Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Monday, January 9, 2012

कर्करोग विरोधी आहार विहार

नवीन संशोधनांनी आपल्या कर्करोग संबंधातील प्रतिबंधात्मक काळजी आणि उपचार या संबंधातील विचारात अनेक मुलभूत बदल केले आहेत. आपल्या खाद्यपदार्थातील काही पदार्थ हे कर्करोगाची वाढ करण्यास किंवा वाढीला प्रोत्साहन देण्यात नक्की वाटा उचलतात हे आता नक्की समजले आहे, तर काही पदार्थ हे त्याच्या वाढीवर नियंत्रण घालतात किंवा आळा बसवितात हे देखील सिद्ध केले आहे. संशोधनांनी असे लक्षात आले आहे की, किमान ३५% कर्करोगांमध्ये आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी, विशेषत: ज्यात जास्त प्रमाणात स्निग्ध पदार्थ आहेत असे व प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ यांचा विपरीत परिणाम होत असतो. आपल्या खाद्य-सवयी बदलल्या तर यातील अनेक कर्करोग नियंत्रित करता येतील असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.

कर्करोग नियंत्रण आणि उपचार करणाऱ्या संस्थांच्या मते कर्करोग हे जगात मृत्यूचे दुसऱ्या क्रमांकाचे कारण आहे.
शरीरातील अवयवांमध्ये पेशींची अनियंत्रित वाढ म्हणजे कर्करोग असे सामान्यत: म्हणता येईल. या वाढीची सुरवात, एखाद्या विशिष्ठ रसायनामुळे, एखाद्या विषाणू (व्हायरस) मुळे, वातावरणीय विषारी पदार्थामुळे ज्यांना एखाद्या विकासकांनी आणखीन घातक वळण दिले आहे, जसे आपल्या शरीरातील हार्मोन्स किंवा खाद्यपदार्थ. आपली जीवन पद्धती, विशेषत: खाद्य-सवयी कर्करोगाच्या नियंत्रणामध्ये फार महत्वाचा घटक आहे. कर्करोगाची घातकता कमी करण्यासाठी व तो आपल्याला होणार नाही याची काळजी घेण्यासाठी वनस्पती-जन्य विशेषत: शाकाहारी आहार निवडा.

कर्करोग नियंत्रक आहार:

फळे आणि भाज्या यांचा आहारातील वापर वाढवा...

अ. आहारात भाज्या आणि फळे यांचा वापर मोठ्या प्रमाणात असेल तर त्याने अनेक घातक कर्क-रोगांना आपोआपच खीळ बसेल. भाज्या व फळे, बायो-फ्लेवोनॉईडस व इतर वनस्पतीजन्य रसायने, फायबर, फॉलेट, व अँटिऑक्सिडंट्स (बिटा-कॅरोटीन आणि क जीवनसत्व) यांनी समृद्ध असतात. या सर्व पदार्थांनी कर्करोग वाढ होण्याची प्रक्रिया कमी किंवा बंद होते. फळे आणि भाज्या यांत अनेक अशी रसायने, न्युट्रीयंट्स जसे जीवनसत्व, फायटो-रसायने किंवा इतर वनस्पती जन्य रसायने असतात ज्यामुळे कर्करोगावर नियंत्रण ठेवता येते.

आ. या न्युट्रीयंट्स मुळे काही प्रकारच्या कर्क-रोगांना पायबंद घालता येऊ शकतो. कृसिफेरस भाज्या जसे, कांदा, लसूण्‍, ब्रोकोली व कॉलीफ्लॉवर आणि आंबट फळे जशी, ग्रेप-फ्रुट आणि संत्री, रास्पबेरी, स्ट्रॉ-बेरी, ब्लॅक-बेरी अशा विविध बेरीज, हिरव्या पालेभाज्या जसे पालक इ. यांचा आहारातील समावेश वाढवा. दिवसाकाठी ५ ते ९ सर्विन्गज या प्रमाणात कच्ची फळे आणि भाज्या आहारात घ्या.

इ. यातील उपयुक्त रसायने कर्करोग वाढीसाठी उपयुक्त असलेल्या पेशींचा नायनाट करून किंवा त्यांना निष्क्रिय करून आपले कार्य करीत असतात. (by preventing precancerous changes in cellular genetic material due to carcinogens by inducing the formation of protective enzymes -).(रक्षक/नियंत्रक  एन्झाईम्स ची ऊत्पत्ती केल्याने ते शरीरातील पेशींमधील जनुकीय(जेनेटिक) घटकांमधे कार्सिनोजेन्स (कॅन्सर उत्पादक घटक) मुळे होणारे कॅन्सरपूर्वीचे  बदल्‍ नियंत्रित करू शकतात.शरीरातील डीएनए च्या तंदुरुस्ती साठी आणि दुरुस्ती साठी फोलेट हे खास करून कार्य करीत असते.

विविधरंगी फळे आणि भाज्या खा :

फळे आणि भाज्या यांच्यातील विविध रंगद्रव्य आणि रसायने, ज्यांनी भाज्या आणि फळांना आकर्षक रंग प्राप्त होतात ते देखील कर्क रोगांशी प्रतिकार करण्यात मदत करीत असतात. आहार तज्ञ आता किमान ३ वेगवेगळ्या रंगाच्या भाज्या आणि २ रंगांची फळे आहारात समविष्ट करावी असे सांगतात. गर्द-हिरव्या पालेभाज्या, तसेच गर्द-पिवळी, नारिंगी आणि लाल फळे व भाज्या यांचा आहारात समावेश असावा. किमान एक सर्व्हिंग क जीवनसत्व युक्त फळे (लिंबू जातीची - मोसंबी, नारिंगी इ.) आणि कृसिफेरस भाज्या आहारात असणे आवश्यक आहे.

अनेक फळे आणि भाज्यांमध्ये एकापेक्षा जास्त प्रकारच्या कर्क-रोगांशी लढण्याची शक्ती असतेखालीएक विविध फळे आणि भाज्या यांची यादी दिली आहे :

-जीवनसत्व युक्त :

आंबट जातीची फळे, स्ट्रॉ-बेरीज, आंबा, मोड आलेली धान्ये, कॉलीफ्लॉवर व बटाटा.

बिटा-कॅरोटिन युक्त :

आंबट जातीची फळे, रताळी, गाजर, लाल-भोपळा, पपई, आंबा आणि ओला-जर्दाळू

तंतुमय पदार्थ :

मका, कडधान्ये, ब्रोकोली, मोड आलेली धान्ये, सालासकट बटाटा, गाजर, सफरचंद, बेरीज आणि अंजीर

फोलेट युक्त पदार्थ :

हिरव्या पालेभाज्या जसे पालक, संत्र्याचा रस इ.

