जीवनामुळे प्रत्येक व्यक्ती गौरवाला, तेजस्वीपणाला प्राप्त होऊ शकते. प्रत्येक बीजात ही क्षमता आहे की, ते फुलाप्रत पोचते व सुगंध उधळते आणि जेव्हां हे बीज वृक्ष बनते तेव्हां पाखरे त्यावर क्रीडा करतात. वारा देखील फेर धरत गाणे म्हणतो. वसंताच्या ह्या क्षणांमध्ये परिपूर्णतेचा आनंद आणि उल्हास आहे, हीच परमात्म्याची प्राप्ती आहे. भोगवादी प्रवृत्तीची माणसे संतती निर्माण करतात, काळाच्या ओघात यमसदनास जातात. मात्र आपली संतती मागे ठेऊन जातात. ‘उल्लू मर जाते है, औलाद छोड जाते है !’ मग ही मुलेही मागे राहत नाहीत, ती देखील पैदास वाढवतच जातात. अशाप्रकारे हळूहळू खोट्या नाण्यांचे चलन वाढत जाते. प्रेमाशिवाय विवाह करण्यापेक्षा अविवाहित राहिलेलेच बरे !
बहुतेक वेळा श्रेष्ठ आणि प्रज्ञावान व्यक्ती अविवाहित राहतात . . . .
संत रामदासस्वामी, ओशो, अटलबिहारी बाजपेयी, डॉ. अब्दुल कलाम ह्यांनी विवाह केला नाही. गानकोकिळा लता मंगेशकर हे त्यातलेच एक उदाहरण. अन्य सामान्य माणसे एक नाही तर चार विवाह करतात. माणूस जितका निकृष्ट असतो तितका तो जास्त वैताग निर्माण करतो. बुद्ध देखील एकाच मुलाचा पिता झाला. सर्वसामान्य माणसे रांगा लावून टाकतात. त्यांच्यात स्पर्धा चालू आहे की कोण किती मोठी रांग लावतो.
प्रेमाशिवाय विवाह करू नये असे माझे मत नाही. परंतु पति-पत्नीमध्ये ताळमेळ असावा. परंतु अलीकडे तसे दिसत नाही. पति-पत्नीचा ताळमेळ तुम्ही कुणा करवी पाहता? ज्योतिषाकडून ! जरा त्याच्या घरची अवस्था पहा. स्वत:च्या बायकोशी तो ताळमेळ साधू शकला आहे का? अन न जाणो किती पति-पत्नीचा ताळमेळ तो बसवतो आहे? तोही चार – आठ आण्यात. . . .
पति-पत्नीमध्ये ताळमेळ बसला तर त्यांची मुलेही प्रतिभावान होतील. प्रेम आणि विवाहाची ही पद्धत लागू झाली तर शेकडो आईनस्टाईन जन्माला येतील, प्रतिभेच्या राशी उभ्या राहू शकतील.
प्रतिभावंतांना जन्म देणे वैदिक विज्ञानाने शक्य :-
पति-पत्नीने एकत्र येतांना नियोजनबद्ध पद्धतीने एकत्र येणे महत्वाचे. नियोजनविना ते अशक्य आहे. ह्या संबंधीचे सविस्तर मार्गदर्शन आयुर्वेदीय ग्रंथामध्ये दिसून येते. आपण शेतातील बियांची जितकी काळजी घेतो तितकी माणसाच्या बीजाची घेत नाही. आपल्यासारखे मूर्ख आपणच ! शेताला पाणी सोडणे, राखण करणे हे जसे महत्वाचे तसेच माणसांसाठी विशेष संस्कार करण्याची आज नितांत गरज आहे.
प्रेम आणि विवाह यांचा काय संबंध ?
प्रेमातून विवाह होऊ शकतो तसेच विवाहानंतरही प्रेम होऊ शकते. ह्या संदर्भात काही गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. प्रेम ही परमेश्वराची मोठी देणगी आहे तर विवाह ही समाजव्यवस्था आहे. विवाह सामाजिक संस्था आहे. प्रेम प्रकृतीचे दान आहे. प्रेम व्यक्तीच्या प्राणामध्ये निसर्गतः निर्माण होते तर विवाह मात्र समाज व कायद्यानुसार केला जातो. विवाह ही मनुष्याची गरज आहे तर प्रेम हे परमात्म्याचे दान आहे. वैवाहिक जीवनात प्रेम निर्माण होईलच असे नाही. विवाहामुळे सहवास लाभतो. सहवासामुळे प्रेम निर्माण होऊ शकते. विवाहापासून परिवार बनतो, ज्याला आपण ‘गृहस्थाश्रम’ म्हणतो. संघर्ष, कलह, द्वेष, इर्षा अशा परिस्थितीत देखील आपण तोंडदेखले हसत घराबाहेर पडतो. ह्यात आत्मतृप्ती होत नाही. पति-पत्नी एकमेकांच्या गरजा पूर्ण करू शकत नाहीत. ह्यातूनच एकमेकांस कमी लेखणे, दुषणे देणे, विक्षिप्त वागणे सुरु होते. ऋषिमुनींनी निर्माण केलेला हा समाज अधोगतीकडे कसा जातो हे अनाकलनीय आहे. तुझ्यामुळे मला शांती मिळत नाही असे जेव्हां पति-पत्नी म्हणायला लागतात तेव्हा प्रेम काय आहे हे कळते. दोन लहान मुले एकमेकांशी भांडत होती. आईने मुलांना भांडण्याचे कारण विचारले असता मुलांनी उत्तर दिले, “मम्मी ! वी आर नॅाट फायटिंग, वी आर प्लेईंग मम्मी अँड़ ड़ॅड़ी गेम !”
मानवता निर्माण होण्यासाठी कामाची पवित्रता, धार्मिकता स्वीकार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कामयोगातून परमात्मा जीव जन्माला घालतो. तो जीव म्हणजे पाप नाही तर जीवन आहे. मनुष्य जीवनावर प्रेम करत नाही. म्हणून फक्त लैंगिकता उरली व यौवन पाप झाले. वास्तविक हे पाप नसून ह्यात फक्त प्रेमाचा अभाव आहे !
जीवन निरंतर बदलत आहे. जीवनाची सृजनात्मकता परमात्मा स्वरूपाने तुमच्या समोर आहे. जोपर्यंत पति-पत्नी एकमेकांवर प्रेम करणार नाहीत तोपर्यंत सुप्रजनन होणार नाही. मुलांना दूध मिळेल, कपडे मिळतील, घरही मिळेल परंतु प्रेम मिळत नसेल तर सर्व मिळूनही व्यर्थच.

"औषधी गर्भसंस्कार"..........

"औषधी गर्भसंस्कार"..........

एक शास्रीय प्रकाशन व उत्पादने
"गर्भविकास आणि मातृपोषणाचा अद् भुत संगम"
प्रत्येक दाम्पत्याला निकोप व सुधृढ बालक हवे असते. ते त्यांचे सुंदर स्वप्न असते. त्यासाठी ते मनापासून प्रयत्नशील असतात. बालक निकोप व सुदृढ तर हवेच, त्याचबरोबर मातेची प्रसुतीही नैसर्गिक पद्धतीने आणि संकटमुक्त व्हावी, अशीही अपेक्षा असते. केवळ पती-पत्नीच नव्हे तर साऱ्या जवळच्या नातेवाईकांची हीच अपेक्षा असते. सतयुग असो वा कलियुग, ह्या अपेक्षा अनादी काळापासून तशाच आहेत, आणि पुढेही तशाच राहणार ह्यात दुमत होणे असंभव. ह्या अपेक्षा सर्वार्थाने पूर्ण करणारी, विशेष पद्धतीने कार्य करणारी १६ उत्पादने "अक्षय उद्योग समूहाने" निर्माण केली. ती उत्पादने व त्यामागील शास्त्रीय सिद्धांत आपल्याला "औषधी गर्भसंस्कार" पुस्तिकेच्या स्वरुपात आम्ही सुपूर्द करीत आहोत.
आयुर्वेद प्राचीन आहे. ह्या प्राचीन आयुर्वेदात समग्र मानवी जीवनाचा सखोल आणि सूक्ष्म अभ्यास केला गेला आहे. निरोगी राहण्यासाठी अनंत प्रकारचे आहार, विहार, औषधोपचार व सर्वप्रकारे दक्षता घेवूनही रोग झालाच तर त्याचे निराकरण करण्याचे अगणित उपाय ह्या शास्त्रात विस्ताराने दिलेले आहेत. त्यामुळेच हे प्रभावी शास्त्र आज एकविसाव्या शतकातही साऱ्या विश्वात लोकप्रिय होत आहे.
