#आयुमित्र
गर्भाधान पूर्वतयारी आणि आयुर्वेद
सध्या लग्नाचा सीजन सुरु झाला आहे. अनेक तरुण जोडपी आपल्या जीवनाची नवी सुरवात करणार आहेत. लग्न झाल्यानंतर पतीपत्नी संततीप्राप्ती गर्भाधानाकडे वळतात. आयुर्वेदात ह्याला सुद्धा एक संस्कार म्हंटलेले आहे. उत्तम व निरोगी संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करायचा असल्यास उचित गर्भाधान विधी करणे महत्वाचे आहे.
गर्भाधनाची पूर्वतयारी कशी करावी?
“शुध्दबिजा पोटी फळे रसाळ गोमटी..|”
जसे उत्तम व निरोगी फळासाठी बीजही उत्तम व शुध्द हवे, तसेच निरोगी व उत्तम संतती प्राप्तीसाठी शुक्र(पुरुष बीज) व शोणित( स्त्रीबीज) हे शुध्द असणे आवश्यक आहे. आयुर्वेदाने ह्यासाठी उत्तम मार्गदर्शन केलेले आहे. शुध्द स्त्री व पुरुषबीजासाठी पतीपत्नीने खालील उपाय करावे.
1) दोघांनी वैद्यानकडून शरीरशुद्धी म्हणजेच पंचकर्म करून घ्यावे.
2) पुरुषाने गाईचे दुध, तूप आहारात घ्यावे तर स्त्रीने तीळ तेल व उडीद ह्याचा आहारात वापर करावा.( टीप– सोबत इतर आहार सुद्धा घेऊ शकता पण प्रामुख्याने वरील आहार घ्यावा. तसेच आपल्या वैद्यांशी संपर्क करून ह्या आहाराचे प्रमाण निश्चित करून घ्यावे.)
3) एक महिनाभर वरील आहार घ्यावा व ह्याकाळात दोघांनी ब्रम्हचर्य पालन करावे.(शरीरसंबंध ठेवू नये)
वरील उपायांनी स्त्री व पुरूषबीज सुदृढ व शुध्द होते आणि पुढे उत्तम संतातीसाठीचे गर्भाधान करता येते.
निरोगी संतती हि निरोगी समाज निर्माण करेल आणि निरोगी समाज निरोगी देश निर्माण करेल.
(आजचा लेख खास माझ्या सर्व नव वर व वधु मित्र मैत्रीणीना समर्पित)
-वैद्य भूषण मनोहर देव.
ज्योती आयुर्वेद, जळगाव 8379820693
drbhushandeo@gmail.com
No comments:
Post a Comment