 जीवनसत्व युक्त पदार्थ :

ड जीवनसत्व हे कर्करोग प्रतिबंधात महत्वाची भूमिका पार पाडत असते. सूर्यप्रकाश हा ड जीवनसत्वाचा अतिशय चांगला स्रोत आहे हे आपण सारेच जाणतो. आपले शरीर हे, सूर्य प्रकाशातील अतिनील किरणांपासून अतिशय पटकन आणि उपयुक्त पद्धतीने आपल्याला ड आणि ड३ जीवनसत्व, अगदी काही दिवसांत उपलब्ध करून देण्यासाठी बनलेले आहे. सूर्यप्रकाशा बरोबरच आहारात देखील ड जीवनसत्व युक्त आहार घेणे उपयुक्त ठरते हे सिद्ध झाले आहे. या मध्ये अ आणि ड जीवनसत्व असलेले दूध (फॉर्टिफाईड दूध), कडधान्ये, फळांचा रस, आणि ज्यात नैसर्गिक रित्या ड जीवनसत्व जास्त प्रमाणात आहे असे पदार्थ जसे अंडी, मासे, यांचा समावेश आहारात करावा.

क्रमश: - पुढील लेखात कर्करोगाशी मुकाबला करू शकणाऱ्या आणखी अन्नपदार्थांची माहिती करून घेऊ...

संदर्भ:
१. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र : मृत्यूची मुख्य कारणे...
२. अमेरिकन कर्करोग सोसायटी : कर्करोग नियंत्रण आहार नियमावली
३. राष्ट्रीय कर्करोग संस्था : कोम्पिमेंतरी व पर्यायी औषधे - वार्षिक अहवाल
४. राष्ट्रीय कर्करोग संस्था : ड जीवनसत्व व कर्करोग प्रतिबंध - शक्तीस्थळे आणि मर्यादा
५. जर्नल ऑफ क्लिनिकल न्युट्रिशन : ड जीवनसत्वाचे कर्करोग प्रतिबंधातील महत्व
६. साधक व बाधक आहार

विशेष टीप : शास्त्रीय संशोधनांतून अजून अमुक एक पदार्थ कर्करोगाशी मुकाबला करू शकतो, किंवा कर्करोग नियंत्रण करू शकतो असे निश्चित सिद्ध झालेले नाही. तथापि, विशिष्ठ पदार्थ आहारात समाविष्ट केल्यास सर्वसाधारण प्रकृतीस्वास्थ्याबरोबरच कर्करोग नियंत्रण होऊ शकते…डॉक्टर अमिता पुरोहित




विराज नाईक यांनी केलेला मराठी अनुवाद...

DrAmita Kulkarni Purohit

http://www.facebook.com/purohitamita

 

Saturday, December 31, 2011

॥ शंख भस्म ॥

शंख भस्म( १-३ गुंजा )

प्रकार ?
=>
द्विधा स दक्षिणावर्तो वामावर्तो...     (र.चं)

ग्राह्य ?
=>
द्विधा स दक्षिणावर्तो वामावर्तो शुभेतरः ।
अशुद्धो गुणदो नैव शुद्धश्च स गुणप्रदः ॥

दक्षिणावर्त शंख शुभ असतो.
अशुद्ध     अग्राह्य
शुद्ध     ग्राह्य

शंखशुद्धी ?
=>
अम्लैः सकांजिकैः च एव दोला स्विन्नः स शुद्धति ॥    (र.चं)

अम्लैः     =    निम्बूरस,इ.
कांजि    =    कांजी
दोला    =    दोलायंत्र
स्विन्न    =    शिजवणे
किती वेळ ?    =    १ प्रहर

शंखभस्म निर्माण ?
=>
१.    वन्हौ प्रोत्फुल्लयेत्‌
किंवा
२.    सम्यक्‌ लघुपुटे पचेत्‌ ।

शुद्ध शंख भस्म स्वरुप ?
=>
कुन्दवत्‌ जायते भस्म    सर्वरोगेषु योजयेत्‌ ।

==========================================॥

वृद्ध वैद्याधार से शंख भस्म निर्माण की कृती =>

दक्षिणावर्ती शंख ले । यह शुभ होता है ।
इस शंख के टुकडे कर ले ।
निम्बु रस में इन टुकडो को २४ घण्टे भिगोके रखे ।
स्वच्छ जल से प्रक्षालन कर ले ।
धूप में सुखोए ।
मृत्तीकापात्र में रख मातकापड कर गजपुट दे ।
स्वांगशीत होने दे ।
उस में कुमारी स्वरस डाल अच्छी तरह मिश्रण करे ।
धूप में सुखोए ।
सुखने पर फिर से गजपुट दे ।
इससे संगजिरे जैसा श्वेतवर्णी एवं सूक्ष्म मृदुस्पर्शी शंख भस्म प्राप्त होता है ।
==========================================॥

ग्रंथोक्त गुणधर्म=>

शंखक्षारो हिमो ग्राही ग्रहणारेकनाशनः ।
नेत्रपुष्पहरो वर्ण्यः तारुण्यपिटिकाप्रणुत्‌ ।
दक्षिणावर्तशंखस्तु त्रिदोषघ्नः शुचिर्निधिः ॥
ग्रह-अलक्ष्मी-क्षय-क्ष्वेडम्‌-अतिक्कक्षयाक्षमीः ।
(यो.र.)

==========================================॥

शंखभस्म यह शंख क्षार ही है ।

क्षार के काफी सारे गुणधर्म इस में आयें है ।
शंखभस्म  एवं कपर्दिक भस्म इनमें काफी गुणसादृश्यता है ।
दोनोही सेंद्रिय चुनखडीके कल्प है ।
पर इन्हमें शंख के कुछ विशेष गुण भी है । उनका उल्लेख आगे किया जायेगा ।

शंख भस्म ग्राही है । यह स्तंभन करता है । इसलिये अतीसार विशेषतः पक्वातीसार में उपयुक्त होता है ।
ग्रहणी व्याधी में बार बार द्रवरेच होते हो तो विशेष उपयुक्त ।
[ सशूल (कोष्ठशूल) सद्रव अल्पाल्प मल प्रवृत्ती ] यह उत्तम अवस्था है शंख भस्म के उपयोग के लिये ।

शंखोदर योग = { शंखभस्म + टंकण भस्म + अफू + जायफळ } = पक्वातीसार का योग ।

पित्तज कोष्ठशूल
पित्तज अतीसार
कफ-पित्तज कोष्ठशूल

विष्टब्ध/विदग्ध अजीर्ण

लक्षणानि    =>
    आध्मान
    आनाह
    शूल    =    तडक निघाल्याप्रमाणे वाटते.
    कोष्ठ स्तैमित्य    =    अन्न स्थिर पडल्याप्रमाणे वाटते
    विदग्ध उद्गार    =    करपट ढेकर
    मधुर उद्गार    =    गोड ढेकर

शंखभस्मस्य कार्य  
चिकित्सा तत्व    =>    उदर आध्मान नाश
                             अन्न पाचन वृद्धी
                             उदरस्थ वात शमन

अपक्ति जन्य उदरशूल
    स्थान        दोष    चिकित्सा अनुपान
१.    आमाशय    =>    पित्तज    => @ गोघृत
२.    पक्वाशय    =>    वातज    => @ निम्बु स्वरस

रसाजीर्ण / रसशेषाजीर्ण !

अनार्ह     =>    पित्त प्रकृती रुग्ण !

यकृत-प्लिहा दुष्टी समुत्पन्न विकार     =>    क्षारो हि याती माधुर्यम्‌ ।

यकृत्‌-प्लिहा वृद्धि        =>    क्षारो हि याती माधुर्यम्‌ ।
+ मलावष्टम्भ            =>    + विरेचक औषध देणे.