आयुर्वेदाच्या मौलिक खजिन्यात मातृत्व प्राप्तीच्या विषयावर यथासांग विवेचन उपलब्ध आहे. ह्या विवेचनाचा उपयोग गर्भधारणा, गर्भसंगोपन, सुलभ प्रसूती, बालकल्याण अशा सर्व टप्प्यांमध्ये कसा होऊ शकतो ते विस्तृतपणे ह्या पुस्तिकेत सोप्या शब्दात सांगितले आहे.
मूळ आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये लग्नासाठी मुलीचे वय सोळा वर्ष, तर मुलाचे वीस वर्ष असावे असे वर्णन केले आहे. ह्या वयाला 'समत्वागतवीर्य' म्हटले आहे. म्हणजेच ह्या वयात विवाह होऊन गर्भधारणा झाली तर स्त्री व पुरुषाचे दोष-धातु सर्वोत्तम स्थितीत असतात व निकोप गर्भधारणेची शक्यता सर्वात जास्त असते. जसजसे वय वाढते तसतसे शरीरात दोषांचे संतुलन बिघडत जाते व गर्भधारणेच्या दृष्टीने थोडी कठीण परिस्थिती उत्पन्न होउ लागते.
एकविसावे शतक किती धकाधकीचे, धावपळीचे, चिंता आणि ताण-तणावाचे झाले आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. कायद्याची वयोमर्यादा, शिक्षणाचा कालावधी, आर्थिक स्थैर्य, विभक्त कुटुंब पद्धती ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता विवाहाचे वय काळाच्या ओघाने आपोआपच वाढत जात आहे व त्याचा परिणाम स्त्री-पुरुषांच्या प्रजनन संस्थेवर होतो व पर्यायाने पुढच्या पिढीवर सुद्धा. हे दुष्टचक्र कुठे थांबवता येईल का ? कलियुगाची ही जीवनपद्धती तर बदलणे शक्य नाही, मग त्याचे दुष्परिणाम कसे आटोक्यात आणता येतील ?
ह्या सर्व समस्यांचे सकारात्मक निवारण फक्त आयुर्वेदातच सापडते. मूळ ग्रंथातील विवेचन अभ्यासताना थक्क होण्याची पाळी येते. ह्या विषयातील एक एक पैलू घेऊन त्यांची उपयुक्तता आणि सर्वांगीण लाभ स्त्रीला व होणाऱ्या बालकाला कसकसे प्राप्त होऊ शकतात हे आता पुढे पाहूया:
आयुर्वेदानुसार प्राकृत गर्भधारणा होण्यासाठी ४ गोष्टी योग्य प्रकारे एकमेकांना अनुरूप व पोषक असाव्या लागतात.
१) ऋतु… … गर्भाधानास योग्य काळ.
२) क्षेत्र… … गर्भाशयाची योग्य स्थिती.
३) अम्बु… … योग्य पोषक घटक.
४) बीज… … स्त्री व पुरुष यांचे निरोगी बीज.
ऋतु ... गर्भाधानास योग्य काळ
२८ दिवसांचा काळ हा मासिक ऋतु स्रावाचा प्राकृत काळ समजला जातो. मासिक स्रावाच्या पहिल्या दिवसापासून पुढे "दहा ते अठरा हा ८ दिवसांचा काळ" गर्भस्थापनेसाठी सुयोग्य असतो. इतर दिवशी संबंध ठेवण्याने प्रायः गर्भधारणा होत नाही. गर्भधारणा न होण्याच्या काळाला "सेफ पिरियड" म्हणतात. सध्या सोनोग्राफीच्या सहाय्याने गर्भधारणेसाठी योग्य काळ अगदी अचूकपणे कळू शकतो.
सोनोग्राफी करणे तुलनेने कमी खर्चिक व अतिशय निर्धोक असल्यामुळे त्याचा लाभ घेण्यास हरकत नाही. कायद्याच्या दृष्टीकोनातून सोनोग्राफी करण्यास काही निर्बंध घालण्यात आले आहेत. गर्भलिंग निदान व त्यामुळे होणाऱ्या भृणहत्या टाळण्यासाठी शासनाने हे कायदे आता कटाक्षाने अमलात आणण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे.
क्षेत्र ... गर्भाशयाची योग्य स्थिती
गर्भाशयाच्या रचनेत जन्मतः दोष असू शकतो. साधारणतः ३ ते ४ टक्के स्त्रियांमध्ये असे दोष असतात. अशा दोषांमुळे गर्भस्थापना होऊ शकते परंतु गर्भाची वाढ पूर्ण काळ होत नाही. गर्भाशयाच्या रचनेत काही दोष असल्यास ऋतुचक्राच्या तक्रारी उद्भवू शकतात. विशेषतः मासिक स्रावाच्या दिवसांमध्ये तीव्र वेदना होणे हे मुख्य लक्षण असते. सोनोग्राफीच्या सहाय्याने ह्या दोषाचे निदान करता येते.
अम्बु ... योग्य पोषक घटक
झाडांच्या वाढीसाठी जसे खत - पाणी तसेच गर्भाशयाच्या व पर्यायाने गर्भाच्याही पोषणासाठी जे जे काही आवश्यक घटक ते सर्व "अम्बु" समजावेत. आधुनिक वैद्यक शास्त्राप्रमाणे इस्ट्रोजिन, प्रोजेस्टेरॉन, प्रोलॅक्टिन इ. घटकांचा योग्य समतोल असणे येथे अभिप्रेत आहे. ऋतुस्राव, गर्भधारणा, गर्भपोषण, स्तन्यनिर्मिती, रजोनिवृत्ती अशा सर्व स्थिती सुरळीत होण्यासाठी शरीरातील अन्तःस्रावी ग्रंथींचे कार्य अविरतपणे चालू असते. गर्भावस्थेत ह्यांचा उत्तम समतोल गर्भाच्या पोषणासाठी अनिवार्य असतो.
बीज ... स्त्री व पुरुष यांचे निरोगी बीज
जन्मतः स्त्रीबीजकोषात ठराविक संख्यने सूक्ष्म स्वरुपात स्त्रीबीज दडलेली असतात. दर महिन्याच्या ठराविक दिवशी एक एक बीज परिपक्व होते व त्याचे पुरूषबीजाबरोबर मीलन झाले तर गर्भधारणा संभवते, अन्यथा मासिक स्रावाच्या वेळी स्त्री शरीरातून हे बीज बाहेर टाकले जाते. स्त्री व पुरुषबीजे निरोगी असली तरच गर्भधारणा व्यवस्थित घडते, निरोगी व सुदृढ बालक जन्माला येऊ शकते.
पुरूषबीजांची म्हणजेच शुक्राणूंची संख्या २० ते ४० दशलक्ष प्रति मि. ली. एवढी असते. किंबहुना एवढी असल्याशिवाय गर्भधारणा बहुधा होतच नाही. त्यातील फक्त एकच शुक्राणु गर्भधारणा घडवतो, तरीपण ही संख्या कमी असून चालत नाही. शिवाय त्यांची चलनवलन क्षमता, स्वरूप, अम्लता ही देखील महत्वाची असते. शुक्राणु सर्व दृष्टीने निरोगी असणे जरुरीचे असते.
स्त्रीबीज किंवा पुरुषबीज दोषयुक्त असता गर्भधारणा झाली तर बहुतेकवेळा गर्भस्राव होतो. त्यातूनही गर्भधारणा झालीच तर होणाऱ्या बालकामध्ये जन्मतः व्यंग राहते व अशा बीजदोषामुळे निर्माण झालेले व्यंग कायमस्वरूपी राहते.
मुळातच स्त्री देह नाजुक, त्या नाजुकपणातही हवीहवीशी वाटणारी संवेदनशील अवस्था म्हणजे 'गर्भावस्था'. पहिल्या गर्भारपणात तर स्त्रीला ही अवस्था अगदीच नवीन, औत्सुक्याची व कुतुहलाची असते. एका जिवंत शरीरातून दुसऱ्या चैतन्यमय शरीराची निर्मिती करणे ही निसर्गाची एक आश्चर्यजनक आणि थक्क करणारी किमया आहे. गर्भधारणा प्रक्रियेत कारणीभूत असलेला प्रत्येक घटक, त्यातील रसायने, त्यांचे प्रमाण सर्व काही माहिती असले तरी स्त्री आणि पुरुषाच्या जिवंत शरीराशिवाय असा नवीन देह निर्माण करण्याची जादू अजून ह्या पृथ्वीतलावर कोणी साकार करू शकलेले नाही.
प्राचीन आयुर्वेदात सुदृढ व निकोप अपत्यप्राप्ती साठी अचूक मार्गदर्शन केले आहे आणि गर्भासंबंधी सर्व दोष निवारण करण्याची क्षमता असणारे निश्चित असे औषधी पाठ सांगितले आहेत. शास्त्रशुद्ध व कालानुरूप सुयोग्य बदल करून हे पाठ विलेपित वटी व तेलाच्या स्वरुपात आम्ही सादर करीत आहोत. त्यांचे नामकरण व संक्षिप्त उपयोग पुढील प्रमाणे :-
१) अश्वमाह - शुक्राणु दोष निवारण, सामर्थ्य, संख्या व गती वर्धन
२) फलमाह - स्त्रीबीज दोष निवारण, सामर्थ्य व रोगप्रतिकारशक्ती वर्धन, विद्युत-चुंबकीय लहरींच्या दुष्परिणामांपासून संरक्षण
३) प्रथमाह - गर्भाशय स्थिती सुधार व स्थापक
४) द्वितिमाह - गर्भिणी व गर्भ यांचे स्वास्थ्य व पोषण
५) तृतिमाह - गर्भिणी व गर्भ यांचे स्वास्थ्य व पोषण
६) किक्किस निवृत्ती तेल - तणाव चिन्ह (स्ट्रेचमार्क्स) प्रतिबंध
७) चतुर्माह - गर्भिणी व गर्भ यांचे स्वास्थ्य व पोषण
८) पंचमाह - गर्भिणी व गर्भ यांचे स्वास्थ्य व पोषण
९) षष्ठमाह - गर्भिणी व गर्भ यांचे स्वास्थ्य व पोषण
१०) सप्तमाह - गर्भिणी व गर्भ यांचे स्वास्थ्य व पोषण
११) अष्टमाह - गर्भिणी व गर्भ यांचे स्वास्थ्य व पोषण
१२) सुप्रसव पिचु तेल - सुलभ, सुरक्षित व नैसर्गिक प्रसव, स्नायू बलवर्धन व जंतु-संसर्ग प्रतिबंध
१३) नवमाह - गर्भिणी व गर्भ यांचे स्वास्थ्य व पोषण
१४) दशमाह - गर्भिणी व गर्भ यांचे स्वास्थ्य व पोषण
१५) सूतिकाभ्यंग तेल - प्रसुती पश्चात मातृस्वास्थ्य रक्षणासाठी अभ्यंग
१६) क्षीरमाह - स्तन्यप्रवर्तन, शोधन व वर्धन
गर्भावस्थेतील प्रत्येक टप्प्यात क्रमाक्रमाने करावयाची ही "औषधी गर्भसंस्कार" योजना आहे. प्रत्येक औषधी घटकाचा उपयोग कसा होतो, ह्यांचा शास्त्राधार काय व त्यावरील संशोधनात्मक शास्त्रीय संदर्भ नेमके कोणते ह्याचे औत्सुक्य सर्वांनाच असणार. ह्या माहिती पुस्तिकेत पाठांतील प्रत्येक घटकाचे कार्मुकत्व प्रतिपादित केलेले असून त्यांचे संदर्भ एकत्रितपणे परिशिष्टात दिले आहेत.
मनोज अनंत जोशी 

सुलभ प्रसव व सुप्रजेसाठी उपाययोजना.........

सुलभ प्रसव व सुप्रजेसाठी उपाययोजना.........

सुलभ प्रसव, सुप्रजा व प्रजनन आरोग्य ही संकल्पना चरक, काश्यपादि काळापासून चिंतनीय मानली जाते. ह्यासाठी महर्षि काश्यप ह्यांनी ‘काश्यपसंहिता’ हा ग्रंथ साकारलेला आहे. ह्या ग्रंथात बालकांच्या सुदृढपणाचे रहस्य दडलेले आहे. ह्याउलट चरकसंहिता, अष्टांगसंग्रह इ. ग्रंथात माता व बालक ह्या दोघांच्या जीवित्वाची हमी, सुलभ प्रसवाचे उपाय, सुप्रजा व यशस्वी बाळंतपणाची जबाबदारी तत्कालीन समयी घेण्यात आलेली आहे. त्यामुळे सुप्रजननाची संकल्पना अनादि कालापासून चालत आलेली आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही.
प्रजनन आरोग्यामध्ये प्रजनन क्षमता, प्रजनन नियमन व गरोदरपणापासून प्रसवापर्यंत सर्व अवस्था सुखरूप होणे ह्या गोष्टींचा समावेश होतो. गरोदरपण व लैंगिक आजारांचा संसर्ग ह्या भीतीपासून मुक्त करणे, लिंगभेद, वृद्धत्व, स्त्रियांना सक्षम करणे, मासिक पाळीतील आरोग्य इत्यादि विषयांचा समावेश प्रजनन आरोग्यामधे होतो. ह्या लेखामधे सुलभ प्रसव व सुप्रजा ह्या दोन बाजूंचा आपण परामर्ष घेऊया.
सुप्रजा निर्मिती कशासाठी ?
भारतीय संस्कृती विविधतेने नटलेली आहे. ह्यात गर्भाधानापासून अंतेष्टीपर्यंत सोळा संस्कार वर्णन केलेले दिसतात. हे संस्कार क्रमाने गर्भाधानापासून प्रसवापर्यंत व बालकाच्या जन्मापासून विवाहापर्यंत केल्यास सुप्रजा निर्मिती होऊ शकते. यंत्रतंत्र युगात जगत असताना हे कसे शक्य आहे? असा विचार दांपत्याच्या मनामध्ये येऊ शकतो. पालकांनी आता विचार करायला हवा की देशाची शक्ती केवळ लोकसंख्येवर नव्हे तर सुसंस्कारित अपत्यांना जन्म देण्यामध्ये आहे. देशाच्या प्रतिमेची काळजी आता प्रत्येकानेच करायला हवी.
मातृत्व ही प्रेमाचा गौरव करणारी घटना आहे. ह्यासाठी डझनावारी मूलं जन्माला घालण्याची आवश्यकता नाही. सुसंस्कारित अशी एक किंवा दोन अपत्ये पुरेशी आहेत. जन्मच द्यावयाचा असेल तर जन्म देण्यायोग्य विवेकानंद, शिवाजी, ज्ञानेश्वर, श्रीकृष्ण, बुद्ध, नागार्जुन, चरक, सुश्रुत आणि काश्यप ह्यांना द्यायला हवा, जो मातापित्यांची प्रतिमा उजळवेल, आपल्या परिवाराचा व देशाचा विकास करेल अशांनाच जन्माला घालावे.
सुप्रजाजनन शक्य आहे काय?
मनुष्याचा शारीरिक व बौद्धिक विकास होऊ लागला तेव्हा जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य पण त्याला मिळाले. स्त्री-पुरुषांनी केवळ आनंदासाठी एकत्र येणे वेगळे मात्र सुप्रजननासाठी दोघे जेव्हा एकत्र येतात तेव्हा काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. आपण इतर गोष्टींमध्ये वैज्ञानिक चिंतन करतो, पण स्वत:बाबत मात्र ते करत नाही. स्वतःबाबत मात्र आपण मोठे अवैज्ञानिक आहोत. बागेतील फुलझाडांची आपण जशी काळजी घेतो तसेच आपल्या बाबतीतही करायला हवे. एखादी गोष्ट घडण्यापूर्वी त्या गोष्टीबद्दल सर्वांगीण विचार करावा. गोष्ट घडून गेल्यावर उहापोह करण्यात अर्थ नाही. म्हणून विवाहाबाबत शास्त्रमर्यादा पाळावी. शास्त्रविहित वयात विवाह होऊन गर्भधारणा झाल्यास मूल अधिक संपन्न होण्याची शक्यता आहे. गर्भाधानासाठी उत्तम शुक्र, निकोप स्त्रीबीज, दोहोंची व्याधिविरहित शरीरे म्हणजेच प्रजनन – विषयक कुठलाही आजार नसावा. ह्यासाठी दांपत्याने वैज्ञानिक तपासणी, उपचार ह्यांचा उपयोग करून घ्यायला हवा. कारण लुळी-पांगळी, वजनाने कमी, बुद्धिहीन, कायम आजारी असलेली मुले जन्माला येण्यापेक्षा मुलाला जन्मच न देणे निश्चितच योग्य ठरेल.
बाळाचे जीवन गर्भधारणेपासूनच सुरु होत असते. म्हणून दांपत्याने आधीपासून आचार रसायनाचे सेवन करावे. प्रत्येक दांपत्याने असा संकल्प करावा की, जो पर्यंत मी सदाचार व ध्यान करण्यास समर्थ होत नाही तो पर्यंत मी मुलाला जन्म देणार नाही. कारण चंगेजखान, नादिरशहा, हिटलर, रामन-राघवन, सद्दाम हुसैन, लादेन अशांना जन्म देऊन काय फायदा ?
बुद्धिहीनांनी लोकसंख्या वाढविणे देशाच्या दृष्टीने धोक्याचे ठरत आहे. बुद्धिहीन वर्गाला समज देऊन प्रजनन थांबविणे, कुटुंबनियोजन सक्तीचे करणे, सुप्रजाजनन, दोन मुलांमध्ये अंतर ठेवणे आता गरजेचे झाले आहे. कुटुंबनियोजन ऐच्छिक ठेवल्यास सुप्रजाजनन, प्रतिभा, बुद्धिमत्ता ह्यांची क्षती होण्याची शक्यता आहे. सुप्रजा निर्मितीबद्दल सूक्ष्मपणे विचार विचार करून आचरण केले तर देशाची प्रतिमा निश्चितच विकसित होईल ह्यात शंका नाही.