उदरस्थ गुल्म
अष्ठीला    

कालज अतीसार
विषूचिका
जंतुज विषूचिका (कॉलरा)        प्रारंभिक तीव्र वेग उपशमानंतर वापर उपशयकारक.
लक्षणानि    =>    द्रवरेच , छर्दी उपशय
        अल्प द्रवरेच + दौर्बल्य
चिकित्सा    =>    शंखभस्म + माक्षिक भस्म

नेत्र फूल पडणे    =>    रोपणधर्मी म्हणून उपयुक्त.

तारुण्यपीटिका    =>    उत्तम औषध.

दोषघ्नता    =>    पित्त
दूष्य    =>    रस रक्त अस्थिअ
स्थान गामित्व    =>    यकृत्‌ प्लिहा उदुंक ग्रहणी पक्वाशय नेत्र मुख

संदर्भ आयुर्वेदीय औषधिगुणधर्मशास्र भाग १ ते ५

http://www.facebook.com/waghmare.prashant
वैद्य प्र. प्र. व्याघ्रसूदन

  • 9867888265




Sunday, October 30, 2011

उतारवयात अनुभवा कामजीवन!

कामजीवन ही केवळ तरुणाईची मक्तेदारी आहे, हा एक सर्रास गैरसमज आहे. आपल्याकडील संवेदनशील सांस्कृतिक जडणघडणीमुळे हा चुकीचा प्रवाद पसरला आहे. वार्धक्यातही जोडप्यांना कामसुखाची गरज असते. कामक्रीडांमुळे शरीराचे विविध व्यायाम घडून येतात. संशोधकांना आढळलंय की कामजीवनाचं सौख्य लुटणाऱ्या वयोवृद्ध जोडप्यांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण ५०० टक्क्यांनी कमी असतं.

... 

साठीकडे झुकल्यावर माणसाची कामातुरता कमी होते, हा एक सर्रास गैरसमज आहे. अमेरिकेत एकदा ५० ते ९२ वयोगटातील ४३४६ स्त्री-पुरुषांचं सवेर्क्षण घेण्यात आलं होतं. तेव्हा, साठी-सत्तरीतल्या वृद्धांनी स्पष्ट कबुली दिली होती की, त्यांचं कामजीवन सुरळीत चालू असून, त्यात त्यांना खूप रस वाटतो. ही सगळी शिकली सवरलेली मध्यमवगीर्य मंडळी होती. खरंतर वृद्धापकाळातही कामजीवन आपणास साथ देतं, हे वास्तव तरुण मंडळींनाही उत्साहवर्धक वाटणारं आहे. या सवेर्क्षणात, अडतीस वर्षं संसार केलेली बाई म्हणाली होती, 'माझा नवरा बाहेरून परत येणार असतो, तेव्हा मी त्याची आतुरतेनं वाट पाहत बसते. फोनवर त्याचा आवाज ऐकला किंवा त्याने घातलेली शीळ ऐकली की माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात.'

सदुसष्ट वर्षांचे एक गृहस्थ म्हणाले होते, 'शाळेत असताना आम्ही प्रेमात पडलो अन् सरत्या काळात आमचं प्रेम वाढत गेलं. अजूनही आमच्या प्रेमाचा आलेख वर वर चढतोय.' आणि त्या सर्व प्रौढ दाम्पत्यांनी आपल्या संसारसुखाचं श्ाेय त्यांच्या निरामय कामजीवनास दिलं होतं.

वाढत्या वयानुसार माणसाच्या जिभेची चव, श्रवणशक्ती, दृष्टी, शारीरिक ताकद कमी होते, त्या प्रमाणे कामातुरतेवरही परिणाम होत असतो. शिवाय हृदयविकार, मधुमेहासारखे आजार त्यांच्या कामजीवनात अडथळे बनतात. पण या आजारांमुळे कामशक्ती ऱ्हास पावते असं मात्र मुळीच नाही.

कामजीवन ही केवळ तरुणाईची मक्तेदारी आहे, हा एक सर्रास गैरसमज आहे. आपल्याकडील संवेदनशील सांस्कृतिक जडणघडणीमुळे हा चुकीचा प्रवाद पसरला आहे. वार्धक्यातही जोडप्यांना कामसुखाची गरज असते. कामक्रीडांमुळे शरीराचे विविध व्यायाम घडून येतात. संशोधकांना आढळलंय की कामजीवनाचं सौख्य लुटणाऱ्या वयोवृद्ध जोडप्यांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण ५०० टक्क्यांनी कमी असतं. नियमित वीर्यपात होणाऱ्या पुरुषांचा मूत्रनलिकेतील प्रोस्टेट ग्रंथीच्या कर्करोगापासून बचाव होतो. कामसुखामुळे वयोवृद्धांच्या शरीरातील रक्तदाबावर अनुकूल परिणाम होतो. शरीराचे मांसल स्नायू कार्यरत राहतात. संप्रेरकाचं सवण नियंत्रित राहतं आणि शरीरातील विविध ग्रंथींची पुनर्रचना होण्यास मदत होते.

इंग्लंडमधील रॉयल एडिनबर्ग इस्पितळातील डॉ. डेव्हिड क्लिस यांनी १९ ते १०२ वयोगटातील ३५०० जणांचं शास्त्रोक्त सवेर्क्षण केलं होतं. तेव्हा त्यांना आढळलं होतं की आठवड्यातून तीनदा समागम करणारी मंडळी कामसुखापासून वंचित होणाऱ्या मंडळींपेक्षा तुलनेने १० वर्षांनी तरुण दिसतात. तारुण्याच्या टिकाऊपणासाठी आनुवंशिकता केवळ २५ टक्के कारणीभूत असते, बाकी सर्व त्यांची स्वभाववैशिष्ट्यं आणि वागणुकीवर अवलंबून असतं. कामसौख्यामुळे प्रौढांच्या मनावरचा ताण सैल होण्यास मदत होते. तसंच इण्डोफिर्नसारखी वेदनाशमक जीवरसायनं शरीरात निर्माण होतात. याशिवाय, कामसुख लुटताना शरीरात उत्पादित होणाऱ्या ऑक्सिटोसिन या रसायनामुळे पती-पत्नीतील एकोप्याची भावना वाढते आणि जोडप्यात सुसंवाद होऊन त्यांच्यातील जीवनबंध घट्ट होत असतात.

अलीकडेच, स्वित्झर्लण्डमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वृद्ध जोडप्यांच्या सवेर्क्षणात, पुन्हा एकदा, म्हाताऱ्या मंडळींमध्ये वाढणाऱ्या कामातुरतेवर शिक्कामोर्तब झालं आहे. अन् साठीनंतरचा काम ही काही पाश्चिमात्य लोकांची मक्तेदारी नाही, हे आपल्याकडील डॉक्टरमंडळींच्याही ध्यानी आता आलं आहे. हृदयावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर आपली कामशक्ती लय पावणार नाही ना, या शंकेने त्रस्त झालेले हृद्रोगी आहेत. म्हातारपणी होणाऱ्या पाकिर्न्सन आजारात खाल्लेल्या औषधांमुळे कामवासना वाढलेल्या आजीबाईही आहेत. इतकंच काय, हृदयाचा झटका आला तरी बेलाशक पण व्हाएग्रा वापरून लिंग ताठरता प्राप्त करून घेणाऱ्या आजोबांची उदाहरणंही आहेत.