आयुर्वेद पंचकर्म आणि सुप्रजा :-
सुप्रजा निर्मितीसाठी प्रजोत्पादनास योग्य काळ, शुद्ध गर्भाशय, स्त्रीबीज, पुरूषबीज, दांपत्याचे सर्व शारीरिक व मानसिक भाव कारणीभूत ठरतात. म्हणूनच स्त्री व पुरुष ह्या दोघांनीही गर्भाधानापुर्वी स्नेहन, स्वेदन व आयुर्वेदातील पंचकर्मोपचार तज्ञाकडून करून घ्यावेत. शरीर शुद्धी झाल्यावर सात्विक आहार-विहार करावा. पुरुषाने औषधीसिद्धी तूप व स्त्री ने तेल व उडिदाचा प्रयोग वैद्याच्या मदतीने करावा. गर्भाधानकाळामधे पहिल्या महिन्यापासून ते दहाव्या महिन्यापर्यंत आयुर्वेदात वर्णन केलेली गर्भिणी परिचर्या व मासानुमासिक चिकित्सा करावी. ह्या चिकित्सेमुळे बाळाची वाढ उत्तम होते. गर्भपाताची भीती राहत नाही. गर्भिणी विषाक्ततेची शक्यता राहत नाही. पूर्णमास व प्राकृत प्रसव होतो. मृतगर्भ जन्माला येत नाही. पहिल्या तीन महिन्यांमधे होणाऱ्या उलट्या व मळमळ थांबते. गरोदरपणात मातेस झटके येत नाहीत व रक्तदाबही नियंत्रित राहतो. योनिगत रक्तस्त्राव होत नाही, सूतिका रोगाची भीती राहात नाही. शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. ह्या सर्व गुणांमुळे गर्भिणी स्त्रियांनी ही औषधे घेऊन गरोदरपणामधे होणाऱ्या गुंतागुंती टाळाव्यात. ही औषधे महाराष्ट्रात अनेक आयुर्वेद रुग्णालयातून अनेक तपे वापरात आहेत. गेल्या पस्तीस वर्षापासून म.आ.पोदार रुग्णालयात ही वापरात असून यशस्वी बाळंतपणाचे रहस्य ह्यात दडलेले आहे. समाधानी माता व तिच्या कुशीत झोपलेलं गुटगुटीत बाळ हा कुटुंबाच्या दृष्टीने आनंदाचा क्षण आहे. त्यासाठी खालील औषधे प्रत्येक मातेने आवर्जून वापरावीत.
औषधे वापरण्याची पध्दत :-
जुनी पद्धत - औषधांची पाच ग्रॅम भरड रात्रभर पाण्यात भिजत घालावी. औषधाच्या वजनाच्या दुप्पट पाणी घालून अर्धे पाणी उरेपर्यंत मंद आचेवर काढा तयार करावा. मिश्रण गाळून घ्यावे व तो काढा सकाळ – संध्याकाळ दोन वेळा घ्यावा. अशी ९ महिनेपर्यंत काढे देण्याची पूर्वी पद्धत होती.
अक्षय फार्मा रेमेडीज ह्या अनुभवसिद्ध औषध निर्मिती कंपनीने ह्या औषधी पाठांवर सखोल शास्त्रीय संशोधन करून त्यांना गोळ्यांच्या स्वरुपात सादर केले आहे. पाठांमधील प्रत्येक वनस्पतीचा सुयोग्य परिचय व त्याची कार्मुकता शास्त्रीय पद्धतीने अभ्यासून प्रसिद्ध केली आहे. ह्यात विशिष्ट नॅनोटेक्नोलॉजी सदृश शास्त्रीय निर्माण पद्धती वापरून ह्या गोळ्या गुणधर्माने अधिक श्रेष्ठ बनविल्या आहेत. काही अनुपलब्ध किंवा संदिग्ध वनस्पतींच्या ऐवजी श्रेष्ठ गुणांच्या प्रातिनिधिक द्रव्यांचा वापर करीत हे पाठ प्रचारात आणण्याचे कौतुकास्पद कार्य केले आहे. पूर्वीच्या काढ्यांपेक्षा ह्या गोळ्या घेण्यास अधिक सुलभ आहेत. स्त्रीच्या ऋतुचक्राच्या अनुषंगाने २८ दिवसांचा महिना व २८० दिवसांची म्हणजेच १० महिन्यांची गर्भावस्था ह्या शास्त्रीय सिद्धांतावर आधारित १० महिन्यांचे १० पाठ निर्माण केले.
गर्भिणी मासानुमासिक पाठ
पहिला महिना: यष्टिमधु, सागाचे बीज, शतावरी, देवदार
दुसरा महिना: आपटा, काळेतीळ, मंजिष्ठा, शतावरी
तिसरा महिना: शतावरी, प्रियंगु, श्वेत सारिवा
चौथा महिना: अनंतमूळ, कृष्णसारिवा, कुलिंजन, कमलपुष्प, यष्टिमधु
पाचवा महिना: रिंगणी, डोरली, शिवण फळ, वटांकुर, वड साल
सहावा महिना: पृश्निपर्णि, बला, शिग्रु, श्वदंष्ट्रा (गोखरू), मधुपर्णिका
सातवा महिना: शृंगाटक, कमलगट्टा, द्राक्ष, कसेरु, यष्टिमधु, शर्करा
आठवा महिना: कपित्थ, बिल्व, बृहति, पटोल, इक्षु, निदिग्धिका
नववा महिना: सारिवा, अनंता, शतावरी, यष्टिमधु
दहावा महिना: शतावरी, यष्टिमधु, सुंठ, देवदार
कुसंतती पेक्षा वांझ राहणे केव्हाही उत्तम :-
श्रीसमर्थ, श्रीचक्रधर, छत्रपती शिवाजी सारखा नरश्रेष्ठ मानव जातीचे कल्याण करतो. “आमचे काय बुवा?” म्हणून देवावर हवाला ठेवणारे दांपत्य क्लिब समजावे. म्हणून सर्वांनी शास्त्राज्ञा पाळून विधिपूर्वक सुप्रजाजनन करावे. चांगली संतती व्हावी ही प्रत्येकाची इच्छा असते, पण कृती मात्र नसते. नुसती फुंकर मारून बासरी वाजत नाही. उत्तम रागदारी बाहेर पडण्यास बोटांचा युक्तिपूर्वक उपयोग करावा लागतो. त्याचप्रमाणे सुप्रजननासाठी योग्य कृती घडली पाहिजे. संतती एकच असावी व ती पुरुषोत्तत्म अशा स्वरुपाची असावी. कन्या असेल तर ‘स्त्रीत्व’ असणारी शूर साम्राज्ञी असावी, अन्यथा खंडोगती प्रजा काय कामाची ?
सुलभ प्रसव म्हणजे काय ?
योनिमार्गाने, डोक्याकडून, माता व बालकाला कुठल्याही प्रकारची इजा न होता होणारी प्रसूती ह्यास सुलभ प्रसव म्हणता येईल.
सुलभ प्रसूतीसाठी मातृत्वाचे खालील नियम प्रत्येकाने लक्षात ठेवावे:-
1. गर्भवती स्त्री ने धुम्रपान व मद्यपान करू नये. त्यामुळे बालकास इजा होऊ शकते.
2. गर्भवती राहिल्यापासून प्रसूती होईपर्यंत दहा वेळा तज्ञांकडून तपासणी करावी.
3. प्रसूती वेळेपर्यंत मातेचे वजन दहा किलोने वाढले पाहिजे.
4. दहा तास विश्रांती, ज्यात झोप – दुपारी दोन तास व रात्री आठ तास.
5. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण दहा ग्रॅम पेक्षा कमी नसावे.
6. दहा महिन्यांपर्यंत मातेचे लसीकरण पूर्ण झालेले असावे.
7. पहिला डोस – अठरा आठवड्यात, दुसरा डोस – चोवीस आठवड्यात
8. गरोदरपणातील जोखिमीची प्राथमिक चिह्ने व लक्षणांचे ज्ञान असावे
9. गरोदर मातेला रुग्णालयात नेण्याचे नियोजन असावे.
10. प्रसूती प्रशिक्षित व्यक्तींकडून करून घ्यावी.
11. कळा सुरु झाल्यापासून दहा ते बारा तासात प्रसव पूर्ण झाला पाहिजे.
12. बालकाचे श्वसन, रोदन, ध्वनि, रंग, प्रतिक्रिया ह्या गोष्टी व्यवस्थित असाव्यात.
13. प्रसूतीपश्चात दहा आठवड्यांपर्यंत तपासणी करावी.