आयुष्यातील मध्यमवयात खाणंपिणं भरपूर वाढलेलं असतं आणि थकवा येणं ही परिस्थिती बहुसंख्य लोकांच्या बाबतीत असते. स्पर्धामय जीवनात सामाजिक, आथिर्क स्तर उंचावण्याच्या धडपडीत आपण नकळत आरोग्याला गहाण टाकत जातो आणि लैंगिक जीवनाच्या सुदृढतेवरही मोठा आघात करत असतो. सर्वसाधारण: आपल्याकडील समाजात लग्न झालं, मुलंबाळं झाली की सर्व संपलं असा समज करून स्त्रिया आपलं जीवन आचरण सुरू करतात. त्यांचा वस्त्रप्रावरणांबद्दलचा नीटनेटकेपणा हरवतो. शरीराच्या आकारमानावरील ताबा सुटतो. या आणि अशा दुर्लक्षित बाबींमुळे पती-पत्नीतील आकर्षण कमी होऊ शकतं. हे आकर्षण जपून ठेवणं म्हणजे 'निज शैशवा'स जपून ठेवण्यासारखं आहे. शिवाय, शक्य तेवढं वाचन करून ज्ञानवृद्धी करणं, आपल्यातील कलागुणांचा विकास करणं यांसारख्या गोष्टींद्वारे पतीपत्नीने वैचारिकदृष्ट्या जवळीक साधली तर त्यांच्यातील आकर्षण सतत वाढीस लागतं. त्यामुळे उतरत्या वयातील कामजीवन समृद्ध होण्यास हातभार लागतो, हे सांगणे न लगेच. 





जोसेफ तुस्कानो 


http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3319369.cms

आहारातून अतिसेवन

चुकून जमिनीवर सांडलेले तेल /तूप साफ करायला वेळ व श्रम बरेच लागतात आणि एवढे करूनही ते व्यवस्थित साफ होत नाही. तुमच्या आहारातील तेल/ तूपाबाबत सुद्धा हे खरे आहे.
स्निग्धघटकातून भरपूर उष्मांक ( कॅलरीज) निर्माण होतात. आहारात जर स्निग्धघटकांचे अतिसेवन असेल तर शरीराला लागणा-या उष्मांकापेक्षा कितीतरी जास्त उष्मांक शरीरात निर्माण होतात. हे जास्तीचे उष्मांक मग शरीरात वेगवेगळ्या भागात साठवले जातात. तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात यावर शरीरात स्निग्धघटक साठण्याचे प्रमाण व जागा अवलंबून असतात.

स्त्रीच्या शरीरात पुरुषांपेक्षा जास्त स्निग्धघटके साठतात आणि हे एकदम नैसर्गिक आहे. युवा पुरुषांच्या शरीरातील स्निग्धांशाचे प्रमाण त्याच्या वजनाच्या साधारण १०-१५ टक्के असते तर युवा स्त्रीमध्ये त्याच्या दुप्पट म्हणजे तिच्या वजनाच्या २० -३० टक्के असणे हे एकदम नैसर्गिक आहे. संततीचे प्रजनन व संगोपन करणे हे स्त्रीचे नैसर्गिक काम आहे. या काळात जर तिला अन्नाची कमतरता झाली तर शरीरात साठलेल्या अतिरीक्त स्निग्धांशाच्या मदतीने शरीराची गरज भागवता यावी यासाठी निसर्गाने केलेली ती सोय आहे. त्यामुळे स्त्रीच्या प्रजनन काळात “ झीरो फिगर” चा अट्टाहास हा घातक होऊ शकतो. 
शरीरात साठलेल्या या अतिरीक्त स्निग्धांशामुळे नुसते तुमचे शरीर बेडौल दिसत नाही तर तुमच्या हृदयावरही कामाचा ताण वाढतो. ५०० ग्रॅम अतिरीक्त स्निग्धांशे तुमच्या हृदयाला ३०० किलोमीटर लांबीइतक्या जास्तीच्या रक्तवाहिण्यांमधून रक्त पाठविण्याचे अतिरीक्त काम व ताण देतात.
दुसरा तोटा म्हणजे हे सगळे स्निग्धांश रक्तातून वहात असताना ते तुमच्या रक्तवाहिण्यांच्या भिंतीवरही साठत जाऊन रक्ताभिसरणाला अडथळा निर्माण करतात. यामुळे हृदयाला होणा-या रक्तपुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण होऊन गंभीर स्वरुपाचा हृदयविकारा होऊ शकतो.
शरीरात स्निग्धघटक साठले आहेत किंवा नाही हे पाहण्य़ाची एक सोपी पद्धत म्हणजे तुमच्या कमरेचा घेर व दंडाची जाडी.
या दोन ठिकाणी तुम्ही हाताचा अंगठा व तर्जनी यांच्या चिमटीत जास्तीत जास्त स्नायु पकडण्याचा प्रयत्न करा. दोन सेंटीमिटरपेक्षा जास्त जाडी जर तुम्ही तुमच्या चिमटीत पकडू शकला तर याचा अर्थ तुम्ही चिमटीत पकडलेला हा भाग शिथिल स्नायु नसून कातडीखाली साठलेली चरबी आहे . म्हणजेच तुमच्या शरीरात आधीच जास्त स्निग्धघटक साठलेले आहेत व इथून पुढे स्निग्धघटकांच्या सेवनावर तुम्हाला बारकाईने लक्ष ठेवायला हवे.
ही कसोटी सर्वांना लागू होते मग तुमचे लिंग, वय काहीही असो. तुम्ही ही सोपी कसोटी करून पहा व तुम्हीच ठरवा तुम्ही लठ्ठ आहात किंवा नाही.
एकदा हे झाले की मग आहारातून किती स्निग्धघटक घ्यायचे हे ठरवा व त्यावर काळजीपुर्वक लक्ष ठेवा. 
तुमच्या आहारातील सर्वसाधारण अन्नप्रकारातील स्निग्धघटकांचे प्रमाण खालील तक्त्यात दिले आहे. त्यावरून तुमच्या आहारात सध्या किती स्निग्धघटक आहेत व किती घ्यायला हवेत याचा तुम्हाला अंदाज घेता येईल. हे प्रमाण एका वेळच्या खाण्यातील आहे.