14. दहा महिन्यांपर्यंत बालकास स्तनपान द्यावे.
15. बालकाच्या वयाच्या दहाव्या महिनापर्यंत लसीकरण पूर्ण झालेले असावे.
16. आईचे दूध हेच बाळासाठी सर्वोत्तम आदर्श असे अन्न आहे. ‘केवळ स्तनपान’ आणि ‘बाळ रडेल तेव्हाही स्तनपान’ हा मंत्र सर्व मतांनी लक्षात ठेवावा. स्तनपान शक्यतो दोन वर्षेपर्यंत चालू ठेवावे.
गरोदरपणासाठी वर्णन केलेली सर्व औषधे घ्यावीत त्याबरोबर विशिष्ट वनस्पतींनी युक्त काढयांचा अस्थापन बस्ति आठव्या महिन्यात घ्यावा. नवव्या महिन्यापासून प्रसूतीपर्यंत योनीभागी ‘सुप्रसव पिचु तेलाचा’ पिचु दररोज रात्रभर ठेवावा. ह्या पिचुधारणेने विटपाचे कठीणत्व जाऊन त्याठिकाणी मृदुत्व येते, प्रसवमार्गात स्निग्धता निर्माण होते, योनीमार्गात लवचिकता निर्माण होऊन स्नायूंची शक्ती वाढते. ह्यामुळे विटपछेद (एपिझिओटॉमी) करण्याची वेळ येत नाही.
सुखप्रसवासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सकारात्मक विचार मातेला देता येतात. प्रसुतीच्या वेळी अशा सूचना वारंवार देऊन सुख-प्रसव घडून आणता येतो. ह्याला आश्वासन चिकित्सा म्हणतात. गर्भिणी परीक्षणामुळे व विविध तपासण्यांमुळे जोखमीच्या शक्यता शोधून काढणे सहज शक्य आहे. सुख प्रसव ही नक्कीच अवघड बाब नाही. ह्या चिकित्सा घेण्याची मातेची मानसिक तयारी हवी. केवळ प्रसूतीतज्ञ कुशल असून भागणार नाही.
प्रजनन आरोग्यातील आयुर्वेदाचा सहभाग :-
सर्वंकष प्रजनन व बाल आरोग्य सेवा ह्यात एकूण पन्नास प्रकारच्या सेवा शासन पुरवीत असते. ह्यात आयुर्वेदाचा सहभाग पुढील प्रमाणे असू शकतो.
माता – बाल संगोपन :-
प्रसूतीपूर्व तपासणी
प्रसूतीपश्चात काळजी
प्रशिक्षित व कुशल व्यक्तीमार्फत प्रसूती
सर्वंकष प्रजनन व बाल आरोग्य सेवा :-
१) लैंगिक शिक्षण
२) विवाहपूर्व समुपदेशन
३) आहार – विहार सल्ला
४) बालआरोग्य शालेय प्रशिक्षणात आयुर्वेदाचा सहभाग
५) स्पष्ट कारण नसलेल्या वंध्यत्वाबाबत मार्गदर्शन व उपचार
६) बालक अतिसारसंबंधी आयुर्वेदोक्त उपचार
७) प्रसवकालीन गुंतागुंतीचे व्यवस्थापन
८) चाळीशी नंतरची घ्यावयाची आरोग्य विषयक काळजी
९) स्तन व गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान करणे.
महाराष्ट्र शासनाकडून अपेक्षा :-
1. आयुर्वेद पदवी व पदव्यूत्तर प्रशिक्षण घेतलेल्या संबंधीत विषयातील तज्ञांना आधुनिक प्रशिक्षण सक्तीने द्यावे.
2. स्त्री व पुरुष टाका व बिनटाक्याचे वंध्यत्वीकरण शस्त्रकर्म प्रशिक्षण इच्छुक वैद्यकीय व्यावसायिकांना द्यावे.
3. सुरक्षित गर्भपाताचे प्रशिक्षण इच्छुक वैद्यकीय व्यावसायिकांना मिळण्याची व्यवस्था करावी
4. राज्य सेवेतील आयुर्वेद वैदकीय अधिकारी वर्ग - २ व वर्ग - ३ ह्यांना आयुर्वेदिक औषधांचा वापर करण्याची सक्ती करावी
5. जिल्हा आयुर्वेद विस्तार अधिकारी ह्यांच्या आयुर्वेद ज्ञानाचा वापर पूर्ण जिल्ह्यात करून आयुर्वेदाव्यतिरिक्त इतर कामे त्यांच्यावर लादू नयेत.
प्रजनन आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी एकात्मिकरित्या झाली तर स्त्रियांचे सर्वांगीण आरोग्य आणि पर्यायाने समाजाचेच आरोग्य सुधारण्यासाठी प्रजनन आरोग्य सेवेचा दीर्घकाळ उपयोग होईल असे वाटते.
लेखक –
प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार
आयुर्वेद वाचस्पति,
सहयोगी प्राध्यापक,
स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र विभाग,
रा. आ. पोदार वैद्यक महाविद्यालय
मुंबई ४०० ०१८
+917738086299
+919819686299
subhashmarlewar@gmail.com

मासिक पाळी – एक निसर्गदत्त देणगी........

मासिक पाळी – एक निसर्गदत्त देणगी........

मासिक पाळी ही स्त्री शारीरक्रियेची नैसर्गिक अवस्था असून तिच्या आरोग्याचे प्रतिक आहे. नैसर्गिक घडामोडीची स्त्री देहातील नियमितता, नियमबद्धता, नेटकेपणा ह्या सर्वांचे प्रतिकात्मक चित्रण म्हणजे मासिक ऋतुचक्र. सृष्टीतील ऋतुचक्राचे सदेह दर्शन स्त्रीमध्ये दिसते. निसर्ग जसा परिवर्तनशील तशीच स्त्रीपण आवर्तनशील आहे. नियमबद्धता, सातत्य, स्थैर्य ह्या सर्व गोष्टी निसर्गाप्रमाणेच स्त्रीच्या देहामध्ये आहेत. निसर्गातल्या अदृश्य, अमृत ऋतूची शक्ती, सामर्थ्य ह्याचे सजीव सगुणरूप म्हणजे स्त्री. म्हणून स्त्रीला ऋतुमती झाली असे म्हणतात. स्त्रियांच्या मासिकपाळी संदर्भात वैज्ञानिक माहीतीचा आढावा घेत असतानाच मासिकपाळी निसर्गदत्त देणगी कशी आहे ह्याचा उहापोह ह्या लेखामध्ये आपण करणार आहोत.
पौगंडावस्था म्हणजे काय ?
वयाच्या ८ ते १८ वर्षाच्या दरम्यान स्त्री शरीरामध्ये विशिष्ट बदल होत असतात. ह्यात जांघेत, बगलेत केसांची वाढ, स्तनांची वाढ, स्त्रीचा बांधा व मासिक पाळी सुरु होणे. ह्यास पौंगडावस्था असे म्हणतात. हा काळ सुमारे ४ वर्ष राहतो. ह्याकाळात उंची व वजनात वाढ होते. मानसिक बदल पण होतात. ह्या वयात मुलींचा आत्मविश्वास जागृत करणे व त्यांच्यावर संस्कार करणे महत्वाचे आहे.
मासिक पाळी म्हणजे काय ?
स्त्रियांमध्ये दर महिन्याला ३ ते ४ दिवस योनिमार्गे जो रक्तस्त्राव होतो. त्याला मासिक पाळी किंवा रज:स्त्राव म्हणतात.
मासिक पाळी केव्हा सुरु होते ?
प्रथम ‘रजोदर्शन’ सामान्यतः वयाच्या १२ व्या वर्षी होते. देश, काल, ऋतु, वयानुसार काही स्त्रियांमध्ये प्रथम रजोदर्शन १६ व्या वर्षी देखील होऊ शकते. बदलत्या वातावरणामुळे व जीवनशैलीमुळे अलीकडे ८ व्या वर्षीसुद्धा प्रथम रजोदर्शन झाल्याची उदाहरणे आहेत. एकदा रजोदर्शन झाल्यानंतर गरोदरपणी व सूतिकावस्थेत रज:स्त्राव होत नाही. कालांतराने पुन्हा मासिक पाळी पूर्ववत सुरु होते. वयाच्या ४५ वर्षानंतर मासिक पाळी हळूहळू बंद होते व पुन्हा येत नाही. ह्यास ‘रजोनिवृत्ती, किंवा ‘मेनोपॅाज’ असे म्हणतात.
मासिक पाळीत रज:स्त्राव किती दिवस असतो व पुन्हा किती दिवसानंतर येते ?