अन्नप्रकार ( १०० ग्रॅम)स्निग्धांशाचे प्रमाण ( ग्रॅम)
उकडलेले किंवा भाजलेले बटाटे०.१
स्निग्धांशविरहीत दुधापासून बनविलेले दही०.३
वरीलप्रमाणेच बनविलेले ब्रेडस्प्रेड४.०
लोणी८.०
चपाती१०.०
मिल्कशेक१०.०
मलई१३.०
चॉकलेटची छोटी वडी१५.०
चीझ बर्गर१५.०
कठीण पनीर१९.०
भाजलेल्या मांसाचा तुकडा२०.०
कबाब किंवा सॉसेज२१.०
सामोसा२६.०

वरील तक्त्यावरून तुमच्या रोजच्या सर्वसाधारण आहारात असलेल्या एकावेळच्या खाण्यातील स्निग्धांशाचे प्रमाण समजते.
तुमची स्निग्धतेची रोजची गरज आहे ६५ ते ८५ ग्रॅम या दरम्यान. समजा तुम्ही एकदोन सामोसे व छोटा चॉकलेटचा बार खाल्लात तरी तुमची स्निग्धघटकाची रोजची गरज पूर्ण होते. म्हणजेच तुमचे रोजचे दोनवेळचे जेवण व इतर खाणे यातून मिळालेले स्निग्धघटक हे अतिरीक्त होतील व शरीरात साठून राहतील.

आहारातील स्निग्धघटकांचे प्रमाण तुम्ही कसे कमी कराल?
वरील कसोटीप्रमाणे तुमच्या शरीरात स्निग्धघटक साठून राहिले असतील तर प्रथम रोजच्या आहारातून तुमच्या शरीरात किती स्निग्धघटक जातात याचा वरील तक्त्यावरून तुम्ही अंदाज घ्या.
आता तुम्हाला स्निग्धघटकांचे आहारातील प्रमाण कमी करावे लागेल. हे कसे कराल?
प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा की आहारातून तेल/ तेल वा तत्सम स्निग्धघटक पूर्णत: बंद करणे आरोग्याला हानीकारक अहे आणि मुख्य म्हणजे तसे करण्याची गरजही नाही. आणि रोजचे दोनवेळचे जेवण कमी करण्याचीही गरज नाही. फक्त काही पथ्ये पाळा.
रोज शक्यतो घरचेच जेवण घ्या. कमी स्निग्धता असलेल्या पदार्थांचे प्रमाण वाढवा. म्हणजेच चपाती किंवा पराठा याऐवजी पुलकी खा. त्याला वरून तूप लावू नका. भाजलेले वा उकडलेले पदार्थ जास्त खा. नाश्त्याच्या वेळी तुम्ही पावावर लोणी लावीत असाल तर पुढच्यावेळेपासून त्यावर लोण्याचा पातळ थर द्या. उपहारगृहात खावेच लागले तर तळलेल्या सामोसे / वडे सारख्या पदार्थापेक्षा उकडलेल्या इडलीला प्राधान्य द्या. चीझ सॅन्डवीचपेक्षा व्हेज सॅन्डवीच खा. भाजलेले वा उकडलेले पदार्थ खा.
रोज एक ग्लास दूध पित असाल तर दुधातील स्निग्धांशाबद्दल तुम्हास माहीत असणे आवश्यक आहे.
मलईयुक्त पूर्ण दूध : २२.० ग्रॅम,
अर्धे स्निग्धांशयुक्त दूध : ११.० ग्रॅम
स्निग्धांश काढलेले दूध : १ ग्रॅम
तुमच्या शरीरातील स्निग्धांशाच्या प्रमाणाप्रमाणे यापैकी कोणते दूध घ्यायचे ते तुम्ही ठरवू शकता. तुम्ही जाडे नसाल व तुमचा आहार संतुलीत आहे आणि आहारात तेलही प्रमाणातच आहे तर तुम्ही अर्धे स्निग्धांश युक्त दूध ( ५०%) वापरू शकता.
तुमच्या आहारात तळलेले पदार्थ असतील, भातावर व पोळीवर तूप घेत असाल तर मात्र तुम्हाला स्निग्धांशविरहीत ( स्कीम्ड) दूधच घ्यावे लागेल.




http://knowaboutyourfood.blogspot.com/

पानगळ आणि चैत्रपालवी


सातत्याने परिवर्तन हा  निसर्ग नियम आहे. शिशिर ऋतूत निसर्गात जे बदल होतात त्याचे परिणामस्वरूप खूप मोठ्या प्रमाणावर झाडांची होत असलेली पानगळ  आपण दरवर्षी बघतो. त्यापाठोपाठ वसंत ऋतू सुरु झाला कि निसर्ग पुन्हा एकदा बदलतो आणि त्याचे परिणामस्वरूप झाडांना आलेली नवीन चैत्रपालवी सुद्धा आपण दरवर्षी बघतो. निसर्ग ऋतुचक्र दरवर्षी याप्रकारे कार्यरत असते. शिशिर ऋतू आल्यावर झाडांची जुनी पाने कोणतीही खळखळ न करता त्या त्या झाडापासून वेगळी होतात आणि नवीन येणाऱ्या चैत्र पालवीला जागा करून देतात.
आम्हाला असलेला अनुभव नवीन येणाऱ्या पानाना नाही असे जुनी पाने म्हणत नाही. आम्ही नसलो तर झाडाचे कार्य व्यवस्थित चालणार नाही अशा गमजा ती जुनी पाने करत नाहीत. चैत्र महिन्यात येणारी नवीन पालवी कोणताही अनुभव गाठीशी नसताना जुन्या पानांची कमतरता भासू न देता नवीन जोमाने त्या झाडाची कार्ये पूर्वी सारखीच पूर्ण करतात.
प्रत्यक्ष जीवनात मात्र हे चित्र सहसा दिसत नाही. घराघरातील वयोवृध्द स्वखुशीने तरुणांच्या हातात संसाराची सूत्रे सोपवताना फार कवचित दिसतात. आम्ही गेली कैक वर्षे जसे करत आलो आहोत तसेच पुढे चालू ठेवण्याचा त्यांचा हेका कमी होताना दिसत नाही. एकंदर आयुष्मान वाढत चालले आहे त्यामुळे ज्या घरात ७५-८० चे वयोवृध्द आहेत त्या घरात ५० च्या जवळपास असणाऱ्या त्यांच्या पुढील पीढीला स्वतंत्र पाने संसार करता येत नाही आणि त्यांच्या मनातील स्वतंत्र संसारच्या कल्पना पूर्ण झालेल्या नसतानाच त्यापुढील पीढी सुद्धा त्यांच्या मनासारखे करता येत नाही म्हणून चीचीद करताना दिसते.
जी गोष्ट घरात तीच गोष्ट बाहेरील कार्य क्षेत्रात दिसून येते. व्यवसाय क्षेत्र असो किवा राजकारण असो वायोवृधानी  आपले अधिकार स्वताहून पुढील पिढीच्या हाती सोपवले आहेत हे दृश्य काहुपाच तुरळकपणे पाहण्यास मिळते.
कोणत्याही गोष्टीचा मोह ठेऊ नये अशी अध्यात्माच्या नावाने सकाळ संध्यकाळ पोपटपंची करणारी मंडळी सुद्धा याला अपवाद दिसत नाहीत.
स्वताचे अधिकार स्वताहून सोडणे हे आपण पानगळ ते चैत्र पालवी या अविरत चालणाऱ्या निसर्ग दृश्यातून कधी शिकणार आहोत का ?               