महर्षी चरकांनी रज:स्त्राव काळ ५ दिवसांचा सांगितला आहे. काही स्त्रियांमध्ये हा काळ ७ दिवसांचा सुद्धा असतो. आधुनिक विज्ञानदेखील ह्याला सहमत आहे. मासिकपाळीची पुनरावृत्ती २८ दिवसांनी होते. काही स्त्रियांमध्ये हा काळ जास्तीतजास्त ३५ दिवसांपर्यंत वाढू शकतो. नियमित पाळी येणे हे आरोग्याचे लक्षण आहे. स्त्रीरोग चिकित्सेत व गर्भावस्थेत महिना म्हणजे हा २८ दिवसांचा काळ समजावा.
मासिकपाळीमध्ये किती रक्तस्त्राव होतो ?
मासिक पाळीतील रक्तस्रावाचे प्रमाण निर्धारित करणे कठीण असते. प्रत्येक स्त्री मध्ये हे प्रमाण वेगवेगळे असते. त्यामुळे ठराविक प्रमाण एका स्त्रीसाठी सामान्य असेल, तर दुसऱ्या स्त्रीसाठी तेच अधिक ठरू शकते. महर्षी चरकाचार्यांनी हे प्रमाण ४ अंजली मानले आहे. आधुनिक विज्ञानाप्रमाणे दर मासिक पाळीत ५० ते ७० मिलीलीटर रक्तस्राव होतो. महर्षी चरकांनी ह्यासंदर्भात सुंदर वर्णन केलेले आहे. “नैवातिबाहुलात्यल्पमार्तवं शुध्दमादिशेत् |” ह्यावरून भारतीय शास्त्रज्ञांची प्रज्ञा दिसून येते. व्यवहारात सामान्यपणे १ दिवसात स्त्रीला २ ते ३ घड्या बदलाव्या लागतात.
ऋतुमती स्त्री कशी ओळखावी ?
ह्या काळात आधीच्या ऋतुकाळातील संचित रज शरीराबाहेर गेलेले असते. द्वितीय ऋतुकाळातील रज नवीन असल्याने योनी शुद्ध असते. ह्या काळात स्त्रीला ‘ऋतुमती’ म्हणतात.
ऋतुमती स्त्रीची लक्षणे -
१) स्त्रीची योनि आणि गर्भाशय व्याधिरहित असणे अर्थात गर्भाधानास बाधक असा कोणताही व्याधी नसणे.
२) स्त्रीबीज शुद्ध असणे.
३) स्त्री शारीरिक रूपाने स्वस्थ असणे.
४) स्त्रीची मानसिक अवस्था प्राकृत व प्रसन्न असणे.
५) स्त्री पुरुष संभोगाकांक्षिणी (उत्सुक) असणे.
ह्यासंदर्भात पुरातन ग्रंथातील वर्णन वाखाणण्यासारखे आहे. त्या काळी अल्ट्रासोनोग्राफी सारख्या सोयी नव्हत्या. असे असूनही ग्रंथात ह्याबद्दल अतिशय चपखल वर्णन आढळते.
पीनप्रसन्नवदनां प्रक्लिन्नात्ममुखद्विजाम् |
नरकामां प्रियकथां स्रस्तकुक्ष्यक्षिमूर्धजाम् ||
क्षामप्रसन्नवदनां स्फुरच्छ्रोणिपयोधराम् |
स्वस्ताक्षिकुक्षिं पुंस्कामां विद्यादृतुमतीं स्त्रियम् ||
मासिक पाळीत दिनचर्या कशी असावी ?
आधुनिक चिकित्सा शास्त्रात रजस्वला स्त्रीसाठी कुठल्याही विशेष दिनचर्येचे वर्णन मिळत नाही. रक्तस्रावामुळे स्त्रीला थकवा येतो, चालण्यास कष्ट होतात. अशावेळी त्या स्त्रीला आराम मिळण्याच्या दृष्टीकोनातून आयुर्वेदाने अधिक परिश्रम करण्यास निषेध केला आहे. हॉर्मोन्सच्या प्रभावामुळे काही स्त्रियांना भूक लागत नाही. आयुर्वेदानुसार वायु आपले कार्य जननेन्द्रियांच्या ठिकाणी करत असतो. त्यामुळे वायु आणि पित्त एकत्रितपणे पचनाचे कार्य योग्यरीत्या करू शकत नाही. अग्निमांद्य स्वाभाविक असतेच. म्हणूनच लघु, सुपाच्य व अल्पाहार घेण्यास सांगितला आहे. ह्याकाळात योनि अशुद्ध असण्याची भावना होते म्हणून योनिधावन करू नये असेही वर्णन आहे. काही स्त्रिया योनिधावन करणे उचित मानतात. परंतु त्याचा निषेध आहे हे ध्यानात ठेवावे. आधुनिक वैद्यकशास्त्र देखील ह्याच्याशी सहमत आहे. आधुनिक विज्ञानाने रजस्वला स्त्री निरोगी असेल, तर संभोग निषिद्ध मानलेला नाही. मात्र योनीमध्ये जंतुसंक्रमण असल्यास समागम करू नये. त्यामुळे डिम्बवाहिनी शोथ (salpingitis) होण्याची शक्यता असते. संक्षेपाने, आयुर्वेदात रजस्वला स्त्रीला विशिष्ट दिनचर्या पालन करण्याचा आदेश दिला आहे, तर आधुनिक विज्ञानाने कुठलेही बदल करण्यास सांगितले नाहीत.
मासिक पाळीच्या काळात पोटात दुखण्याचे कारण काय ?
ओटीपोटात जंतुसंसर्ग झाल्यामुळे पोटात दुखू शकते. पोषक आहार, मोकळी हवा व पाळी नियमित करणारी हॉर्मोनविरहित आयुर्वेदिक औषधे घेतल्यास पोटातील दुखणे थांबते. आयुर्वेदातील बस्ति चिकित्सा ह्यात उपयुक्त ठरते.
नियमित मासिक पाळी मागे-पुढे करण्यासाठी गोळ्या घेणे चांगले आहे का?
मासिक पाळी मागे-पुढे करण्यासाठी गोळ्या घेणे आरोग्याच्या दृष्टीने संयुक्तिक नाही. मासिक पाळी चक्र म्हणजे काही एखादी अपॉईंटमेंट नव्हे म्हणून सूज्ञ स्त्रियांनी उठसूट लहानसहान कारणांसाठी हॉर्मोन्स घेऊन आरोग्य बिघडू देऊ नये. ह्याने निसर्ग नियमांना व स्त्रीच्या शारीरक्रियांना अडथळा येतो व पुढे संततीप्रप्तीच्या काळात अडचणी निर्माण होतात.
हॉर्मोन म्हणजे काय ?
विशिष्ट यंत्रणांना उत्तेजित करण्यासाठी शरीरातील ग्रंथींपासून निर्माण होणारा व रस-रक्तामार्फत स्रवणारा द्रव म्हणजे हॉर्मोन. स्त्री शरीरात अशा हॉर्मोन्स वर संपूर्ण नियंत्रण करणारी मस्तिष्क स्थित पियुशिका ही अन्तःस्त्रावी ग्रंथी असते. मासिक पाळीमध्ये पहिल्या पंधरा व पुढच्या पंधरा दिवसात काही बदल करण्यास ही ग्रंथी सतत कार्यरत असते. तिच्या स्रावांना हॉर्मोन्स म्हणतात.
आयुर्वेदिक ग्रंथामध्ये आयुर्वेदात हॉर्मोनचा विचार आहे का ?
आयुर्वेदिक ग्रंथामध्ये हॉर्मोनचा विचार ‘ओज’ ह्या अर्थाने केलेला आहे. गर्भावस्थेत ओज स्थिर–अस्थिर ह्या संदर्भातील उल्लेख आलेले आहेत. तैत्तरीय उपनिषदामध्ये हॉर्मोन संदर्भातील उल्लेख आहेत. ह्या ओजामुळेच स्त्री व्यक्तिमत्व प्रसन्न व लोभस दिसते.
वर्षभर हॉर्मोनच्या गोळ्या घेऊन पाळी कायमची बंद केल्यास काय परिणाम होतात ?
परवा सुनीताने मला दूरध्वनीवरून हा प्रश्न विचारला तेव्हा मला धक्काच बसला. हे खूळ मला उशिरा कळाले. पूजा, मंगलकार्य अशा प्रसंगी अपवादात्मक परिस्थितीत हॉर्मोनच्या गोळ्या घेणे ठीक आहे. परंतु ह्यामुळे शरीरातील हॉर्मोनचे संतुलन बिघडते. मग ३६५ दिवस गोळ्या घेऊन पाळी थांबवायची म्हणजे नैसर्गिक चक्र कृत्रिम हॉर्मोन देऊन बिघडवायचे व त्याचे गंभीर परिणाम पुढे आयुष्यभर भोगायचे.
अलीकडेच लिब्रल नावाच्या गोळीसंदर्भात वाचले. ३६५ दिवस गोळी घेऊन पाळीपासून मुक्त करणारी ही गोळी म्हणजे परदेशातून आलेलं एक खुळ. त्या अनुषंगाने सुनीताने विचारलेला प्रश्नही तसा बरोबरच होता म्हणा. नैसर्गिक हॉर्मोनमुळे स्त्री शरीर हॉर्मोनियस राहते हे सुनीताला कोण सांगणार? स्त्रीबीज ग्रंथीमध्ये स्त्रीबीजाला जिवंत ठेवणारे हॉर्मोन म्हणजे अपर ओज. गर्भाशयात व गर्भाशयाच्या बाहेर जन्मानंतर सर्वांना कार्यरत ठेवणारे हॉर्मोन म्हणजे अपर ओज. ह्या सर्व गोष्टी सुनीताच्या बुद्धीस आकलन न होणाऱ्याच दिसतात.
कृत्रिम हार्मोन घेऊन मासिक पाळीचे चक्र बदलणे म्हणजेच निरोगी स्त्रीला रोगी बनविणे. १० - २० वर्षापूर्वी गर्भनिरोधकांना स्त्रियांनी विरोध केला. नीतीमुल्याची ती झलक होती. सगळा खटाटोप करून उठसूट हॉर्मोनच्या गोळ्या घेऊ नयेत एवढ खरं. वर्षभर गोळ्या घेणे ही कल्पनाही न केलेली बरी.
शरीरात सर्व धातू तयार झाल्यानंतर शेवटी ओज तयार होते. हे ओज जन्मापासून मृत्यु पर्यंत चित्तामध्ये असते. (universal intelligence) व आनंद स्वरुपात स्थित असते. (aspects of supreme). कृत्रिम हार्मोन घेतल्यामुळे आनंद आणि त्याचे स्वरूप दोन्ही नष्ट होतात. आनंदाचे स्फुरण, शब्द पोरके होतात. अष्टधा प्रकृती, बुद्धी, अहंकार, पंचतन्मात्रा, पंचमहाभूते यांच्या ठायी हे ओज असते. कृत्रिम गोळयांमुळे ह्या ओजाची नासाडी होते. म्हणून सुनिता असो की अन्य स्त्रिया, कोणीही ह्या गोळ्या घेण्याबद्दल चुकुनही विचार करू नये.
लेखक –
प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार
आयुर्वेद वाचस्पति,
सहयोगी प्राध्यापक,
स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र विभाग,
रा. आ. पोदार वैद्यक महाविद्यालय
मुंबई ४०० ०१८
+917738086299
+919819686299
subhashmarlewar@gmail.com

गर्भसंस्कार आणि काम परमात्म्याची सृजनशक्ती

गर्भसंस्कार आणि काम परमात्म्याची सृजनशक्ती
लेखक – प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार
आयुर्वेद वाचस्पति
सहयोगी प्राध्यापक, पोदार वैद्यक महाविद्यालय व रुग्णालय, वरळी, मुंबई
भ्रमणध्वनी - +९१७७३८०८६२९९/ +९१९८१९६८६२९९
ईमेल – subhashmarlewar@gmail.com
रशियातील एका वैज्ञानिकाने माकडांवर काही प्रयोग केले. माकडांचे त्याने दोन गट बनवले. एका गटामध्ये हुबेहूब कृत्रिम माकडीण बनवली. नकली हात, नकली चेहरा सर्वकाही हुबेहूब माकडासारखेच. दुसऱ्या गटामध्ये जिवंत माकडीण ठेवण्यात आली. माकडाच्या १० नवजात पिल्लांना कृत्रिम माकडीणीमार्फत चांगल्या प्रकारचे दूध पाजण्यात आले, कृत्रिम प्रेम करून पालन – पोषण करण्यात आले. ही पिल्ले त्या कृत्रिम माकडीणीच्या पोटाला बिलगून राहत. कालांतराने ही पिल्ले धष्टपुष्ट, स्वस्थ अशी माकडे बनली. मात्र मानसिकदृष्ट्या ती कमकुवत होती, विक्षिप्त व विकृत बनली होती. पिल्लांना दूध मिळाले, त्यांचे शरीरही चांगले धष्टपुष्ट झाले. परंतु ती विक्षिप्त का झाली? वैज्ञानिक गोंधळात पडले. वैज्ञानिकांच्या प्रयोगशाळेमध्ये प्रेम ही वस्तू मिळतच नाही. दुसऱ्या गटातील पिल्लांना प्रेमासहित दुध मिळाले व ती शारीरिक व मानसिकदृष्ट्या आरोग्यसंपन्न घडली.
पहिल्या गटातील पिल्लांच्या परिस्थितीप्रमाणे आपल्या देशातील समाजाची परिस्थिती बनली आहे. अभिनय करणारी आई मिळते. अभिनय करणारा बाप मिळतो. नकली बाप नकली आई मुलांसाठी अंगाई गीत गाते. पण मुले विक्षिप्त होतात. आपण म्हणतो ही अशांत कशी झाली. ही मुले एखाद्याच्या पोटात सुरा भोसकतात, मुलींच्या अंगावर अॅसीड टाकतात, कॉलेजला आग लावतात, बसवर दगड फेकतात. शिक्षकांना मारहाण करतात.
आजचा समाज प्रेमाच्या केंद्रावर निर्मित नाही. त्यामुळे समाजात विक्षिप्तता व गुन्हेगारी प्रवृत्तीचे प्रमाण जास्त आहे. युद्ध, आत्महत्या, कुरूप-समाज आणि रुग्ण-मनुष्य ही प्रेमाच्या अभावातून निर्माण झालेली परिस्थिती आहे. प्रेमातून विवाह निर्माण झाल्यास सुसंस्कृत समाज निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे. जे पति-पत्नी प्रेमपूर्ण संभोगात लीन होत नाहीत, ते केवळ भौतिकवादी मुलास जन्म देतील. त्यांचे जीवन भौतिकतेच्या पुढे जाणार नाही. जे आई-वडील एकमेकांवर प्रेम करून मुलास जन्म देतील, त्या मुलांच्या जीवनात वसंताची बहार येईल, त्यांचे जीवन गतिमान व समृद्ध बनेल. प्रेम हे बीज आहे व सुप्रजनन हे या बीजास आलेले फळ आहे. प्रेम जर कुटुंबाचे केंद्र बनेल तर स्वामी अरविंद घोषांची सुपर-मॅन ची कल्पना, ओशोंची महामानवाची संकल्पना या पृथ्वीवर साकार होईल. भृण ज्याचा पहिला अणु प्रेमाचा त्याचा अंतिम श्वासही प्रेमाचाच असेल. ह्यातूनच एक सात्विक मानवता उत्पन्न होऊ शकते.
क्षितिजाच्या पलीकडे जाऊन नवनिर्माण करणे खरच कठीण काम आहे. खर तर ती एक जोखीम आहे. मात्र अशी जोखीम जे घेत नाहीत, ते जमिनीवरच्या किड्या-मुंग्यांप्रमाणे जगतात व जे क्षितिजाच्या पलीकडे झेप घेतात. ते “बाज” पक्षी म्हणून सिद्ध होतात. अलिकडचा समाज हा घराची कवाडे बंद करून यशप्राप्तीची आराधना करणारा आहे.
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जीवनाचे चार पुरुषार्थ आहेत. समाज धारण करणारी सुव्यवस्था म्हणजे ‘धर्म’. निर्वाहाचे साधन म्हणून उपयोगात येतो तो ‘अर्थ’. प्रजननातील महत्त्वपूर्ण घटक म्हणजे ‘काम’. या तिन्ही पुरुषार्थांचा उपभोग घेऊन साक्षी भावाने निवृत्त होणे म्हणजे ‘मोक्ष’. काही प्रवृत्तींनी कामजीवनाचे विकृतीकरण करून समाजापुढे मांडले, म्हणून समाजाला त्याचा आनंद घेता आला नाही. खरं तर कामशक्ती म्हणजे परमात्म्याची सृजनशक्ती, ह्यातूनच ऊर्जाशक्ती निर्माण होते. प्रेमभावाने पति-पत्नीचे मिलन घडले तर ‘कामाचे’ रुपांतर सृजनशक्तीमध्ये होईल. अपवित्र किंवा पापदृष्टीने कामशक्तीकडे पाहिले तर ‘काम’ कुरूप होऊन जाईल आणि प्रेमभावे बघितले तर ‘दिव्यशक्ती’ बनून राहील.
पति-पत्नीच्या शारीरिक मिलनापूर्वी त्यांचे मानसिक मिलन होणे अत्यावश्यक आहे. लैंगिक शक्ती ही इंद्रियांमध्ये नसते तर ती मनामध्ये असते. विवाहानंतर शरीरे एकत्र आली म्हणजे मिलन झाले असे नाही. एकमेकांना समजून घेणे, एकमेकांच्या प्रश्नांशी एकरूप होणे व त्यानंतरचे शारीरिक मिलन अद्वितीय असते, दिव्य आनंद देऊन जाते.