Vasant Chintaman Joshi



  • A6/12, BEST NAGAR, GOREGAON(W0
  • Mumbai, India 400104

  • 9323406386


Monday, October 24, 2011

स्वतःला उटणे लावणे

स्वतःला उटणे लावणे
१. कपाळ : कपाळावर लावतांना मधल्या तीन बोटांचा उपयोग करून स्वतः लावतांना डावीकडून उजवीकडे या पद्धतीने लावावे. परत उलट्या दिशेने त्यावरून हात फिरवू नये. उलट्या दिशेने हात फिरवल्याने त्रासदायक स्पंदनांची निर्मिती होते. लावतांना थांबून परत डावीकडून उजवीकडे यावे. कपाळाच्या पोकळीत साठलेल्या त्रासदायक स्पंदनांची गती ही डावीकडून उजवीकडे असल्याने त्याच पद्धतीने या स्पंदनांना कार्यरत करून उटण्यातील तेजोमय स्पर्शाने त्यांचे विघटन केले जाते.

२. कपाळाच्या दोन्ही टोकांना बाजूला भुवईजवळ : येथे लावतांना ते बोटांच्या अग्रभागांनी डावीकडून उजवीकडे (खालून वरच्या दिशेने), तसेच उजवीकडून डावीकडे (वरून खालच्या दिशेने) चोळून लावावे. या भागात सुप्त असणार्‍या त्रासदायक लहरींचे वहन दोन्ही बाजूंनी होत असल्याने दोन्ही बाजूंनी घर्षण करून त्यांच्यातील त्रासदायक स्पंदनांना नष्ट करावे.

३. डोळ्यांच्या पापण्या : यांवर लावतांना नाकाकडून कानाकडे हात फिरवावा.

४. नाक : उजव्या हाताचा अंगठा आणि तर्जनी यांनी नाकाच्या दोन्ही बाजूंनी खालच्या दिशेने उतरत यावे आणि खाली आल्यावर उटण्याचा वास घ्यावा. उटण्याच्या वासातून प्रक्षेपित होणारा तेजाशी संबंधित गंध फुफ्फुसांतील वायूकोषात गेल्याने तेथील काळे आवरण नष्ट होण्यास साहाय्य होते.

५. मुखाचा वरचा भाग : या भागातून, म्हणजेच नाकाच्या खालून मधली तीन बोटे ठेवून प्रारंभ करून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने मुखाभोवती गोल, म्हणजेच हनुवटीच्या खड्ड्यातून वर स्वतःच्या डावीकडे जाऊन मुखाभोवतीचा गोल पूर्ण करावा.
६. गालांच्या पोकळी : यांत केंद्रबिंदूशी अनेक टाकाऊ वायू घनीभूत झालेले असल्याने उटणे गालाला लावतांना गालाच्या मध्यभागातून प्रारंभ करून घड्याळाच्या काट्याप्रमाणे बोटांची अग्रे गोल गोल फिरवून लावावे. यामुळे गालातील मध्यपोकळीत घनीभूत झालेली त्रासदायक स्पंदने कार्यरत होऊन त्यांचे विघटन त्याच जागी होण्यास साहाय्य होते.

७. कानाची पाळी : ही तर्जनी आणि अंगठा यांमध्ये धरून तिथल्या तिथे हालवून उटणे लावावे.

८. दोन्ही कान : दोन्ही कान हातांनी पकडून कानाच्या मागच्या बाजूला फक्त अंगठा ठेवून खालून वरच्या दिशेने फिरवावा.

९. मान : मानेच्या मागून मध्यातून दोन्ही हातांची बोटे पुढे विशुद्ध चक्राकडे आणणे

१०. छाती आणि पोट यांचा मध्यभाग : उजव्या हाताच्या तळव्याने छातीच्या मध्यरेषेवर वरून खालच्या दिशेने नाभीकडे हात फिरवत आणणे. यामुळे चक्रे जागृत होतात. त्यानंतर दोन्ही हातांची बोटे छातीच्या मध्यरेषेशी येतील अशा पद्धतीने दोन्ही हात वरून खाली एकाच वेळी फिरवावेत.

११. काखेपासून कमरेपर्यंत : काखेपासून पितृतीर्थासारखा हात, म्हणजेच अंगठा एका बाजूला आणि चार बोटे दुसर्‍या बाजूला ठेवून अंगाच्या दोन्ही बाजूच्या रेषेवरून वरून खाली या पद्धतीने फिरवावेत.

१२. पाय आणि हात : हाताची बोटे फिरवत पायांवर आणि हातांवर वरून खालच्या दिशेने उटणे लावावे.

१३. पावलाच्या आणि पायाच्या जोडरेषा : पावलाच्या आणि पायाच्या जोडरेषेवर अंगठा आणि तर्जनी यांनी विळखा घालून तो भाग कड्यासारखा घासावा.

१४. डोक्याच्या मध्यभागी : डोक्याच्या मध्यभागी तेल लावून ते हाताने घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरवावे.

१. पाठ : दुसर्‍या व्यक्तीच्या पाठीला उटणे लावतांना पाठीच्या मणक्याच्या रेषेशी दोन्ही हातांच्या बोटांची अग्रे येतील अशा पद्धतीने वरून खालच्या दिशेने दोन्ही हात एकाच वेळी फिरवावेत.

२. कंबर : दुसर्‍या व्यक्तीला लावतांना कमरेच्या आडव्या रेषेवर पाठीकडून तिच्या डाव्या बाजूकडून उजवीकडे येऊन परत उजवीकडून डावीकडे जावे. असे परत परत लावावे.



http://www.facebook.com/pappukaka5

Tuesday, October 4, 2011

नक्षत्र, देवता आणि आराध्य वृक्ष

नक्षत्र, देवता आणि आराध्य वृक्ष
आपल्या पत्रिकेत चंद्र ज्या नक्षत्रात असतो ते आपले जन्म नक्षत्र असते.
उपासना मार्गावर, भक्ती मार्गावर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी कोणत्याही देवतेची उपासना केली तरी प्रथम आपल्या जन्म नक्षत्राची जी देवता आहे त्या देवतेचे स्मरण प्रथम करणे आवश्यक आहे. इतर देवतेपर्यंत पोचण्यासाठी आपल्या जन्म नक्षत्र असलेल्या देवतेला बायपास करू नये. आपल्या आर्ध्य वृक्षाचे चित्र जरी आपल्या नित्य वावर असलेल्या जागी ठेवले तरी ते लाभदायक ठरते..
शरदिनी डहाणूकर यांच्या नक्षत्रवृक्ष या पुस्तकात प्रत्येक वृक्षाचे रंगीत चित्र आहे व अधिक माहितीसुद्धा आहे.
खाली दिलेले टेबल दाते पंचांगकर्ते यांच्या नक्षत्र: देवता आणि वृक्ष मधून संकलित केले आहे.      
नक्षत्र                            देवता               आराध्यवृक्ष
आश्विनी                    अश्विनीकुमार             कुंचला
भरणी                         यम                          आवळ
कृत्तिका                       अग्नी                        उंबर
रोहिणी                         ब्रम्हा                      जांभळी
 मृग                            चंद्र                          खैर
आर्द्रा                           शंकर                         कृष्णागरु
पुनर्वसू                         अदिती                      वळू
पुष्य                             बृहस्पती                  पिंपळ
आश्लेषा                         सर्प                         नागचाफा
मघा                             पितर                          वट
पूर्वा                              भग                         पळस
उत्तरा                             अर्यमा                    पायरी
हस्त                             सूर्य/सविता                जाई
चित्रा                            त्वष्टा                        बेल
स्वाती                          वायू                        अर्जुन
विशाखा                         इंद्राग्नी                    नागकेशर
अनुराधा                       मित्र                         नागचाफा
ज्येष्ठा                           इंद्र                           सांबर
मूळ                               निरुती                     राळ
पूर्वाषाढा                        उदक/आप              वेत
उत्तराषाढा                      विश्वेदेव                    फणस
श्रवण                           विष्णू                       रुई
धनिष्ठा                           वसू/गंधर्व                शमी
शततारका                     वरुण                      कळंब
पूर्वाभाद्रपदा                   अजैकपाद               आम्र
उत्तराभाद्रपदा                  अहिर्बुध्य                कडूलिंब
रेवती                              पूषा                       मोह
  



http://www.facebook.com/vasantcjoshi
Vasant Chintaman Joshi

  • A6/12, BEST NAGAR, GOREGAON(W0
  • Mumbai, India 400104
  • 9323406386


Wednesday, September 14, 2011

श्रावण मास, नको तब्येतीला त्रास !


श्रावण मास, नको तब्येतीला त्रास !

सणवार साजरे करणे यासारखा आनंद मनुष्याला इअतर कशात मिळत असेल असे मला वाटत नाही. वर्षभर आपण कोणते ना कोणते सण, उत्सव साजरे करीतच असतो. मात्र चातुर्मास म्हणजे या सगळ्या सणवारांचा राजा असे म्हणणे वावगे ठरणार नाही. या चातुर्मासाला धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्व आहे. मंगळागौर, नागपंचमी,नारळी पौर्णिमा, गणपती, नवरात्र, दसरा, द्वाळी असे अनेक सण, उत्सव याच काळात साजरे होतात. असे असले तरी या चार महिन्यांमध्ये श्रावण महिन्याचे महत्व जरा अधिकच आहे.
      धर्मशास्त्रानुसार चातुर्मासाचा आरंभ आषाढी एकादशीला होतो. या एकादशीलाच “शयनी एकादशी” असेही म्हणतात. कारण या दिवशी भगवान विष्णु शयन करतात, झोपी जातात आणि कार्तिकी / प्रबोधिनी एकादशीला ते जागे होतात अशी समजुत आहे. जेव्हा देव झोपलेले असतात त्या काळात असुरांचे, राक्षसांचे बळ वाढलेले असते. सर्वत्र त्यांचेच साम्राज्य पसरलेले असते. अशावेळी मनुष्याने या असुरांपासुन स्वतःचे रक्षण करणे आवश्यक आहे. हे राक्षस, असुर म्हणजे कोणी प्राणीमात्र आहेत असे समजण्याऐवजी काम, क्रोध, लोभ, द्वेष, असुया , मत्सर यासारखे षड्-रिपु म्हणजेच असुर होय असे मला वाटते. आयुर्वेदानुसार सत्व हा मनाचा गुण आहे आणि रज व तम हे मनाचे दोष आहेत. यापैकी रज व तम वाढले की काम-क्रोध आदी भाव मनात वाढीस लागतात. थोडक्यात कामक्रोधादी भावांचा नाश करण्यासाठी मनाचा सत्व गुण वाढविणे हा योग्य उपाय आहे. म्हणुनच चातुर्मासात किंवा श्रावणात यम, नियम, आहाराविषयीचे नियम, धार्मिक ग्रंथांचे पठण, तुलसीपूजन, दानधर्म, उपवास, लंघन, देवदर्शन यासारख्या सात्विकता वाढविणा-या गोष्टींचा अवलंब करणे फायद्याचे ठरते यात शंका नाही.
      ज्याप्रमाणे आपले वागणे आपल्या मनावर प्रभाव टाकत असते त्याचप्रमाणे आपला आहारदेखिल मनावर प्रभाव करीत असतो आणि मनाचा आहारावर प्रभाव पडत असतो. उदाहरणासाठी आपल्याला सांगता येईल कि नासके, खराब, व्यवस्थित न शिजवलेले अन्न मनामध्ये उद्विग्नता, घृणा निर्माण करते आणि परिक्षेच्या काळात मनावर आलेल ताण भूक कमी करतो, अपचन-अजीर्ण-अम्लपित्त यासारखे त्रास निर्माण करतो. थोडक्यात अन आणि आहार यांचा खुप जवळचा संबंध आहे. श्रावण महिना म्हणजे पावसाळ्याचा काळ आहे. त्यामुळे मुळातच निसर्गतः शरीरात वातदोष वाढलेला असतो, भूक मंदावलेली असते. जर या काळात पथ्य पाळले नाही तर पचन बिघडून वेगवेगळे शारीरिक त्रास सुरु होतो आणि मनालाही त्याचा त्रास होतो.
      चातुर्मास आणि त्यातही श्रावण म्हणजे नुसती उपास-तापासांची रेलचेल असते. खरंतर मूळ शब्द “उपास” हा नसून तो आहे “उपवास”. त्या शब्दाची फोड होते उप + वास. “उप” म्ह्णजे जवळ आणि “वास” म्हणजे राहणे. “देवाच्या जवळ राहणे” असा लाक्षणिक अर्थ उपवास या शब्दातून व्यक्त होतो आणि नुसतेच देवाच्या जवळ राहणे असे नाही तर देवाजवळ तहानभूक विसरून राहणे अपेक्षित आहे. व्यवस्थित खाऊन-पिऊन देवाची पूजा अचना करायला मन तयार होणार नाही. उपवासाला भरपूर खाल्लेल्या खाण्याने आलेले आळस , सुस्ती हे मनाला आणि शरीराला स्वस्थता लाभू देणार नाहीत आणि म्हणुनच उपवासाने पूर्ण लंघन, एकभूक्त किंवा लघ्वशन अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र “एकादशी आणि दुप्पट खाशी” ही म्हण प्रत्ययास येते. उपवासाला चालणा-या पदार्थांची यादी पाहिली कि ज्यांनी या गोष्टी उपवासाला चालतात असे ठरविले त्यांचे खूप कौतुक (?) वाटते. हे सगळे पदार्थ पचायला जड या श्रेणीत बसतात. उपवासाला आणि चातुर्मासात चालणारे आणि न चालणारे पदार्थ म्हणजे भगर, साबुदाणा, शिंगाडा, राजगिरा, बटाटा, रताळी, दही, ताक, कांदा आणि लसुण असे आहेत. यातील कांदा आणि लसुण सोडून इतर सगळे पदार्थ उपवासाला चालत असले तरी त्यांचे गुणधर्म बघितल्यानंतर आपण आपलेच ठरवायचे की त्यांचे सेवन उपवासाला करायचे कि नाही ?