प्रेम हे परमात्म्याचे द्वार आहे, पण आमचे त्याकडे लक्ष नाही. भौतिक माणसांनी आणि भौतिकवादी प्रवृत्तीने ही दारे बंद करून टाकली आहेत. ह्या प्रवृत्तीने प्रेमाची हत्या करून मनुष्य जीवन सुव्यस्थित करण्याचा तथाकथित प्रयत्न केला आहे. जीवनात प्रेमाची संभावनाच राहणार नाही ह्याकडे लक्ष दिले आहे. समाजाची संपूर्ण व्यवस्था निष्प्रेम आहे आणि त्यातून होणारे विवाद जीवनाच्या अंतापर्यंत टिकून राहतात ही त्याची शोकांतिका. हजारो वर्षांपासून आपण भगवान श्रीकृष्ण, श्रीराम, गौतमबुद्ध, जीझसक्राईस्ट, मोहम्मद पैगंबर, गुरुनानक, संत ज्ञानेश्वर, चक्रधरस्वामी अशा अनेक संत महात्म्यांची स्तुती करत आलो आहोत. ह्या सर्वांना ईश्वरप्राप्ती झाली मात्र आजच्या समाजात अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच माणसे पूर्णत्वाला गेली. ह्याचा विचार करण्याची नितांत गरज आज निर्माण झालेली आहे.
शेतकऱ्याने लाखो बीजे पेरली आणि त्यातील एखादेच बीज जर अंकुरले तर त्याला तुम्ही शेतकरी म्हणाल का? ही बीजे जमिनीवर नुसती जरी फेकली असती तरी त्यातील एखादे नक्कीच उगवले असते! तेव्हां लाख बीजे पेरली आणि ती सर्व उगवली तर तो खरा शेतकरी. त्यापैकी दोन-चार उगवली नाही तरी ठीक आहे. पण आता तर उलटेच होत आहे. कोट्यावधी मुले जन्माला येतात, त्यात एखादा डॉ. होमी भाभा असतो, कधी डॉ. माशेलकर तर कधी डॉ. अब्दुल कलाम.
फुलाच्या सुगंधाची उधळण ही प्रत्येक बीजाची क्षमता . . . .
प्रेमसंपन्न वैवाहिक जीवनामुळे प्रत्येक व्यक्ती गौरवाला, तेजस्वीपणाला प्राप्त होऊ शकते. प्रत्येक बीजात ही क्षमता आहे की, ते फुलाप्रत पोचते व सुगंध उधळते आणि जेव्हां हे बीज वृक्ष बनते तेव्हां पाखरे त्यावर क्रीडा करतात. वारा देखील फेर धरत गाणे म्हणतो. वसंताच्या ह्या क्षणांमध्ये परिपूर्णतेचा आनंद आणि उल्हास आहे, हीच परमात्म्याची प्राप्ती आहे. भोगवादी प्रवृत्तीची माणसे संतती निर्माण करतात, काळाच्या ओघात यमसदनास जातात. मात्र आपली संतती मागे ठेऊन जातात. ‘उल्लू मर जाते है, औलाद छोड जाते है !’ मग ही मुलेही मागे राहत नाहीत, ती देखील पैदास वाढवतच जातात. अशाप्रकारे हळूहळू खोट्या नाण्यांचे चलन वाढत जाते. प्रेमाशिवाय विवाह करण्यापेक्षा अविवाहित राहिलेलेच बरे !
बहुतेक वेळा श्रेष्ठ आणि प्रज्ञावान व्यक्ती अविवाहित राहतात . . . .
संत रामदासस्वामी, ओशो, अटलबिहारी बाजपेयी, डॉ. अब्दुल कलाम ह्यांनी विवाह केला नाही. गानकोकिळा लता मंगेशकर हे त्यातलेच एक उदाहरण. अन्य सामान्य माणसे एक नाही तर चार विवाह करतात. माणूस जितका निकृष्ट असतो तितका तो जास्त वैताग निर्माण करतो. बुद्ध देखील एकाच मुलाचा पिता झाला. सर्वसामान्य माणसे रांगा लावून टाकतात. त्यांच्यात स्पर्धा चालू आहे की कोण किती मोठी रांग लावतो.
प्रेमाशिवाय विवाह करू नये असे माझे मत नाही. परंतु पति-पत्नीमध्ये ताळमेळ असावा. परंतु अलीकडे तसे दिसत नाही. पति-पत्नीचा ताळमेळ तुम्ही कुणा करवी पाहता? ज्योतिषाकडून ! जरा त्याच्या घरची अवस्था पहा. स्वत:च्या बायकोशी तो ताळमेळ साधू शकला आहे का? अन न जाणो किती पति-पत्नीचा ताळमेळ तो बसवतो आहे? तोही चार – आठ आण्यात. . . .
पति-पत्नीमध्ये ताळमेळ बसला तर त्यांची मुलेही प्रतिभावान होतील. प्रेम आणि विवाहाची ही पद्धत लागू झाली तर शेकडो आईनस्टाईन जन्माला येतील, प्रतिभेच्या राशी उभ्या राहू शकतील.
प्रतिभावंतांना जन्म देणे वैदिक विज्ञानाने शक्य :-
पति-पत्नीने एकत्र येतांना नियोजनबद्ध पद्धतीने एकत्र येणे महत्वाचे. नियोजनविना ते अशक्य आहे. ह्या संबंधीचे सविस्तर मार्गदर्शन आयुर्वेदीय ग्रंथामध्ये दिसून येते. आपण शेतातील बियांची जितकी काळजी घेतो तितकी माणसाच्या बीजाची घेत नाही. आपल्यासारखे मूर्ख आपणच ! शेताला पाणी सोडणे, राखण करणे हे जसे महत्वाचे तसेच माणसांसाठी विशेष संस्कार करण्याची आज नितांत गरज आहे.
प्रेम आणि विवाह यांचा काय संबंध ?
प्रेमातून विवाह होऊ शकतो तसेच विवाहानंतरही प्रेम होऊ शकते. ह्या संदर्भात काही गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. प्रेम ही परमेश्वराची मोठी देणगी आहे तर विवाह ही समाजव्यवस्था आहे. विवाह सामाजिक संस्था आहे. प्रेम प्रकृतीचे दान आहे. प्रेम व्यक्तीच्या प्राणामध्ये निसर्गतः निर्माण होते तर विवाह मात्र समाज व कायद्यानुसार केला जातो. विवाह ही मनुष्याची गरज आहे तर प्रेम हे परमात्म्याचे दान आहे. वैवाहिक जीवनात प्रेम निर्माण होईलच असे नाही. विवाहामुळे सहवास लाभतो. सहवासामुळे प्रेम निर्माण होऊ शकते. विवाहापासून परिवार बनतो, ज्याला आपण ‘गृहस्थाश्रम’ म्हणतो. संघर्ष, कलह, द्वेष, इर्षा अशा परिस्थितीत देखील आपण तोंडदेखले हसत घराबाहेर पडतो. ह्यात आत्मतृप्ती होत नाही. पति-पत्नी एकमेकांच्या गरजा पूर्ण करू शकत नाहीत. ह्यातूनच एकमेकांस कमी लेखणे, दुषणे देणे, विक्षिप्त वागणे सुरु होते. ऋषिमुनींनी निर्माण केलेला हा समाज अधोगतीकडे कसा जातो हे अनाकलनीय आहे. तुझ्यामुळे मला शांती मिळत नाही असे जेव्हां पति-पत्नी म्हणायला लागतात तेव्हा प्रेम काय आहे हे कळते. दोन लहान मुले एकमेकांशी भांडत होती. आईने मुलांना भांडण्याचे कारण विचारले असता मुलांनी उत्तर दिले, “मम्मी ! वी आर नॅाट फायटिंग, वी आर प्लेईंग मम्मी अँड़ ड़ॅड़ी गेम !”
मानवता निर्माण होण्यासाठी कामाची पवित्रता, धार्मिकता स्वीकार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कामयोगातून परमात्मा जीव जन्माला घालतो. तो जीव म्हणजे पाप नाही तर जीवन आहे. मनुष्य जीवनावर प्रेम करत नाही. म्हणून फक्त लैंगिकता उरली व यौवन पाप झाले. वास्तविक हे पाप नसून ह्यात फक्त प्रेमाचा अभाव आहे !
जीवन निरंतर बदलत आहे. जीवनाची सृजनात्मकता परमात्मा स्वरूपाने तुमच्या समोर आहे. जोपर्यंत पति-पत्नी एकमेकांवर प्रेम करणार नाहीत तोपर्यंत सुप्रजनन होणार नाही. मुलांना दूध मिळेल, कपडे मिळतील, घरही मिळेल परंतु प्रेम मिळत नसेल तर सर्व मिळूनही व्यर्थच.

Visit Our Page