१)     भगर – भगरीलाच वरी असेही नाव आहे. बहुधा जेथे नाचणी पिकते तिथेच भगरही पिकते. याचा भात, लाट्या, पीठ तयार करून वापर केला जातो. वरी गोड, तुरट रसाची असून वृष्य (मैथुनक्षमता वाढविणारी ) आहे. शरीरातील वात आणि पित्त यांचा नाश करणारी असल्याने थोड्या प्रमाणात खायला हरकत नाही.
२)     साबुदाणा – एका प्रकारच्या स्टार्चपासूनहा पदार्थ बनविला जातो. ताडासारख्या जातीच्या वृक्षापासून हा तयार होतो. खिचडी किंवा तळलेला वडा या स्वरूपात हा पचायला अतिशय जड असणारा हा पदार्थ आहे. त्यामुळे उपवासाला अजिबात खाऊ नये. अगदिच खायचाच असेल तर दुधात बनविलेली खीर बरी. पण आव, अपचन, भूक नसणे यात या कडे बघूही नये. मुळात ज्यांना साबुदाणा खुप आवडतो त्यांनी एकदा साबुदाण्याच्या कंपनीला भेट द्यावी. नंतर साबुदाणा खायची इच्छा मरते हे मात्र नक्की.
३)     शिंगाडा – पाण्यात तयार होणारी ही वेल आहे. याची फळे आपण वापरतो. शिंगाडा गोड रसाचा, थंड गुणाचा, पचायला जड, पित्त-रक्तविकार,दाह यांचा नाशक आहे. बळ देणारा शिंगाड्याच्या पीठाचा शिरा तहान, जुलाब, संग्रहणी, गर्भस्त्राव यात उपयुक्त असला तरी कमी मात्रेत खाण्यास योग्य आहे.
४)     राजगिरा – पुरुषभर उंचीचे हे झुडुप असते. याची लागवड केली जाते. याच्या बियांमध्ये पुष्कळ पौष्टीक गुण आहेत. लघवीला साफ करणार आणि रक्तातील दोष दूर करणारा राजगिरा मूळव्याधीतही फायद्याचा आहे. पचायला हलका असल्याने सर्व उपवासाला चालणा-या पदार्थांमध्ये याचा नंबर एक लागतो.
५)     बटाटा व रताळी – कंदमूळ या प्रकारात मोडणारे हे दोन्ही पदार्थ गोड रसाचे, थंड, पचायला जड, बळ वाढविणारे आहेत. कच्चा बटाटा दाह करणारा आणि कैफ आणणारा आहे. मात्र उकडल्यावर हे दोष कमी होतात ( नष्ट नाही. ). मधुमेही, संग्रहणी, जुलाब व पोटात मुरडा येणा-या रोग्यांनी बटाटा टाळावा. आग होणे, लघवीच्या तक्रारीत रताळी उपयुक्त आहे. पण हे दोन्ही पदार्थ तारतम्याने खावे.
६)     दही आणि ताक – दही हे उष्ण ( थंड अजिबात नाही ) , बूक वाढविणारे, पचायला जड, पचल्यावर आंबट रस तयार करणारे, पित्त-रक्तविकार-सूज-मेद-कफ वाढविणारे आहे. त्यामुळे उपवासाला इतर पदार्थ पचन बिघडविणारे असतांना त्यात भरीसभर म्हणुन दही अजिबात खाऊ नये. मात्र दह्यात चारपट पाणी टाकुन, रवीने घुसळुन लोणी काढलेले ताक मात्र ह्या पृथ्वीवरचे अमृत आहे. ताक हे तुरट गोड रसाचे, पचल्यावर गोड होणारे, पचायला हलके, उष्ण, तृप्ती देणारे आणि वातनाशक आहे. म्हणुन उपवासाला दह्यापेक्षा ताक चांगले. मात्र अंगाची आग, रक्तपित्त, चक्कर येणे यात ताक टाळावे.
७)     कांदा आणि लसुण – वर आपण उपवासाला आणि चातुर्मासात चालाणा-या (?) पदार्थांची माहिती पाहिली. पण कांदा आणि लसुण हे न चालणरे पदार्थ आहे. कांदा हा भरपूर औषधी गुणयुक्त असला तरी तो रज आणि तम दोष वाढविणारा आहे तसेच तो अमेध्य (बुध्दीला उपयुक्त नसणारा) आहे. त्यामुळे चातुर्मासात किंवा श्रावणात जेव्हा मनाचा सत्व गुण वाढणे अपेक्षित आहे तेव्हा कांदा त्याला मारक ठरतो कारण तो रजोतमोवर्धक आहे. राहू चोरून अमृत प्यायला, त्यामुळे त्याचा गळा कापतांना जे अमृताचे थेंब खाली पृथ्वीवर पडले त्यातुन लसुणाची उत्पत्ती झाली अशी एक कथा आहे. थोडक्यात असुरांपासुन लसणाची उत्पत्ते झाली आहे त्यामुळे तो याकाळात वर्ज्य आहे. अन्यथा लसुणामध्ये औषधी गुण ठासून भरलेले आहेत.
उपवासाला चालणारे पदार्थ, त्यांचे गुणधर्म बघितल्यानंतर “एकादशी अन दुप्पट खाशी” ही म्हण खोटी पाडली पाहिजे असे वाटते. कारण आपण फक्त उपवासाला भरपूर खातो आणि इतर वेळी मात्र फार पथ्याने राहतो अशी परिस्थीती नाही. आणि म्हणुनच इतर काळात केलेल्या अपथ्यामुळे शरीरात तयार झालेले दोष उपवासाने, लंघनाने कमी करण्यासाठी उपवास हा कडकडीत करून पचनशक्तीला  काम करायला अवसर दिला पाहिजे तर तो उपवास आपल्याला लाभेल.
      लंघनाने होणारे फायदे वाचले तर तुम्हीही माझ्या म्हणण्याला दुजोरा द्याल यात शंका नाही.
“विमलेन्द्रियता सर्गो मलानां लाघवं रुचिः ।
क्षुत्तृट्सहोदयः शुध्दहृदयोद्गारकण्ठता ॥
व्याधीमर्दवमुत्साहः तन्द्रानाश्चलंघिते ॥“ ( अष्टांग हृदय/सुत्र/१४)
थोडक्यात सर्व इंद्रिये (कर्मेन्द्रिय,ज्ञानेन्द्रिय,मन) प्रसन्न होणे, शरीरातील मळ बाहेर टाकला जाणे, अंगाला हलकेपणा येणे, रुची उत्पन्न होणे, भूक आणि तहान यांचा एकाचवेळी योग्य प्रादुर्भाव होणे, हृदय आणि कंठ शुध्द होणे, शुध्द ढेकर येणे ( कडवट-आंबट ढेकर नसणे), शारीरिक रोगांचा जोर कमी होणे, उत्साह वाढणे आणि झापड- तंद्रा कमी होणे हे सगळे फायदे लंघनाने होतात.
      हे सगळे पाळले गेले तर आपल्या पूर्वीच्या आचार्यांना उपवासाने अपेक्षित असलेले ध्येय आपण गाठू शकू, नाही का ?


                                                                 वैद्य . मनीष जोशी,
७, गुंजाळ एव्हेन्यु, महिला बँकमागे,
इंदिरानगर,
नाशिक – ४२२००९
फोन – ९४२०४६२०५ / ९८८११५०२७२


Visit Our Page